“This is India’s Time”
“Every development expert group in the world is discussing how India has transformed in the last 10 years”
“World trusts India today”
“Stability, consistency and continuity make for the ‘first principles’ of our overall policy making”
“India is a welfare state. We ensured that the government itself reaches every eligible beneficiary”
“Productive expenditure in the form of capital expenditure, unprecedented investment in welfare schemes, control on wasteful expenditure and financial discipline - Four main factors in each of our budgets”
“Completing projects in a time-bound manner has become the identity of our government”
“We are addressing the challenges of the 20th century and also fulfilling the aspirations of the 21st century”
“White Paper regarding policies followed by the country in the 10 years before 2014 presented in this session of Parliament”

गुयानाचे पंतप्रधान मार्क फिलिप्स, विनीत जैन, उद्योग क्षेत्रातील नेते, विविध मुख्य कार्यकारी अधिकारी गण , इतर माननीय, बंधू आणि भगिनींनो

मित्रांनो,

जागतिक व्यवसाय परिषदेच्या चमूने यावेळी शिखर परिषदेसाठी जी संकल्पना ठेवली आहे, ती संकल्पनाच खूप महत्त्वाची आहे असे मला वाटते. व्यत्यय, विकास आणि विविधीकरण हे आजच्या काळात अतिशय लोकप्रिय शब्द आहेत. आणि या व्यत्यय, विकास आणि विविधीकरणाच्या चर्चेत सर्वजण सहमत आहेत की ही भारताची वेळ आहे. आणि संपूर्ण जगाचा भारतावरचा विश्वास सतत वाढत आहे. दावोसमध्ये अशा लोकांचा कुंभमेळा आपण नुकताच पाहिला, तिथले पाणी काही वेगळेच आहे. तिथे गंगाजल नाही. दावोसमध्येही भारताप्रती अभूतपूर्व उत्साह दिसून आला. कोणीतरी म्हटले की भारत ही एक अभूतपूर्व आर्थिक यशोगाथा आहे. दावोसमध्ये जे बोललं जात होतं ते जगातील धोरणकर्ते  बोलत होते. कोणीतरी म्हंटलं की भारतातील डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधा नवीन उंचीवर आहेत. एका दिग्गजाने सांगितले की, आता जगात असे एकही ठिकाण नाही जिथे भारताचे वर्चस्व नाही. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तर भारताच्या क्षमतेची तुलना  ‘रेजिंग बुल’  शी केली. आज जगातील प्रत्येक विकास तज्ज्ञांच्या गटात चर्चा आहे की 10 वर्षात भारताचा कायापालट झाला आहे.  आता विनीत जी सांगत होते, त्यात अनेक गोष्टींचा उल्लेख होता. आज जगाचा भारतावर किती विश्वास आहे हे या गोष्टींवरून दिसून येते. भारताच्या क्षमतेबाबत जगात इतकी सकारात्मक भावना यापूर्वी कधीही नव्हती. भारताच्या यशाबद्दल इतकी सकारात्मक भावना जगात क्वचितच कोणी अनुभवली असेल. म्हणूनच मी लाल किल्ल्यावरून  म्हंटलं  आहे - हीच ती वेळ आहे, योग्य वेळ आहे

 

मित्रांनो,

कोणत्याही देशाच्या विकासाच्या प्रवासात एक वेळ अशी येते की सर्व परिस्थिती त्याच्या अनुकूल असते. जेव्हा तो देश पुढील अनेक शतके स्वत:ला मजबूत बनवतो. मला आज भारतासाठी तीच वेळ दिसत आहे. जेव्हा मी हजार वर्षांबद्दल बोलतो तेव्हा मी खूप विचार करून मग बोलतो. हे खरे आहे की जर एखाद्याने हजार शब्द कधीच ऐकले नाहीत, जर त्याने हजार दिवस ऐकले नाहीत, तर त्याला हजार वर्षे खूप मोठी वाटतात, परंतु काही लोक असे आहेत जे पाहू शकतात. हा कालावधी खरोखरच अभूतपूर्व आहे. एक प्रकारे ‘पुण्यचक्र’ सुरू झाले आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा आपला विकास दर सतत वाढत आहे आणि आपली वित्तीय तूट कमी होत आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा आपली निर्यात वाढत आहे आणि चालू खात्यातील तूट कमी होत आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा आमची उत्पादक गुंतवणूक विक्रमी उच्च पातळीवर आहे आणि महागाई नियंत्रणात  आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा संधी आणि उत्पन्न दोन्ही वाढत आहेत आणि गरिबी कमी होत आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा उपभोग आणि कॉर्पोरेट नफा दोन्ही वाढत आहेत आणि बँक एनपीएमध्ये विक्रमी घट झाली आहे. ही अशी वेळ आहे जेव्हा उत्पादन आणि उत्पादकता दोन्ही वाढते. आणि... ही अशी वेळ आहे जेव्हा आमचे टीकाकार आजतागायत सर्वात कमी आहेत.

मित्रांनो,

यावेळी आमच्या अंतरिम अर्थसंकल्पाला तज्ञांकडून आणि आमच्या माध्यमांमधील मित्रांकडून खूप प्रशंसा मिळाली आहे. अनेक विश्लेषकांनीही त्याची प्रशंसा केली असून हा फक्त लोकांना आकर्षित करणारा अर्थसंकल्प नाहीये, हे पण स्तुतीचे एक कारण असल्याचेही म्हटले आहे. या पुनरावलोकनाबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण मला त्याच्या मुल्यांकनात आणखी काही गोष्टी जोडायच्या आहेत... काही मूलभूत मुद्द्यांकडे लक्ष वेधून घ्यायचे आहे. जर तुम्ही आमच्या अर्थसंकल्पावर किंवा एकूणच धोरणाबाबत चर्चा केली तर तुम्हाला त्यात काही प्राथमिक तत्त्वे दिसतील. आणि ती प्राथमिक तत्त्वे आहेत - स्थिरता, सातत्य, निरंतरता. हा अर्थसंकल्प देखील त्याचाच एक विस्तार आहे.

 

मित्रांनो,

जेव्हा एखाद्याची परीक्षा घ्यायची असते तेव्हा त्याची परीक्षा फक्त अडचणीच्या किंवा आव्हानाच्या वेळीच होऊ शकते. कोरोना महामारी आणि त्यानंतरचा संपूर्ण काळ जगभरातील सरकारांसाठी मोठी परीक्षाच ठरला. आरोग्य आणि अर्थव्यवस्थेच्या या दुहेरी आव्हानाला कसे सामोरे जायचे, याची कल्पना सुद्धा कोणाला नव्हती. या काळात भारताला सर्वाधिक… आठवा तो दिवस, मी सतत टीव्हीवर येऊन देशाशी संवाद साधत असे. आणि त्या संकटाच्या काळात मी प्रत्येक क्षणी छाती उंचावत देशवासियांसमोर उभा राहिलो.  त्यावेळी सुरुवातीच्या काळात मी सांगितले होते आणि त्यानुसार मी जीव वाचवण्याला प्राधान्य दिले होते. आमचे म्हणणे होते की , जीवन असेल तर जग आहे. तुम्हाला आठवत असेल. आम्ही आमची सर्व शक्ती जीवन वाचवणारी संसाधने गोळा करण्यात आणि लोकांना जागरूक करण्यात लावली होती. सरकारने गरिबांसाठी मोफत धान्य पुरविले. आम्ही मेड इन इंडिया लसीवर लक्ष केंद्रित केले. ही लस प्रत्येक भारतीयापर्यंत त्वरीत पोहोचेल याची आम्ही खात्री केली. या मोहिमेला गती मिळताच… आम्ही म्हणालो, " जान भी है, जहान भी है."

आम्ही आरोग्य आणि उपजीविकेच्या दोन्ही मागण्या पूर्ण केल्या. सरकारने थेट महिलांच्या बँक खात्यात पैसे पाठवले... रस्त्यावरील विक्रेते आणि छोट्या उद्योगपतींना आम्ही आर्थिक मदत केली, शेतीत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आम्ही सर्व उपाययोजना केल्या. आपत्तीचे संधीत रूपांतर करण्याचा संकल्प आम्ही केला.माध्यम विश्वातील माझ्या मित्रांनो, तुम्ही त्यावेळची वर्तमानपत्रे काढा आणि बघा... त्यावेळी मोठ्या तज्ज्ञांचे मत असे होते की पैसे छापायचे, नोटा छापायच्या, त्यामुळे मागणी वाढते आणि मोठ्या उद्योगांना मदत होते. मी समजू शकतो की उद्योग जगताच्या लोकांनी माझ्यावर रुबाब घातला, ते आजही करतील. पण सर्व नोबेल पारितोषिक विजेतेही मला एकच सांगायचे, हेच चालले होते. जगातील अनेक सरकारांनीही हा मार्ग स्वीकारला होता. पण या पावलामुळे इतर काही जरी निष्पन्न झाले नाही, तरी ते आपल्या इच्छेनुसार देशाची अर्थव्यवस्था चालवू शकले.

इतर देशांमध्ये महागाई वाढली, त्या लोकांची अवस्था अशी झाली होती.त्यांनाही महागाई आटोक्यात आणता येत नव्हतं. त्यांनी निवडलेल्या मार्गाचे आजही दुष्परिणाम आहेत. आमच्यावरही दबाव टाकण्याचे अनेक प्रयत्न झाले. समोरचा सोपा मार्ग असा होता की जग जे काही म्हणतंय, जग जे काही करतंय, त्यातच वाहून जाऊया. पण आम्हाला जमिनी वास्तव माहीत होते...आम्ही समजत होतो ...आम्ही आमच्या अनुभवाच्या आधारे काही निर्णय घेतले. आणि त्यातून निघालेल्या निकालाचे आजही जगभरातून कौतुक होत आहे. आता सगळ जग त्याचे कौतुक करत आहे. ज्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, तीच आमची धोरणे योग्य असल्याचे सिद्ध झाले आणि म्हणूनच आज भारताची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत आहे.

 

मित्रांनो,

आपण एक कल्याणकारी राज्य आहोत. देशातील सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणे आणि त्याचे जीवनमान सुधारणे हे आमचे प्राधान्य आहे. आम्ही नवीन योजना बनवणे स्वाभाविक आहे, परंतु या योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचला पाहिजे याची आम्ही काळजी घेतली.

आम्ही केवळ वर्तमान काळासाठी नव्हे, तर भविष्यासाठी देखील गुंतवणूक केली आहे. लक्षपूर्वक पहिले, तर आमच्या प्रत्येक अर्थसंकल्पात तुम्हाला चार प्रमुख घटक दिसतील. पहिला- भांडवली खर्चाच्या स्वरूपात उत्पादक खर्चाची विक्रमी नोंद, दुसरा- कल्याणकारी योजनांवरील अभूतपूर्व गुंतवणूक, तिसरा- अनावश्यक खर्चावर नियंत्रण आणि चौथा- आर्थिक शिस्त. तुम्ही पहिले असेल, की आम्ही या चार घटकांमध्ये समतोल साधला आणि चारही घटकांमधील निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करून दाखवली. आज आम्हाला काही जण विचारतात, की आम्ही हे कसे साधले? त्याचे वेगवेगळ्या पद्धतीने  उत्तर देता येईल. आणि त्यापैकी प्रमुख आहे- ‘पैसे वाचवणे म्हणजे पैसे कमवणे’ हा मंत्र. उदाहरणार्थ, प्रकल्प लवकर पूर्ण करून आणि वेळेत पूर्ण करून आम्ही देशाचा खूप पैसा वाचवला. वेळेत प्रकल्प पूर्ण करणे ही आमच्या सरकारची ओळख बनली आहे. मी एक उदाहरण देतो. इस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर 2008 मध्ये सुरू करण्यात आला. आधीच्या सरकारने जलद काम पूर्ण केले असते, तर त्यासाठीची गुंतवणूक 16,500 कोटी रुपये इतकी असती. पण हा प्रकल्प गेल्या वर्षी पूर्ण झाला, तोपर्यंत त्याचा खर्च 50 हजार कोटीच्या वर गेला. त्याचप्रमाणे तुम्हाला आसामचा बोगीबील पूलही माहीत आहे. याची सुरुवात 1998 साली झाली होती आणि तो 1100 कोटी रुपये खर्चाने पूर्ण करायचा होता. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या ठिकाणी मी अनेकदा भेट दिली आणि त्या कामाला गती दिली. हे काम 1998 पासून सुरु होते. आम्ही ते 2018 मध्ये पूर्ण केले. मात्र त्याचा खर्च 1100 कोटीवरून 5 हजार कोटीवर पोहोचला. अशा कितीतरी प्रकल्पांचे उदाहरण देता येईल. आधी जो पैसा फुकट जात होता, तो कोणाचा होता? तो पैसा कोणत्याही नेत्याच्या खिशातून येत नव्हता. तो पैसा देशाचा होता. देशाच्या कर दात्यांचा पैसा होता, तुमचा पैसा होता. आम्ही करदात्यांच्या पैशाचा मान राखला, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. संसदेच्या नव्या इमारतीचे बांधकाम किती वेगाने झाले ते तुम्ही पहिलेच आहे. कर्तव्य पथ असो... मुंबईचा अटल सेतू असो... या बांधकामाचा वेग देशाने पाहिला आहे. त्यामुळेच आज देश म्हणतो- मोदी ज्या योजनेची पायाभरणी करतात, त्याचे लोकार्पणही मोदीच करतात.

 

मित्रहो,

आमच्या सरकारने व्यवस्थेत पारदर्शकता आणून आणि तंत्रज्ञानाचा वापर करून देशाचा पैसा वाचवला आहे. तुम्ही कल्पना करा...काँग्रेस सरकारच्या काळात कागदपत्रांमध्ये... तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल, की कागदपत्रांमध्ये अशा 10 कोटी नावांची नोंद होती, जे बनावट लाभार्थी होते, असे लाभार्थी, जे कधी जन्मालाच आले नव्हते. विधवा महिलांची अशीच नावे होती, ज्या मुली कधी जन्मालाच आल्या नव्हत्या. दहा कोटी. आम्ही अशी दहा कोटी बनावट नावे कागदपत्रांमधून हटवली. आम्ही थेट लाभार्थी योजना सुरु केली. आम्ही पैशाची गळती थांबवली. एक पंतप्रधान असे म्हणाले होते, जेव्हा एक रुपया मंजूर होतो, तेव्हा लाभार्थ्यांपर्यंत त्यापैकी केवळ 15 पैसे पोहोचतात. आम्ही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम थेट जमा केली. आणि एक रुपया जेव्हा दिला जातो, तेव्हा लाभार्थ्यांना 99 सुद्धा नाही, तर शंभर पैसे मिळतात. थेट लाभार्थी योजनेचा एक फायदा असा झाला आहे की, जवळजवळ 3 लाख कोटी रुपये चुकीच्या हातांमध्ये जाण्यापासून रोखले गेले आहेत. सरकार द्वारे केल्या जाणाऱ्या खरेदीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आमच्या सरकारने GeM हे पोर्टल सुरू केले, GeM द्वारे आम्ही केवळ वेळेची बचत केली नाही, तर गुणवत्ताही सुधारली आहे. बरेच लोक पुरवठादार बनले आहेत. आणि त्यात सरकारने सुमारे 65 हजार कोटी रुपयांची बचत केली, 65 हजार कोटी रुपयांची बचत… आम्ही तेल खरेदीमधेही वैविध्य आणले आणि त्यामुळे 25 हजार कोटी रुपयांची बचत झाली. तुम्हालाही याचा लाभ मिळत आहे, दर दिवशी मिळत आहे. गेल्या एका वर्षात आम्ही केवळ पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण करून 24 हजार कोटी रुपयांची बचत केली. आणि एवढेच नाही तर ज्या स्वच्छता अभियानाची काही लोक खिल्ली उडवतात... या देशाचे पंतप्रधान स्वच्छतेबद्दलच  बोलत असतात. स्वच्छता अभियानांतर्गत सरकारी इमारतींमध्ये केलेल्या साफसफाईच्या कामातून निघालेले भंगार सामान विकून मी 1100 कोटी रुपये कमावले आहेत.

आणि मित्रांनो,

देशातील नागरिकांचे पैसे वाचतील अशा पद्धतीने आम्ही आमच्या योजना बनवल्या. आज जल जीवन मिशनमुळे गरिबांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत आहे. त्यामुळे त्यांचा आजारपणावरील खर्च कमी झाला. आयुष्मान भारतने देशातील गरिबांचे 1 लाख कोटी रुपये वाचवले आणि त्यांना उपचार मिळवून दिले. पीएम जन औषधी केंद्रांवर 80 टक्के सवलत, आणि आपल्या देशात सवलत ही अशी एक ताकद आहे, कितीही मोठे दुकान असो, कितीही उत्तम माल असो, शेजारच्या दुकानदाराने दहा टक्के सवलतीची पाटी लिहिली, तर सर्व महिला त्या दुकानात गर्दी करतील. देशातील मध्यम वर्ग आणि गरीब कुटुंबांना आम्ही 80 टक्के सवलतीच्या दरात औषधे उपलब्ध करून देतो. जन औषधी केंद्रांमध्ये ज्यांनी औषधे खरेदी केली आहेत, त्यांच्या 30 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे.

मित्रांनो,

माझे उत्तरदायित्व केवळ आताच्या पिढीसाठीच नव्हे, तर भविष्यातील अनेक पिढ्यांसाठी देखील आहे. मी केवळ आपले दैनंदिन जीवन जगण्यामध्ये जीवनाची सफलता मानत नसून, येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करून जावे, असे मला वाटते.

 

मित्रहो,

तिजोरी रिकामी करून आणखी चार मते मिळवण्याच्या राजकारणापासून आम्ही दूर आहोत, आणि म्हणून आम्ही धोरणांमध्ये, निर्णयांमध्ये आर्थिक व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. मी तुम्हाला एक छोटेसे उदाहरण देईन. विजेबाबत काही पक्षांचा दृष्टिकोन तुम्हाला माहीत आहे. तो दृष्टिकोन देशाच्या विद्युत व्यवस्थेला विनाशाकडे नेणारा आहे. माझी पद्धत त्यांच्यापेक्षा वेगळी आहे. आमच्या सरकारने एक कोटी घरांसाठी रूफटॉप सोलर योजना आणली आहे हे तुम्हाला माहीतच आहे. या योजनेमुळे लोक वीज निर्मिती करून त्यांचे विजेचे बिल शून्यावर आणू शकतील आणि अतिरिक्त वीज विकून पैसेही कमवू शकतील. आम्ही उजाला योजना सुरू केली, जी स्वस्त एलईडी बल्ब देते… आमच्या आधीच्या सरकारच्या कार्यकाळात एलईडी बल्ब 400 रुपयांना मिळत होते. आम्ही इथे आलो, आणि परिस्थिती बदलली, आणि ते 40-50 रुपयांना मिळू लागले, तोच दर्जा, कंपनीही तीच. एलईडीमुळे लोकांच्या वीज बिलात जवळजवळ 20 हजार कोटी रुपयांची बचत झाली.

मित्रांनो,

तुम्ही सगळे इथे… मोठ्या संख्येने अनुभवी पत्रकारही इथे बसले आहेत… तुम्हाला माहिती आहे… सात दशकांपूर्वीपासून आपल्याकडे गरिबी हटावचे नारे रात्रंदिवस दिले जात आहेत. या घोषणांनी गरिबी तर हटली नाहीच, पण त्यावेळच्या सरकारांनी गरिबी हटवण्याच्या सूचना देणारे उद्योग मात्र नक्कीच निर्माण केले. त्यामधूनच त्यांची कमाई व्हायची. सल्लागार सेवा द्यायला निघाले होते. या उद्योगातील लोक दरवेळी गरिबी हटवण्यासाठी नवनवीन फॉर्म्युला सांगायचे आणि स्वतः करोडपती व्हायचे, पण त्यांना देशाची गरिबी कमी करता आली नाही. वर्षानुवर्षे एसी खोल्यांमध्ये बसून, वाईन आणि चीझ बरोबर गरिबी हटवण्याच्या फॉर्म्युला वर वादविवाद व्हायचे, आणि गरीब गरीबच राहिले. मात्र, 2014 नंतर जेव्हा त्या गरीबाचा मुलगा पंतप्रधान झाला, तेव्हा गरिबीच्या नावावर सुरु असलेला हा उद्योग ठप्प झाला. मी गरिबीमधूनच इथवर पोहोचलो आहे, त्यामुळे मला गरिबीशी लढायचे कसे हे माहित आहे. आमच्या सरकारने गरिबी विरोधात लढा देण्यासाठी मोहीम सुरू केली. प्रत्येक दिशेने काम सुरू केले, तेव्हा त्याचा परिणाम असा झाला की, गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. यावरून आमच्या सरकारची धोरणे योग्य असल्याचे, आमच्या सरकारची दिशा योग्य असल्याचे दिसून येते. याच  दिशेने वाटचाल करून आम्ही देशाची गरिबी कमी करू आणि आपला देश विकसित करू.

मित्रांनो

आमच्या राज्यकारभाराचा रथ एकाच वेळी दोन आघाड्यांवर दौडत आहे.  एकीकडे आम्ही,आपल्याला वारसाहक्काने मिळालेल्या  20 व्या शतकातील आव्हानांना सामोरे जात आहोत आणि दुसरीकडे आम्ही 21 व्या शतकातील आकांक्षा पूर्ण करण्यात व्यग्र आहोत.  आम्ही कोणतेही काम लहान मानले नाही.  दुसरीकडे, आम्ही मोठ्या आव्हानांचा सामना केला आणि मोठी उद्दिष्टे साध्य केली.  आमच्या सरकारने 11 कोटी शौचालये बांधली, तर अंतराळ क्षेत्रातही नवे पर्याय  निर्माण केले आहेत.  आमच्या सरकारने गरिबांना 4 कोटी घरे दिली आहेत, तर त्याचबरोबरीने 10 हजारांहून अधिक अटल टिंकरिंग लॅबही (नवंसंशोधन प्रयोगशाळा) उभारल्या आहेत.  आमच्या सरकारने 300 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालये बांधली, तर फ्रेट कॉरिडॉर (रेल्वे द्वारे मालवाहतुकीचे जाळे) आणि डिफेन्स कॉरिडॉरचे (संरक्षण विषयक साहित्यनिर्मितीचा टापू) कामही वेगाने सुरू आहे.  आमच्या सरकारने वंदे भारत रेल्वेगाड्या कार्यान्वित केल्या आहेत आणि दिल्लीसह देशातील अनेक शहरांमध्ये सुमारे 10 हजार इलेक्ट्रिक बसेसही धावत आहेत.  आमच्या सरकारने कोट्यवधी भारतीयांना बँकिंगशी जोडले आहे आणि डिजिटल इंडिया तसेच फिनटेकच्या (अर्थविषयक तंत्रज्ञान) माध्यमातून सुविधांचा सेतूही उपलब्ध केला आहे.

 

मित्रहो,

सध्या या सभागृहात देशातील आणि जगातील सर्व विचारवंत आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर बसलेले आहेत.  तुम्ही तुमच्या संस्थेसाठी उद्दीष्ट कसे ठरवता, तुमच्यासाठी यशाची व्याख्या काय आहे?  बरेच लोक म्हणतील की आम्ही गेल्या वर्षी जिथे  होतो, तिथून आमचे लक्ष्य निश्चित करतो,आधी आम्ही 10 वर होतो, आता आम्ही 12, 13, 15 वर जाऊ.

जर 5-10 टक्के वाढ असेल तर ती चांगली मानली जाते.  मी तर म्हणेन की  एकप्रकारे ही "वाढ निश्चित करुन मर्यादा घालून घेणारी  विचारसरणी म्हणजे शाप" आहे.  हे चुकीचे आहे कारण तुम्ही स्वतःला मर्यादीत करत आहात.  कारण तुम्ही आत्मविश्वासाने तुमच्या गतीने पुढे जात नाही.  मला आठवतं, मी सरकारमध्ये आलो तेव्हा आमची नोकरशाहीही याच विचारात अडकली होती.  या विचारसरणीतून मी नोकरशाहीला बाहेर काढेन, तरच देश त्या विचारातून बाहेर पडू शकेल, असे मी ठरवले.  मी आधीच्या सरकारांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर आणि वेगाने काम करण्याचा निर्णय घेतला.  आणि आज त्याचे परिणाम जग पाहत आहे.  अशी अनेक क्षेत्रे आहेत ज्यात गेल्या 70 वर्षात किंवा 7 दशकात जेवढे काम केले गेले त्यापेक्षा गेल्या 10 वर्षांत जास्त काम झाले आहे.  म्हणजेच, तुम्ही 7 दशके आणि 1 दशकाची तुलना करा… 2014 पर्यंत, 7 दशकात सुमारे 20 हजार किलोमीटर रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झाले, 7 दशकात 20 हजार किलोमीटर!  आमच्या सरकारच्या 10 वर्षात आम्ही 40 हजार किलोमीटरहून अधिक रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण केले आहे.  आता सांगा काही तुलना आहे का?  मी मे महिन्याबद्दल बोलत नाहीये.  2014 पर्यंत, 7 दशकात, चौपदरी किंवा त्याहून अधिक 18 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधले गेले….18 हजार! आमच्या सरकारच्या 10 वर्षात असे सुमारे 30 हजार किलोमीटरचे महामार्ग आम्ही बांधले आहेत.  70 वर्षात 18 हजार किलोमीटर... 10 वर्षात 30 हजार किलोमीटर... मी जर फक्त वाढीचे लक्ष्य मर्यादीत ठेवण्याच्या विचाराने काम केले असते तर मी कुठे पोहोचलो असतो बंधुंनो?

मित्रांनो,

2014 पर्यंत, 7 दशकात भारतात मेट्रो रेल्वेचे 250 किलोमीटरपेक्षा कमी जाळे तयार झाले होते.  गेल्या 10 वर्षात आम्ही मेट्रो रेल्वेचे, 650 किलोमीटरहून अधिक लांबीचे जाळे तयार केले आहे.  2014 पर्यंत 7 दशकांमध्ये, भारतातील 3.5 कोटी कुटुंबांकडे नळ जोडणी  होती…..3.5 कोटी! 2019 मध्ये, आम्ही जल जीवन मिशन सुरू केले.  गेल्या 5 वर्षात आम्ही ग्रामीण भागातील 10 कोटींहून अधिक घरांना नळाचे पाणी पुरवले आहे.

मित्रहो,

2014 पूर्वीच्या 10 वर्षांतील देशाची धोरणे खरे तर देशाला गरिबीकडे नेणारी होती.  या संदर्भात आम्ही संसदेच्या या अधिवेशनात भारताच्या आर्थिक स्थैर्याबाबत श्वेतपत्रिकाही मांडली आहे.  आज तिच्यावर चर्चाही सुरू आहे आणि मला….आज एवढा मोठा प्रेक्षकवृंद जमला आहे तर मी मनातील गोष्ट सांगून टाकतो.  आज मी जी श्वेतपत्रिका आणली आहे, ती मी 2014 मध्ये आणू शकलो असतो.  माझा राजकीय स्वार्थ असता तर मी हे आकडे 10 वर्षांपूर्वी देशासमोर मांडले असते.  पण 2014 मध्ये माझ्यासमोर जे आले ते पाहून मला धक्का बसला.  अर्थव्यवस्था अतिशय गंभीर स्थितीत होती.  यापूर्वी जगभरातील गुंतवणूकदार, घोटाळे आणि धोरणाच्या पांगुळगाड्या मुळे निराश झाले होते. त्या वेळी जर मी त्या गोष्टी उघडल्या असत्या तर थोडेसे नवे चुकीचे संकेतही गेले असते, तर कदाचित देशाचा आत्मविश्वास ढासळला असता, लोकांना वाटले असते  की आपण बुडालो आहोत आणि आता यातून बाहेर येताच येणार नाही.  ज्याप्रमाणे एखाद्या रुग्णाला आपल्याला एखादा गंभीर आजार झाल्याचे कळले, तर तो तिथेच गळपटून जातो,  देशाचीही तशीच स्थिती झाली असती.  त्या सर्व गोष्टी बाहेर आणणे मला तेव्हा राजकीयदृष्ट्या सहज शक्य होते.  राजकारण तर मला ते करायला उद्युक्त करत होते, पण राष्ट्रहित मला ते करू देत नव्हते आणि म्हणून मी राजकारणाचा मार्ग सोडून राष्ट्रकारणाचा मार्ग निवडला.  आणि गेल्या 10 वर्षांत जेव्हा सर्व स्थिती मजबूत झाली,कोणत्याही धक्क्याला तोंड देण्याइतपत आपण सक्षम झालो, तेव्हा देशासमोर सत्य सांगावे, असे मला वाटले.  आणि म्हणूनच मी काल संसदेत श्वेतपत्रिका मांडली आहे. ही श्वेतपत्रिका पाहिली तर कळते की आपण कुठे होतो आणि किती वाईट प्रसंगातून आपण आज इथपर्यंत पोहोचलो आहोत.

मित्रांनो,

आज तुम्ही भारताच्या प्रगतीची नवी शिखरे पाहत आहात.  आमच्या सरकारने अनेक कामे केली आहेत.  आणि आता मी पाहत होतो की आमचे विनीतजी पुन्हा पुन्हा सांगत होते की जगातील तिसरी अर्थव्यवस्था, तिसरी अर्थव्यवस्था!  आणि कोणाला काही शंका नाही….मी पाहत होतो की विनीतजी अतिशय विनम्रपणे बोलतात, अतिशय मृदूभाषी आहेत.  पण तरीही तुम्हा सर्वांचा विश्वास आहे की हो मित्रा!  आपण तिसऱ्या क्रमांकावर पोहोचू, का?  मी शेजारीच बसलो होतो.  आणि मी तुम्हाला हमी देतो, आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देश अर्थव्यवस्थेत जगात 3 ऱ्या क्रमांकावर पोहोचेल.  आणि मित्रांनो, तुम्हीही सज्ज राहा, मी काहीही लपवत नाही.  मी सर्वांना तयारीची संधीही देतो.  पण लोकांचे काय आहे की त्यांना वाटते…  राजकारणीच आहे तर आपला बोलतच राहतो.  पण आता तुम्हाला माझा अनुभव आलाच आहे की  मी काही आपला उगाचच  बोलत नसतो.  आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो, तिसऱ्या कार्यकाळामध्ये… आणखी मोठे निर्णय घेतले जाणार आहेत.भारतातील गरिबी दूर करण्यासाठी आणि भारताच्या विकासाला नवी गती देण्यासाठी मी गेल्या दीड वर्षांपासून नवीन योजना तयार करत आहे.  आणि मी वेगवेगळ्या दिशेने कसे काम करायचे, कुठपर्यंत करायचे, मी त्याबाबत संपूर्ण रोड मॅप (कृती आराखडा) बनवत आहे. आणि मी जवळपास 15 लाखांहून अधिक लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारे सूचना घेतल्या आहेत.  15 लाखांहून अधिक लोकांसोबत मी यावर काम करत आलो आहे.  मी तुम्हाला हे पहिल्यांदाच सांगत आहे की मी कधीही याबाबत कोणतीही प्रेस नोट दिली नाही. काम सुरू असून येत्या 20-30 दिवसांत ते अंतिम टप्प्यात येईल. नवा भारत आता अशा इतक्या वेगाने काम करेल... आणि ही मोदींची हमी आहे. मला आशा आहे की या शिखर परिषदेत सकारात्मक चर्चा होईल.  तयार होत असलेल्या रोड मॅपमध्ये उपयोग होईल अशा अनेक चांगल्या सूचना समोर येतील  पुन्हा एकदा, या कार्यक्रमासाठी मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो.

खूप खूप धन्यवाद!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress

Media Coverage

Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
This is the New India that leaves no stone unturned for development: PM Modi
March 23, 2026
Today, India is moving forward with a new confidence; Now India faces challenges head-on: PM
From the Gulf to the Global West and from the Global South to neighbouring countries, India is a trusted partner for all: PM
What gets measured gets improved and ultimately gets transformed: PM
This is the new India, It is leaving no stone unturned for development: PM

नमस्कार!

पिछले कुछ समय में मुझे एक-दो बार टीवी9 भारतवर्ष देखने का मौका मिला है। नॉर्मली भी युद्धों और मिसाइलों पर आपका बहुत फोकस होता है और आजकल तो आपको कंटेंट की ओवरफीडिंग हो रही है। बड़े-बड़े देश टीवी9 को इतना सारा कंटेंट देने पर तुले हुए हैं, लेकिन On a Serious Note, आज विश्व जिन गंभीर परिस्थितियों से गुजर रहा है, वो अभूतपूर्व है और बेहद गंभीर है। और इन स्थितियों के बीच, आज टीवी-9 नेटवर्क ने विचारों का एक बेहद महत्वपूर्ण मंच बनाया है। आज इस समिट में आप सभी India and the world, इस विषय पर चर्चा कर रहे हैं। मैं आप सबको बधाई देता हूं। इस समिट के लिए अपनी शुभकामनाएं देता हूं। सभी अतिथियों का अभिनंदन करता हूं।

साथियों,

आज जब दुनिया, conflicts के कारण उलझी हुई है, जब इन conflicts के दुष्प्रभाव पूरी दुनिया पर दिख रहे हैं, तब India and the world की बात करना बहुत ही प्रासंगिक है। भारत आज वो देश है, जिसकी अर्थव्यवस्था तेजी से आगे बढ़ रही है। 2014 के पहले की स्थितियों को पीछे छोड़कर के आज भारत एक नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रहा है। अब भारत चुनौतियों को टालता नहीं है बल्कि चुनौतियों से टकराता है। आप बीते 5-6 साल में देखिए, कोरोना की महामारी के बाद चुनौतियां एक के बाद एक बढ़ती ही गई हैं। ऐसा कोई साल नहीं है, जिसने भारत की, भारतीयों की परीक्षा न ली हो। लेकिन 140 करोड़ देशवासियों के एकजुट प्रयास से भारत हर आपदा का सामना करते हुए आगे बढ़ रहा है। इस समय युद्ध की परिस्थितियों में भी भारत की नीति और रणनीति देखकर, भारत का सामर्थ्य देखकर दुनिया के अनेकों देश हैरान हैं। हमारे यहां कहावत है, सांच को आंच नहीं। 28 फरवरी से दुनिया में जो उथल-पुथल मची है, इन कठोर विपरीत परिस्थितियों में भी भारत प्रगति के, विकास के, विश्वास के संकल्प के साथ आगे बढ़ रहा है। इन 23 दिनों में भारत ने अपनी Relationship Building Capacity दिखाई है, Decision Making Capacity दिखाई है और Crisis Management Capacity दिखाई है।

साथियों,

आज जब दुनिया इतने सारे खेमों में बंटी हुई है, भारत ने अभूतपूर्व और अकल्पनीय bridges बनाए हैं। Gulf से लेकर Global West तक, Global South से लेकर पड़ोसी देशों तक भारत सभी का trusted partner है। कुछ लोग पूछते हैं, हम किसके साथ हैं? तो उनको मेरा जवाब यही है कि हम भारत के साथ हैं, हम भारत के हितों के साथ हैं, शांति के साथ हैं, संवाद के साथ हैं।

साथियों,

संकट के इसी समय में जब global supply chains डगमगा रही हैं, भारत ने diversification और resilience का मॉडल पेश किया है। Energy हो, fertilizers हों या essential goods अपने नागरिकों को कम से कम परेशानी हो, इसके लिए भारत ने निरंतर प्रयास किया है और आज भी कर रहे है।

साथियों,

जब राष्ट्रनीति ही राजनीति का मुख्य आधार हो, तब देश का भविष्य सर्वोपरि होता है। लेकिन जब राजनीति में व्यक्तिगत स्वार्थ हावी हो जाता है, तब लोग देश के फ्यूचर के बजाय अपने फ्यूचर के बारे में सोचते हैं। आप ज़रा याद कीजिए 2004 से 2010 के बीच क्या हुआ था? तब कांग्रेस सरकार के समय पेट्रोल-डीजल और गैस की कीमतों का संकट आया था और तब कांग्रेस ने देश की नहीं बल्कि अपनी सत्ता की चिंता की। उस वक्त कांग्रेस ने एक लाख अड़तालीस हज़ार करोड़ रुपए के ऑयल बॉन्ड जारी किए थे और प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी ने खुद कहा था कि वो आने वाली पीढ़ी पर कर्ज का बोझ डाल रहे हैं। यह जानते हुए भी कि ऑयल बॉन्ड का फैसला गलत है, जो रिमोट कंट्रोल से सरकार चला रहे थे, उन लोगों ने अपनी सत्ता बचाने के लिए यह गलत निर्णय किया क्योंकि जवाबदेही उस समय नहीं होनी थी, उस बॉन्ड पर री-पेमेंट 2020 के बाद होनी थी।

साथियों,

बीते 5-6 वर्षों में हमारी सरकार ने कांग्रेस सरकार के उस पाप को धोने का काम किया है, और इस धुलाई का खर्चा कम नहीं आया है, ऐसी लाँड्री आपने देखी नहीं होगी। 1 लाख 48 हज़ार करोड़ रुपए की जगह, देश को 3 लाख करोड़ रुपए से अधिक की पेमेंट करनी पड़ी क्योंकि इसमें ब्याज भी जुड़ गया था। यानी हमने करीब-करीब दोगुनी राशि चुकाने के लिए मजबूर हुए। आजकल कांग्रेस के जो नेता बयानों की मिसाइलें दाग रहे हैं, मिसाइल आई तो टीवी9 को मजा आएगा, उनकी इस विषय का जिक्र आते ही बोलती बंद हो जाती है।

साथियों,

पश्चिम एशिया में बनी परिस्थितियों पर मैंने आज लोकसभा में अपना वक्तव्य दिया है। दुनिया में जहां भी युद्ध हो रहे हैं, वो भारत की सीमा से दूर हैं। लेकिन आज की व्यवस्थाओं में कोई भी देश युद्धों से दुष्प्रभाव से दूर रहे, ऐसा संभव नहीं होता। अनेक देशों में तो स्थिति बहुत गंभीर हो चुकी है। और इन हालातों में हम देख रहे हैं कि राजनीतिक स्वार्थ से भरे कुछ लोग, कुछ दल, संकट के इस समय में भी अपने लिए राजनीतिक अवसर खोज रहे हैं। इसलिए मैं टीवी9 के मंच से फिर कहूंगा, यह समय संयम का है, संवेदनशीलता का है। हमने कोरोना महासंकट के दौरान भी देखा है, जब देशवासी एकजुट होकर संकट का सामना करते हैं, तो कितने सार्थक परिणाम आते हैं। इसी भाव के साथ हमें इस युद्ध से बनी परिस्थितियों का सामना करना है।

साथियों,

दुनिया की हर उथल-पुथल के बीच, भारत ने अपनी प्रगति की गति को भी बनाए रखा है। अगर मैं 28 फरवरी को युद्ध शुरू होने के बाद, बीते 23 दिनों का ही ब्यौरा दूं, तो पूरब से पश्चिम तक, उत्तर से दक्षिण तक देश में हजारों करोड़ के डेवलपमेंट प्रोजेक्ट्स का काम हुआ है। दिल्ली मेट्रो रेल के महत्वपूर्ण कॉरिडोर्स का लोकार्पण, सिलचर का हाई स्पीड कॉरिडोर का शिलान्यास, कोटा में नए एयरपोर्ट का शिलान्यास, मदुरै एयरपोर्ट को इंटरनेशनल एयरपोर्ट का दर्जा देना, ऐसे अनेक काम बीते 23 दिनों में ही हुए हैं। बीते एक महीने के दौरान ही औद्योगिक विकास को गति देने के लिए भव्य स्कीम को मंजूरी दी गई है। इसके तहत देशभर में 100 plug-and-play industrial parks विकसित किए जाएंगे। देश में Small Hydro Power Development Scheme को भी हरी झंडी दी गई है। इससे आने वाले वर्षों में 1,500 मेगावाट नई hydro power capacity जोड़ी जाएगी। इसी दौरान जल जीवन मिशन को साल 2028 तक बढ़ाने का निर्णय लिया गया है। किसानों के हित में भी अनेक बड़े निर्णय लिए गए हैं। बीते एक महीने में ही पीएम किसान सम्मान निधि के तहत 18 हजार करोड़ रुपए से अधिक सीधे किसानों के खातों में ट्रांसफर किए गए हैं। और जो हमारे MSMEs हैं, जो हमारे निर्यातक हैं, उनके लिए भी करीब 500 करोड़ रुपए के राहत पैकेज की भी घोषणा की गई है। यह सारे कदम इस बात का प्रमाण हैं कि विकसित भारत बनाने के लिए देश कितनी तेज गति से काम कर रहा है।

साथियों,

Management की दुनिया में एक सिद्धांत कहा जाता है - What gets measured, gets managed. लेकिन मैं इसमें एक बात और जोड़ना चाहता हूं, What gets measured, gets improved और ultimately, gets transformed. क्योंकि आकलन जागरूकता पैदा करता है। आकलन जवाबदेही तय करता है और सबसे महत्वपूर्ण आकलन संभावनाओं को जन्म देता है।

साथियों,

अगर आप 2014 से पहले के 10-11 साल और 2014 के बाद के 10-11 साल का आप आकलन करेंगे, तो यही पाएंगे कि कैसे इसी सिद्धांत पर चलते हुए, भारत ने हर सेक्टर को Transform किया है। जैसे पहले हाईवे बनते थे, करीब 11-12 किलोमीटर प्रति दिन की रफ्तार से, आज भारत करीब 30 किलोमीटर प्रतिदिन की स्पीड से हाईवे बना रहा है। पहले पोर्ट्स पर शिप का Turnaround Time, 5-6 दिन का होता था। आज वही काम, करीब-करीब 2 दिन से भी कम समय में पूरा हो रहा है। पहले Startup Culture के बारे में चर्चा ही नहीं होती थी। 2014 से पहले, हमारे देश में 400-500 स्टार्ट अप्स ही थे। आज भारत में 2 लाख से ज्यादा रजिस्ट्रर्ड स्टार्ट अप्स हैं। पहले मेडिकल education में सीटें भी सीमित थीं, करीब 50-55 हजार MBBS seats थीं, आज यह बढ़कर सवा लाख से ज्यादा हो चुकी हैं। पहले देश के Banking system से भी करोड़ों लोग बाहर थे। देश में सिर्फ 25 करोड़ के आसपास ही बैंक account थे। वहीं जनधन योजना के माध्यम से 55 करोड़ से ज्यादा बैंक अकाउंट खुले हैं। पहले हमारे देश में airports की संख्या भी 70 से कम थी। आज एयरपोर्ट्स की संख्या भी बढ़कर 160 से ज्यादा हो चुकी है।

साथियों,

पहले भी योजनाएं तो बनती थीं, लेकिन आज फर्क है, आज परिणाम दिखते हैं। पहले गति धीमी थी, आज भारत fastrack पर है। पहले संभावनाएं भी अंधकार में थीं, आज संकल्प सिद्धियों में बदल रहे हैं। इसलिए दुनिया को भी यह संदेश मिल रहा है कि यह नया भारत है। यह अपने विकास के लिए कोई कोर-कसर बाकी नहीं छोड़ रहा है।

साथियों,

आज हमारा प्रयास है कि अतीत में विकास का जो असंतुलन पैदा हो गया था, उसको अवसरों में बदला जाए। अब जैसे हमारा पूर्वी भारत है। हमारा पूर्वी भारत संसाधनों से समृद्ध है, दशकों तक वहां जिन्होंने सरकारें चलाई हैं, उनकी उपेक्षा ने पूर्वी भारत के विकास पर ब्रेक लगा दी थी। अब हालात बदल रहे हैं। जिस असम में कभी गोलियों की आवाज सुनाई देती थी, आज वहां सेमीकंडक्टर यूनिट बन रही है। ओडिशा में सेमीकंडक्टर से लेकर पेट्रोकेमिकल्स तक अनेक नए-नए सेक्टर का विकास हो रहा है। जिस बिहार में 6-7 दशक में गंगा जी पर एक बड़ा पुल बन पाया था एक, उस बिहार में पिछले एक दशक में 5 से ज्यादा नए पुल बनाए गए हैं। यूपी में कभी कट्टा मैन्युफैक्चरिंग की कहानियां कही जाती थीं, आज यूपी, मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग में दुनिया में अपनी पहचान बना रहा है।

साथियों,

पूर्वी भारत का एक और बड़ा राज्य पश्चिम बंगाल है। पश्चिम बंगाल, एक समय में भारत के कल्चर, एजुकेशन, इंडस्ट्री और ट्रेड का हब होता था। बीते 11 वर्षों में केंद्र सरकार ने पश्चिम बंगाल के विकास के लिए बड़ी मात्रा में निवेश किया है। लेकिन दुर्भाग्य से, आज वहां एक ऐसी निर्मम सरकार है, जो विकास पर ब्रेक लगाकर बैठी है। TV9 बांग्ला के जो दर्शक हैं, वो जानते हैं कि बंगाल में आयुष्मान योजना पर निर्मम सरकार ने ब्रेक लगाया हुआ है। पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना पर ब्रेक लगाया हुआ है। पीएम आवास योजना पर ब्रेक लगाया हुआ है। चाय बागान श्रमिकों के लिए शुरू हुई योजना के लिए ब्रेक लगाया हुआ है। यानी विकास और जनकल्याण से ज्यादा प्राथमिकता निर्मम सरकार अपने राजनीतिक स्वार्थ को दे रही है।

साथियों,

देश में इस तरह की राजनीति की शुरुआत जिस दल ने की है, वो अपने गुनाहों से बच नहीं सकती और वो पार्टी है - कांग्रेस। कांग्रेस पार्टी की राजनीति का एक ही लक्ष्य रहा है, किसी भी तरह विकास का विरोध और कांग्रेस यह तब से कर रही है, जब मैं गुजरात में था। गुजरात में वर्षों तक जनता ने हमें आशीर्वाद दिया, तो कांग्रेस ने उस जनादेश को स्वीकार नहीं किया। उन्होंने गुजरात की छवि पर सवाल उठाए, उसकी प्रगति को कटघरे में खड़ा किया और जब यही विश्वास पूरे देश में दिखाई दिया, तो कांग्रेस का विरोध भी रीजनल से नेशनल हो गया।

साथियों,

जब राजनीति में विरोध, विकास के विरोध में बदल जाए, जब आलोचना देश की उपलब्धियों पर सवाल उठाने लगे, तब यह सिर्फ सरकार का विरोध नहीं रह जाता, यह देश की प्रगति से असहज होने की मानसिकता बन जाती है। आज कांग्रेस इसी मानसिकता की गुलाम बन चुकी है। आज स्थिति यह है कि देश की हर सफलता पर प्रश्न उठाया जाता है, हर उपलब्धि में कमी खोजी जाती है और हर प्रयास के असफल होने की कामना की जाती है। कोविड के समय, देश ने अपनी वैक्सीन बनाई, तो कांग्रेस ने उस पर भी संदेह जताया। Make in India की बात हुई, तो कहा गया कि यह सफल नहीं होगा, बब्बर शेर कहकर इसका मजाक उड़ाया गया। जब देश में डिजिटल इंडिया अभियान शुरू हुआ, तो उसका मजाक उड़ाया गया। लेकिन हर बार यह कांग्रेस का दुर्भाग्य और देश का सौभाग्य रहा कि भारत ने हर चुनौती को सफलता में बदला। आज भारत दुनिया की सबसे बड़ी वैक्सीनेशन ड्राइव का उदाहरण है। भारत डिजिटल पेमेंट्स में दुनिया का अग्रणी देश है। भारत मैन्युफैक्चरिंग और स्टार्टअप्स में नई ऊंचाइयों को छू रहा है।

साथियों,

लोकतंत्र में विरोध जरूरी होता है। लेकिन विरोध और विद्वेष के बीच एक रेखा होती है। सरकार का विरोध करना लोकतांत्रिक अधिकार है। लेकिन देश को बदनाम करना, यह कांग्रेस की नीयत पर सवाल खड़ा करता है। जब विरोध इस स्तर तक पहुंच जाए कि देश की उपलब्धियां भी असहज करने लगें, तो यह राजनीति नहीं, यह दृष्टिकोण की समस्या है। अभी हमने ग्लोबल AI समिट में भी देखा है। जब पूरी दुनिया भारत में जुटी हुई थी, तो कांग्रेस के लोग कपड़े फाड़ने वहां पहुंच गए थे। इन लोगों को देश की इज्जत की कितनी परवाह है, यह इसी से पता चलता है। इसलिए आज आवश्यकता है कि देशहित को, दलहित से ऊपर रखा जाए क्योंकि अंत में राजनीति से ऊपर, राष्ट्र होता है, राष्ट्र का विकास होता है।

साथियों,

आज का यह दिन भी हमें यही प्रेरणा देता है। आज के ही दिन शहीद भगत सिंह, शहीद राजगुरु और शहीद सुखदेव ने देश के लिए सर्वोच्च बलिदान दिया था। आज ही, समाजवादी आंदोलन के प्रखर आदर्श डॉ. राम मनोहर लोहिया जी की जयंती भी है। यह वो प्रेरणाएं हैं, जिन्होंने देश को हमेशा स्व से ऊपर रखा है। देशहित को सबसे ऊपर रखने की यही प्रेरणा, भारत को विकसित भारत बनाएगी। यही प्रेरणा भारत को आत्मनिर्भर बनाएगी। मुझे पूरा विश्वास है कि टीवी9 की यह समिट भी भारत के आत्मविश्वास और दुनिया के भरोसे पर, भारतीयों पर जो भरोसा है, उस भरोसे को और सशक्त करेगी। आप सभी को मेरी तरफ से बहुत-बहुत शुभकामनाएं हैं और आपके बीच आने का अवसर दिया, आप सबसे मिलने का मौका लिया, इसलिए बहुत-बहुत धन्यवाद!

नमस्‍कार!