India-ASEAN partnership may be just 25 years old. But, India’s ties with Southeast Asia stretch back more than two millennia: PM
India's free trade agreements in ASEAN region are its oldest and among the most ambitious anywhere, says the PM
Over six-million-strong Indian diaspora in ASEAN- rooted in diversity & steeped in dynamism - constitutes an extraordinary human bond: PM

“आसियान-भारत सामायिक मूल्ये , समान भवितव्य ” या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसियान-भारत भागीदारीबाबत आपली कल्पना मांडली आहे. आसियान  देशांच्या प्रमुख दैनिकांमध्ये हा लेख प्रसिद्ध झाला आहे. या लेखातील संपूर्ण मजकूर पुढीलप्रमाणे :

आसियान-भारत सामायिक मूल्ये , समान भवितव्य

– नरेंद्र मोदी

आज सव्वाशे कोटी भारतीयांना आमची राजधानी नवी दिल्ली येथे भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात -आसियान देशांचे प्रमुख-१० मान्यवर अतिथींसाठी यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे.

गुरुवारी, आसियान-भारत भागीदारीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने स्मृती परिषदेसाठी १० प्रतिष्ठित पाहुण्यांचे स्वागत करण्याचे सौभाग्य मला लाभले. त्यांची आमच्यातील उपस्थिती हे आसियान देशांच्या चांगुलपणाचे अभूतपूर्व दर्शन आहे. त्याला प्रतिसाद म्हणून, हिवाळ्यातील या प्रसन्न सकाळी त्यांना मैत्रीपूर्ण आलिंगन देण्यासाठी भारतीय जनता बाहेर पडली आहे.

हा काही साधारण कार्यक्रम नाही. एका अद्भुत प्रवासातील हा एक ऐतिहासिक टप्पा आहे ज्याने भारत आणि आसियानला त्यांच्या १.९ अब्ज जनतेसाठी  म्हणजेच सुमारे एक चतुर्थांश मानवजातीसाठी एका दृढ भागीदारीत गुंफले आहे.

भारत-आसियान भागीदारी फक्त 25 वर्षांची असेल. परंतु, दक्षिणपूर्व आशियाबरोबर भारताचे संबंध दोनशे वर्षांपेक्षा अधिक जुने आहेत. शांतता आणि मैत्री, धर्म आणि संस्कृती, कला आणि वाणिज्य, भाषा आणि  साहित्याने परिपूर्ण  हे दुवे भारत आणि दक्षिण-पूर्व आशियातील भव्य विविधतेच्या प्रत्येक पैलूमध्ये आता दिसून येतात, ज्याने आमच्या लोकांमध्ये सहजता आणि परिचयाचे विशिष्ट कवच उपलब्ध करून दिले आहे.

दोन दशकांपूर्वी, भारताने भौगोलिक बदलांसह स्वतःला जगासमोर खुले केले. आणि, शतकानुशतके बहाल केलेल्या कौशल्यामुळे ते नैसर्गिकरित्या पूर्वेकडे वळले. त्यामुळे पूर्वेकडील देशांबरोबर भारताच्या पुनर्एकात्मीकरणाचा  एक नवीन प्रवास सुरू झाला. भारतासाठी, आमचे प्रमुख भागीदार आणि बाजारपेठा  – आसियान आणि पूर्व आशिया ते उत्तर अमेरिका – पूर्वेपर्यंत आहेत आणि  जमीन आणि समुद्राच्या माध्यमातून आमचे  शेजारी असलेले आग्नेय आशिया आणि आसियान आमच्या लुक ईस्टचे आणि गेल्या तीन वर्षांपासून ऍक्ट ईस्ट धोरणाचे व्यासपीठ आहे.

या काळात, संवाद भागीदारीकडून आसियान आणि भारत धोरणात्मक भागीदार बनले. आम्ही ३० यंत्रणांच्या माध्यमातून आमची व्यापक भागीदारी पुढे नेली. प्रत्येक आसियान सदस्य देशाबरोबर आम्ही राजनैतिक, आर्थिक आणि सुरक्षा भागीदारी वाढवत आहोत. आमच्या सागरी सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही एकत्रितपणे काम करत आहोत. आमचा व्यापार आणि गुंतवणूक ओघ अनेकदा कित्येक पटीने वाढला आहे. आसियान हा भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. भारत आसियानचा सातवा आहे. भारताची २० टक्क्यांहून अधिक परदेशी गुंतवणूक आसियान मध्ये जाते. सिंगापूरच्या नेतृत्वाखाली आसियान हा भारताचा आघाडीचा गुंतवणूक स्रोत आहे. या प्रांतातील भारताचे मुक्त व्यापार करार हे सर्वात जुने आणि अतिशय महत्वाकांक्षी आहेत.

हवाई संपर्क  वेगाने विस्तारलेले आहेत आणि आम्ही नवीन निकड आणि प्राधान्यक्रमासह  दक्षिणपूर्व आशियामध्ये  महामार्गांचा विस्तार करीत आहोत. संपर्क मार्ग वाढण्यामुळे सान्निध्याची पुनरावृत्ती झाली आहे. दक्षिणपूर्व आशियातील पर्यटनात भारत अग्रस्थानी राहिला आहे. या प्रदेशात 6 दशलक्षहून अधिक भारतीय समुदाय आहे – वैविध्यपूर्ण  आणि गतिशील – आपल्यात एक विलक्षण मानवी नाते आहे.

पंतप्रधानांनी प्रत्येक आसियान सदस्य देशाबाबत आपली मते पुढीलप्रमाणे मांडली आहेत.

थायलंड

आसियानमध्ये थायलंड भारताचा एक महत्त्वाचा व्यापार भागीदार म्हणून उदयास आला आहे आणि भारतातील आसियानमधील महत्त्वाचा गुंतवणूकदारांपैकी एक आहे. गेल्या दशकभरात भारत आणि थायलंड या देशांमधील द्विपक्षीय व्यापार दुपटीहून अधिक वाढला आहे. भारत आणि थायलंड यांच्यातील संबंध अनेक क्षेत्रात विस्तारलेले आहेत. आम्ही दक्षिण आणि आग्नेय आशियाला जोडणारे महत्वाचे  क्षेत्रीय भागीदार आहोत. आम्ही आसियान, पूर्व आशिया शिखर परिषद आणि बिमस्टेक (मल्टी-सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कोऑपरेशनसाठी बंगालचा उपक्रम) मध्ये तसेच मैकोंग गंगा सहकार्य , आशिया सहकार्यात्मक संवाद आणि इंडियन ओशन रिम असोसिएशनच्या चौकटीत सहकार्य करतो. 2016 मध्ये थायलंडच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याने द्विपक्षीय संबंधांवर दीर्घकालीन प्रभाव पाडला आहे.

महान आणि लोकप्रिय राजे भूमिबोल अडुल्यादेज यांच्या निधनाच्या वेळी संपूर्ण भारताने आपल्या थाई बंधु आणि बहिणींसह शोक व्यक्त केला होता. नवीन राजे  महा वजिरालोंगकोम यांच्या दीर्घ, समृद्ध आणि शांततापूर्ण कारकिर्दीसाठी प्रार्थना करण्यासाठी भारताचे लोक थायलंडमधील मित्रांसमवेत सहभागी झाले होते.

व्हिएतनाम

पारंपारिक रूपाने जवळचे आणि सौहार्दपूर्ण नातेसंबंधांची ऐतिहासिक मुळे  ही  परकीय गुलामगिरीतून  मुक्ततेसाठी आणि स्वातंत्र्यासाठीच्या  राष्ट्रीय संघर्षासाठी सामायिक लढ्यात आहेत. महात्मा गांधी आणि अध्यक्ष हो ची मिन्ह यांच्यासारख्या पुढाऱ्यांनी वसाहतवादविरोधी लढ्यामध्ये आमच्या लोकांचे नेतृत्व केले. २००७ मध्ये पंतप्रधान गुयेन टॅन डुंग यांच्या भारत भेटीदरम्यान, आम्ही धोरणात्मक भागीदारी करारावर  स्वाक्षरी केली. २०१६ मधील माझ्या व्हिएतनाम दौऱ्यामुळे ही धोरणात्मक भागीदारी व्यापक धोरणात्मक भागीदारीत रूपांतरित झाली आहे.

व्हिएतनामसह भारताचे  संबंध आर्थिक आणि व्यावसायिक भागीदारीने परिपूर्ण आहेत. भारत आणि व्हिएतनाम  यांच्यात द्विपक्षीय व्यापार 10 वर्षांत दहापट वाढला आहे. भारत आणि व्हियेतनाम यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा एक महत्वपूर्ण स्तंभ म्हणून संरक्षण सहकार्य उदयाला आले आहे. भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान हे सहकार्याचे आणखी एक महत्वाचे क्षेत्र आहे.

भारत आणि म्यानमार यांची  1600 किमी पेक्षा अधिक भूसीमा आणि सागरी सीमा सामायिक आहे. नातेसंबंधाच्या गहन संवादातून वाहणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमुळे आणि आपल्या बौद्ध धर्मातील समान परंपरेने आपल्याला  ऐतिहासिक भूतकाळाप्रमाणे एकत्र बांधले आहे.  श्वेडगोन  पॅगोडाच्या तेजस्वी  टॉवरपेक्षा काहीही अधिक तेजस्वी नाही. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण संस्थेच्या सहाय्याने बागानमध्ये आनंद मंदिराची पुनर्बांधणी  करण्याचे  सहकार्य या सामायिक वारसाचे प्रतीक आहे.

वसाहती काळामध्ये,स्वातंत्र्यासाठीच्या सामायिक संघर्षात आशा आणि एकतेची भावना दाखवणाऱ्या आपल्या नेत्यांमध्ये राजकीय संबंध निर्माण झाले  गांधीजीनी यांगॉनला  अनेक वेळा भेट दिली. बाळ  गंगाधर टिळक हे अनेक वर्षे  यांगॉनला निर्वासित केले गेले. भारताच्या स्वातंत्र्यासाठी नेताजी  सुभाषचंद्र बोस यांच्या आवाहनाने म्यानमारमधील अनेकांची मने जागृत केली.

गेल्या दशकात आमचा व्यापार  दुपटीने  अधिक वाढला आहे. आमचे  गुंतवणूक संबंध देखील मजबूत आहेत. म्यानमारबरोबर भारताच्या संबंधांमध्ये विकास  सहकार्य महत्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे. हे सहाय्य  सध्या 1.73 अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक आहे. भारताचे  पारदर्शक  विकास सहकार्य म्यानमारच्या राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी सुसंगत आहे आणि आसियान कनेक्टिव्हिटीच्या प्रमुख आराखड्याशी  समन्वय स्थापित करते.

सिंगापूर

या  प्रदेशाशी भारताच्या संबंधांचा वारसा , सध्याची प्रगती आणि भविष्यातील संभाव्यता यांची सिंगापूर ही एक खिडकी आहे.   सिंगापूर  हा  भारत आणि आसियान यांच्यातील एक पूल होता.

आज, हा  आमचा  पूर्वेकडील प्रवेशद्वार आहे,  आमचा आघाडीचा  आर्थिक भागीदार आणि एक प्रमुख जागतिक धोरणात्मक भागीदार आहे, जे अनेक प्रादेशिक आणि जागतिक मंचांवरील आमच्या सदस्यत्वामध्ये प्रतिबिंबित होते. सिंगापूर आणि भारत यांच्यात एक धोरणात्मक भागीदारी आहे.

आमच्या राजकीय संबंध सदिच्छा, प्रेम, आणि  विश्वासार्हतेमध्ये समाविष्ट आहेत. आमचे संरक्षण संबंध हे दोघांसाठी  सर्वात मजबूत आहेत.

आमच्या आर्थिक भागीदारीने आमच्या दोन देशांच्या  प्रत्येक प्राधान्य क्षेत्राचा समावेश केला आहे. सिंगापूर हे भारताचे प्रमुख गंतव्यस्थान आणि गुंतवणुकीचे स्त्रोत आहे.

हजारो भारतीय कंपन्या सिंगापूरमध्ये नोंदणीकृत आहेत

सिंगापूरमध्ये 16 भारतीय शहरांमधून दर आठवड्याला 240 थेट उड्डाणे आहेत. सिंगापूरमधील भारतीय पर्यटकांची संख्या तिसऱ्या क्रमांकाची आहे.

सिंगापूरचा  प्रेरणादायक बहुसंस्कृतिवाद आणि गुणवत्तेबद्दल  आदराने एक जागरुक व गतिमान भारतीय समाज निर्माण केला आहे जो आमच्या राष्ट्रांमधील सखोल सहकार्यासाठी योगदान देत आहे.

 

फिलीपिन्स

 

दोन महिन्यांपूर्वी मी केलेला फिलीपिन्सचा दौरा  अतिशय समाधानकारक होता. आसियान-भारत, ईएएस आणि संबंधित परिषदांना उपस्थित राहण्याव्यतिरिक्त, मला राष्ट्रपती ड्यूटरटे  यांना  भेटण्याचा योग्य आला. आणि आम्ही आमचे जिव्हाळ्याचे आणि समस्या मुक्त नाते कसे पुढे न्यायचे याबद्दल व्यापक चर्चा केली. आपण दोघेही सेवांमध्ये बळकट आहोत आणि प्रमुख देशांमध्ये  आमचा वृद्धीदर  सर्वात जास्त आहे.  आमच्या  व्यापार क्षमतेत  मोठ्या संधी आहेत.

मी सर्वसमावेशक विकासासाठी आणि भ्रष्टाचारविरोधी लढा देण्यासाठी अध्यक्ष दुटेर्टे यांच्या  वचनबद्धतेचे  कौतुक करतो. ही अशी क्षेत्रे  आहेत जिथे दोन्ही देश एकत्र काम करू शकतात. आम्ही  सार्वत्रिक ओळखपत्रे, आर्थिक समावेशन, सर्वाना बँकिंग सुविधा उपलब्ध करून देणे, थेट लाभ हस्तांतरण आणि रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन यामधील आमचा अनुभव फिलिपिन्सला सांगायला तयार आहोत. फिलीपीन्स सरकारसाठी सर्वांना औषधे उपलब्ध करून देणे हे एक अन्य प्राधान्य क्षेत्र आहे ज्यामध्ये आम्ही योगदान देण्यासाठी तयार आहोत. मुंबई ते मारावी पर्यंत,  दहशतवाद्यांना सीमा माहीत नाही. या आव्हानाला सामोरे जाताना आम्ही फिलीपिन्सबरोबर आमचे  सहकार्य वाढवत आहोत.

 

मलेशिया

 

भारत आणि मलेशिया यांच्यातील समकालीन संबंध बरेच व्यापक आहेत आणि अनेक क्षेत्रांत विस्तारलेले आहेत. मलेशिया आणि भारत यांच्यात धोरणात्मक भागीदारी आहे आणि आम्ही अनेक बहुपक्षीय आणि  क्षेत्रीय आघाड्यांवर सहकार्य  करतो. 2017 मध्ये मलेशियन पंतप्रधानांच्या भारत दौऱ्याने द्विपक्षीय संबंधांवर दीर्घकालीन प्रभाव पाडला आहे.

मलेशिया आशियाई देशांत भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार बनला आहे आणि आशियानमधील भारतातील महत्त्वाच्या  गुंतवणूकदारांपैकी एक आहे. भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार दहा वर्षांत दोन पटीने वाढला  आहे. भारत आणि मलेशिया यांच्यात 2011 पासून द्विपक्षीय व्यापक आर्थिक सहकार्य करार आहे. हा करार असामान्य आहे कारण  दोन्ही बाजूंनी वस्तूंच्या व्यापारासाठी आसियन प्लसची  वचनबद्धता  देऊ केली आहे आणि सेवांमध्ये व्यापारातील डब्ल्यूटीओ प्लस ऑफरची देवाणघेवाण केली आहे. मे 2012 मध्ये स्वाक्षरी केलेल्या उभय देशांमधील सुधारित दुहेरी कर चुकवेगिरी करार  आणि 2013 मध्ये सीमाशुल्क सहकार्याबाबत सामंजस्य करार झाल्यानंतर आमचे व्यापार आणि गुंतवणुक सहकार्य अधिक सुलभ झाले आहे.

ब्रुनेई

भारत आणि ब्रुनेई यांच्यातील द्विपक्षीय व्यापार गेल्या दशकभरात दुपटीहून अधिक वाढला आहे. भारत आणि ब्रुनेई दोन्ही देश संयुक्त राष्ट्रसंघ, अलिप्त राष्ट्र परिषद (नाम), राष्ट्रकुल संघटना, आशियाई प्रादेशिक मंच (एआरएफ) यांचे सदस्य असून मजबूत  पारंपरिक आणि सांस्कृतिक संबंध असलेली  विकसनशील राष्ट्रे या नात्याने भारत आणि ब्रुनेई यांची प्रमुख आंतरराष्ट्रीय मुद्यांवर योग्य प्रमाणात समान भूमिका आहे. मे २००८ मध्ये ब्रुनेईच्या सुलतानांनी भारताला दिलेली भेट ही या दोन देशांमधील संबंधांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ठरली. फेब्रुवारी २०१६ मध्ये भारताच्या उपराष्ट्रपतींनी ब्रुनेईला भेट दिली होती.

लाओ पीडीआर

भारत आणि लाओ पीडीआर तथा लाओस (पीपल्स डेमोक्रेटिक रिपब्लिक) यांच्यातील संबंध अनेक क्षेत्रांमध्ये  व्यापक प्रमाणात विस्तारलेले आहेत. लाओ पीडीआरमधील वीज पारेषण आणि कृषी क्षेत्रात भारताची सक्रीय गुंतवणूक आहे. आज भारत आणि लाओ पीडीआर अनेक बहुआयामी आणि प्रादेशिक क्षेत्रांसाठी सहकार्य करतात.

भारत आणि लाओ पीडीआर यांच्यातील व्यापार अजूनही क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात असला तरीही भारताने आपल्या करमुक्त जकात प्राधान्य योजना लाओ पीडीआरसाठी लागू केल्या असून लाओ पीडीआरमधून भारतात माल आयात करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. सेवा व्यापार क्षेत्रातही आम्हाला प्रचंड संधी असून त्यातून लाओ पीडीआरची अर्थव्यवस्था उभरता येईल. आसियान-भारत सेवा आणि गुंतवणूक करारामुळे आमच्या सेवा क्षेत्रातील व्यापार सुलभ होण्यास सहाय्य  होणार आहे.

इंडोनेशिया

हिंदी महासागरात केवळ ९० सागरी मैल अंतरावरून विभक्त झालेले भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांमध्ये सांस्कृतिक संबंध दोन हजार वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. ओडीशात दरवर्षी साजरी केली जाणारी बालीजत्रा असो की रामायण आणि महाभारत कथा असो, जे संपूर्ण इंडोनेशियाच्या प्रदेशात आढळते, हे आगळेवेगळे सांस्कृतिक धागे आशियातल्या या दोन सर्वात मोठ्या लोकशाही देशांतील लोकांना घट्ट बांधून ठेवत आले आहेत.

विविधतेत एकता किंवा भिन्नेका तुंग्गल इका हा ही दोन्ही देशांमधील लोकशाही आणि कायद्याचे राज्य या पैलूंसारखाच सामाजिक मूल्य रचनेचा समान पैलू आहे, जो दोन्ही देश साजरा करत असतात. आज, महत्वपूर्ण  भागीदार या नात्याने आमच्यातील सहकार्य राजकीय, आर्थिक, संरक्षण आणि सुरक्षा, सांस्कृतिक तसेच दोन्ही देशांच्या लोकांमधील संबंध या सर्वंकष क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहे. आसियान मधील आमचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार इंडोनेशिया हाच राहिला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार अडीच पटींनी वाढला आहे. अध्यक्ष जोको विडोडो यांनी २०१६ मध्ये भारताला दिलेली भेट ही द्विपक्षीय संबंधांवर दीर्घकाळ परिणाम करणारी ठरली.

कम्बोडिया

भारत आणि कम्बोडिया यांच्यातील पारंपरिक आणि मैत्रीपूर्ण संबंधांचे मूळ सांस्कृतिक संबंधात खोलवर रुजले आहे. अंगकोर वॅट मंदिराची उत्कृष्ट रचना आमच्या प्राचीन ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक संबंधांची वैभवशाली साक्ष आणि भव्य सुचिन्ह आहे. १९८६ ते १९९३ या कठीण काळात अंगकोर वॅट मंदिराचा जीर्णोद्धार आणि जतन करण्याचे काम हाती घेतल्याचा भारताला अभिमान आहे. ताप्रोह्म मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम हाती घेऊन भारताने हे मौल्यवान संबंध पुढेही सुरु ठेवले आहेत.

ख्मेर रूज राजवट कोसळल्यानंतर १९८१ मध्ये सत्तेवर आलेल्या सरकारला मान्यता देणारा भारत हा पहिला देश होता. १९९१ मध्ये परीस शांतता करार आणि तो अंतिम करण्याच्या प्रक्रियेशी भारत जोडला गेला होता. मैत्रीची ही पारंपरिक बंधने उच्च स्तरीय नेत्यांच्या एकमेकांच्या देशांना भेटी देण्यातून आणखी मजबूत झाले आहेत. संस्थात्मक क्षमतांची उभारणी, मनुष्य बळ विकास, विकासाचे  आणि सामाजिक प्रकल्प, सांकृतिक देवाणघेवाण, संरक्षण क्षेत्रातील सहकार्य, पर्यटन आणि एकमेकांच्या नागरिकांमधील संबंध अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांमध्ये आम्ही सहकार्य आणखी व्यापक केले आहे.

आसियान आणि विविध जागतिक मंचांवर कम्बोडिया हा भारताचा महत्वाचा संवादक आणि समर्थक भागीदार आहे. कम्बोडियाच्या आर्थिक विकासात भागीदार राहण्यास भारत कटिबद्ध आहे आणि पारंपरिक संबंध आणखी खोलवर रुजवण्याकडे उत्सुकतेने पाहत आहे.

भारत आणि आसियान खूप काही करत आहेत. आसियान प्रणीत पूर्व आशिया शिखर परिषद, आसियान संरक्षण मंत्रीस्तरीय परिषद, आणि एआरएफ (आसियान प्रादेशिक मंच) यासारख्या संस्थांमध्ये आमच्या भागीदारीमुळे आमच्या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य आणखी पुढे नेत आहेत. प्रादेशिक सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारातही भारत उत्सुकतेने सहभागी झाला असून सर्व १६ सहभागी देशांसाठी व्यापक, संतुलित आणि योग्य समझोता  होण्यासाठी हा करार आहे.

 

आसियान देशांमधील सहकार्याची मजबुती  आणि लवचिकपणा केवळ गणिती आकड्यांनी आलेला नाही तर संबंधांचा पाया त्यास  आहे.  भारत आणि आसियान राष्ट्रे यांच्यातील संबंध स्पर्धा आणि हक्कांचे दावे यापासून मुक्त आहेत. समावेशकता आणि एकीकरण यावर उभारलेले भविष्य,  आकाराचा विचार न करता सर्व राष्ट्रांच्या सार्वभौम समानतेवर विश्वास आणि व्यापार तसेच आपसातील संबंधांसाठी मुक्त आणि खुल्या मार्गाना समर्थन यावर आमचा समान दृष्टीकोन आहे.

भारत-आसियान भागीदारी वाढत राहणार आहे. लोकसंख्या, गतिमानता आणि मागणी या मिळालेल्या देणग्यांसह  झपाट्याने परिपक्व होत चाललेल्या अर्थव्यवस्था असल्याने भारत आणि आसियान मजबूत आर्थिक भागीदारी उभारतील. संपर्क व्यवस्था वाढून व्यापार आणखी विस्तारित होईल. भारतात सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्यवाद असल्याने आमची राज्येही आग्नेय आसियान देशांशी फलदायी सहकार्याची उभारणी करत आहेत. भारताच्या ईशान्येकडील राज्येही पुनरुत्थानाच्या मार्गावर आहेत. आग्नेय आशियाशी संबंधांमुळे त्यांची प्रगती झपाट्याने होईल. आणि त्यातून आमच्या स्वप्नातील आसियान-भारत संबंधांसाठी ईशान्य भारत जोडणारा पूल असेल.

पंतप्रधान म्हणून मी चार आसियान-भारत शिखर परिषदा आणि पूर्व आशिया परिषदेला उपस्थित राहिलो आहे. यातून आसियान देशांमधील ऐक्य, केंद्रीयता आणि या दृष्टीकोनातून प्रदेशाला आकार देणारे नेतृत्व याबाबत मला वाटणारी खात्री आणखी मजबूत झाली आहे.

हे वर्ष महत्वाचे टप्पे गाठण्याचे आहे. यंदा भारत ७० वर्षांचा झाला. आसियानने ५० वर्षाचा सोनेरी टप्पा गाठला. आम्ही प्रत्येक जण आमच्या भविष्याकडे आशेने आणि परस्परांच्या भागीदारीकडे विश्वासाने पाहू शकतो.

सत्तरीत असताना  भारताच्या युवा वर्गाचे चैतन्य, साहसी वृत्ती आणि उर्जा ओसंडून वाहत आहे. जगातील सर्वात जलद गतीने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून, भारत जागतिक संधीमध्ये आघाडीवर असलेला देश बनला असून जागतिक अर्थव्यवस्थेतील स्थैर्याचा आधारस्तंभ झाला आहे. दिवसेंदिवस भारतात व्यवसाय करणे सोपे आणि सुलभ होत आहे. आसियान राष्ट्रे, भारताचे शेजारी आणि मित्र म्हणून नव्या भारताच्या परिवर्तनाचे अंतर्गत घटक बनतील. अशी मला आशा आहे.

आसियानच्या स्वतःच्या प्रगतीचे आम्हाला कौतुक वाटते. जेव्हा आग्नेय आशिया पाशवी युद्धं आणि अनिश्चिततेत अडकलेल्या राष्ट्रांची रंगभूमी बनला होता, तेव्हा आसियानने दहा देशांना समान उद्देश आणि सामायिक भविष्याच्या उद्दिष्टाने  एकत्र केले. उच्च महत्वाकांक्षांचा पाठपुरावा करण्याची तसेच पायाभूत सुविधा आणि  नागरीकरण ते लवचिक कृषी क्षेत्र आणि प्रदूषणापासून मुक्त समृद्ध पृथ्वी या आजच्या काळातील आव्हानांचे निवारण करण्याची आमच्यात क्षमता आहे. डिजिटल तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संशोधन आणि संपर्क व्यवस्था यांच्या ताकदीचा उपयोग आम्ही लोकांच्या आयुष्यात अभूतपूर्व गती आणि त्याच प्रमाणात स्थित्यंतर घडवून आणण्यासाठी करू शकतो.

आशेचे भविष्य हवे असेल तर त्यासाठी शांततेच्या मजबूत मूलभूत तत्वांची गरज असते. परिवर्तन, अडथळे आणि बदल यांचे हे युग आहे, जे इतिहासात क्वचितच येते. अनिश्चितता आणि गोंधळ यातून मार्ग काढत आमचा प्रदेश आणि जगालाही, स्थिर आणि शांततापूर्ण भविष्याकडे नेण्यासाठी स्थिर प्रवाह तयार करण्याची अफाट संधी, नव्हे प्रचंड जबाबदारी आसियान आणि भारतावर आहे.

भरभराटीचा सूर्योदय आणि संधीचा प्रकाश यासाठी भारतीयांनी नेहमीच पूर्वेकडे पाहिले आहे.  आताही पूर्वीप्रमाणेच, पूर्व किंवा भारत-पॅसिफिक प्रदेश भारताचे भविष्य आणि  आमची  सामायिक नियती घडवण्यासाठी अपरिहार्य असेल. दोन्ही उद्दिष्टांत आसियान-भारत भागीदारी निर्णायक भूमिका बजावेल. आणि दिल्लीत, आसियान आणि भारत यांनी या दिशेने पुढच्या प्रवासाकरता नव्याने शपथ घेतली आहे.

पंतप्रधानांच्या आसियान वृत्तपत्रांतील संपादकीय पानावरील भाषण खालील लिंक वर पूर्ण मिळू शकेल

https://www.bangkokpost.com/opinion/opinion/1402226/asean-india-shared-values-and-a-common-destiny

 

https://vietnamnews.vn/opinion/421836/asean-india-shared-values-common-destiny.html#31stC7owkGF6dvfw.97

 

https://www.businesstimes.com.sg/opinion/asean-india-shared-values-common-destiny

 

https://www.globalnewlightofmyanmar.com/asean-india-shared-values-common-destiny/

 

https://www.thejakartapost.com/news/2018/01/26/69th-republic-day-india-asean-india-shared-values-common-destiny.html

 

https://www.mizzima.com/news-opinion/asean-india-shared-values-common-destiny

 

https://www.straitstimes.com/opinion/shared-values-common-destiny

 

https://news.mb.com.ph/2018/01/26/asean-india-shared-values-common-destiny/

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature

Media Coverage

IIT Delhi tops India in QS Rankings 2027; 52 Indian institutions feature
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of Prime Minister addresses the Indian Community in Paris
June 18, 2026

नमस्ते!

बों जू!

ऐसा लग रहा है, आप सब छुट्टी के मूड में हैं।

साथियों,

ये पेरिस शहर, Lights का शहर है, रंगों का शहर है, यहां Art है, Ideas हैं, और innovation की प्रेरणा भी है। इस शहर को भारत के अलग-अलग राज्यों से आए आप सभी लोग और भी खूबसूरत बना देते हैं। नए नए रंगों से भर देते हैं।

कोई तमिल है, कोई पंजाबी है, कोई गुजराती है, तो कोई मराठी है, और कोई बंगाली है। भारत के हर कोने का प्रतिनिधित्व यहां दिखाई देता है।

साथियों,

मैं जब 14 जून को नीस पहुंचा था तो सबसे पहले भारत इनोवेट्स कार्यक्रम में शामिल हुआ था। आज जब मैं फ्रांस से वापसी की तैयारी में हूं तो लग रहा है जैसे भारत कनेक्ट्स कार्यक्रम में आ गया हूं।

फ्रांस में रहने वाले आप लोगों ने 21वीं सदी के भारत-फ्रांस रिश्तों को जिस तरह कनेक्ट किया है, वो हमारी Strategic Partnership की बहुत बड़ी ताकत बन रही है। मैं आप सभी के लिए भारत से 140 करोड़ देशवासियों की शुभकामनाएं लेकर आया हूं। इस आत्मीय स्वागत के लिए, मैं आप सभी का हृदय से आभार व्यक्त करता हूं।

साथियों,

आज मैं ऐसे समय में फ्रांस आया हूं जब कुछ ही दिन पहले हमारी सरकार के 12 वर्ष पूरे हुए हैं। चुने हुए प्रधानमंत्री के रूप निरंतर 12 साल तक देश की सेवा करना मेरे जीवन का बहुत बड़ा सौभाग्य रहा है। यह भारत के लोकतंत्र की शक्ति है जिसने एक चायवाले को यहां तक पहुंचा दिया।

साथियों,

बीते 12 वर्ष, 140 करोड़ भारतीयों के अद्भुत सामर्थ्य के रहे हैं। 12 साल के इस कालखंड में भारत का GDP दोगुना हुआ है। Airports की संख्या दोगुनी हुई है। Universities की संख्या भी दोगुनी हो गई है। Highway Construction की स्पीड तीन गुना बढ़ गई। और Metro Network, चार गुणा बड़ा हो गया है।

मैं आपको कुछ और फैक्ट्स दूंगा, उससे आप अंदाजा लगा पाएंगे कि भारत किस स्पीड और कितने बड़े स्केल पर काम कर रहा है। पिछले 12 वर्षों में भारत का Defence Export 35 गुणा यानि Thirty Five Times बढ़ गया है।

औऱ एक फैक्ट सुनिए भारत में मोबाइल मैन्यूफैक्टरिंग यूनिट्स में, 100 गुणा की बढ़ोतरी हुई है। 100 times. भारत अब दुनिया का दूसरा सबसे बड़ा mobile phone manufacturer है। इसी गति, इसी प्रगति का नतीजा है कि आज भारत दुनिया की Fastest Growing Major Economy है।

साथियों,

आज भारत की कहानी सिर्फ Economic Progress की कहानी नहीं है। सिर्फ यहाँ अटक नहीं जाती है। ये Social Transformation की भी कहानी है।

पिछले 12 साल में देश में 25 करोड़ लोग गरीबी से बाहर निकले हैं। यानि एक ऐसी प्रगति जिसका लाभ समाज के अंतिम व्यक्ति तक पहुंच रहा है। फ्रांस में जितने घर हैं, उससे भी अधिक पक्के घर बीते 12 वर्ष में हमने जरूरतमंदों के लिए बनाए हैं।

अब हर परिवार के पास, गरीब से गरीब क्यों न हो, Bank Account है। Financial Inclusion एक सरकारी कार्यक्रम नहीं, बल्कि सामाजिक परिवर्तन का अभियान बना है।

साथियों,

इन 12 वर्षों की उपलब्धियों में, एक उपलब्धि ऐसी भी है जिसे किसी आंकड़े से, या अंकों से, नहीं मापा जा सकता। वह है 140 करोड़ भारतीयों का आत्मविश्वास।

आज का भारत और आज के भारत का युवा बहुत बड़े सपने देख रहा है। भारत का किसान नई संभावनाओं के साथ आगे बढ़ रहा है। भारत की महिलाएं नए नेतृत्व का परिचय दे रही हैं। इसलिए ये सिर्फ Achievements के 12 साल नहीं हैं, ये भारत की एस्पिरेशन्स को नई बुलंदी देने का कालखंड रहा है।

साथियों,

एक समय था जब दूर-दराज के गांवों तक आधुनिक सुविधाएं पहुंचाना वाकई बहुत मुश्किल भरा था। आज उन्हीं गांवों में बिजली भी है, इंटरनेट भी है, और डिजिटल सेवाओं की पूरी दुनिया भी है। आज एक क्लिक पर, कभी भी, कहीं भी बैंकिंग सेवाएं उपलब्ध हैं।

आज मोबाइल फोन, भारत के नागरिकों को अनेक सुविधाओं से कनेक्ट कर रहा है। हमारे किसान, हमारे मछुआरे, हमारे dairy farmers, हमारी महिलाएं, हमारे स्टूडेंट्स, सभी टेक्नोलॉजी के माध्यम से सशक्त हो रहे हैं, और अपने लिए नए अवसर बना रहे हैं।

साथियों,

आपने 125 करोड़ से अधिक Aadhaar IDs के बारे में सुना है। लेकिन आज भारत सिर्फ पहचान को डिजिटल नहीं बना रहा। आज करीब 90 करोड़ भारतीयों की Unique Digital Health IDs बनाई जा चुकी हैं। जिससे मेडिकल रिकॉर्ड सुरक्षित और accessible बन गए हैं। इससे हेल्थकेयर डिलीवरी और अधिक आसान और efficient हो रही है।

साथियों,

इन उपलब्धियों की सबसे बड़ी विशेषता यह है कि इनमें से अधिकांश चीजें कुछ वर्ष पहले तक कल्पना जैसी लगती थीं। कौन सोच सकता था कि गांव-गांव तक हाई-स्पीड इंटरनेट पहुंचेगा ? कौन सोच सकता था कि दूर-सुदूर के गांवों में भी QR code जीवन का हिस्सा बन जायेगा ? गांव में कोई बहन, ड्रोन से खेती करने में मदद करेगी, ये भी असंभव लगता था।

लेकिन आज यह सब, भारत के करोड़ों लोगों के जीवन का सामान्य हिस्सा बनता जा रहा है। और आपको गर्व होगा साथियों, यही नए भारत की पहचान है।

जो कभी सपना था, वह आज सच्चाई है। जो कभी नामुमकिन लगता था, वो आज मुमकिन हुआ है, औऱ ये करने के पीछे सबसे बड़ी ताकत क्या है? किसकी वजह से ये सब संभव हुआ है? यह मोदी के कारण नहीं, वो ताकत है- भारत का लोकतंत्र, भारत की डेमोक्रेसी। इस डेमोक्रेसी में सबका साथ है, सबका विकास है।

साथियों,

आज से 50 या 100 साल बाद जब भारत के इस कालखंड की समीक्षा होगी, तो ये बात उभरकर सामने आएगी कि इस कालखंड को भारत की Aspirations ने ड्राइव किया। यह भारत के एस्पिरेशन्स का नया युग है।

जहां बिजली पहुंची है, वहां लोग सिर्फ बिजली नहीं चाहते, वे Smart Living चाहते हैं। जहां ट्रेन पहुंची है, वहां लोग High-Speed Connectivity चाहते हैं। जहां हाईवे बने हैं, वहां लोग World-Class Expressways चाहते हैं। जहां इंटरनेट पहुंचा है, वहां लोग AI और Digital Innovation में नेतृत्व चाहते हैं।

यानि आज भारत के लोग अपने जीवन को भी Next Level पर ले जाना चाहते हैं, और भारत को भी Next Level पर ले जाना उनका मकसद है, उनका संकल्प है, उनके सपने है।

और साथियों,

यही Aspirations आज भारत की विकास यात्रा की सबसे बड़ी शक्ति हैं। मैं आपको भारत की Space Journey का उदाहरण दूंगा।

भारत ने चंद्रयान को चंद्रमा के South Pole पर उतारा। दुनिया ने इसे एक बहुत बड़ी उपलब्धि माना। लेकिन भारत इसे अपनी मंजिल मानकर रुका नहीं। आज देश गगनयान की तैयारी कर रहा है। भारत अंतरिक्ष में अपना Space Station बनाने की दिशा में आगे बढ़ रहा है।

हमारे Space Startups Global Space Economy में अपनी जगह बनाने के लिए पुरजोश काम कर रहे हैं, आगे बढ़ रहे हैं।

साथियों,

Green Energy के क्षेत्र में भी भारत की यही एस्पिरेशंस दिखाई देती है। Solar Power में भारत की उपलब्धियों की दुनिया भर में लगातार चर्चा हो रही हैं। लेकिन भारत अगली छलांग की तैयारी कर रहा है।

Green Hydrogen में बड़े निवेश हो रहे हैं। Advanced Nuclear Energy पर तेजी से काम हो रहा है। आपने भारत के Fast Breeder nuclear Reactor से जुड़ी प्रोग्रेस के बारे में भी सुना ज़रूर होगा। ये भारत के न्यूक्लियर एनर्जी लैंडस्केप में क्रांतिकारी परिवर्तन करने का बहुत बड़ा अचीवमेंट हमारे सीसेन्टिस्टों ने किया है।

साथियों,

आज का भारत भविष्य का पूरा Ecosystem बना रहा है। भारत एक साथ हर उस क्षेत्र में निवेश कर रहा है, जो आने वाले दशकों की दिशा तय करेगा।

अभी आपने कुछ दिन पहले ही देखा है नीस में भारत इनोवेट्स का एक आयोजन किया। ये इवेंट भारत के डीप टेक सामर्थ्य को दुनिया तक पहुंचाने का एक और माध्यम था। इसमें भारत के 120 Deep-Tech Startups उपस्थित थे। Bharat Innovates में करीब एक हजार चार सौ B2B Meetings हुईं है। कई Startups के लिए Investment Commitments आगे बढ़ीं, Commercial Orders के लिए रास्ते खुले। French और European Universities तथा Incubators के साथ Engagements बढ़ रही हैं।

Student Exchanges, Joint Research, और Innovation Support के नए रास्ते बने। इसलिए Bharat Innovates सिर्फ एक Summit नहीं रहा। यह Innovation Diplomacy का एक नया मॉडल बना है।

और आज ही पेरिस में VivaTech इवेंट के जरिए, इस यात्रा को हमने और आगे बढ़ाया। नीस में हमने Ideas को Capital से जोड़ा और पेरिस में Indian Innovation को Global Scale से जोड़ा। आज दुनिया देख रही है भारत केवल भविष्य के लिए तैयार नहीं हो रहा है। भारत भविष्य को आकार दे रहा है।

साथियों,

एक समय था, जब देशों के बीच रिश्ते केवल व्यापार से तय होते थे। आज व्यापार के साथ-साथ Trust यानि भरोसा भी उतना ही महत्वपूर्ण हो गया है।

हर देश Reliable Supply Chains चाहता है। हर देश Stable Partnerships चाहता है। हर देश ऐसे साथियों की तलाश में है, जिन पर लंबे समय तक भरोसा किया जा सके। और ऐसे समय में, भारत विश्व में एक Trusted Partner के रूप में उभर रहा है।

एवियां में G7 बैठक के दौरान मैंने trust based partnerships बनाने पर ज़ोर दिया। ग्लोबल साउथ के देशों के साथ equal पार्टनर्स के रूप में आगे बढ़ने का आह्वान किया। भारत का G7 समिट में संदेश था Global Governance तभी प्रभावी होगी जब वह Inclusive होगी। Global Growth तभी Sustainable होगी जब वह शेयर्ड होगी। और Global Technology तभी मानवता के लिए उपयोगी होगी जब वह Trusted होगी।

साथियों,

भारत और दुनिया के बीच व्यापारिक रिश्तों में नई ऊर्जा नज़र आ रही है। फ्रांस के साथ भारत का ट्रेड लगतार बढ़ रहा है। पिछले कुछ वर्षों में भारत ने दुनिया के अनेक देशों के साथ Free Trade Agreements किए हैं। यूरोपियन यूनियन हो, यूनाइटेड किंगडम हो दुनिया के हर देश, हर रीजन के साथ भारत समझौते कर रहा है।

अगले महीने से भारत और UK के बीच ट्रेड एग्रीमेंट भी लागू हो जाएगा। यह एग्रीमेंट भारत के farmers, workers और innovators को अनेक नए अवसर प्रदान करेगा।

साथियों,

आज दुनिया Uncertainty और Disruption के दौर से गुजर रही है। ऐसे समय में भारत और फ्रांस की साझेदारी विश्वास, स्थिरता और सहयोग का एक मजबूत स्तंभ बन रहा है।

इस वर्ष हमने भारत और फ्रांस के संबंधों को Special Global Strategic Partnership का दर्जा दिया था। नीस में मेरे मित्र President Macron और मैंने हमारे संबंधों को force for global good बनाने पर चर्चा की। Defence से लेकर space और नुक्लियर तक AI और क्रिटीकल मिनरल्स से लेकर high speed railway तक, हर क्षेत्र में हम मिलकर आगे बढ़ेंगे।

साथियों,

Solar energy हो, या AI के क्षेत्र में सहयोग हो, भारत और फ्रांस मिलकर ऐसे समाधान विकसित कर रहे हैं जो पूरी मानवता के हित में हैं। पिछले वर्ष पेरिस में और इस वर्ष दिल्ली में हमने AI Summit को Co-chair किया।

अब हम साथ मिलकर अगले वर्ष “तृष्णा” satellite को लॉन्च करने जा रहें हैं। यह “तृष्णा” satellite जो विश्व में फूड और वाटर सिक्युरिटी सुनिश्चित करने में योगदान देगा।

और साथियों,

यह सभी गवर्नमेंट टू गवर्नमेंट पहलो में आप सभी का योगदान बहुत महत्वपूर्ण है। ये आप हैं जो भारत और यूरोप के बीच सबसे मजबूत सेतु हैं। आप दोनों समाजों को समझते हैं। दोनों बाजारों को समझते हैं। आने वाले समय में Talent, Trade, Technology, Tourism और Investment के नए अवसरों को आगे बढ़ाने में आपकी भूमिका लगातार बढ़ने वाली हैं।

साथियों,

भारत और फ्रांस के रिश्तों को साझा इतिहास, साझा मूल्यों और साझा विश्वास ने आगे बढ़ाया है। विश्व युद्धों के दौरान फ्रांस की धरती पर बलिदान देने वाले भारतीय सैनिकों की स्मृतियां आज भी हमें जोड़ती हैं।

मुझे पहले नव शापेल में श्रद्धांजलि देने का अवसर मिला, पिछले वर्ष प्रेसिडेंट मैक्रों के साथ मार्सेय के वॉर मेमोरियल जाने का अवसर भी मिला। ये हमारी साझा विरासत है।

फ्रांस, भारतीयों के योगदान को संजोता भी है और सराहता भी है। भारतीय मूल की नूर इनायत खान हों, जिन्होंने फ्रांस की Resistance के लिए अपना जीवन बलिदान किया, या महाराजा रणजीत सिंह के साथ काम करने वाले जनरल जां फ्रांस्वा अलार हों ये सभी भारत और फ्रांस की साझा विरासत के प्रतीक हैं।

भारत के राज्य पुडुचेरी में भी फ्रेंच विरासत की झलक दिखाई देती है। वहां का Architecture, वहां की कला-संस्कृति और खान-पान सभी में हमारे संबंधों की महेक है।

साथियों,

इस समय फ्रांस समेत पूरी दुनिया में International Yoga Day की तैयारी भी चल रही है। इस अवसर पर मैं, फ्रांस में योग को आगे बढ़ाने वाले श्रीमान महेश घाट्राड्याल जी को भी आदरपूर्वक श्रद्धांजलि देता हूं। मैं पद्म पुरस्कार से सम्मानित, शार्लोत शोपां जी को भी प्रणाम करता हूं। जिन्होंने सौ वर्ष की आयु में भी, योग के माध्यम से फ़्रांस को भारत की विरासत से जोड़ा है। उनका जीवन यह सिद्ध करता है: Yoga does not add years to life, it adds life to years.

साथियों,

मैं फ्रेद नेग्री जी को भी आदरपूर्वक श्रद्धापूर्वक याद करता हूं। भारतीय विरासत को संरक्षित करने में उनका योगदान अतुल्य रहा है।

साथियों,

भारत और फ्रांस को कनेक्ट करने वाली एक और चीज है, और वो है फुटबॉल। इस वक्त यहां फुटबॉल फीवर पूरे जोर पर है। फ्रांस में इसकी दीवानगी, चप्पे-चप्पे पर दिखती है। लेकिन भारत में भी फुटबॉल का क्रेज़ सिर चढ़कर बोलता है।

खासतौर पर फ्रांस की टीम के फैन्स भारत में बहुत अधिक हैं। फ़्रांस ने इस वर्ल्ड कप की शुरुआत एक जोरदार जीत से शुरू की है। मैं फ्रांस की टीम को बहुत-बहुत शुभकामनाएं देता हूं।

साथियों,

जाने से पहले, आप सभी के लिए कुछ और अच्छी खबरें भी लेकर के आया हूँ। वो आपके लिए हैं। पिछले वर्ष, मार्सेय में कॉन्सुलेट खोला गया, इससे काफी अधिक सुविधा मिल रही है। कुछ हफ्ते पहले, Indian Nationals के लिए French Airports पर Visa-free Transit की व्यवस्था शुरू हो गई है।

Students और Professionals की Mobility बढ़ाना हो, या Educational Qualifications की Mutual Recognition की बात हो, या फिर French Universities के भारत में Campus खोलना हो, इन सभी पर हम मिलकर आगे बढ़ रहें हैं।

अब फ्रांस में UPI के उपयोग का दायरा भी और बढ़ने जा रहा है। यानि भारत-फ्रांस कनेक्ट भी Instant और आपसी Payment भी Instant!

साथियों,

इन सभी पहलों से, हम भारत और फ़्रांस को और करीब ला रहें हैं। और मैं फिर कहूंगा इस साझेदारी की नींव, इस रिश्ते की असली ताकत आप सभी हैं। आप सब मेरे देशवासी हैं।

आज जब भारत तेज़ी से विकसित भारत के लक्ष्य की ओर बढ़ रहा है, तो मैं आप सभी से भारत के साथ और गहराई से जुडने का आग्रह करूंगा। इससे भारत की विकास यात्रा को नई शक्ति मिलेगी, और आपको अपनी पुरखों की धरती की सेवा करने का अवसर भी मिलेगा।

इन्हीं शब्दों के साथ आप सभी के प्रेम आपके उत्साह और इस आत्मीय स्वागत के लिए मैं एक बार फिर आप सभी का आभार व्यक्त करता हूं।

भारत माता की जय!

बहुत बहुत धन्यवाद।