सर्व आंतरराष्ट्रीय पाहुण्यांनी अतुल्य भारताचे मनापासून साक्षीदार व्हावे, असे मी आवाहन करतो: पंतप्रधान
भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात आफ्रिकन युनियन G20 चा भाग बनला याचा आम्हाला अभिमान आहे: पंतप्रधान
न्यायदान हा स्वतंत्र स्वयं-प्रशासनाचा पाया असून, न्यायाशिवाय देशाचे अस्तित्वही असंभव आहे: पंतप्रधान
जेव्हा आपण सहयोग करतो तेव्हा आपण एकमेकांची कार्यपद्धती अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतो. एकमेकांना अधिक चांगले जाणून घेतल्याने, अधिक समन्वय येतो, आणि समन्वयामुळे अधिक चांगल्या आणि जलद न्याय वितरणाला चालना मिळते: पंतप्रधान
21 व्या शतकातील समस्या 20 व्या शतकाच्या दृष्टिकोनातून हाताळल्या जाऊ शकत नसल्याने, पुनर्विचार, पुनर्कल्पना आणि सुधारणांची गरज असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
न्याय वितरणाला चालना देण्यासाठी कायदे शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे
भारत सध्याचे वास्तव प्रतिबिंबित करण्याच्या दिशेने कायद्यांचे आधुनिकीकरण करत आहे
आपण असे जग निर्माण करूया, जिथे प्रत्येकाला वेळेवर न्याय मिळेल आणि कोणीही मागे राहणार नाही

प्रतिष्ठित कायदेतज्ञ , जगभरातील विविध देशांमधील अतिथी आणि उपस्थित मान्यवर सदस्यगण, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार !

मित्रहो, 

या परिषदेचे उद्घाटन करताना आनंद होत आहे. मला आनंद आहे की जगभरातील आघाडीचे कायदेतज्ञ इथे उपस्थित आहेत. 140 कोटी भारतीयांच्या वतीने मी आमच्या सर्व आंतरराष्ट्रीय पाहुण्यांचे स्वागत करतो. मी तुम्हा सर्वांना अतुल्य भारताचा पूर्ण अनुभव घेण्याचे आवाहन करतो.

 

मित्रहो, 

मला सांगण्यात आले आहे की येथे आफ्रिकेतील अनेक मित्र आले आहेत. आफ्रिकन महासंघाबरोबर भारताचे विशेष नाते आहे. आफ्रिकन महासंघ भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात जी 20 चा भाग बनला याचा आम्हाला अभिमान आहे. यामुळे आफ्रिकेतील लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी खूप मदत मिळेल. 

मित्रहो, 

गेल्या काही महिन्यांमध्ये मी अनेक वेळा कायदा क्षेत्रातील तज्ञांशी संवाद साधला आहे. काही दिवसांपूर्वी, मी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झालो होतो. गेल्या सप्टेंबरमध्ये याच ठिकाणी मी आंतरराष्ट्रीय वकील परिषदेसाठी आलो होतो. अशा प्रकारचे संवाद आपल्या न्याय व्यवस्थेच्या कार्याची प्रशंसा करण्यात आपल्या सर्वांना मदत करतात. तसेच चांगल्या प्रकारे आणि जलद गतीने न्याय देण्याच्या संधी निर्माण करण्याचे माध्यम देखील बनतात.

मित्रहो, 

भारतीय परंपरांमध्ये न्यायाला खूप महत्त्व दिले गेले आहे. प्राचीन भारतीय विचारवंत म्हणाले: न्यायमूलं स्वराज्यं स्यात्. याचा अर्थ न्याय स्वतंत्र स्वराज्याचे मूळ  आहे. न्यायाशिवाय कुठल्याही राष्ट्राचे अस्तित्वच शक्य नाही.

 

मित्रहो, 

या परिषदेची संकल्पना  ‘न्याय वितरणातील सीमेपलिकडील आव्हाने’ अशी आहे. एकमेकांशी जोडलेल्या, वेगाने बदलणाऱ्या जगात, हा विषय अतिशय प्रासंगिक आहे. कधीकधी, एका देशात न्याय मिळवून देण्यासाठी इतर देशांसोबत काम करणे आवश्यक असते. जेव्हा आपण एकमेकांना सहकार्य करतो, तेव्हा आपण एकमेकांच्या व्यवस्था अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. अधिक समजून घेतल्यामुळे अधिक ताळमेळ येतो. ताळमेळ योग्य असेल तर उत्तम आणि जलद न्याय दानाला  चालना मिळते. म्हणूनच असे मंच आणि परिषदा महत्त्वाच्या आहेत.

मित्रहो, 

आपल्या व्यवस्था अनेक क्षेत्रांमध्ये एकमेकांसोबत काम करत आहेत . उदाहरणार्थ, हवाई वाहतूक नियंत्रण आणि सागरी वाहतूक. त्याचप्रमाणे तपास आणि न्याय दान व्यवस्थेतही आपण सहकार्य वाढवायला हवे. एकमेकांच्या अधिकारक्षेत्राचा आदर करूनही सहकार्य करता येऊ शकते. जेव्हा आपण एकत्र काम करतो, तेव्हा अधिकार क्षेत्र विलंब न करता न्याय देण्याचे साधन बनते.

मित्रहो, 

अलिकडच्या काळात गुन्ह्यांचे स्वरूप आणि व्याप्ती यात आमूलाग्र बदल झालेला दिसतो. गुन्हेगारांचे विविध देश आणि प्रांतांमध्ये विशाल जाळे आहे. ते निधी पुरवठा आणि संचालन दोन्हीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरतात. एका प्रदेशातील आर्थिक गुन्ह्यांचा वापर इतर प्रदेशातील कारवायांना निधी पुरवण्यासाठी केला जात आहे.  क्रिप्टोकरन्सीचा  वाढता वापर  आणि सायबर धोके नवीन आव्हाने उभी करत आहेत. 21व्या शतकातील आव्हानांचा सामना 20व्या शतकातील दृष्टिकोन अवलंबून करता येत नाही. पुनर्विचार, पुनर्कल्पना आणि सुधारणा करण्याची गरज आहे. यामध्ये न्याय प्रदान करणाऱ्या कायदेशीर व्यवस्थांचे आधुनिकीकरण समाविष्ट आहे. यामध्ये आपली व्यवस्था अधिक लवचिक आणि अनुकूल  बनवणे समाविष्ट आहे.

 

मित्रहो,

जेव्हा आपण सुधारणांबद्दल बोलतो तेव्हा न्याय व्यवस्था अधिक नागरिक-केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. न्याय सुलभता हा न्याय दानाचा  आधारस्तंभ आहे. या क्षेत्रात  सामायिक करण्यासारख्या भारताकडे अनेक गोष्टी आहेत. 2014 मध्ये भारतातील जनतेने मला पंतप्रधानपदाची जबाबदारी सोपवली. त्यापूर्वी मी गुजरात राज्यात मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. तेव्हा आम्ही संध्याकाळची न्यायालये सुरू करण्याचा निर्णय घेतला. यामुळे लोकांना त्यांच्या कामाच्या वेळेनंतर न्यायालयीन सुनावणीला उपस्थित राहण्यास मदत झाली. यामुळे न्याय तर मिळालाच पण वेळ आणि पैसाही वाचला. याचा लाभ हजारो लोकांनी घेतला.

मित्रहो, 

भारतातही लोकअदालतीची अनोखी संकल्पना आहे. म्हणजे लोक न्यायालय. ही न्यायालये सार्वजनिक उपयोगाच्या सेवांशी संबंधित लहान प्रकरणे निकाली काढण्यासाठी एक यंत्रणा प्रदान करतात. ही खटला-पूर्व प्रक्रिया आहे. अशा न्यायालयांनी हजारो प्रकरणे निकाली काढली आहेत आणि सहज न्याय मिळवून दिला आहे. अशा उपक्रमांवरील चर्चा जगभरात महत्वपूर्ण  ठरू शकते.

मित्रहो,

न्याय दानाला चालना देण्यासाठी कायदेशीर शिक्षण हे महत्त्वाचे साधन आहे.शिक्षणातून आवड आणि व्यावसायिक क्षमता या दोन्हींचा परिचय युवकांना होतो. जगभरात, प्रत्येक क्षेत्रात अधिकाधिक महिलांना कसे आणता येईल यावर चर्चा होत आहे. असे करण्याची पहिली पायरी म्हणजे प्रत्येक क्षेत्राला शैक्षणिक स्तरावर सर्वसमावेशक बनवणे. कायद्याचे शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये महिलांची संख्या वाढल्यावर कायद्याशी संबंधित व्यवसायातील महिलांची संख्याही वाढेल. अधिकाधिक महिलांना कायदा संबंधी शिक्षणात कसे आणता येईल यावर या परिषदेतील सहभागी  विचार विनिमय करू शकतात.

 

मित्रहो, 

जगाला युवा कायदेतज्ञांची  गरज आहे ज्यांच्याकडे विविध प्रकारचे प्रदर्शन आहे. बदलत्या काळाशी आणि तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी कायदेशीर शिक्षणाचीही गरज आहे. गुन्हे ,तपास आणि पुरावे यातील नवीन कल समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करणे उपयुक्त ठरेल.

मित्रहो,

कायदा क्षेत्रातील युवा व्यावसायिकांना जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवून देण्यात मदत करण्याची गरज आहे. आपली सर्वोत्कृष्ट विधि विद्यापीठे विविध देशांमध्ये आदानप्रदान कार्यक्रम मजबूत करू शकतात. उदाहरणार्थ, भारतामध्ये न्यायवैद्यकला समर्पित जगातील कदाचित एकमेव विद्यापीठ आहे. 

विविध देशांतील विद्यार्थी, कायदा शिक्षण देणाऱ्या संस्था आणि अगदी न्यायाधीशांनाही इथल्या छोट्या अभ्यासक्रमांचा लाभ घेण्यासाठी मदत केली जाऊ शकते. तसेच न्यायदानाशी संबंधित अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत. त्यांच्यामध्ये अधिक प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी विकसनशील देश एकत्र काम करू शकतात. विद्यार्थ्यांना अशा संस्थांमध्ये इंटर्नशिप शोधण्यासाठी देखील मदत केली जाऊ शकते. यामुळे आपल्या कायदा व्यवस्थांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींमधून  शिकता येईल. 

मित्रहो,

भारताला वसाहतवादी  काळापासून कायदेशीर व्यवस्थेचा  वारसा मिळाला आहे. मात्र गेल्या काही वर्षांत आम्ही त्यात अनेक सुधारणा केल्या. उदाहरणार्थ, भारताने वसाहतवादी काळातील हजारो कालबाह्य कायदे रद्द केले आहेत. यापैकी काही कायदे लोकांच्या छळाचे साधन बनले होते. यामुळे जगणे सुखकर झाले आणि व्यवसाय सुलभता देखील वाढली आहे. भारत सध्याच्या वास्तव स्थितीला अनुरूप कायद्यांचे आधुनिकीकरण करत आहे. आता, 3 नवीन कायद्यांनी 100 वर्षांहून अधिक जुन्या वसाहतवादी काळातील  फौजदारी कायद्यांची जागा घेतली आहे. यापूर्वी, शिक्षा आणि दंड या  बाबींवर लक्ष केंद्रित केले जात होते. आता न्याय मिळवून देण्यावर भर आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीऐवजी आश्वासकतेची भावना आहे.

 

मित्रहो,

तंत्रज्ञानाचा न्याय व्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. गेल्या काही वर्षांत, भारताने स्थळांचे नकाशे तयार करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील लोकांना मालमत्ता हक्काचे कार्ड देण्यासाठी ड्रोनचा वापर केला आहे. वादाची शक्यता कमी होते. खटल्याची शक्यता कमी होते.  आणि न्याय व्यवस्थेवरील भार कमी होऊन ती अधिक कार्यक्षम बनते. डिजिटलायझेशनमुळे भारतातील अनेक न्यायालयांना ऑनलाइन कामकाज करण्यास मदत झाली आहे. यामुळे लोकांना दूरच्या ठिकाणाहूनही न्याय मिळण्यास मदत झाली आहे. या संदर्भातला  आपला अनुभव इतर देशांसोबत सामायिक करण्यात भारताला आनंद होईल.  आम्ही इतर देशांमधील अशाच उपक्रमांबद्दल जाणून घेण्यास देखील उत्सुक आहोत.

मित्रहो, 

न्यायदानातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाता येते.  मात्र हा प्रवास एका सामायिक मूल्याने सुरू होतो. आपण न्यायाप्रति आवड सामायिक केली पाहिजे. या परिषदेमुळे ही भावना दृढ होईल. आपण असे जग निर्माण करूया जिथे प्रत्येकाला वेळेवर न्याय मिळेल आणि कोणीही वंचित राहणार नाही.

धन्यवाद.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Positive consumer sentiments drive automobile dispatches up 12% in 2024: SIAM

Media Coverage

Positive consumer sentiments drive automobile dispatches up 12% in 2024: SIAM
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Text of PM's speech at inauguration of Sri Sri Radha Madanmohanji Temple of ISKCON in Navi Mumbai
January 15, 2025
The followers of ISKCON spread across the world are tied by the thread of devotion to Lord Krishna which keeps them all connected to each other, which keeps guiding every devotee 24 hours a day, the formula of thoughts of Srila Prabhupada Swami: PM
India is not just a piece of land bounded by geographical boundaries, its a living land, a living culture, the consciousness of this culture is spirituality, if we want to understand India, we have to first imbibe spirituality: PM
The main foundation of our spiritual culture is the spirit of service: PM

हरे कृष्णा – हरे कृष्णा !

हरे कृष्णा – हरे कृष्णा !

महाराष्ट्र के गवर्नर सी. पी. राधाकृष्णन जी, यहां के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवा भाऊ, उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, श्रद्धेय गुरु प्रसाद स्वामी जी, हेमा मालिनी जी, सभी सम्मानित अतिथि, भक्तगण, भाइयों और बहनों।

आज ज्ञान और भक्ति की इस महान धरती पर इस्कॉन के प्रयासों से श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर का उद्घाटन हो रहा है। मेरा सौभाग्य है कि मुझे ऐसे अलौकिक अनुष्ठान में अपनी भूमिका निभाने का पुण्य प्राप्त हुआ है। ये इस्कॉन के संतों का अपार स्नेह और अपनापन है, श्रील प्रभुपाद स्वामी का आशीर्वाद है, मैं सभी पूज्य संतों का आभार करता हूँ, उनके चरणों में प्रणाम करता हूँ। मैं अभी देख रहा था, श्री राधा मदनमोहनजी मंदिर परिसर की जो रूपरेखा है, इस मंदिर के पीछे जो विचार है, इसका जो स्वरूप है, उसमें आध्यात्म और ज्ञान की सम्पूर्ण परंपरा के दर्शन होते हैं। मंदिर में ईश्वर के विविध स्वरूपों के दर्शन होते हैं, जो ‘एको अहम् बहु स्याम’ ये हमारे विचार को भी अभिव्यक्त करते हैं। नई पीढ़ी की रुचि और आकर्षण के अनुरूप यहाँ रामायण, महाभारत, उसको समेटे हुए, उस पर आधारित म्यूजियम भी बनाया जा रहा है। यहां वृंदावन के 12 जंगलों पर आधारित एक उद्यान भी विकसित किया गया है। मुझे विश्वास है, ये मंदिर परिसर, आस्था के साथ-साथ भारत की चेतना को भी समृद्ध करने का एक पुण्य केंद्र बनेगा। मैं इस पुनीत कार्य के लिए इस्कॉन के सभी संतों और सदस्यों को, और महाराष्ट्र के लोगों को बहुत-बहुत बधाई देता हूँ।

साथियों,

आज इस मौके पर मुझे परम श्रद्धेय गोपाल कृष्ण गोस्वामी महाराज का भावुक स्मरण भी हो रहा है। इस प्रोजेक्ट में उनका विज़न जुड़ा हुआ है, भगवान श्रीकृष्ण के प्रति उनकी अगाध भक्ति का आशीर्वाद जुड़ा हुआ है। आज वो भौतिक शरीर से भले ही यहाँ न हों, लेकिन उनकी आध्यात्मिक उपस्थिति हम सब महसूस कर रहे हैं। मेरे जीवन में तो उनके स्नेह का, उनकी स्मृतियों का एक अलग ही स्थान है। उन्होंने जब विश्व की सबसे बड़ी गीता का लोकार्पण करवाया, तो उसके लिए मुझे आमंत्रित किया और मुझे भी वो पुण्य प्रसाद मिला। श्रील प्रभुपाद जी की 125वीं जन्मजयंती के अवसर पर भी मुझे उनका सानिध्य प्राप्त हुआ था। मुझे संतोष है कि आज मैं उनके एक और सपने को पूरा होते देख रहा हूँ, उसका साक्षी बन रहा हूँ।

साथियों,

दुनियाभर में फैले इस्कॉन के अनुयायी भगवान श्रीकृष्ण की भक्ति के डोर से बंधे हैं। उन सबको एक-दूसरे से कनेक्ट रखने वाला एक और सूत्र है, जो चौबीसों घंटे हर भक्त को दिशा दिखाता रहता है। ये श्रील प्रभुपाद स्वामी के विचारों का सूत्र है। उन्होंने उस समय वेद-वेदांत और गीता के महत्व को आगे बढ़ाया, जब देश गुलामी की बेड़ियों में जकड़ा था। उन्होंने भक्ति वेदांत को जन सामान्य की चेतना से जोड़ने का अनुष्ठान किया। 70 वर्ष की आयु में जब लोग अपने कर्तव्यों को पूरा मान चुके होते हैं, उस समय उन्होंने इस्कॉन जैसा मिशन शुरू किया। इसके बाद उन्होंने लगातार दुनियाभर का भ्रमण किया, श्रीकृष्ण के संदेश को दुनिया के कोने-कोने में ले गए। आज दुनिया के हर कोने में करोड़ों लोगों को उनकी तपस्या का प्रसाद मिल रहा है। श्रील प्रभुपाद स्वामी की सक्रियता, उनके प्रयास आज भी हमें प्रेरित करते हैं।

साथियों,

हमारा भारत एक असाधारण और अद्भुत भूमि है। भारत केवल भौगोलिक सीमाओं में बंधा भूमि का एक टुकड़ा मात्र नहीं है। भारत एक जीवंत धरती है, एक जीवंत संस्कृति है, जीवंत परंपरा है। और, इस संस्कृति की चेतना है- यहाँ का आध्यात्म! इसलिए, यदि भारत को समझना है, तो हमें पहले आध्यात्म को आत्मसात करना होता है। जो लोग दुनिया को केवल भौतिक दृष्टि से देखते हैं, उन्हें भारत भी अलग-अलग भाषा और प्रांतों का समूह नजर आता है। लेकिन, जब आप इस सांस्कृतिक चेतना से अपनी आत्मा को जोड़ते हैं, तब आपको भारत के विराट रूप के दर्शन होते हैं। तब आप देख पाते हैं, सुदूर पूरब में बंगाल की धरती पर चैतन्य महाप्रभु जैसे संत अवतरित होते हैं। पश्चिम में महाराष्ट्र में संत नामदेव, तुकाराम, और ज्ञानदेव जैसे संतों का अवतरण होता है। चैतन्य महाप्रभु ने महावाक्य मंत्र जन-जन तक पहुंचाया। महाराष्ट्र के संतों ने ‘रामकृष्ण हरी’, रामकृष्ण हरी के मंत्र से आध्यात्मिक अमृत बांटा। संत ज्ञानेश्वर ने ज्ञानेश्वरी गीता के जरिए भगवान कृष्ण के गूढ ज्ञान को जनसुलभ बनाया। इसी तरह, श्रील प्रभुपाद जी ने इस्कॉन के माध्यम से गीता को लोकप्रिय बनाया। गीता की टीकाएं प्रकाशित कर उसकी भावना से लोगों को जोड़ा। अलग-अलग स्थानों पर जन्में ये सभी संत अपने-अपने तरीके से कृष्ण भक्ति की धारा को गति देते रहे हैं। इन संतों के जन्मकाल में वर्षों का अंतर है, अलग-अलग भाषा, अलग-अलग पद्धति है, लेकिन, बोध एक है, विचार एक है, चेतना एक है। सभी ने भक्ति के प्रकाश से समाज में नए प्राण फूंके, उसे नई दिशा दी, अविरत ऊर्जा दी।

साथियों,

आप सभी परिचित हैं, हमारी आध्यात्मिक संस्कृति की नींव का प्रमुख आधार सेवा भाव है। आध्यात्मिकता में जनार्दन-सेवा और जन-सेवा, एक हो जाते हैं। हमारी आध्यात्मिक संस्कृति साधकों को समाज से जोड़ती है, उनमें करुणा की भावना पैदा करती है। ये भक्ति-भाव उन्हें सेवा-भाव की ओर ले जाता है।

दातव्यम् इति यत् दानम दीयते अनुपकारिणे देशे काले च पात्रे च तत् दानं सात्त्विकं स्मृतम्।।

श्री कृष्ण ने हमें इस श्लोक में सच्ची सेवा का मतलब बताया है। उन्होंने बहुत सुंदर तरीके से समझाया है कि सच्ची सेवा वही है, जिसमें आपका कोई स्वार्थ न हो। हमारे सभी धार्मिक ग्रंथों और शास्त्रों के मूल में भी सेवा भावना है। इस्कॉन जैसी इतनी विराट संस्था भी, इसी सेवा भावना से काम करती है। शिक्षा, स्वास्थ्य, और पर्यावरण से जुड़े कितने ही काम आपके प्रयासों से होते हैं। कुम्भ में इस्कॉन सेवा के कई बड़े कार्य कर रहा है।

साथियों,

मुझे संतोष है कि हमारी सरकार भी इसी सेवा भावना के साथ पूरे समर्पण से लगातार देशवासियों के हित में काम कर रही है। हर घर में शौचालय बनवाना, हर गरीब महिला को उज्ज्वला का गैस कनेक्शन देना, हर घर तक नल से जल की सुविधा पहुंचाना, हर गरीब को 5 लाख रुपए तक मुफ्त इलाज की सुविधा देना, 70 वर्ष की आयु से ऊपर के हर बुजुर्ग को इस सुविधा के दायरे में लाना, हर बेघर को पक्के घर देना, ये इसी सेवा भावना के साथ, इसी समर्पण भाव के साथ किए गए कार्य हैं, जो मेरे लिए हमारी महान सांस्कृतिक परंपरा का प्रसाद है। सेवा की यही भावना, सच्चा सामाजिक न्याय लाती है, सच्चे सेक्यूलरिज्म का प्रतीक है।

साथियों,

हमारी सरकार कृष्ण सर्किट के माध्यम से देश के अलग-अलग तीर्थों, धार्मिक स्थानों को जोड़ रही है। इस सर्किट का विस्तार गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश और ओडिशा तक है। स्वदेश दर्शन और प्रसाद योजना के द्वारा इन स्थानों को विकसित किया जा रहा है। इन मंदिरों में भगवान श्रीकृष्ण के अलग-अलग रूपों के दर्शन होते हैं। कहीं वो बाल रूप में दिखते हैं, तो कहीं उनके साथ राधा रानी की भी पूजा होती है। किसी मंदिर में उनका कर्मयोगी स्वरूप दिखाई देता है, तो कहीं राजा के रूप में उनकी पूजा की जाती है। हमारा प्रयास है कि भगवान श्री कृष्ण के जीवन से जुड़े अलग-अलग स्थलों तक पहुंचना और मंदिरों के दर्शन करना आसान हो। इसके लिए विशेष ट्रेनें भी चलाई जा रही हैं। इस्कॉन भी कृष्ण सर्किट से जुड़े आस्था के इन केंद्रों पर श्रद्धालुओं को लाने में जरूर सहयोग कर सकता है। मेरा आपसे आग्रह है कि आप अपने सेंटर से जुड़ने वाले सभी भक्तों को भारत में कम से कम 5 ऐसे स्थानों पर जरूर भेजें।

साथियों,

पिछले एक दशक में देश में विकास और विरासत को एक साथ गति मिली है। विरासत से विकास के इस मिशन को इस्कॉन जैसी संस्थाओं का महत्वपूर्ण सहयोग मिल रहा है। हमारे मंदिर या धार्मिक स्थल तो सदियों से सामाजिक चेतना के केंद्र रहे हैं। हमारे गुरुकुलों का शिक्षा और कौशल विकास को बढ़ावा देने में अहम योगदान रहा है। इस्कॉन भी अपने कार्यक्रमों के जरिए युवाओं को प्रेरित करता है कि वो आध्यात्म को अपने जीवन का हिस्सा बनाएं। और अपनी परंपरा पर चलते हुए, इस्कॉन के युवा साधक कैसे आधुनिक टेक्नोलॉजी को आत्मसात करते हैं, ये देखना और अद्भुत होता है। और आपका इन्फॉरमेशन नेटवर्क तो दूसरों के लिए सीखने योग्य है। मुझे विश्वास है, इस्कॉन के सानिध्य में युवा सेवा और समर्पण की भावना से राष्ट्रहित में काम करेंगे। इस परिसर में भक्तिवेदांत आयुर्वेदिक हीलिंग सेंटर की सुविधा भी लोगों को मिलेगी। और मेरा तो मत है, दुनिया के लिए मैंने हमेशा संदेश दिया है- ‘हील इन इंडिया’। शुश्रूषा के लिए, और सर्वांगीण रूप से स्वस्थ होने के लिए, well being के लिए ‘हील इन इंडिया’। यहाँ भक्ति वेदान्त कॉलेज फॉर वेदिक एजुकेशन की स्थापना भी की गई है। इनका लाभ हर समाज को होगा, पूरे देश को होगा।

साथियों,

हम सब देख रहे हैं कि वर्तमान समाज जितना आधुनिक हो रहा है, उतनी ही उसे संवेदनशीलता की भी जरूरत है। हमें संवदेनशील इंसानों का समाज तैयार करना है। एक ऐसा समाज जो मानवीय गुणों के साथ आगे बढ़े। एक ऐसा समाज जहां अपनेपन की भावना का विस्तार हो। इस्कॉन जैसी संस्था अपने भक्ति वेदांत के माध्यम से दुनिया की संवेदनशीलता को नया प्राण दे सकती है। आपकी संस्था अपनी क्षमताओं का उपयोग कर, पूरी दुनिया में मानवीय मूल्यों का विस्तार कर सकती है। मुझे विश्वास है कि प्रभुपाद स्वामी के आदर्शों को जीवंत बनाए रखने के लिए इस्कॉन के महानुभाव इसी तरह हमेशा तत्पर रहेंगे। मैं एक बार फिर राधा मदनमोहनजी मंदिर के लिए पूरे इस्कॉन परिवार को, सभी देशवासियों को बहुत-बहुत बधाई देता हूं।

आप सबका बहुत-बहुत धन्यवाद।

हरे कृष्णा – हरे कृष्णा !

हरे कृष्णा – हरे कृष्णा !

हरे कृष्णा – हरे कृष्णा !