नमस्ते ऑस्ट्रेलिया !

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आणि माझे प्रिय मित्र अँथनी अल्बनीज, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान मान्यवर स्कॉट मॉरिसन, न्यू साउथ वेल्सचे प्रीमियर क्रिस मिन्स, परराष्ट्र मंत्री पेनी वोंग, दूरसंवाद मंत्री मिशेल रोलेन्ड, ऊर्जा मंत्री क्रिस बोवेन, विरोधी पक्षनेते पीटर डटन, परराष्ट्र उपमंत्री टीम वॉट्स, न्यू साउथ वेल्सच्या मंत्रिमंडळाचे उपस्थित आदरणीय सदस्य, पॅरामाटाचे संसद सदस्य डॉ अँड्रू चार्लटन,  येथे उपस्थित असलेले ऑस्ट्रेलियाचे सर्व संसद सदस्य, महापौर, उप महापौर, कौन्सिलर्स आणि ऑस्ट्रेलियात  राहत असलेले आणि मोठ्या संख्येने उपस्थित अनिवासी भारतीय, आपणा सर्वांना माझा नमस्कार. 

सर्वात प्रथम आपण आज ज्या भूमीवर भेटत आहोत त्या भूमीचे पारंपारिक रक्षणकर्ते यांची दखल घेत ज्येष्ठ, वर्तमान, आणि उदयोन्मुख या सर्वांप्रति मी आदर व्यक्त करतो.

मित्रहो,  

2014 मध्ये मी इथे आलो होतो तेव्हा आपल्याला एक वचन दिलं होतं. वचन हे होतं की आपणांस  भारताच्या पंतप्रधानांची प्रतीक्षा करत 28 वर्ष घालवावी लागणार नाहीत. हे बघा, येथे मी पुन्हा हजर आहे तोही मी एकटा आलो नाही.  पंतप्रधान अल्बनीजसुद्धा माझ्याबरोबर आलेले आहेत. पंतप्रधानांनी  आपल्या अगदी व्यस्त कार्यक्रमातून आपणा सर्वांसाठी  वेळ काढला ही गोष्ट आपल्या भारतीयांप्रति त्यांची स्नेह भावना दाखवते. त्यांनी आता जे सांगितलं त्यावरून ऑस्ट्रेलियाच्या हृदयात भारताबद्दल केवढे प्रेम आहे ते दिसून येते. यावर्षी मला पंतप्रधानांचे भारताच्या धरतीवर, अहमदाबादमध्ये स्वागत करण्याची संधी मिळाली. आज ते येथे लिटिल इंडियाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यास माझ्यासह आले आहेत. मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. माझे मित्र,अँथनी, धन्यवाद!

हे लिटिल इंडिया म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या विकासात भारतीय समुदायाच्या योगदानाला दिलेली पावती आहे. मी न्यू साउथ वेल्स प्रीमियर पॅरामाटा शहराच्या मेयर, उपमेयर आणि कौन्सिलर्सना या विशेष सन्मानासाठी धन्यवाद देऊ इच्छितो.

 

मित्रहो,

मला आनंद वाटतो की न्यू साउथ वेल्स मध्ये अनिवासी भारतीय समुदायातील अनेक लोक सार्वजनिक जीवनात सक्रिय भाग घेत आहेत आपली ओळख निर्माण करत आहेत. आत्ताच्या न्यू साउथ वेल्स च्या सरकारमध्ये डेप्युटी प्रीमियर प्रू कार, खजिनदार डॅनियल मुखी योगदान देत आहेत आणि अगदी हल्ली हल्ली कालच समीर पांडे पॅरामाटाचे  लॉर्ड मेयर म्हणून निवडले गेले आहेत. मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रहो,

आज पॅरामाटामध्ये हे सगळं घडत आहे तेव्हाच अजून एक माहिती कळली की पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पर्थ शहरात भारतीय सैनिक नैनसिंह सैलानी यांच्या नावे एक सैलानी अवेन्यू तयार केला गेला आहे. पहिल्या जागतिक महायुद्धात ऑस्ट्रेलियाच्या फौजेसाठी लढताना त्यांना वीरगती प्राप्त झाली होती. या सन्मानाबद्दल पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वाचं मी आदरपूर्वक अभिनंदन करतो.

मित्रहो,

कधीकाळी असं म्हटलं जात असे की भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संबंध तीन C दर्शवतात. हे तीन C कोणते तर कॉमनवेल्थ, क्रिकेट आणि करी  त्यानंतर म्हटले जाऊ लागले की ऑस्ट्रेलियाचे आणि भारताचे संबंध तीन D वर आधारित आहेत ते म्हणजे डेमोक्रसी, डायस्पोरा आणि दोस्ती. काही जण असेही म्हणत की भारत आणि ऑस्ट्रेलियाचे  संबंध तीन E वर आधारित आहेत. एनर्जी, इकॉनोमी आणि एज्युकेशन. म्हणजेच काय, तर कधी C , कधी D तर कधी E. वेगवेगळ्या काळात त्या त्या गोष्टी एक प्रकारे योग्यही असतील, पण भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या ऐतिहासिक संबंधांचा  विस्तार याहून कितीतरी मोठा आहे आणि या संबंधांना सर्वात मोठा आधार काय आहे हे सर्वच जण जाणतात. जाणता ना?  नाही, सर्वात मोठा आधार आहे तो परस्परविश्वास आणि परस्पर आदर.  हा परस्परांवरचा विश्वास आणि परस्परांबद्दलचा आदर केवळ राजनैतिक संबंधामधून विकसित झालेला नाही. त्याचे खरे कारण आहे ते म्हणजे ऑस्ट्रेलियात राहणारा प्रत्येक भारतीय. तुम्ही या गोष्टीची खरी ताकद आहात, खरे कारण आहात. याचे खरे कारण आहे ते ऑस्ट्रेलियातील अडीच कोटींहून जास्त नागरिक.

मित्रहो,

आपल्यामध्ये भौगोलिक अंतर नक्की आहे परंतु हिंदी महासागर आपल्याला एकमेकांशी सांधतो. आपली जीवनशैली वेगवेगळी असेल पण आता योगसुद्धा आपल्याला जोडतो. क्रिकेटबरोबर तर आम्ही केव्हापासून सांधले गेलो होतो. पण आता टेनिस आणि चित्रपट सुद्धा आम्हाला एकत्र आणतात. आपल्याकडे स्वयंपाक करण्याचा पद्धती वेगवेगळ्या असतील पण आता मास्टर शेफ हा आपल्या मधला सांधा आहे. आमच्याकडे सण समारंभ वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. मात्र आम्ही सगळे दिवाळीची रोषणाई आणि बैसाखीचा उत्साह यांनी एकत्र जोडले गेलेलो आहोत . आमच्याकडे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात पण आम्ही मल्याळम, तामिळ, तेलुगु, पंजाबी, हिंदी भाषा शिकवणाऱ्या साऱ्या शाळांबरोबर आम्ही जोडले गेले आहोत‌.

 

मित्रहो,

ऑस्ट्रेलियाचे लोक, इथले रहिवासी एवढ्या विशाल हृदयाचे आहेत, मनाचे एवढे चांगले आणि सच्चे  आहेत की भारताच्या या विविधतेला मोकळ्या मनाने स्वीकारतात. म्हणूनच पॅरामाटा स्क्वेअर एखाद्यासाठी परमात्मा चौक होऊन जातो आणि Wigram स्ट्रीट सुद्धा विक्रम स्ट्रीट म्हणून प्रसिद्ध पावतो. हॅरीस पार्क कित्येक लोकांसाठी हरीश पार्क म्हणून ओळखला जातो.  तसंही माझ्या कानावर आले आहे की हॅरीस पार्कमध्ये चाटकाझची चाट, जयपुर स्वीटसची जिलेबी या सगळ्याना काही तोड नाही. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आपण माझे मित्र पंतप्रधान अल्बनीजना सुद्धा तिथे जरूर घेऊन जा.  मित्र हो, जेव्हा खाण्याची गोष्ट निघते आणि चाटबद्दल बोलतो आहोत तर लखनऊचं नाव बोलण्यात येणे  सहाजिक आहे. मी ऐकले आहे की सिडनीच्या जवळ लखनऊ नावाची ही एक जागा आहे पण मला तिथे चाट मिळते की नाही याची माहिती नाही. आता इथे सुद्धा बहुतेक दिल्लीच्या जवळ असणाऱ्या लखनऊचेच लोक असतील .आहेत का अरे वा खरोखर दिल्ली स्ट्रीट, बॉम्बे स्ट्रीट , कश्मीर अवेन्यू, मालाबार अवेन्यू यासारखी कितीतरी रस्ते ऑस्ट्रेलियाला आपल्या भारताशी जोडून ठेवतात.

ग्रेटर सिडनी मध्ये इंडिया परेडही  सुरु होणार असल्याचे मला सांगण्यात आले आहे. इथे तुम्ही सर्वांनी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला हे जाणून मला खूप आनंद झाला. त्या निमित्ताने येथील अनेक सिटी कौन्सिलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सिडनी ऑपेरा हाउस जेंव्हा तिरंगा रोषणाईने उजळून निघाले होते, तेंव्हा भारतीयांना खूप आनंद झाला होता. हिंदूस्थानात देखील जयजयकार होत होता आणि यासाठी मी न्‍यू साउथ वेल्‍सच्या सरकारचे विशेष आभार मानतो. 

 

मित्रांनो, 

आपल्या क्रिकेटच्या नात्याला देखील 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. क्रीडांगणावर क्रिकेटचा सामना जितका मनोरंजक होतो, मैदानाबाहेर आपली तितकीच दाट मैत्री आहे. यावेळी ऑस्ट्रेलियामधील अनेक महिला क्रिकेट खेळाडू पहिल्यांदाच आयपीएल सामने खेळण्यासाठी भारतात आल्या होत्या, आणि मित्रांनो आपण केवळ सुखाच्या काळामध्ये एकमेकांचे साथीदार आहोत असे अजिबात नाही. खरा मित्र सुखाच्या काळात साथीदार असतोच, दुःखाच्या काळात देखील तो साथीदार असतो. मागच्या वर्षी जेव्हा महान शेन वॉर्न यांचे निधन झाले तेव्हा ऑस्ट्रेलिया बरोबरच करोडो  भारतीयांनाही दुःख झाले.आप्तस्वकीय गमावल्याप्रमाणे भारतीयांची भावना होती.

मित्रांनो,

तुम्ही सर्वजण इथे ऑस्ट्रेलियामध्ये आहात. तुम्ही येथील विकास पाहत आहात. तुम्हा सर्वांचे एक स्वप्न आहे की आपला भारत देखील विकसित राष्ट्र बनला पाहिजे. हे आपले स्वप्न आहे ना? हे आपले स्वप्न आहे ना? 140 कोटी भारतीयांचे हे स्वप्न आहे. 

मित्रांनो,

भारताकडे सामर्थ्याची कमतरता नाही. भारताकडे संसाधनांची देखील कमतरता नाही. आज जगातील सर्वात मोठी आणि सर्वात तरुण टॅलेंट फॅक्टरी ज्या देशात आहे तो देश आहे भारत. आपले उत्तर बरोबर आहे, तो देश आहे भारत. मी ही गोष्ट पुन्हा सांगत आहे. आज जगातील सर्वात मोठी आणि सर्वात तरुण टॅलेंट फॅक्टरी ज्या देशात आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आणि आता मी तुमच्यासमोर वास्तव मांडू इच्छितो आणि तुमच्याकडून याचे योग्य उत्तर जाणून घेऊ इच्छितो. तुम्ही तयार आहात ना, कोरोनाच्या या जागतिक महामारी मध्ये ज्या देशाने जगात सर्वात जलद लसीकरण उपक्रम राबवला तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश जगात सर्वात जलद गतीने विकसित होणारी अर्थव्यवस्था बनला आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश जगात प्रथम क्रमांकाचा स्मार्टफोन डेटा उपभोक्ता आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश फिनटेक ॲडॉप्शन रेट मध्ये प्रथम क्रमांकावर आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश दूध उत्पादनाच्या बाबतीत जगामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येमध्ये जगभरात दुसऱ्या क्रमांकावर आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश जगातील सर्वात मोठा  दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल फोन निर्माता आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश तांदूळ, गहू आणि साखर उत्पादकांच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश फळे आणि भाज्या उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आज जो देश जगात तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टार्ट अप परिसंस्था बनला आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऑटोमोबाईल व्यापार ज्या देशात होतो तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठा नागरी हवाई वाहतूक बाजार ज्या देशात आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. आणि आता जो देश येत्या 25 वर्षांमध्ये विकसित राष्ट्र बनण्याचे उद्दिष्ट ठेवून पुढे वाटचाल करत आहे तो देश आहे भारत, तो देश आहे भारत. 

 

मित्रांनो,

आज जागतिक नाणे निधी  भारताला जागतिक अर्थव्यवस्थेचा उज्वल बिंदू मानतो आहे, जागतिक बँकेला हा विश्वास आहे की जागतिक प्रतिकूलतेला जर कोणी आव्हान देऊ शकत असेल तर तो देश आहे भारत. आज एकीकडे जगातील अनेक देशांमध्ये बँकिंग प्रणालीवर संकट कोसळले आहे मात्र दुसरीकडे भारतातील बँकांच्या मजबुतीची जगभरात प्रशंसा होत आहे. जगावर कोसळलेल्या गेल्या शंभर वर्षातील सर्वात मोठ्या संकट काळात भारताने गेल्या वर्षभरात विक्रमी निर्यात केली आहे. आज आपली परकीय गंगाजळी  नवे शिखर गाठत आहे.

मित्रांनो, 

भारत जागतिक कल्याणासाठी कशा प्रकारचे काम करत आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे, आपला डिजिटल स्टेक. आपण सर्वजण भारताच्या फिनटेक क्रांतीशी चांगल्या रीतीने परिचित आहात. 2014 मध्ये जेंव्हा मी इथे आलो होतो तेव्हा मी आपल्या बरोबर एक स्वप्न सामायिक केले होते, ते तुम्हाला आठवत असेलच. माझे ते स्वप्न म्हणजे भारतातील अति गरीब व्यक्तीचे देखील बँक खाते असावे. तुम्हाला अभिमान वाटेल मित्रांनो, की मागच्या नऊ वर्षात आम्ही जवळपास 50 कोटी भारतीयांची म्हणजे जवळपास 500 दशलक्ष बँक खाती उघडली आहेत. आणि केवळ बँक खाती उघडण्यातच आम्हांला सफलता मिळाली असे नाही, आणि आम्ही तेथेच अडकून पडलो असेही नाही. या गोष्टीने भारताच्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या संपूर्ण परिसंस्थेला रूपांतरित केले आहे. आम्ही जन धन बँक अकाउंट, मोबाईल फोन आणि आधार ओळखपत्र यांची एक जेएएम त्रिसूत्री  बनवली आहे. तुम्ही विचार करा यामुळे एका क्लिकवर, केवळ एका क्लिकवर कोटी कोटी देशवासी आणि पर्यंत डीबीटीम्हणजे थेट लाभ हस्तांतरण शक्य झाले आहे, आणि तुम्हाला आनंद वाटेल, कारण, मागच्या नऊ वर्षांमध्ये, हा आकडा देखील तुम्हाला आनंद देईल, मागच्या नऊ वर्षांमध्ये 28 लाख कोटी रुपये म्हणजे 500 अब्ज  ऑस्ट्रेलियन डॉलर पेक्षा अधिक रक्कम थेट गरजवंतांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आली आहे. कोरोना संकट काळात अनेक देशांना आपल्या नागरिकांना पैसे पाठवण्यामध्ये अडचणी येत होत्या मात्र हेच काम एका क्लिकवर काही क्षणात करणाऱ्या देशांमध्ये भारताचा समावेश होता. युनिव्हर्सल पब्लिक इंटरफेस म्हणजेच यु पी आय ने भारतात वित्तीय समावेशकतेला नव्या उंचीवर पोहोचवले आहे. जगातील 40% रियल टाईम डिजिटल पेमेंटस् एकट्या भारतात होत आहेत. जर आपण अलीकडच्या काळात भारताला भेट दिली असेल तर आपण पाहिले असेल की आज फळे, भाज्या विक्रेते किंवा पाणीपुरीच्या गाड्या असो किंवा चहाची टपरी या सर्व जागी डिजिटल व्यवहार होत आहेत.

मित्रांनो,

भारताची ही डिजिटल क्रांती केवळ फिनटेक पुरती मर्यादित नाही. भारत आधुनिक व्यवस्था निर्माण करत आहे. लोकांची जीवन सुलभता वाढवत आहे. याचे एक उदाहरण म्हणजे भारताचे डिजिलॉकर. यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स पासून पदवी प्रमाणपत्र आणि मालमत्तेची कागदपत्रे हे सर्व जे काही सरकारकडून दिले जातात ते या डिजिटल लॉकर मध्ये जनरेट होतात. जवळपास शेकडो प्रकारचे कागदपत्र डिजिटल लॉकर मध्ये रिफ्लेक्ट होतात.

तुम्हाला भौतिक प्रत साठवण्याची गरज नाही. फक्त एक पासवर्ड पुरेसा आहे. आता 15 कोटींहून अधिक म्हणजे 150 दशलक्षाहून अधिक भारतीय त्यात जोडले गेले आहेत. असे अनेक डिजिटल मंच आज भारतीयांना शक्तिशाली बनवत आहेत.

 

मित्रांनो,

आज भारताच्या प्रत्येक पावलाबद्दल आणि प्रत्येक कामगिरीबद्दल जगाला जाणून घ्यायचे आहे. आजचे जग ज्या जागतिक व्यवस्थेकडे जात आहे. ते  ज्या शक्यता शोधू पाहत आहे त्यानुसार  हे स्वाभाविक आहे. भारत ही हजारो वर्षांची जिवंत संस्कृती आहे. भारत ही लोकशाहीची जननी आहे. आपण स्वतःला काळानुरुप घडवत गेलो आहोत, परंतु नेहमीच आपल्या मूलभूत सिद्धांतावर, तत्वांवर अटळ राहिलो आहोत. आपण राष्ट्रालाही एक कुटुंब म्हणून पाहतो आणि जगालाही एक कुटुंब मानतो, वसुधैव कुटुंबकम्, आणि म्हणून जेव्हा भारत आपल्या जी-20 अध्यक्षपदाची संकल्पना ठरवतो तेव्हा म्हणतो, त्याचे आदर्श, जगण्यासाठीचे त्याचे स्वरूप पहा, जी-20 अध्यक्षपदात भारत म्हणतो, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. जेव्हा भारत पर्यावरणाच्या रक्षणासाठी सौर ऊर्जेसाठी मोठी उद्दिष्टे ठेवतो, तेव्हा तो म्हणतो एक सूर्य, एक जग, एक ग्रीड.  जेव्हा भारत जागतिक समुदायाने निरोगी राहावे अशा कामना करतो, तेव्हा तो एक पृथ्वी, एक आरोग्य म्हणतो. भारत हा असा देश आहे ज्याने कोरोना संकटात जगातील 150 हून अधिक देशांमध्ये औषधे पाठवली. भारत हा असा देश आहे ज्याने 100 हून अधिक देशांना मोफत लस पाठवून करोडो लोकांचे प्राण वाचवले आहेत. कोरोनाच्या काळात तुम्ही ज्या सेवाभावनेने इथे काम केले ते आपल्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. आज हुतात्म्यांचे मानबिंदू पाचवे शीख गुरू श्री गुरू अर्जुन देव जी, यांचे  शहीद पर्व आहे, सर्वांची सेवा करण्याची शिकवण आपल्याला गुरुजींच्या जीवनातून मिळते.  गुरु अर्जुन देवजींनीच दशवंध प्रथा सुरू केली. याच्याच प्रेरणेने कोरोनाच्या काळातही अनेक गुरुद्वारांच्या लंगरने येथील लोकांना मदत केली. या काळात येथील पीडितांसाठी अनेक मंदिरांची स्वयंपाकघरे उघडण्यात आली. ऑस्ट्रेलियात राहणारे आणि शिकणारे विद्यार्थीही मोठ्या संख्येने लोकांना मदत करण्यासाठी पुढे आले. या काळात विविध सामाजिक संस्थांनीही अनेकांना मदत केली. भारतीय कोठेही राहोत, त्यांच्यात  मानवतेची  भावना कायम असते.

मित्रांनो,

मानव हिताच्या अशा कामांमुळेच आज भारताला विश्व हिताची शक्ती म्हटले जात आहे. जिथे कोठेही आपत्ती येते तिथे भारत मदतीला तत्पर असतो. जेव्हा जेव्हा संकट येते; तेव्हा त्याचा सामना करण्यासाठी  भारत तयार असतो. आज आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून सौरऊर्जेचा वापर वाढवणे असो, परस्पर सहकार्यातून आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा निर्माण करणे असो, आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सचे नेतृत्व करणे असो, भारताने नेहमीच वेगवेगळ्या देशांना एकत्र आणण्यासाठी एक सांधणारी शक्ती म्हणून काम केले  आहे. नुकताच तुर्कीएमध्ये भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला तेव्हा भारताने ऑपरेशन दोस्तच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला. भारत आपले हित सर्वांच्या हिताशी जोडून पाहतो. सर्वांची साथ, सर्वांचा विकास, सर्वांचा विश्वास आणि सर्वांचे प्रयत्न, हाच आपल्या देशांतर्गत प्रशासनाचा आधार आहे आणि जागतिक प्रशासनासाठीही हीच ध्येयदृष्टी आहे.

मित्रांनो,

आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील धोरणात्मक भागीदारी सतत दृढ होत आहे.  अलीकडेच आम्ही आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार ECTA वर स्वाक्षरी केली आहे. येत्या पाच वर्षांत दोघांमधील व्यापार दुपटीने वाढेल असा अंदाज आहे.  आता आम्ही सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य करारावर काम करत आहोत.  आम्ही लवचिक आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी तयार करत आहोत. यामुळे दोन्ही देशांच्या व्यवसायाला चालना तर मिळेलच, शिवाय जगालाही नवा विश्वास मिळेल.  आज भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान अनेक थेट विमान उड्डाणे आहेत.  गेल्या काही वर्षांत उड्डाणांची संख्या वाढली आहे.  येत्या काही दिवसांत त्यांची संख्या आणखी वाढणार आहे. दोन्ही देश एकमेकांच्या पदव्यांना मान्यता देण्याबाबतही पुढे सरसावले आहेत आणि याचा आपल्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.  स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारी करारावरही एक करार झाला आहे. यामुळे आपल्या कुशल व्यावसायिकांना ऑस्ट्रेलियात येऊन येथे काम करणे सोपे होईल आणि मित्रांनो, मी येथे आलोच आहे तेव्हा मी एक घोषणाही करणार आहे.  ब्रिस्बेनमधील भारतीय समुदायाची मागणी आता पूर्ण होणार आहे.  लवकरच ब्रिस्बेनमध्ये भारताचा नवीन वाणिज्य दूतावास उघडण्यात येणार आहे.

मित्रांनो,

भारत आणि ऑस्ट्रेलियाची घट्ट होत असलेली भागीदारी भारतमातेवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला सक्षम करेल.  तुमच्याकडे प्रतिभा आहे, तुमच्या कौशल्याची ताकद आहे आणि तुमची सांस्कृतिक मूल्येही आहेत. ही मूल्ये तुम्हाला ऑस्ट्रेलियातील लोकांमध्ये मिसळून जाण्यात मदत करण्यात मोठी भूमिका बजावतात. मी कालच पापुआ न्यू गिनीहून आलो.  तिरुक्कुरल या तमिळ साहित्याचा स्थानिक भाषेतील अनुवादाचे मी तिथे लोकार्पण केले. हा अनुवाद तेथील भारतीय वंशाच्या स्थानिक गव्हर्नरने केला आहे.  परदेशात राहूनही आपल्याला आपल्या मुळांचा अभिमान असायला हवा, आपल्या मुळाशी जोडलेले राहावे, याचे हे जिवंत उदाहरण. तुम्ही इथे ऑस्ट्रेलियातही भारतीय संस्कृतीचा सुगंध पसरवत आहात.  तुम्ही भारताचे सांस्कृतिक राजदूत आहात, ऑस्ट्रेलियातील भारताचे सदिच्छा दूत  आहात.

मित्रांनो,

मी माझे बोलणे संपवण्यापूर्वी मला तुम्हाला काही मागायचे आहे, तुम्ही द्याल?  आवाज जरा कमी झाला, द्याल?  पक्के?  वचन? मी तुम्हाला हे मागतोय  आणि मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही जेव्हाही भारतात याल, जेव्हाही तुम्ही भारतात याल तेव्हा आपल्यासोबत किमान एका   ऑस्ट्रेलियन मित्राला आणि त्याच्या कुटुंबाला सोबत घेऊन या.  यामुळे त्यांना भारताला समजून घेण्याची आणि जाणून घेण्याची चांगली संधी मिळेल. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आलात, खूप दिवसांनी तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली, तुम्ही सर्वजण खूप आरोग्यदायी राहा, आनंदी रहा, आनंदी रहा, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार!

माझ्यासोबत बोला 

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Millennials Rejected Them, Gen Z Too…’: PM Modi Dismisses Rahul Gandhi’s ‘Vote Chori’ Claims

Media Coverage

Millennials Rejected Them, Gen Z Too…’: PM Modi Dismisses Rahul Gandhi’s ‘Vote Chori’ Claims
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM’s address during launch of development works, nationwide campaign for HPV vaccination from Ajmer
February 28, 2026
Our government is committed to all-round development: PM
Today, I had the privilege of launching the nationwide HPV vaccination campaign from Ajmer, inaugurating and laying foundation stones for multiple projects and distributing appointment letters to the youth: PM
The HPV vaccination campaign has commenced from Ajmer, this campaign is a significant step towards empowering the Nari Shakti of the country: PM
The double-engine government is moving forward by taking both Rajasthan’s heritage and development together: PM
The campaign to link rivers started by our government will significantly benefit Rajasthan: PM
There is no shortage of sunlight in Rajasthan, this very sunshine is becoming a source of savings and income for the common man: PM
A very significant role is being played by the PM Surya Ghar Free Electricity Scheme, this scheme has the power to change Rajasthan's destiny: PM

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

तीर्थराज पुष्कर और माता सावित्री की इस पावन भूमि पर, आज मुझे आप सबके बीच आने का, आपके आशीर्वाद प्राप्त करने का अवसर मिला है। इस मंच से मैं सुरसुरा के तेजाजी धाम को, पृथ्वीराज की भूमि अजमेर को प्रणाम करता हूं।

मेरे साथ बोलिए –

तीर्थराज पुष्कर की जय।

तीर्थराज पुष्कर की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

भगवान देव नारायण की जय।

भगवान देव नारायण की जय।

वरूण अवतार भगवान झूलेलाल जी की जय।

भगवान झूलेलाल जी की जय।

मंच पर विराजमान राजस्थान के राज्यपाल हरिभाउ बागडे जी, राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा जी, पूर्व मुख्यमंत्री बहन वसुंधरा जी, केंद्रीय मंत्रिमंडल में मेरे साथी भगीरथ चौधरी जी, उपमुख्यमंत्री प्रेमचंद भैरवा जी, दिया कुमारी जी, संसद में मेरे साथी, भाजपा के प्रदेश अध्यक्ष मदन राठौर जी, उपस्थित अन्य मंत्रिगण, अन्य महानुभाव और राजस्थान के मेरे प्यारे भाई और बहनों। मैं पूज्य संतों का बहुत आभारी हूं, कि हमें आशीर्वाद देने के लिए इतनी बड़ी संख्या में पूज्य संतगण यहां मौजूद हैं।

साथियों,

अजमेर आस्था और शौर्य की धरती है। यहां तीर्थ भी है और क्रांतिवीरों के पदचिन्ह भी हैं। अभी कल ही मैं इजराइल की यात्रा को पूरा करके भारत लौटा हूं। राजस्थान के सपूत मेजर दलपत सिंह के शौर्य को इजराइल के लोग आज भी गौरव से याद करते हैं। मुझे भी इजराइल की संसद में, मेजर दलपत सिंह जी के शौर्य को नमन करने का सौभाग्य मिला। राजस्थान के वीर बाकुरों की, इजराइल के हाइफा शहर को आजाद कराने में जो भूमिका थी, मुझे उसका गौरवगान करने का अवसर मिला है।

साथियों,

कुछ समय पहले ही, राजस्थान में भाजपा की डबल इंजर सरकार को दो साल पूरे हुए हैं, मुझे संतोष है कि आज राजस्थान विकास के नए पथ पर अग्रसर है। विकास के जिन वायदों के साथ भाजपा सरकार आपकी सेवा में आई थी, उन्हें तेजी के साथ पूरा कर रही है। और आज का दिन, विकास के इसी अभियान को तेज करने का दिवस है। थोड़ी देर पहले यहां राजस्थान के विकास से जुड़ी करबी 17 हजार करोड़ रूपयों की परियोजनाओं का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। सड़क, बिजली, पानी, स्वास्थ्य, शिक्षा, हर क्षेत्र में नई शक्ति जुड़ रही है। ये सारे प्रोजेक्टस राजस्थान की जनता की सुविधा बढ़ाएंगे और राजस्थान के युवाओं के लिए, रोजगार के भी अवसर पैदा करेंगे।

साथियों,

भाजपा की डबल इंजर सरकार लगातार युवा शक्ति को सशक्त कर रही है। दो साल पहले तक राजस्थान से भर्तियों में भ्रष्टाचार और पेपर लीक की ही खबरें चमकती रहती थीं, आती रहती थीं। अब राजस्थान में पेपर लीक पर लगाम लगी है, दोषियों पर सख्त कार्रवाई हो रही है। आज यहां इसी मंच से राजस्थान के 21 हजार से अधिक युवाओं को नियुक्ति पत्र भी सौंपे गए हैं। ये बहुत बड़ा बदलाव आया है। मैं इस बदलाव के लिए, नई नौकरियों के लिए, विकास के सभी कामों के लिए, राजस्थान के आप सभी लोगों को बहुत-बहुत बधाई देता हूं।

साथियों,

आज वीरांगनाओं की इस धरती से, मुझे देशभर की बेटियों के लिए एक अहम अभियान शुरू करने का अवसर मिला है। यहां अजमेर से HPV वैक्सीनेशन अभियान शुरू हुआ है। ये अभियान, देश की नारीशक्ति को सशक्त करने की दिशा में अहम कदम है।

साथियों,

हम सब जानते हैं कि परिवार में जब मां बीमार होती है, तो घर बिखर सा जाता है। अगर मां स्वस्थ है, तो परिवार हर संकट का सामना करने में सक्षम रहता है। इसी भाव से, भाजपा सरकार ने महिलाओं को संबल देने वाली अनेक योजनाएं चलाई हैं।

साथियों,

हमने 2014 से पहले का वो दौर देखा है, जिसमें शौचालय के अभाव में बहनों-बेटियों को कितनी पीड़ा, कितना अपमान झेलना पड़ता था। बच्चियां स्कूल छोड़ देती थीं, क्योंकि वहां अलग टॉयलेट की सुविधा नहीं होती थी। गरीब बेटियां सेनिटरी पैड्स नहीं ले पाती थीं। पहले जो सत्ता में रहे, उनके लिए ये छोटी बातें थीं। इसलिए इन समस्याओं की चर्चा तक नहीं होती थी। लेकिन हमारे लिए ये बहनों-बेटियों को बीमार करने वाला, उनके अपमान से जुड़ा संवेदनशील मसला था। इसलिए, हमने इनका मिशन मोड पर समाधान किया।

साथियों,

गर्भावस्था के दौरान कुपोषण माताओं के जीवन के लिए बहुत बड़ा खतरा होता था। हमने सुरक्षित मातृत्व के लिए योजना चलाई, मां को पोषक आहार मिले, इसके लिए पांच हज़ार रुपए बहनों के खाते में जमा करने की योजना शुरु की। मां धुएं में खांसती रहती थी, लेकिन उफ्फ तक नहीं करती थी। हमने कहा ये नहीं चलेगा। और इसलिए उज्जवला गैस योजना बनाई गई। ये सब इसलिए संभव हुआ, क्योंकि भाजपा सरकार, सत्ता भाव से नहीं, संवेदनशीलता के साथ काम करती है।

साथियों,

21वीं सदी का एक चौथाई हिस्सा बीत चुका है। आज का समय राजस्थान के विकास के लिए बड़ा महत्वपूर्ण है। भाजपा की डबल इंजन सरकार, राजस्थान की विरासत और विकास, दोनों को साथ लेकर चल रही है। हम सब जानते हैं, अच्छी सड़क, अच्छी रेल और हवाई सुविधा सिर्फ सफर आसान नहीं करती, वो पूरे इलाके की किस्मत बदल देती है। जब गांव-गांव तक अच्छी सड़क पहुँचती है, तो किसान अपनी फसल सही दाम पर बेच पाता है। व्यापारी आसानी से अपना सामान बाहर भेज पाते हैं। और हमारा अजमेर-पुष्कर तो, उसकी पर्यटन की ताकत कौन नहीं जानता। अच्छी कनेक्टिविटी का पर्यटन पर सबसे अच्छा असर पड़ता है। जब सफर आसान होता है, तो ज्यादा लोग घूमने आते हैं।

और साथियों,

जब पर्यटक आते हैं तो स्वाभाविक है होटल चलते हैं, ढाबे चलते हैं, कचौड़ी और दाल बाटी ज्यादा बिकती है, यहां राजस्थान के कारीगरों का बनाया सामान बिकता है, टैक्सी चलती है, गाइड को काम मिलता है। यानी एक पर्यटक कई परिवारों की रोज़ी-रोटी बन जाता है। इसी सोच के साथ हमारी सरकार, राजस्थान में आधुनिक कनेक्टिविटी पर बहुत बल दे रही है।

साथियों,

जैसे-जैसे राजस्थान में कनेक्टिविटी का विस्तार हो रहा है, वैसे-वैसे यहां निवेश के लिए भी अवसर लगातार बढ़ते जा रहे हैं। दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर के इर्द-गिर्द उद्योगों के लिए एक बहुत ही शानदार इंफ्रास्ट्रक्चर बनाया जा रहा है। यानी राजस्थान को अवसरों की भूमि बनाने के लिए, डबल इंजन सरकार हर संभव, अनेक विध काम कर रही है।

साथियों,

राजस्थान की माताएं अपने बच्चों को पालने में ही, राष्ट्र भक्ति का संस्कार देती हैं। राजस्थान की ये धरा जानती है कि देश का सम्मान क्या होता है, और इसीलिए आज राजस्थान की इस धरा पर, मैं आप लोगों से एक और बात कहने आया हूं।

साथियों,

हाल में ही, दिल्ली में, दुनिया का सबसे बड़ा AI सम्मेलन हुआ, Artificial Intelligence इसमें दुनिया के अनेक देशों के प्रधानमंत्री, अनेक देशों के राष्ट्रपति, अनेक देशों के मंत्रि, उस कार्यक्रम में आए थे। दुनिया की बड़ी-बड़ी कंपनियां, उन कंपनियों के कर्ता-धर्ता वो भी एक छत के नीचे इकट्ठे हुए थे। सबने भारत की खुले मन से प्रशंसा की। मैं जरा राजस्थान के मेरे भाई-बहनों से पूछना चाहता हूं। जब दुनिया के इतने सारे लोग, भारत की प्रशंसा करते हैं, ये सुनकर के आपको गर्व होता है की नहीं होता है? आपको गर्व होता है कि नहीं होता है? आपको अभिमान होता है कि नहीं होता है? आपका माथा ऊंचा हुआ या नहीं हुआ? आपका सीना चौड़ा हुआ कि नहीं हुआ?

साथियों,

आपको गर्व हुआ, लेकिन हताशा निराशा में डूबी, लगातार पराजय के कारण थक चुकी कांग्रेस ने क्या किया, ये आपने देखा है। दुनियाभर के मेहमानों के सामने, कांग्रेस ने देश को बदनाम करने की कोशिश की। इन्होंने विदेशी मेहमानों के सामने देश को बेइज्जत करने के लिए पूरा ड्रामा किया।

साथियों,

कांग्रेस, पूरे देश में ल्रगातार हार रही है, और गुस्से में वो इसका बदला, वो भारत को बदनाम करके ले रही है। कभी कांग्रेस, INC यानी इंडियन नेशनल कांग्रेस थी, लेकिन अब INC नहीं बची है, इंडियन नेशनल कांग्रेस नहीं बची है, आज वो INC के बजाय MMC, MMC बन गई है। MMC यानी मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस हो चुकी है।

राजस्थान के मेरे वीरों,

इतिहास गवाह है, मुस्लिम लीग भारत से नफरत करती थी, और इसलिए मुस्लिम लीग ने देश बांट दिया। आज कांग्रेस भी वही कर रही है। माओवादी भी, भारत की समृद्धि, हमारे संविधान और हमारे सफल लोकतंत्र से नफरत करते हैं, ये घात लगाकर हमला करते हैं, कांग्रेस भी घात लगाकर, देश को बदनाम करने के लिए कहीं भी घुस जाती है। कांग्रेस के ऐसे कुकर्मों को देश कभी माफ नहीं करेगा।

साथियों,

देश को बदनाम करना, देश की सेनाओं को कमजोर करना, ये कांग्रेस की पुरानी आदत रही है। आप याद कीजिए, यही कांग्रेस है, जिसने हमारी सेना के जवानों को हथियारों और वर्दी तक के लिए तरसा कर रखा था। ये वही कांग्रेस है, जिसने सालों तक हमारे सैनिक परिवारों को वन रैंक वन पेंशन से वंचित रखा था। ये वही कांग्रेस है, जिसके जमाने में विदेशों से होने वाले रक्षा सौदों में बड़े-बड़े घोटाले होते थे।

साथियों,

बीते 11 वर्षों में भारत की सेना ने हर मोर्चे पर आतंकियों पर, देश के दुश्मनों पर करारा प्रहार किया। हमारी सेना, हर मिशन, हर मोर्चे में विजयी रही। सर्जिकल स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक, वीरता का लोहा मनवाया, लेकिन कांग्रेस के नेताओं ने इसमें भी दुश्मनों के झूठ को ही आगे बढ़ाया। देश के लिए जो भी शुभ है, जो भी अच्छा है, जो भी देशवासियों का भला करने वाला है, कांग्रेस उस सबका विरोध करती है। इसलिए, देश आज कांग्रेस को सबक सिखा रहा है।

साथियों,

राजस्थान में तो आपने कांग्रेस के कुशासन को करीब से अनुभव किया है। यहां जितने दिन कांग्रेस की सरकार रही, वो भ्रष्टाचार करने और आपसी लड़ाई-झगड़े में ही उलझी रही। कांग्रेस ने हमारे किसानों को भी हमेशा धोखा दिया है। आप याद कीजिए, कांग्रेस ने दशकों तक सिंचाई की परियोजनाओं को कैसे लटकाए रखा। इसका राजस्थान के किसानों को बहुत अधिक नुकसान हुआ है। ERCP परियोजना को कांग्रेस की सरकारों ने केवल फाइलों और घोषणाओं में उलझाकर रखा। हमारी सरकार ने आते ही इस स्कीम को फाइलों से निकालकर धरातल पर उतारने का प्रयास किया है।

साथियों,

हमारी सरकार ने नदियों को जोड़ने का जो अभियान शुरु किया है, उसका बहुत अधिक फायदा राजस्थान को मिलना तय है। संशोधित पार्वती-कालीसिंध-चंबल लिंक परियोजना हो, यमुना-राजस्थान लिंक प्रोजेक्ट हो, डबल इंजन सरकार ऐसी अनेक सिंचाई परियोजनाओं का लाभ किसानों तक पहुंचाने के लिए प्रतिबद्ध है। आज भी झालावाड़, बारां, कोटा और बूंदी जिले के लिए पानी की अनेक परियोजनाओं पर काम शुरु हुआ है। हमारा प्रयास है, कि राजस्थान में भूजल का स्तर भी ऊपर उठे।

साथियों,

भाजपा सरकार, राजस्थान के सामर्थ्य को समझते हुए, योजनाएं बना रही है, उन्हें लागू कर रही है। मुझे खुशी है कि राजस्थान अब, सूरज की ताकत से समृद्धि कमाने वाली धरती बन गया है। हम सब जानते हैं, हमारे राजस्थान में धूप की कोई कमी नहीं। अब यही धूप, सामान्य मानवी के घर की बचत और कमाई का साधन बन रही है। और इसमें बहुत बड़ी भूमिका है, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना की। इस योजना में राजस्थान का भाग्य बदलने की ताकत है। इस योजना में भाजपा सरकार लोगों को अपनी छत पर सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए की सहायता देती है। सरकार सीधे आपके बैंक खाते में पैसे भेजती है। आजादी के बाज सब बजट, सब योजनाएं देख लीजिए, जिसमें मध्यम वर्ग को सबसे ज्यादा लाभ होने वाला है, ऐेसी योजना कभी नजर नहीं आएगी, आज इन परिवारों को सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए सीधा सरकार देती है। सबसे अधिक लाभ मध्यम वर्ग के लोग ले रहे हैं। और जिससे घर पर एक छोटा सा बिजली घर तैयार हो जाता है। दिन में सूरज की रोशनी से बिजली बनती है, घर में वही बिजली काम आती है और जो ज्यादा बिजली बनती है, वो बिजली ग्रिड में जाती है। और जिस घर में बिजली बनी होती है, उसे भी इसका लाभ मिलता है।

साथियों,

आज राजस्थान में सवा लाख से अधिक परिवार इस योजना से जुड़ चुके हैं। और इस योजना की वजह से, कई घरों का बिजली बिल लगभग जीरो आ रहा है। यानी खर्च कम हुआ है, बचत ज़्यादा हुई है।

साथियों,

विकसित राजस्थान से विकसित भारत के मंत्र पर हम लगातार काम कर रहे हैं। आज जिन योजनाओं पर काम शुरू हुआ है, वो विकसित राजस्थान की नींव को और अधिक मजबूत करेंगे। जब राजस्थान विकसित होगा, तो यहां के हर परिवार का जीवन समृद्ध होगा। आप सभी को एक बार फिर, विकास परियोजनाओं के लिए बहुत-बहुत शुभकामनाएं। मेरे साथ बोलिये-

भारत माता की जय!

भारत माता की जय!

वंदे मातरम के 150 साल देश मना रहा है। मेरे साथ बोलिये-

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

बहुत-बहुत धन्यवाद।