युवाशक्तीची प्रतिभा आणि बुद्धीसंपदा उल्लेखनीय आहे : पंतप्रधान
आपली युवा शक्ती, आपली नवोन्मेषी तरुणाई आणि आपले तंत्रज्ञान हे भारताचे सामर्थ्य आहे, असे संपूर्ण जग म्हणत आहे : पंतप्रधान
गेल्या सात वर्षांच्या हॅकेथॉनमध्ये पुढे आलेले संशोधनपर उपाय आज देशातील लोकांच्या जगण्याला सुसह्य करत असल्याचे सिद्ध झाले आहे : पंतप्रधान
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक मानसिकता रुजवण्याच्या उद्देशाने आम्ही नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केले आहे : पंतप्रधान
भारतातील कोणताही तरुण कोणत्याही माहितीपासून वंचित राहू नये यासाठी सरकार वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजनेअंतर्गत सर्व नावाजलेल्या प्रकाशनांच्या संशोधनविषयक जर्नल्सचे सबस्क्रिप्शन घेत आहे
स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 च्या ग्रँड फिनालेमध्ये देशभरातील 1300 हून अधिक विद्यार्थी संघ होणार सहभागी
संस्थेच्या स्तरावर होणाऱ्या हॅकेथॉनमध्ये यावर्षी 150% वाढ नोंदली गेली, ज्यामुळे ही हॅकेथॉन बनली आतापर्यंतची सर्वात मोठी आवृत्ती

मित्रांनो,

मी लाल किल्ल्यावरून बोलताना नेहमी एका गोष्टीचा उल्लेख केला आहे तो तुमच्या लक्षात असेलच. हे म्हणालो होतो ‘सबका प्रयास’, आजचा भारत सर्वांच्या प्रयत्नांनीच जलद गतीने प्रगती करू शकतो. आजचा हा दिवस याचेच उदाहरण आहे. स्मार्ट इंडिया हॅकेथॉन’च्या या ग्रँड फिनाले ची मला बरेच दिवसांपासून प्रतीक्षा होती. जेव्हा जेव्हा मला तुमच्यासारख्या युवा नवोन्मेषकांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळते, मला खूप काही जाणून घेण्याची शिकण्याची आणि समजून घेण्याची नामी संधी मिळते. माझ्या तुम्हा सगळ्यांकडून खूप काही अपेक्षा देखील असतात. 21 व्या शतकातील भारताकडे पाहण्याचा तुम्हा सर्व नवोन्मेषकांचा दृष्टिकोन वेगळाच आहे आणि म्हणूनच तुमचे पर्याय देखील वेगळेच असतात. म्हणूनच जेव्हा तुमच्यासमोर नवीन आव्हाने उभी राहतात तेव्हा तुम्ही त्यांचे नवीन आणि अनोख्या प्रकारचे उत्तर शोधून काढता. मी यापूर्वी देखील अनेक हॅकेथॉन’चा भाग झालो होतो. तुम्ही माझी कधीही निराशा केली नाही. नेहमीच माझा विश्वास वाढवला आहे. तुमच्या पूर्वीचे जे संघ होते, त्यांनी पर्याय शोधून काढले होते. आज ते पर्याय वेगवेगळ्या मंत्रालयात खूप कमी येत आहेत. आता या हॅकेथॉन मध्ये देशाच्या विविध भागातून आलेले संघ काय करत आहेत? मी मी तुमच्या नवोन्मेषाबाबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे. चला तर मग सुरुवात करू, सर्वप्रथम कोण आमच्याशी संवाद साधणार आहे?

पंतप्रधान : नमस्कार,

सहभागी : नमस्कार सर, मी शाहिदा, मी स्मार्ट इंडिया हॅकेथॉन मध्ये भाग घेणाऱ्या बिग ब्रेन्स या संघाचे सदस्य आहे. आम्ही कर्नाटकातल्या बंगळुरू शहरातील आहोत. सर, आम्ही नोडल सेंटर, एनआयटी श्रीनगर येथे आहोत आणि येथे कडाक्याची थंडी आहे त्यामुळे बोलताना काही चूक झाली तर आम्हाला माफ करा.

पंतप्रधान : नाही, नाही! तुम्ही लोक खूप बहादूर असता. त्यामुळे तुमच्यावर थंडीचा कोणताही परिणाम करु शकणार नाही. तुम्ही काळजी करू नका.

सहभागी : धन्यवाद सर, आम्ही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने दिलेल्या समस्या विधानावर काम करण्यासाठी या हॅकेथॉन मध्ये सहभागी होत आहोत. ज्या अंतर्गत आम्ही ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर आणि बौद्धिक अपंगत्व असलेल्या मुलांसाठी एक आभासी वास्तव मित्र तयार करत आहोत. ते याचा वापर परस्परसंवादी कौशल्य वाढवणारा म्हणून करतील. आपल्या देशात ऑटिझम स्पेक्ट्रम मध्ये समावेश असणारे सुमारे 8 कोटी लोक आहेत तर प्रत्येक शंभर मुलांपैकी एक मूल बौद्धिक आव्हानांना तोंड देत आहे. या सर्वांच्या मदतीसाठी आम्ही एक असे साधन तयार करत आहोत जे त्यांच्या मित्राप्रमाणे काम करेल. असा मित्र जो त्यांच्या स्मार्टफोनमध्ये राहून त्यांच्याबरोबर सर्वत्र जाऊ शकेल. हे आभासी वास्तव वापरण्यासाठी त्यांना कोणत्याही विशेष साधनाची गरज पडणार नाही. ते त्यांचा लॅपटॉप किंवा फोन किंवा इतर कोणतेही डिवाइस वापरून या मित्राची मदत घेऊ शकतील. हा मित्र त्यांना त्यांच्या प्रत्येक कामात मार्गदर्शन करेल. हा मित्र म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनवण्यात आलेला आभासी वास्तव असणारा पर्याय आहे. त्यामुळे आता ही मुले त्यांच्या दिनचर्येतील एखादे काम जर करू शकत नसतील, संवाद साधणे, सामाजिक संवाद साधणे, यासारख्या कामांना हा मित्र छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये विभाजित करेल ज्यामुळे ही मुले ते काम करु……

पंतप्रधान : अच्छा, तुम्ही जे काम करत आहात, त्यामुळे या मुलांच्या सामाजिक आयुष्यावर कशा प्रकारचे सकारात्मक परिणाम होणार आहेत ?

सहभागी : विशेष गरजा असलेली मुले या मित्राच्या मदतीने सामाजिक संवादामध्ये काय चूक आहे किंवा काय बरोबर आहे, तसेच लोकांशी संपर्क कसा साधावा, हे शिकतील. या गोष्टी ते इथे सुरक्षित वातावरणात शिकून पुढे आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात वापरू शकतील. हा मित्र या मुलांना वास्तविक जगात सामान्य गोष्टी करण्यास सक्षम बनवून त्यांचे जीवन चांगले बनवण्यास मदत करू शकतो. विशेष गरजा असलेल्या मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत विशेष गरजा असतात, म्हणून आम्ही त्यांना हा मित्र प्रदान करणार आहोत. यामुळे सामान्य लोकांचे सामान्य जीवन आणि विशेष गरजा असलेल्या मुलांच्या दैनंदिन जीवनातील सामान्य क्रिया किंवा इतर क्रियांमध्ये कोणताही फरक राहणार नाही.

 

पंतप्रधान : सध्या तुमच्या संघात किती लोक काम करत आहेत?

सहभागी : सर, आम्ही एकूण सहा जण काम करत आहोत आणि खरे तर माझा संघ खूपच वैविध्यपूर्ण आहे. आमच्या संघाचे सदस्य वेगवेगळ्या तांत्रिक पार्श्वभूमीचे, भौगोलिक पार्श्वभूमीचे आहेत, इतकेच नव्हेतर आमचा एक सदस्य भारतीय नसून परदेशी आहे.

पंतप्रधान : तुमच्यापैकी असे कोणी आहे का की ज्याने अशा विशेष गरजा असलेल्या मुलांशी कधी संवाद साधला आहे ? त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि मग त्या सोडवण्यासाठी पर्याय शोधण्याचे दिशेने प्रयत्न केले आहेत?

सहभागी : हो सर, आमच्या संघात असा एक सदस्य आहे ज्याच्या कुटुंबातील सदस्यांपैकी एकजण ऑटिझम म्हणजे स्वमग्नतेच्या आव्हानांना तोंड देत आहे. या विशेष गरजा असलेल्या मुलांना नक्की कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो? आणि, त्यांच्या खऱ्या अडचणी कोणत्या? हे समजून घेण्यासाठी आम्ही इथे येण्यापूर्वी विविध केंद्रांना भेटी देऊन संवाद साधला आहे. जेणेकरून आम्ही त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी योग्य दिशेने काम करू शकू.

पंतप्रधान : तुम्ही काहीतरी म्हणत होता. तुमचे मित्र काही सांगू इच्छित होते.

सहभागी : हो सर, तर, आमच्या संघात असाही एक सदस्य आहे जो भारतीय नाही तर तो भारतात शिक्षण घेणारा परदेशी विद्यार्थी आहे.

सहभागी : नमस्कार पंतप्रधान महोदय, माझे नाव मोहम्मद धाली आहे आणि मी येमेन प्रजासत्ताकातून आलेला एक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आहे. मी संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकीची पदवी घेण्यासाठी भारतात आलो आणि मी बिग ब्रेन संघाचा भाग आहे. आमचा संघ एक कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्जीत आभासी वास्तव अनुभव विकसित करत आहे, जो विशेष गरजा असलेल्या मुलांना लक्षात ठेवून विशेषत्वाने आरेखित करण्यात आला आहे.

पंतप्रधान: प्रत्येक मूल हे विशेष आहे ही कल्पना तुम्हाला समजली आहे याबद्दल तुम्हा सर्वांचे अभिनंदन.  प्रत्येकाला उत्कर्षाची संधी मिळाली पाहिजे आणि समाजात कोणीही मागे राहू नये.  कुणालाही आपण वंचित आहोत असे वाटू नये यासाठी, नवीन उपाययोजनांची आवश्यकता आहे.  तुमच्या चमुचा  हा उपाय लाखो मुलांचे जीवन सुकर करण्यात मदत करेल.  तुम्ही देशासाठी जे उपाय तयार करत आहात ते भलेही स्थानिक असू शकतात…स्थानिक गरज म्हणजे गरजांवर आधारित आहेत…पण त्यांचा वापर जागतिक आहे, त्याचा परिणाम जागतिक आहे.  जे भारताच्या गरजांसाठी योग्य आहेत ते जगातील कोणत्याही देशासाठी योग्य असू शकतात.  मी तुम्हाला आणि तुमच्या चमुला शुभेच्छा देतो.  पुढे कोण आहे?

धर्मेंद्र प्रधान जी: पुढचा चमू आहे ड्रीमर्स, जो खरगपूरमध्ये  आहे… खरगपूरचा चमू….बोला!

सहभागी : धन्यवाद माननीय पंतप्रधान जी!  मी लावण्या आहे…ड्रीमर्सची चमू प्रमुख आहे आणि आम्ही आमचे नोडल सेंटर IIT खरगपूर, पश्चिम बंगाल इथे आहोत आणि आम्ही चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तामिळनाडू चे आहोत. आमच्याकडे सोपवलेली समस्या, राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेने निवडली आहे.  दिवसेंदिवस तांत्रिक नवकल्पना वाढत असताना सायबर हल्ल्यांची संख्याही वाढत आहे.  आमच्या नोंदीनुसार, भारतात 7 कोटी 30 लाख सायबर हल्ले झाले आहेत जे जगातील तिसरे सर्वात मोठे आहेत.  परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी, आम्ही एक नाविन्यपूर्ण, अनोखे आणि प्रमाणबद्ध उपाय घेऊन आलो आहोत.  सर हा उपाय माझी सहकारी  कल्पप्रिया समजावून सांगेल.

 

सहभागी : नमस्ते माननीय पंतप्रधानजी!

पंतप्रधान जी : नमस्ते जी!

सहभागी : नमस्ते! बाधित फायली शोधण्यासाठी, आपल्या देशामध्ये असलेल्या बहुतेक सायबर सिक्युरिटीज संस्था आपला बचाव मजबूत करणार्‍या आहेत….आम्ही एकापेक्षा अधिक अँटीव्हायरस इंजिन वापरत आहोत.  आम्ही मायक्रोसॉफ्ट डिफेंडर, ईएसईटी आणि ट्रेंड मायक्रो मॅक्झिमम सिक्युरिटी सारखी 3 इंजिने वापरली आहेत.  आर्किटेक्चरल डिझाइन आणि धोक्याची दिशा यांचा समावेश असलेला आमचा उपाय, पूर्णपणे ऑफलाइन आहे.  आपल्याला माहीत आहे की, कोणताही एक अँटीव्हायरस परिपूर्ण नसतो, प्रत्येक अँटीव्हायरसची स्वतःची ताकद आणि उणिवा असतात.  त्यामुळे या आव्हानाचा सामना करण्यासाठी आम्ही मायक्रोसॉफ्ट डिफेंडर, ईएसईटी आणि ट्रेंड मायक्रो मॅक्झिमम सिक्युरिटी वापरत आहोत.  समांतर स्कॅनिंग करून आम्ही हे 3 AVs वापरू शकतो. यामुळे सायबर धोका  टळतो आणि आमची सिस्टम, सुरक्षित अवस्थेत राहते.

पंतप्रधानजी: अलिकडेच मन की बात मध्ये मी सामान्य लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सविस्तर चर्चा केली होती.  सायबर फसवणुकीच्या माध्यमातून लोकांची वैयक्तिकरित्या कशाप्रकारे लूट केली जात आहे…तुम्हाला याबद्दल माहिती आहे का?

सहभागी: नाही सर!

पंतप्रधानजी: तुम्ही शोधत असलेल्या उपायांमुळे…. आणि मला विश्वास आहे की समाजातील एक मोठा वर्ग आज अशा संकटात अडकतो.  या तरुणाला काही बोलायचे होते का?

सहभागी: होय सर!  नमस्कार सर!

पंतप्रधानजी: नमस्कार!

सहभागी: होय सर, हेच तंत्रज्ञान तंत्रज्ञानातही सुधारणा करत आहे आणि त्याच वेळी, आमच्या सायबर हल्ल्यांची काळजी देखील घ्यावी लागते, म्हणून त्या बाबतीत, आम्ही ते उपाय अधिक कार्यक्षम आणि सुधारित करत आहोत.  विद्यमान उपाय अधिक कार्यक्षमतेने वापरून आणि सुधारित करून, आम्ही अंमलात आणत असलेला उपाय सध्याच्या उपायापेक्षा चांगला असेल.

पंतप्रधानजी: तुम्हाला माहीत आहे की तुमच्या कोणत्याही सायबर सुरक्षेच्या प्रयत्नांचे आयुष्य खूपच कमी असते.  तुम्हाला या बद्दल काही कल्पना आहे का?

सहभागी: होय सर!

पंतप्रधानजी: तुमचा अंदाज काय आहे ते सांगू शकाल का?

सहभागी: तंत्रज्ञान प्रगत होत असल्यामुळे आम्हाला अद्यतन करत रहावं लागेल…. आम्हाला अपडेट व्हायचे आहे...

पंतप्रधानजी: होय, तुमचे म्हणणे बरोबर आहे कारण सायबर हल्ल्यातील हल्लेखोर इतक्या नाविन्यपूर्ण कल्पनांचा उपयोग करतात की आज तुम्हाला उपाय सापडला तर 24 तासांत आणखी नवीन उपाय लागेल.  आपल्याला नेहमी अपडेट करावे लागेल.  पहा, भारत ही जगातील आघाडीच्या डिजिटल अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.  आपला देश मोठ्या प्रमाणावर डिजिटली जोडला जात आहे.  अशा स्थितीत सायबर गुन्ह्यांचा धोकाही सतत वाढत आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे!  त्यामुळे तुम्ही ज्या उपायावर काम करत आहात ते भारताच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.  पण मी म्हटल्याप्रमाणे, हा एक वेळचा उपाय नाही.  प्रत्येक वेळी पाऊस पडल्यावर छत्री उघडावी लागते…तसे आहे हे!  पण मी तुम्हाला शुभेच्छा देतो, तुम्ही एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर खूप मेहनत घेत आहात आणि तुमचे उपाय माझ्यासमोर नक्कीच येतील आणि सरकारलाही त्याचा खूप फायदा होऊ शकेल.  मी तुमचे सर्व सहकारी पाहतोय, तुमचा संपूर्ण चमू उत्साहाने भरलेला आहे.  प्रत्येकजण आपापल्या मोबाईलवरून  रेकॉर्डिंग करताना दिसत आहे.  चला पुढे जाऊया.  पुढील संघ कोणता आहे?

धर्मेंद्र प्रधान जी: आता आपण गुजरात टेक्निकल युनिव्हर्सिटी, अहमदाबाद येथे बसलेल्या टीम ब्रोकोडशी संवाद साधणार आहोत…. अहमदाबादला जाऊ.

 

सहभागी: नमस्कार पंतप्रधानजी!

पंतप्रधानजी: नमस्कार जी!

सहभागी : होय सर आम्ही बोलतोय... नमस्कार, माझे नाव हर्षित आहे आणि मी टीम ब्रोकोडचे प्रतिनिधित्व करत आहे.  येथे, आम्ही ISRO च्या समस्येचे निराकरण करणार आहोत.  आमचे समस्या निवारण उद्दिष्ट, दक्षिण ध्रुवावर असलेले सौरमंडळ, सोलर कोडच्या गडद प्रतिमा वाढत आहेत, ही आमच्या समोरील समस्या आहे.  म्हणून आम्ही चांद वर्तनी नावाने हा उपाय विकसित करणार आहोत.  चांद वर्तनी हा असा एक उपाय आहे जिथे आपण गडद प्रतिमा,  उच्च दर्जाची प्रतिमा बनवू शकतो.  त्यामुळे हे केवळ प्रतिमेचा दर्जा  वाढवणारे नाही तर निर्णय घेण्याचे कौशल्य देखील आहे.  निर्णय घेण्याच्या कौशल्यामध्ये, आम्ही भूगर्भीय चंद्र अन्वेषण शोधणार आहोत  आणि त्याचे वास्तविक ठिकाण देखील सर.

पंतप्रधान : तुम्ही या अंतराळाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांशी कधी चर्चा केली आहे का? अहमदाबादमध्ये तुम्ही आहात, जिथे एक मोठे स्पेस सेंटर आहे. कधी तिथे जाऊन त्यांच्या समस्या, गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक गोष्टी यावर चर्चा केली का?

सहभागी: मी मार्गदर्शक आणि हैदराबादमधील शास्त्रज्ञांशी बोललो आहे. पण अशा केंद्रांपर्यंत पोहोचलेलो नाही, कारण आम्ही आंध्र प्रदेशपासून खूप दूर आहोत आणि आमचा गट देखील...

पंतप्रधान: ठीक आहे. या प्रकल्पामुळे आपण चंद्राच्या भूगर्भशास्त्रीय आणि पर्यावरणीय परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो का?

सहभागी: होय, सर! आम्ही चंद्राच्या भूगर्भशास्त्रीय वैशिष्ट्यांचा शोध घेऊ शकतो, जसे की गोठलेले पाण्याचे तळे किंवा चंद्राच्या पृष्ठभागावर असलेल्या मोठ्या खडकांचे शोध. यामुळे रोव्हरला सुरक्षितपणे उतरण्यास मदत होईल.

पंतप्रधान: तुमच्या टीममध्ये सध्या किती लोक काम करत आहेत?

सहभागी: आमच्या टीममध्ये 6 लोक काम करत आहेत.

पंतप्रधान: तुम्ही सर्व वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेले आहात का, की इथल्याच संस्थांमधून शिकून बाहेर पडलेले आहात?

सहभागी: समस्येच्या निवडीवर आधारित, आम्ही सर्व सदस्यांमध्ये कामाचे वाटप केले आहे. 3 सदस्य मिशन लँडिंग मॉडेल्सवर काम करत आहेत, 2 सदस्य प्रतिमा फिल्टर्स सुधारण्याचे काम करत आहेत. आता माझा सहकारी सुनील तुमच्याशी बोलेल.

पंतप्रधान: तुम्ही खूप महत्त्वाच्या विषयावर काम केले आहे. आणखी काही म्हणत होते का? कोणी दुसरा माईक घेत आहे का?

सहभागी: सर, आम्ही आंध्र प्रदेशमधून आलो आहोत. मला हिंदी फारशी येत नाही.

पंतप्रधान: आंध्र गारू?

सहभागी: क्षमस्व...

पंतप्रधान: हां, बोला!

सहभागी: नमस्ते प्रधानमंत्रीजी! मी सुनील रेड्डी, आंध्र प्रदेशमधून आलो आहे. आम्ही मिशन लर्निंग मॉडेलवर काम करत आहोत, ज्यामध्ये आम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या प्रतिमा सुधारत आहोत. यासाठी आम्ही दोन आर्किटेक्चर्स वापरत आहोत: डार्कनेट आणि फोटोनेट. डार्कनेट सावल्या काढून टाकण्यासाठी आणि फोटोनेट प्रतिमांचा आवाज कमी करण्यासाठी वापरले जात आहे. दक्षिण ध्रुवातून प्रतिमा घेताना कमी प्रकाश आणि जास्त आवाजाचा सामना करावा लागतो. आम्ही न्यूरल नेटवर्क्स वापरून त्या प्रतिमा सुधारत आहोत. हे न्यूरल नेटवर्क्स प्रत्येकामध्ये 1024 न्यूरॉन्स असलेल्या आहेत. माझ्या सहकाऱ्याने म्हटले की, यामुळे गोठलेले पाण्याचे स्रोत शोधण्याची संधी मिळेल. तुमच्याशी संवाद साधणे हे माझे स्वप्न होते. तुम्ही नेल्लोरलाही आले होते, परंतु मी गर्दीत खूप दूर होतो. मी मोठ्याने ओरडत होतो की मी तुमचा मोठा चाहता आहे. धन्यवाद सर, ही संधी दिल्याबद्दल!

पंतप्रधान: बघा मित्रांनो, स्पेस तंत्रज्ञानामध्ये भारताची यात्रा जग मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. तुम्ही यंग ब्रेन्स यामध्ये सहभागी झाल्यामुळे ही अपेक्षा आणखी वाढली आहे. तुम्हा युवक इनोव्हेटर्सना पाहून स्पष्ट होते की भारत जागतिक स्पेस पॉवर म्हणून आपली भूमिका वेगाने विस्तारत आहे. मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आता पुढील टीम कोण आहे?

धर्मेंद्र प्रधानजी: मिस्टिक ओरिजिनल्स, इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च, मुंबईचे आहेत. मुंबईचे मित्र, माननीय प्रधानमंत्रीजींशी बोला.

सहभागी: नमस्ते माननीय पंतप्रधान महोदय!

पंतप्रधान: नमस्ते!

सहभागी: माझे नाव महक वर्मा आहे, आणि मी टीम मिस्टिक ओरिजिनल्सची टीम लीडर आहे. आम्ही इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कोटा येथून आलो आहोत. आमची टीम स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2024 मध्ये भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने दिलेल्या सिक्युरिटी चॅलेंजवर काम करत आहे. हे मायक्रो डॉपलर बेस्ड टार्गेट क्लासिफिकेशन आहे, जे ड्रोन आणि पक्ष्यांमध्ये फरक करण्याचे काम करते. रडारवर दोन्ही एकसारखे दिसतात, ज्यामुळे चुकीचे अलार्म व सुरक्षेच्या समस्या निर्माण होतात, विशेषतः मिलिटरी झोन, एअरपोर्ट्स आणि क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर्समध्ये. याबाबत अधिक सांगण्यासाठी माझा सहकारी अक्षित तुम्हाला सांगेल.

 

सहभागी: नमस्ते प्रधानमंत्रीजी!

पंतप्रधान: नमस्कार!

सहभागी: माझे नाव अक्षित आहे, आणि मी टीम मिस्टिक ओरिजिनल्सचा सदस्य आहे. आमचे सोल्यूशन मायक्रो डॉपलर सिग्नेचर्स वापरते, जे वेगवेगळ्या वस्तूंनी तयार केलेल्या विशिष्ट पॅटर्न्स आहेत. हे पॅटर्न पक्ष्यांच्या पंखांच्या हालचाली किंवा ड्रोनच्या रोटर ब्लेडच्या हालचालींमुळे तयार होतात. यांना आपण फिंगरप्रिंट्सप्रमाणे समजू शकतो. प्रत्येक वस्तूचे मायक्रो डॉपलर सिग्नेचर वेगळे असते. याच्या आधारे आम्ही वस्तू ड्रोन आहे का पक्षी हे ओळखू शकतो. हे ओळखणे विमानतळ, सीमा, आणि मिलिटरी झोनसारख्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठिकाणी फारच गरजेचे आहे.

पंतप्रधान : तुम्हाला इतका फरक कळेल की हा पक्षी नाही तर ड्रोन आहे. पण तुम्ही हेही सांगू शकाल का, की तो किती अंतरावर आहे,कुठल्या दिशेला जात आहे, किती वेगाने जात आहे? या सर्व गोष्टी तुम्ही मॅप करू शकता का ?

सहभागी (अक्षित ): हो सर, आम्ही यावरही काम करत आहोत. आणि आम्ही लवकरच हेदेखील करू शकू.

पंतप्रधान : तुम्ही ड्रोनचा शोध लावणाऱ्या सिस्टीमवर काम करत आहात. ड्रोन्सचे खूप सकारात्मक उपयोग आहेत. पण काही शक्तींद्वारे त्याचा गैरवापर होत असल्यामुळे ड्रोन सुरक्षेसाठी आव्हानही आहे. तुमचा संघ या आव्हानाचा कसा सामना करेल?

सहभागी (अक्षित ) : सर, मी तुम्हाला आमच्या सिस्टीमचे कार्य कसे चालते ते समजावतो. सर्वप्रथम आमच्याकडे रडारवरून जो डेटा येतो त्यातून आम्ही सगळे आवाज काढून टाकतो. त्यामुळे आम्हाला स्पष्ट आणि अचूक डेटा मिळतो. मग त्यावर आम्ही काही टाईम फ्रिक्वेन्सी ट्रान्सफॉर्म लावतो, जे हे मायक्रो डॉपलर नमुना निर्माण करतात आणि मग आम्ही हे नमुने एका मशीन लर्निंग मॉडेलमध्ये फीड करतो. आणि मग ती वस्तू ड्रोन होता की पक्षी हे आम्हाला कळते. ही सिस्टीम अतिशय कॉम्पॅक्ट आणि किफायतशीर उपकरणावरही वापरता येऊ शकते. ही सिस्टीम खूप स्केलेबल आणि त्याच वेळी ती वेगवेगळ्या वातावरणास अनुकूल आहे, ज्यामुळे आपण विमानतळ आणि सीमावर्ती भागात देखील वापरू शकतो. आणि हे समस्या विधान आम्ही का निवडले ते सांगण्यासाठी मी माझ्या एका सहकाऱ्याला सुमीतला बोलावू इच्छितो.

सहभागी (सुमीत) : नमस्ते प्रधानमंत्री जी.

पंतप्रधान : नमस्ते.

सहभागी (सुमीत): हे समस्या विधान आम्ही का निवडले ते मी सांगतो. मी राजस्थानमधल्या गंगानगरचा आहे. हा भाग सरहद्दीच्या बराच  जवळ असल्याने अनेक ड्रोन्स येत-जात असतात. पण पुलवामा हल्ल्यानंतर तर ड्रोन्सचे येणे-जाणे खूपच वाढले. त्यानंतर पहाटे चार वाजता, रात्री 12 वाजता कधीही अँटी ड्रोन सिस्टीम सुरू व्हायची आणि गोळीबार सुरू होत असे. त्या वेळी ना अभ्यास करता यायचा, ना लोक झोपू शकायचे. खूप त्रास व्हायचा. त्यावेळी माझ्या मनात यायचे, यासाठी काहीतरी करायला हवे. या वर्षी जेव्हा आमचा संघ समस्या विधान शोधत होता तेव्हा ही समस्या आमच्यासमोर आली. माझ्या संघासोबत मी ती सामायिक केली आणि यावर काम करण्यास सुचवले. ही समस्या सोडवण्यासाठी आणि लोकांचे जीवन सुकर करण्यात मदत करण्याची आमची इच्छा होती. आमच्या संघाने यावर काम सुरू केले आणि आम्ही महाअंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकलो. खूप खूप धन्यवाद सर!

पंतप्रधान: मित्रांनो, आजकाल देशात वेगवेगळ्या क्षेत्रात ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. नमो ड्रोन दीदी योजनेबद्दल तुम्ही ऐकलेच असेल. आजकाल दुर्गम भागात औषधे आणि जीवनावश्यक वस्तू पोहोचवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जात आहे, पण त्याचसोबत देशाचे शत्रू भारतात शस्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी ड्रोनचा पुरेपूर वापर करत आहेत. अशा परिस्थितीत अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी तुम्ही सर्वजण गांभीर्याने काम करत आहात ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. तुमच्या प्रयत्नांमुळे संरक्षण तंत्रज्ञानाच्या निर्यातीलाही एक नवा आयाम मिळू शकतो आणि यासाठी  मी तुमचे अभिनंदन करतो आणि तुमचे एक सहकारी स्वतः सीमेवर राहणाऱ्यांपैकी एक आहेत, त्यामुळे ते ही समस्या आणि त्यावर उपाय शोधण्याची गरज  चांगल्या प्रकारे समजू शकतात.  परंतु भविष्यात याला अनेक पैलू असतील आणि मला वाटते की मोठ्या प्रमाणावर काम करावे लागेल कारण ड्रोनच्या जगातले लोकच ड्रोनच्या सहाय्याने जगात कहर करत आहेत. प्रत्येक वेळी ते नवीन तंत्रज्ञान आणतील आणि नवीन प्रवेशमार्ग शोधतील, आमच्यासाठी देखील नित्यनवीन आव्हाने उभी राहू शकतील .  तुम्ही जे प्रयत्न करत आहात त्यासाठी मी  तुमचे खूप अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आता आपण देशाच्या कोणत्या भागाशी जोडणार आहोत ते पाहूया!

धर्मेंद्र प्रधान : आता आपण निर्वाण वन, जे बंगळुरूमधल्या न्यू होरायझन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आहेत. तिथून ते आपल्याशी जोडले गेले आहेत. चला बंगळुरूशी जोडले जाऊया . ओव्हर टू बंगळुरू.

पंतप्रधान : तुमचा आवाज येत नाहीये. मला तुमचे बोलणे ऐकू येत नाहीये.

सहभागी : सर, आता माझे बोलणे ऐकू येत आहे का ?

पंतप्रधान : हो हो, मला आता तुमचे बोलणे ऐकू येत आहे.

सहभागी : नमस्ते, माननीय पंतप्रधान जी !

पंतप्रधान : नमस्ते !

सहभागी : माझे नाव देव पूर्णी आहे आणि मी निर्वाणा वन टीमचे नेतृत्व करतो. माझ्या संघात आदित्य चौधरी, अशर एजाज़, तन्वी बंसल, नमन जैन आणि  सानिध्‍य मंलूमिया आहेत. सर सर, आम्ही जलशक्ती मंत्रालयाने दिलेल्या एका अत्यंत महत्त्वाच्या समस्या विधानावर काम करण्यासाठी जयपूर ग्रामीणहून बंगळुरूला आलो आहोत. आम्हाला अभ्यासात कळले की,  नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी, भारत सरकारने गेल्या काही वर्षात अनेक प्रगत प्रयत्न हाती घेतले आहेत.आम्ही एक सर्वसमावेशक प्रणाली तयार करण्याचा विचार केला ज्यामुळे नदी प्रदूषण निरीक्षण सुधारते, ते अधिक कार्यक्षमतेने होते  आणि आपल्या एकूण नदी परिसंस्थेचे आरोग्य सुधारण्यासाठी सूचना पुरवते.  या माध्यमातून एक अर्थपूर्ण योगदान देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

सहभागी : नमस्ते सर.

पंतप्रधान : नमस्ते

सहभागी : आमच्या असे लक्षात आले की आपल्या देशातील अनेक लोकांचे उत्पन्न आणि जीवन नद्यांशी जोडलेले आहे, आणि म्हणून आम्हाला त्या लोकांचे जीवन चांगले बनवायचे आहे आणि सकारात्मक बदल घडवून आणायचा आहे. आम्ही या प्रकल्पासाठी गंगा निवडली कारण ती आपल्या  इतिहासात अतिशय महत्त्वाची सांस्कृतिक भूमिका बजावते आणि  आमच्या पंतप्रधानांच्या हृदयातही तिला अत्यंत आदराचे स्थान आहे.

आमच्या या प्रकल्पाची सुरुवात नमामि गंगे कार्यक्रम आणि नॅशनल मिशन फॉर क्लीन गंगा,एनएमसीजी  बद्दल वाचून आणि संशोधन करून झाली. यावरून आम्हाला असे आढळले  की एनएमसीजी ची दोन अतिशय स्पष्ट उद्दिष्टे आहेत. पहिले - प्रदूषण कमी करणे, म्हणजे गंगा नदीतील प्रदूषण कमी करणे, आणि दुसरे - गंगा नदीचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन म्हणजेच  गंगेची गुणवत्ता पुन्हा पूर्वीसारखी करणे.

त्याचबरोबर आम्हाला हे देखील समजले की गंगेशी संबंधित भरपूर दर्जेदार डेटा सार्वजनिकरित्या उपलब्ध केला गेला आहे. आम्ही या डेटाने खूप प्रभावित आणि प्रेरित झालो.  आम्ही विचार केला की आपल्याला या डेटावर आधारित निर्णय समर्थन प्रणाली तयार करता आली तर ज्यामुळे गंगा नदीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना निर्णय घेण्यास मदत होईल, त्याचा त्यांच्या जीवनात खूप मोठा प्रभाव पडू शकतो आणि त्यांच्या जीवनात खूप सकारात्मक बदल होऊ शकतो.

सहभागी: सर,  गंगा ही खूप मोठी नदी आहे, त्यामुळे हे आवश्यक आहे की जी काही प्रणाली तयार केली जाईल त्याचे वास्तविक मोजमाप करता यायला हवे.  यासाठी आम्ही फेडरेटेड लर्निंग नावाचे एक प्रगत तंत्रज्ञान वापरले आहे.यासाठी आम्ही डेटाचे विश्लेषण केले आणि 38 प्रमुख ठिकाणे निवडली. आणि  फेडरेटेड लर्निंग वापरून, आम्ही तिथे स्थानिक मॉडेल्स  तयार केली जी त्या स्थानिकीकृत डेटावर आधारित आहेत. सध्या, ही सर्व स्थानिक मॉडेल्स मदर मॉडेलशी संवाद साधतात, जिथे ते त्यांचा डेटा शेअर करतात. यामुळे नवीन मॉडेल्सची भर घालणे आणि आधीपासून अस्तित्वात असलेली मॉडेल्स काढून टाकणे आणि सध्या जी   मॉडेल्स आहेत त्यांची अचूकता, कार्यक्षमता लक्षणीयरीत्या सुधारण्यात मदत होते. आणि जर आपण या तांत्रिक बाबी बाजूला ठेवल्या, तर आपल्या लक्षात येते की नमामि गंगेच्या माध्यमातून गंगा संवर्धन , पुनरुज्जीवन आणि नियंत्रणात मुख्य योगदान देणारे लोक  आहेत. त्यामुळे डेटा आणि वापरकर्त्यांमधील अंतर कमी करण्यासाठी आम्ही या हितधारकांसाठी एक प्रगत डॅशबोर्ड तयार केला आहे. ज्यावर आम्ही प्रत्येक प्रकारचे हितधारक ....।

पंतप्रधान: खूप मोठा कुंभमेळा होणार आहे, गंगेच्या काठावर 40-45 कोटी लोक जमणार आहेत.  या योजनेचा लाभ कसा घेता येईल, तुम्ही या नवोन्मेषातून तिथे कोणते फायदे मिळवू शकता?

सहभागी: सर, आपल्याला माहीत आहेच की जर आपण पाण्याच्या गुणवत्तेच्या मापदंडांचे विश्लेषण केले तर त्यांच्या परीने निर्जंतुकीकरण कसे करायचे  आणि इतकेच नाही तर त्यांचे आणि लोकांचे  आरोग्य चांगले राहावे यासाठी काय करायचे हे  आपण लोकांना सांगू शकतो.  यासाठी, आम्ही त्यांना एक पोर्टल देऊ, जसे की आम्ही ते औद्योगिक सांडपाणी निरीक्षणासाठी देऊ, आम्ही ते सांडपाणी प्रक्रिया पायाभूत सुविधांसाठी देऊ, आम्ही ते जैवविविधता व्यवस्थापनासाठी देऊ. आम्ही शेतकरी, मच्छीमार आणि अगदी पर्यटकांना देखील सांगू की ते कशा प्रकारे प्रवासाची रूपरेषा बनवू शकतात आणि ते कोणत्या मुख्य गोष्टींना भेट देऊ शकतात, त्यांनी कुठे जायला हवे आणि सध्या कुठे जाऊ नये आणि तिथे कशा प्रकारे काम सुरू आहे .

पंतप्रधान: तर मग शहरांमध्ये पिण्याच्या पाण्याची जी पुरवठा साखळी असते त्यावर देखील तुमचे काम अगदी सहजतेने होऊ  शकते.

सहभागी: हो सर. यासाठी आम्ही काय केले तर जी शहरे आहेत, गंगा नदीशी जोडली जात आहेत किंवा इतर नद्यांशी जोडली जात आहेत, आम्ही त्यांचे अक्षांश आणि रेखांश ओळखले आहेत. आणि आमच्या स्टेशन्सच्या माध्यमातून त्यांच्या आजूबाजूला कोणते उद्योग आहेत हे देखील आम्ही जाणून घेतले आहेत. आता  आपल्याला माहित आहे उद्योगातील काही क्षेत्रांद्वारे रसायन, कागद, कापड, टॅनरी, कत्तलखाने यामधून  कोणत्या प्रकारचे सांडपाणी सोडले जाते. तर आम्ही आमच्या अल्गोरिदमच्या सहाय्याने मागोवा  घेऊ शकतो की जर आपल्या  पाण्यात काही विशिष्ट प्रदूषकांचे स्पाइक्स असतील तर त्यासाठी कोणते क्षेत्र कारणीभूत आहे ते आम्ही शोधू शकतो. आणि आम्ही हीच गोष्ट नद्यांचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्था आणि प्राधिकरणांना सांगू शकतो आणि त्यांना त्वरित अहवाल देऊ शकतो, जेणेकरून जीपीआय म्हणजेच सर्वाधिक प्रदूषणकारी उद्योग आहेत त्यांची त्वरित तपासणी सुरू केली जाऊ शकते .

पंतप्रधान: आपल्या या  बैठकीनंतर तुम्हाला आणखी किती तास काम करावे लागेल?

सहभागी: सर, आणखी  किमान 20 तास.

पंतप्रधान: ठीक आहे! गंगा माता असो किंवा  देशातील इतर नद्या. देशाच्या अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाबरोबरच पर्यावरणाच्या दृष्टिकोनातूनही खूप महत्त्वपूर्ण आहेत. तुम्ही लोक या विषयावर काम करत आहात याचा मला आनंद आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जयपूरचे आहात तर पाण्याचे मोल काय आहे आणि त्याचे महत्त्व काय आहे हे तुम्हाला चांगलेच ठाऊक  आहे. माझ्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.

सहभागी  : खूप-खूप धन्यवाद सर.

पंतप्रधान :

मित्रांनो ,

तुम्हा सर्वांशी बोलून खूप आनंद झाला आणि मी पाहत होतो की  तुम्हा लोकांचा गट जेव्हा पहायचो तेव्हा हा गट कशा प्रकारे बनला आहे . यातून एक भारत श्रेष्ठ भारत चे दर्शन देखील घडत होते.  उत्तरेकडील विद्यार्थी दक्षिणेत,  दक्षिणेकडील विद्यार्थी उत्तर भारतात  ,  पूर्वेकडील विद्यार्थी पश्चिमेत ,पश्चिमेकडील पूर्वेत,  मला वाटते की हा तुम्हा  सर्वांसाठी  खूप चांगला अनुभव असेल आणि देशाची विशालता आणि विविधता तुम्ही अनुभवली असेल. तर तुमच्या हॅकेथॉनमधील विषयाव्यतिरिक्त , तुम्हाला इतरही अनेक अवांतर गोष्टी शिकायला मिळत असतील .   

मित्रांनो ,

तुम्हाला तर माहीतच आहे की भविष्यातील जग हे ज्ञान आणि नवोन्मेषावर चालणार  आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही भारताची आशा आहात , आकांक्षा आहात. तुमचा दृष्टीकोन वेगळा आहे, तुमचे विचार वेगळे आहेत आणि ऊर्जेची पातळी तर खूपच  वेगळी आहे. पण सर्वांचे ध्येय एकच आहे. भारत हा जगातील सर्वात नवोन्मेषी,प्रगतीशील आणि समृद्ध देश बनावा .

आज अवघे जग सांगत आहे की, भारताची ताकद, ही आपली युवाशक्ती आहे, आमचे युवक  नवोन्मेषी  आहेत,  आमच्याकडे तंत्रज्ञानाची शक्ती आहे. भारताची ही ताकद तुम्हा सर्वांमध्ये, ‘इंडिया हॅकेथॉन‘ मध्ये अगदी स्पष्टपणे दिसून येत आहे. मला आनंद वाटतो की, ‘स्मार्ट इंडिया हॅकेथॉन‘ हे भारतातील युवकांना वैश्विक दृष्ट्या, उत्कृष्ट बनण्याचा एक उत्तम मंच बनला आहे. ज्यावेळी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनला प्रारंभ झाला आहे, त्यावेळेपासून जवळपास 14 लाख विद्यार्थ्यांनी स्मार्ट इंडिया हॅकेथॉनमध्ये भाग घेतला आहे. या विद्यार्थ्यांनी मिळून दोन लाख टीम बनविल्या आणि जवळपास तीन हजार समस्यांवर काम केले आहे. 6400 पेक्षा जास्त संस्था, - जवळपास सहा हजार संस्था जोडल्या गेल्या आहेत. या हॅकेथॉनमुळे शेकडो नवीन स्टार्ट अप्स जन्माला आले आहेत. आणखी एक गोष्ट मी नोंदवली आहे, ती म्हणजे 2017 मध्ये विद्यार्थ्यांच्यावतीने 7 हजारपेक्षा जास्त नवीन  कल्पनांच्या प्रकल्पांची  नावनोंदणी झाली होती. यंदाच्यावर्षी अशा  नवकल्पनांची संख्या 57 हजारपेक्षाही जास्त झाली आहे. सात हजार ते 57 हजार कल्पनांची नोंदणी होणे, म्हणजे हे दर्शवते की,  भारतातील युवावर्ग, कशा पद्धतीने आपल्या देशातील आव्हानांवर पर्याय, समाधान शोधण्यासाठी कंबर कसून पुढे जात आहे.

मित्रांनो,

गेल्या सात वर्षांमध्ये जितकेही हॅकेथॉन झाले आहेत, त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर युवकांनी शोधून काढलेल्या पर्यायांचा, उत्तरांचा आज देशातील लोकांसाठी खूप उपयोग होत असल्याचे सिद्ध होत आहेत. अनेक मोठ्या समस्यांना हॅकेथॉनमधून उत्तरे मिळाली आहेत. ज्याप्रमाणे 2022 मध्ये हॅकेथॉनमध्ये तुमच्यासारख्या युवकांच्या एका टीमने चक्रीवादळाची तीव्रता मोजण्यासाठी एक कार्यप्रणाली तयार करण्याचे काम केले होते. हॅकेथॉनमध्ये जी कार्यप्रणाली विकसित केली होती, ती आता इस्रोव्दारे पुढे अधिक विकसित केलेल्या तंत्रज्ञानाबरोबर संलग्न करण्यात आली आहे. हे ऐकून तुम्हा सर्वांनाही अभिमान वाटत असेल. 4-5 वर्षापूर्वी हॅकेथॉनमध्ये आणखी एका टीमने एक असे ‘व्हिडिओ जिओटॅगिंग अॅप’  बनवले होते, त्याच्या मदतीने डेटा जमा करणे खूप सुकर झाले आहे. याचाही उपयोग आता अंतराळाशी संबंधित संशोधनामध्ये केला जात आहे. हॅकेथॉनच्या आणखी एका टीमने ‘रिअल टाइम ब्लड मॅनेजिंग सिस्टम‘ वर काम केले होते. ही एक अशी कार्यप्रणाली होती की, एखाद्या नैसर्गिक आपत्तीच्या काळामध्ये तिथे उपलब्ध असलेल्या रक्तपेढींविषयी सर्व तपशील प्रदान करून शकते. यामुळेही आज एनडीआरएफसारख्या संस्थांना खूप मदत मिळत आहे. काही  वर्षांपूर्वी एका टीमने दिव्यांगजनांसाठी एक असे उत्पादन तयार केले की, त्यामुळे या विशेष व्यक्तींच्या जीवनातील समस्या कमी करण्यासाठी मदत होत असल्याचे दिसून आले आहे. आजही हॅकेथॉनमध्ये सहभागी होत असलेल्या तुम्हां सर्व युवकांसाठी अशा शेकडो यशोगाथा प्रेरणा देणा-या ठरत आहेत. यावरून असे दिसून येते की, आज देशातील युवक, सरकारच्याबरोबरीने देशाच्या विकासासाठी, देशासमोर असलेल्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी कार्यरत आहे. यामुळे युवावर्गामध्ये  देशाच्या समस्यांवर उत्तर शोधण्याविषयी, देशाच्या विकासाविषयी एक स्वामित्वाची भावनाही तयार होत आहे. 

आजही तुम्हा सर्वांबरोबर संवाद साधल्यानंतर माझा विश्वास अधिक वाढला आहे, आणि मला ठामपणे वाटतेय की, देश विकसित भारत होण्यासाठी अगदी योग्य ‘ट्रॅक’वर आहे. आज तुम्ही ज्या तत्परतेने, ज्या वचनबद्धतेने, भारताच्या समस्यांवर अगदी नवसंकल्पनांमधून पर्याय-उत्तरे शोधत आहात, ही गोष्ट खरोखरच अद्भुत आहे.

मित्रांनो,

आज देशाच्या ज्या आकांक्षा आहेत, त्यामध्ये आपल्याला प्रत्येक आव्हानांसाठी ‘आउट ऑफ द बॉक्स’ जावून विचार करवाच लागेल. आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये ‘आउट ऑफ द बॉक्स थिकींग’ हाच मार्ग असला पाहिजे, आणि हीच सवय आपल्या दैनंदिन जीवनात अंगिकारली पाहिजे. या हॅकेथॉनचे वैशिष्टही हेच कायम राहिले आहे. या सर्व गोष्टीची प्रक्रियाही खूप महत्वाची आहे आणि त्यातून निर्माण होणारे उत्पादनही महत्वाचे आहे. एक काळ असा होता की, ज्यावेळी फक्त सरकारच देशाच्या समस्यांवर तोडगा काढेल, असा दावा केला जात होता. परंतु आता असे काहीही राहिले नाही. आज अशा हॅकेथॉनच्या माध्यमातून विद्यार्थी, शिक्षक आणि ‘मेंटॉर्स’ही उत्तर शोधत आहेत. हे भारताचे नवीन प्रशासकीय मॉडेल आहे. ‘सबका प्रयास’ या मॉडेलची प्राणशक्ती आहे. 

मित्रांनो,

देशाची आगामी 25 वर्षांमधली पिढी, ही भारताची अमृत पिढी आहे. तुम्हां सर्व मंडळींवर विकसित भारताच्या निर्माणाची जबाबदारी आहे. आणि आमचे सरकार आजच्या या पिढीला प्रत्येक साधन-संसाधन अगदी योग्य वेळी देण्यासाठी वचनबद्ध आहे. आणि  यासाठी आम्ही वेगवेगळ्या वयोगटामध्ये वेगवेगळ्या स्तरावर काम करीत आहोत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी आम्ही नवीन शैक्षणिक धोरण लागू केले आहे. देशातील पुढच्या  पिढीला शाळांमध्येच नवसंकल्पनांच्या विकासासाठी संसाधने मिळावीत, यासाठी आम्ही 10 हजारांपेक्षा जास्त अटल टिंकरिंग लॅब्ज सुरू केल्या आहेत. आज एक कोटींपेक्षा जास्त मुलांसाठी या प्रयोगशाळा म्हणजे नवनवीन प्रयोग आणि संशोधनांचे केंद्र बनत आहेत. देशातील 14 हजारपेक्षा जास्त पीएम श्री शाळांमध्येही 21 व्या शतकांतील कौशल्यांवर काम केले जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये मनामध्‍ये नवोन्मेषी विचार अधिक चांगल्या पद्धतीने यावेत, ते प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांना प्रवृत्त करता यावे, यासाठी आम्ही महाविद्यालयीन स्तरावर इन्क्युबेशन सेंटर्सची स्थापना केली आहे. युवकांच्या प्रश्नांवर उत्तरे दिली जावीत, यासाठी जिज्ञासा मंच तयार केला आहे. यामध्ये युवकांना थेट संशोधकांबरोबर संपर्क साधून त्यांच्याशी बोलण्याची संधी दिली जाते.

मित्रांनो,

आज प्रशिक्षणाव्यतिरिक्त नवयुवकांना स्टार्टअप्स इंडिया अभियानाच्या माध्यमातून आर्थिक मदतही दिली जात आहे. त्यांना करसवलत दिली जात आहे. नवयुवकांना आपल्या व्यवसायासाठी 20 लाख रूपयांपर्यंत मुद्रा ऋण देण्याची व्यवस्था केली गेली आहे. नवीन  कंपन्यांसाठी देशभरामध्ये तंत्रज्ञान पार्क आणि नवीन आयटी केंद्र बनविण्यात येत आहेत. सरकारने एक लाख कोटी रूपयांचा संशोधन निधीही बनवला आहे. याचा अर्थ करिअरच्या प्रत्येक टप्प्यावर सरकार तुम्हा सर्व नवयुवकांच्या बरोबरीने उभे आहे. प्रत्येकांच्या आवश्यकतेप्रमाणे सरकार मदतीचा हात देण्याचे काम करीत आहे. अशा हॅकेथॉनमुळे आपल्याकडच्या नवयुवकांना नवनवीन संधी मिळत आहेत. आणि हा काही औपचारिक कार्यक्रम आहे, असे नाही. तर ही एक स्थायी संस्थांना सहभागी करून घेणारी प्रक्रिया आहे. हे आमचे ‘प्रो पिपल गर्व्हनन्स मॉडेल’ म्हणजे लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श नमूना दर्शवणारा भाग आहे.

मित्रांनो,

जर आपल्याला जगातील आर्थिक महासत्ता बनायचे असेल तर आपल्याला अर्थव्यवस्थेतील नव्या क्षेत्रांवर खूप मोठ्या प्रमाणावर काम करावे लागेल. आज भारत Digital Content Creation पासून Gaming पर्यंत अनेक अशा क्षेत्रात पुढे जात आहे जी 10 वर्षांपूर्वीपर्यंत फारशी उदयाला देखील आली नव्हती. आज भारत, करियरचे नवे मार्ग देखील बनवत आहे. युवा वर्गाला नवीन मार्गांचा शोध घेण्याची आणि त्यावर प्रयोग करण्याच्या संधी देखील देत आहे. युवा वर्गाची Curiosity आणि Conviction विचारात घेऊन सरकार त्यांच्या आवडीला प्रोत्साहन देत आहे. सरकार विविध सुधारणा करून त्यांच्या मार्गातील अडथळे दूर करत आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच National Creators Award सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. Content Creators ची मेहनत आणि Creativity यांची दखल घेऊन त्यांना मान्यता देण्याचा याचा उद्देश होता. आम्ही खेळांना Career Choice बनवण्यासाठी काम केले आहे. गावात विलेज लेवल टूर्नामेंट्स पासून ते ऑलिंपिकच्या तयारीसाठी Khelo India आणि TOPS योजनांना चालना दिली आहे. National Centre of Excellence for Animation, Visual Effects, Gaming, Comics, and Extended Reality यांचा परिणाम देखील दिसू लागला आहे. याच कारणामुळे Gaming देखील एक Promising Career पर्याय बनू लागला आहे.

मित्रांनो,

अगदी अलीकडेच सरकारने एक खूप मोठा निर्णय घेतला आहे. संपूर्ण जगात त्याची प्रशंसा होत आहे. हा निर्णय आंतरराष्ट्रीय पत्रिकांसंदर्भात भारताच्या युवा वर्गाला, भारताच्या संशोधकांना, भारताच्या नवोन्मेषकांना वापरसुलभता देण्याविषयीचा आहे. One Nation-One Subscription ही योजना जगातील वैशिष्ट्यपूर्ण योजनांपैकी एक आहे. ज्या अंतर्गत सरकार, प्रतिष्ठेच्या जर्नल्सची सबस्क्रिप्शन घेत आहे जेणेकरून कोणत्याही माहितीपासून भारताचा कोणताही युवा वंचित राहणार नाही. हॅकेथॉनमध्ये सहभागी होणाऱ्या तुम्हा सर्व युवांना देखील याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. आता सरकारच्या प्रत्येक प्रयत्नांचे हेच लक्ष्य आहे की आपले युवा जगातील Best Minds सोबत स्पर्धा करू शकतील. कोणत्याही युवा शक्तीला असे वाटता कामा नये की त्यांच्याकडे कोणत्याही पाठबळाचा किंवा पायाभूत सुविधांचा अभाव आहे. माझ्यासाठी युवांचे व्हिजनच, सरकारचे मिशन आहे आणि म्हणून माझ्या सर्व युवा वर्गाला जे काही पाहिजे, सरकारच्या रुपात आम्ही सर्व त्या दिशेने काम करत आहोत.

मित्रांनो,

आज हजारो तरुण या हॅकेथॉनच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. त्यामुळे  तुम्हा सर्वांना आणखी एक महत्त्वाचा संदेश देण्याची माझी इच्छा आहे. तुम्हाला माहीत आहेच की मी लाल किल्ल्यावरून सांगितले होते. देशाच्या राजकारणात मी अशा एक लाख तरुणांना आणणार आहे, ज्यांच्या कुटुंबातील कोणीही यापूर्वी कधीही राजकारणात नव्हते. अगदी तरुण रक्त. देशाच्या भवितव्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. हे काम करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात आहे. असाच एक कार्यक्रम पुढील महिन्यात होणार आहे. विकसित भारत, Young Leaders Dialogue ज्यामध्ये देशभरातील कोट्यवधी तरुण सहभागी होतील. विकसित भारतासाठी आपल्या Ideas देतील. ज्या Ideas निवडल्या जातील, जे तरुण निवडले जातील, त्यांच्यासोबत 11 आणि 12 जानेवारीला स्वामी विवेकानंदजींच्या जयंतीला दिल्लीत Young Leaders Dialogue चे आयोजन होईल. यामध्ये देशविदेशातील दिग्गजांच्या सोबत तुम्हा सर्वांना पाहण्यासाठी ऐकण्यासाठी मी येणार आहे. आज या हॅकेथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व युवांना माझी विनंती आहे की विकसित भारत, Young Leaders Dialogue मध्ये नक्की सहभागी व्हा. राष्ट्र उभारणीमध्ये सहभागी होण्याची आणखी एक उत्तम संधी तुम्हाला मिळणार आहे.

मित्रांनो,

आगामी काळ तुमच्यासाठी एक संधी देखील आहे, त्याबरोबरच एक जबाबदारी देखील आहे. मला तर असे वाटते की Smart India Hackathon च्या टीम्सनी केवळ भारताच्याच नव्हे तर जागतिक समस्यांवर देखील आणखी चांगल्या पद्धतीने काम करावे. पुढील वर्षी जेव्हा आपण सर्व या हॅकेथॉनमध्ये येऊ त्यावेळी एखादे असे उदाहरण देखील असले पाहिजे जे एखाद्या जागतिक समस्येवरील उपाय शोधण्याचे माध्यम बनेल. देशाला तुम्ही सर्व इनोवेटर्स, तुम्हा सर्व ट्रबलशूटर्सच्या सामर्थ्यावर विश्वास देखील आहे, अभिमान देखील आहे. तुम्हा सर्वांच्या यशस्वी भविष्याच्या मंगल कामनेसह तुम्हा सर्वांना खूप-खूप शुभेच्छा.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How PLI schemes, design in India and manufacturing excellence are transforming the architectural lighting industry

Media Coverage

How PLI schemes, design in India and manufacturing excellence are transforming the architectural lighting industry
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Narendra Modi Chairs Second High-Level Meeting with Secretaries of Government of India
July 28, 2026
Sectors discussed: Finance and Economy, Commerce and Industry, and Technology
PM emphasises the need to break both horizontal and vertical silos within the Government
PM emphasises the importance of technological self-reliance and building domestic capabilities in critical sectors
PM encourages greater participation of young innovators and entrepreneurs in cybersecurity ecosystem
PM Stresses Proactive Outreach on Strategic Sectors to Counter Misinformation
PM says Govt must always remain youthful, dynamic and forward-looking, continuously adapting to new challenges and opportunities with agility and innovation
Secretaries share experiences and perspectives on key initiatives, emerging opportunities and implementation challenges

Prime Minister Shri Narendra Modi chaired the second high-level meeting with Secretaries to the Government of India at his residence at 7, Lok Kalyan Marg earlier today. He reviewed the future action agenda of Ministries and Departments dealing with Finance and Economy, Commerce and Industry, and Technology sectors. The meeting focused on accelerating progress towards the goals of Viksit Bharat.

Prime Minister called for a strong focus on team building across Ministries and Departments, urging officers to work with a shared sense of purpose. He emphasised the need to break both horizontal and vertical silos within the Government so that departments function in close coordination and deliver integrated outcomes.

Highlighting the importance of citizen-centric governance, Prime Minister said that the people of India must remain at the centre of governance. He reminded that every decision and policy should be guided by the interests and aspirations of the common citizen.

Prime Minister stressed that while India is making significant investments in infrastructure, equal priority must be given to developing indigenous technologies. He underscored the importance of technological self-reliance and building domestic capabilities in critical sectors.

Prime Minister underlined that energy security is closely linked with national security, economic stability and citizens’ welfare. Prime Minister said India must achieve self-reliance in the energy sector through innovation, diversification and accelerated capacity creation.

Emphasising that reforms are not merely a fashionable term but a continuous necessity for effective governance, Prime Minister stressed the need to reform processes, improve work culture and strengthen institutional efficiency.

Prime Minister said that growing use of technology must be accompanied by a strong focus on cybersecurity to safeguard digital systems and infrastructure. He stressed the need for constant vigilance against emerging cyber threats. He called for encouraging greater participation of young innovators and entrepreneurs in the cybersecurity ecosystem and emphasised that it should evolve into a nationwide movement.

Prime Minister also emphasised the importance of proactive communication on strategic sectors where the country is undertaking major initiatives, to counter misinformation and unfounded fears surrounding such efforts.

Prime Minister says that new academic courses should be planned in partnership with industry to equip the workforce with skills required by emerging and future industries. He also observed that a government must always remain youthful, dynamic and forward-looking, continuously adapting to new challenges and opportunities with agility and innovation.

The meeting featured detailed discussions by Secretaries on the progress, priorities and implementation issues across their respective domains. The meeting was attended by the Cabinet Secretary, Secretaries of key Ministries and Departments, and senior officials from the Prime Minister’s Office.