"भारत लवचिकता आणि प्रगतीचे प्रतीक म्हणून उदयास आला आहे"
“धोरण, सुशासन आणि नागरिकांचे कल्याण या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यावर भारताची विकासकथा आधारित”
"भारत हा जगासाठी आशेचा किरण आहे, त्याची मजबूत अर्थव्यवस्था आणि गेल्या दशकातील परिवर्तनात्मक सुधारणांचा हा परिणाम आहे"
"गिफ्ट सिटीची कल्पना चैतन्यपूर्ण परिसंस्था म्हणून केली गेली आहे जी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे चित्र पुन्हा परिभाषित करेल"
“आम्हाला गिफ्ट सिटी हे नव्या जगतातील आर्थिक आणि तंत्रज्ञान सेवेचे ग्लोबल नर्व्ह सेंटर बनवायचे आहे”
"भारताचा 'ग्लोबल ग्रीन क्रेडिट उपक्रम' हा COP28 मधील एक प्रो-प्लॅनेट उपक्रम"
“भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फिनटेक बाजारपेठांपैकी एक आहे”
“GIFT IFSC ची अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधा एक व्यासपीठ प्रदान करते जे व्यवसायांना कार्यक्षमता वाढविण्यास सक्षम करते”
“भारत हा खोल रुजलेली लोकशाही मूल्ये तसेच आर्थिक आणि व्यापाराची ऐतिहासिक परंपरा असलेला देश आहे”

नमस्कार,

गुजरातचे लोकप्रिय मुख्यमंत्री भूपेंद्र भाई,  राज्य सरकारचे मंत्री, आयएफसीए चे अध्यक्ष के. राजारामन जी, जगातील प्रतिष्ठित वित्तीय संस्था आणि विविध संस्थांचे नेते, महिला आणि पुरुष,
आपल्या सर्वांचे इन्फिनिटी फोरमच्या दुसऱ्या बैठकीमध्ये स्वागत आहे. मला आठवते, की 2021 मध्ये आपण जेव्हा इन्फिनिटी फोरमच्या बैठकीला एकत्र आलो होतो, तेव्हा जगभरात साथरोगामुळे केवढी अनिश्चितता होती. जागतिक आर्थिक विकासाबद्दल सर्वांनाच चिंता होती. आणि आजही ही भीती संपलेली नाही. भू-राजकीय तणाव, वाढती महागाई आणि वाढलेले कर्ज या सर्व समस्या आपल्या सर्वांना माहीतच आहेत.
अशा काळात भारत लवचिकता आणि प्रगतीचे एक उत्तम उदाहरण म्हणून उदयाला आला आहे. अशा महत्त्वाच्या काळात गिफ्ट सिटीमध्ये एकविसाव्या शतकातील आर्थिक धोरणांवर विचारमंथन होत आहे, ही गोष्ट गुजरातचा गौरव वाढवणारी आहे. तसे, आज मी गुजरातच्या जनतेचे आणखी एका गोष्टीसाठी अभिनंदन करणार आहे. युनेस्कोने अलीकडेच, गरबा, या गुजरातच्या पारंपरिक नृत्य प्रकारचा समावेश अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून केला आहे. हे खूप मोठे यश आहे. गुजरातचे यश हे देशाचे यश आहे.  

 मित्रहो,
आज भारताच्या विकास गाथेने जगाला दाखवून दिले आहे की, जेव्हा धोरणांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाते, जेव्हा सुशानानासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते, जेव्हा देश आणि देशवासीयांचे हित आर्थिक धोरणांचा पाया असते, तेव्हा काय परिणाम साधला जातो. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 6 महिन्यांत भारतीय अर्थव्यवस्था 7.7 टक्के दराने वाढली आहे. या वर्षी सप्टेंबरमध्ये आयएमएफ ने म्हटले होते की 2023 मध्ये जागतिक विकासाच्या सोळा टक्के वाटा भारताचा असेल. यापूर्वी जुलै 2023 मध्ये, जागतिक बँकेने म्हटले होते की जागतिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर, भारत आणि त्याच्या अर्थव्यवस्थेकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी म्हटले होते की, ग्लोबल साउथचे नेतृत्व करण्यासाठी भारत सक्षम आहे.काही महिन्यांपूर्वी जागतिक आर्थिक मंचानेही म्हटले होते की, भारतामध्ये लाल फितीच्या कामकाजाचे प्रमाण कमी झाले असून गुंतवणुकीसाठी चांगले वातावरण निर्माण झाले आहे.

 

आज संपूर्ण जगाला भारताकडून अपेक्षा आहेत. आणि हे असेच घडले नाही. हे भारताच्या बळकट होत असलेल्या अर्थव्यवस्थेचे आणि गेल्या 10 वर्षांत केलेल्या परिवर्तनात्मक सुधारणांचे प्रतिबिंब आहे. या सुधारणांमुळे देशाचा आर्थिक पाया मजबूत झाला आहे. साथरोगाच्या काळात, जेव्हा बहुतेक सर्व देश केवळ आर्थिक मदतीवर लक्ष केंद्रित करत होते, तेव्हा आम्ही दीर्घकालीन विकास आणि आर्थिक क्षमतेच्या विस्तारावर लक्ष केंद्रित केले.

मित्रहो,
जागतिक अर्थव्यवस्थेशी एकात्मता वाढवणे हे आमच्या सुधारणांचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. आम्ही अनेक क्षेत्रांमध्ये एफडीआय धोरण लवचिक केले, आम्ही अनुपालन ओझे कमी केले, आम्ही 3 एफटीएवर स्वाक्षरी केली आणि आजही आम्ही अनेक महत्त्वपूर्ण पावले उचलत आहोत. गिफ्ट आयएफएससीए हे भारतीय वित्तीय बाजारांना जागतिक वित्तीय बाजारांशी जोडण्यासाठी आम्ही केलेल्या मोठ्या सुधारणांचा एक भाग आहे. गिफ्ट (GIFT) सिटी ची कल्पना एक अशी प्रभावी परिसंस्था म्हणून करण्यात आली आहे, जी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा परिप्रेक्ष पुन्हा परिभाषित करेल. ती नवोन्मेष, कार्यक्षमता आणि जागतिक सहकार्याचा नवीन मापदंड निश्चित करेल. 2020 मध्ये एक एकीकृत नियामक म्हणून आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणाची स्थापना, म्हणजे या प्रवासातील महत्वाचा टप्पा आहे. आर्थिक संकटाच्या या कठीण काळातही, आयएफएससीए ने 27 नियम आणि 10 पेक्षा जास्त चौकटी  तयार केल्या  आहेत. यामुळे गुंतवणुकीचे नवे मार्गही खुले झाले आहेत.
तुम्हाला हे जाणून आनंद होईल की तुम्ही इन्फिनिटी फोरमच्या पहिल्या बैठकीत दिलेल्या सूचनांच्या आधारे अनेक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, एप्रिल 2022 मध्ये, आयएफएससीए ने निधी व्यवस्थापन व्यवहारांचे नियंत्रण करण्यासाठी एक व्यापक चौकट अधिसूचित केली आहे. आज आयएफएससीए मध्ये 80 फंड व्यवस्थापन संस्था नोंदणीकृत आहेत, ज्यांनी 24 अब्ज अमेरिकी डॉलर्स पेक्षा जास्त किमतीचे निधी स्थापन केले आहेत. या दोन आघाडीच्या आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना 2024 पासून गिफ्ट आयएफएससीए मध्ये त्यांचे अभ्यासक्रम सुरू करण्याची मान्यता मिळाली आहे. आयएफएससीए ने मे 2022 मध्ये विमान भाड्याने देण्यासाठीच नियमावली जारी केली होती, आज 26 संस्थांनी आयएफएससीए बरोबर परिचालन सुरू केले आहे.

मित्रहो,
पहिल्या आवृत्तीला मिळालेल्या दणदणीत यशानंतर, तुमच्या सूचनांवर एवढे काम केल्यावर, आता प्रश्न आहे, की पुढे काय? गिफ्ट आयएफएससीए ची व्याप्ती एवढीच राहील का? तर माझे उत्तर असेल, नाही. सरकारला गिफ्ट आयएफएससीए ला पारंपारिक वित्त आणि उपक्रमांच्या पलीकडे नेण्याची इच्छा आहे. आम्हाला गिफ्ट सिटी हे नव्या युगातील वित्तीय आणि तंत्रज्ञान सेवांचे जागतिक केंद्र बनवायचे आहे. मला विश्वास आहे, गिफ्ट सिटी ची उत्पादने आणि सेवा जगासमोरील आव्हाने सोडवण्यासाठी मदत करतील. आणि यामध्ये तुम्हा सर्व भागधारकांची  मोठी भूमिका आहे.

मित्रहो,
आज जगासमोरील सर्वात मोठे आव्हान म्हणजे हवामान बदल. भारत हा जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याने या चिंतेला कमी लेखत नाही, आम्ही त्याबद्दल जागरूक आहोत. काही दिवसांपूर्वी झालेल्या कॉप  परिषदेतही भारताने जगासमोर नवीन वचनबद्धता मांडल्या आहेत. भारत आणि जगाची जागतिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, आपल्याला किफायतशीर वित्तपुरवठ्याची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करावी लागेल.
जी-20 अध्यक्षपदाच्या कार्यकाळामध्ये आम्ही काही विशिष्ट गोष्टींना प्राधान्य दिले होते. यामध्ये  वैश्विक वृद्धी आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी सर्व शाश्वत वित्तीय आवश्यकता  समजून  घेतल्या पाहिजेत, अशी भूमिका आमची आहे.  यामुळे हरित क्षेत्र, लवचिकता आणि समाजिक समावेशकता  आणि आर्थिक दिशेने संक्रमणाला प्रोत्साहन मिळेल. काही अंदाजांनुसार भारतालाही 2070 पर्यंत ‘निव्वळ शून्य उद्दिष्ट '  साध्य करण्यासाठी कमीत कमी 10 ट्रिलियन डॉलरची आवश्यकता असेल. या गुंतवणूकीसाठी एक निश्चित निधी वैश्विक स्त्रोतांच्या माध्यामातून उभा केला पाहिजे. यासाठी आम्ही ‘आयएफएससी‘ला एक वैश्विक शाश्वत आर्थिक केंद्र बनवू इच्छित आहोत.

 

भारताला एक ‘लो- कार्बन’ अर्थव्यवस्था बनविण्यासाठी आवश्यक आहे ते ‘ग्रीन कॅपिटल फ्लो’ आणि त्यासाठी ‘जीआयएफटी आयएफएससी‘ हे एक प्रभावी चॅनल आहे. हरित रोखे , शाश्वत रोखे , शाश्वतेशी संलग्न रोखे यासारख्या वित्तीय उत्पादनांचा विकास झाला तर संपूर्ण जगाचा मार्ग सोपा बनू शकेल. तुम्हा सर्वांना माहिती आहे की, भारताने कॉप 28 मध्ये एक ‘प्रो प्लॅनेट’उपक्रम म्हणून ‘ग्लोबल ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह’ ची घोषणा केली आहे. मला वाटते की, इथे उपस्थित सर्व अनुभवी लोकांनी  ‘ग्रीन क्रेडिट’  म्हणजे हरित पत पुरवठा निश्चित करण्यासाठी एक विपणन तांत्रिक प्रणाली विकसित करण्यासाठी आपल्या कल्पना  मांडाव्यात.

मित्रांनो,
भारत आज जगातील सर्वाधिक वेगाने वृद्धिंगत होणा-या फिनटेक बाजारपेठेपैकी एक आहे. फिनटेकमध्ये भारताची ताकद ‘जीआयएफटी आयएफएससी‘ चे व्हिजन कसे आहे, त्याच्याशी जोडली गेली आहे. कारण हे स्थान फिनटेकचे एक उदयोन्मुख केंद्र बनत  आहे. 2022 मध्ये आयएफएससीए ने फिनटेकसाठी एक प्रगतशील नियामक आराखडा जारी केला होता. नवोन्मेषी संकल्पना आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आयएफएससीए’मध्ये एक फिनटेक इनिशिएटिव्ह योजना आहे. ती योजना भारतीय आणि परदेशी फिनटेक यांना निधी पुरवते. गिफ्ट सिटीमध्ये जगासाठी ग्लोबल फिनटेक वर्ल्डचे प्रवेशद्वार आणि फिनटेक प्रयोगशाळा बनण्याची क्षमता आहे. माझा आपल्या सगळ्यांना आग्रह आहे की, याचा तुम्ही जास्तीत जास्त लाभा उठवावा.

मित्रांनो,
स्थापनेनंतर अवघ्या काही वर्षांमध्ये ‘जीआयएफटी आयएफएससी‘ ज्या पद्धतीने ग्लोबल कॅपिटल फ्लोचे प्रभावी आणि मुख्य प्रवेशव्दार बनले आहे, ही गोष्ट एक अभ्यासाचा विषय बनली आहे. गिफ्ट सिटीने एक अव्दितीय ‘ट्राय-सिटी’ संकल्पना विकसित केली आहे. ऐतिहासिक शहर अहमदाबाद आणि राजधानी गांधीनगर यांच्या मधल्या क्षेत्रामध्ये स्थित  गिफ्ट सिटीची कनेक्टिव्हिटी उत्तम आहे. ‘जीआयएफटी आयएफएससी‘ मध्ये असलेल्या  अत्याधुनिक डिजिटल पायाभूत सुविधांमुळे असा एक मंच तयार झाला आहे की, त्यामुळे व्यवसायाचा वेग आणि क्षमता प्रचंड वाढतो. या भागाच्या  ग्लोबल कनेक्टिव्हिटी विषयी आपण खूप चांगल्या प्रकारे जाणून आहातच. ‘जीआयएफटी आयएफएससी‘ एक असे व्यवस्थापन म्हणून पुढे आले आहे की, त्यामुळे आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या जगातील दिग्गज  त्याकडे आकर्षित होतात.
आज आयएफएससीमध्ये कार्यरत असलेल्या  580 परिचालन संस्था आहेत. 3 एक्सचेंज आहेत, त्यामध्ये आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंजचाही समावेश आहे. 25 बॅंका आहेत, त्यामध्ये 9 परदेशी बॅंकांचा समावेश आहे. 29 विमा कंपन्या, 2 परदेशी विद्यापीठे, 50 पेक्षा अधिक व्यवासायिक सेवा प्रदाते आहेत, त्यामध्ये कन्सलटिंग फर्म आहेत, लॉ फर्म आहेत, तसेच सीए फर्मचाही समावेश आहे. मला विश्वास आहे की, आगामी काही वर्षांमध्ये गिफ्ट सिटी, जगातील सर्वश्रेष्ठ आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्रापैकी एक बनेल.

मित्रांनो,
भारत एक असा देश आहे की जिथे लोकशाहीची मूल्ये, पाळेमुळे खोलवर रूजली आहेत.  व्यापार आणि वाणिज्याची या देशाला ऐतिहासिक परंपरा आहे. भारतामध्ये प्रत्येक गुंतवणूकदार अथवा कंपनीसाठी सर्वाधिक वैविध्यपूर्ण प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत. गिफ्टविषयी आमचे व्हिजन भारताच्या वृद्धीच्या यशोगाथेबरोबर जोडले गेले आहे. मी आपल्यासमोर काही उदाहरणे ठेवणार आहे. आज भारतात दररोज 4 लाख प्रवासी विमानाने प्रवास करीत आहेत. 2014 मध्ये आमच्याकडे असलेल्या प्रवासी विमानांची संख्या 400 होती. ती वाढून आज 700 पेक्षा जास्त झाली आहे. गेल्या 9 वर्षांमध्ये भारतातील प्रवासी विमानांची संख्या दुप्पट झाली आहे. आगामी वर्षांमध्ये आमच्या विमान कंपन्या जवळपास 1000 नवीन विमाने खरीदणार आहेत.

 

या परिस्थितीमध्ये  गिफ्ट सिटीच्यावतीने  विमानाशी संबंधित अनेक प्रकारच्या सुविधा देणे, अतिशय योग्य ठरते. भारतामध्ये जलमार्गाने मालाची वाहतूक आता वाढतेय. जहाजांची संख्याही त्यामुळे वाढत आहे. हा कल लक्षात घेवून आयएफएससीए ची  शिप लिजींग योजना   त्याचा पूर्ण लाभ उठविण्याची संधी देत आहे. अशाच प्रकारे भारताकडे असलेली  मजबूत आयटी प्रतिभा, डेटा संरक्षणाचे कायदे आणि गिफ्ट सिटीचे डेटा एम्बसी इनिशिएटिव्ह, सर्व देशांसाठी आणि व्यवसायांना डिजिटल कनेक्टिव्हिटीची सुरक्षित सेवा देत आहे. भारतातील युवा प्रतिभेमुळे आपण सर्व मोठ्या कंपन्यांच्या जगतिक क्षमता केंद्राचा 'पाया ' बनलो आहोत.
मित्रांनो, आगामी काही वर्षांमध्ये भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत भारत विकसित देश बनेल. नव्या पद्धतीचे भांडवल, डिजिटल तंत्रज्ञान आणि या काळातील वित्तीय सेवा या गोष्टी या एकूणच प्रवासात महत्वपूर्ण भूमिका बजावतील. आपल्याकडील प्रभावी नियमन, प्लग अॅंड प्ले पायाभूत सुविधा, दुर्गम भागातील अर्थव्यवस्थेपर्यंत असलेली पोहोच, कोणताही व्यवसाय करताना त्यासाठी येणारा खर्च कमी असल्यामुळे होणारा लाभ आणि इथे असलेल्या प्रतिभेचा फायदा या कारणांमुळे गिफ्ट सिटी अशा अनेक संधी निर्माण करीत आहे, त्याची इतर कशा बरोबरही तुलना होवू शकत नाही.
चला तर मग, या! ‘जीआयएफटी आयएफएससी‘च्या बरोबरीने वैश्विक स्वप्ने पूर्ण करण्याच्या दिशेने आपण सर्वजण मिळून पुढे जाऊया!! लवकरच व्हायब्रंट गुजरात ग्लोबल इन्व्हेस्टर समिटचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठीही मी सर्व गुंतवणूकदारांना आमंत्रित करतो आणि आपण केलेल्या या प्रयत्नांना अनेक-अनेक शुभेच्छा देतो. या, आपण सर्वजण मिळून जगापुढे असलेल्या गंभीर मुद्यांवर तोडगे शोधण्याच्या दिशेने नवोन्मेषी संकल्पनांचा शोध घेवू आणि  त्या उपाय योजनांना पुढे घेवून जावू या!
खूप -खूप धन्यवाद!!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Using Fuel With Restraint Is Need Of Hour': PM Modi Says India Committed Towards Energy Security

Media Coverage

'Using Fuel With Restraint Is Need Of Hour': PM Modi Says India Committed Towards Energy Security
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister extends greetings to everyone on National Technology Day
May 11, 2026
PM shares a Sanskrit Subhashitam highlighting Agni as the fiery essence that awakens immense power within the smallest particles of matter

Prime Minister Shri Narendra Modi today extended greetings to everyone on National Technology Day.

The Prime Minister recalled with pride the hard work and dedication of the scientists, which led to the successful tests in Pokhran in 1998. He noted that the landmark moment reflected India’s scientific excellence and unwavering commitment.

The Prime Minister stated that technology has become a key pillar in building a self-reliant India. Shri Modi highlighted that it is accelerating innovation, expanding opportunities, and contributing to the nation’s growth across sectors. He emphasised that the continued focus remains on empowering talent, encouraging research, and creating solutions that serve both national progress and the aspirations of the people.

Reflecting on the historic milestone, the Prime Minister further noted that the nuclear tests conducted in Pokhran on this day in 1998 introduced the world to India's amazing capabilities. He lauded the scientists as the true architects of the country's pride and self-respect.

Sharing a Sanskrit Subhashitam, the Prime Minister noted that Agni is the supreme power of the heavens and the primary source of all energy on earth. This fiery essence awakens the immense power hidden within the smallest particles of matter and spreads energy and motion throughout creation.

In a series of posts on X, the Prime Minister wrote:

"Greetings on National Technology Day. We recall with pride the hard work and dedication of our scientists, which led to the successful tests in Pokhran in 1998. That landmark moment reflected India’s scientific excellence and unwavering commitment.

Technology has become a key pillar in building a self-reliant India. It is accelerating innovation, expanding opportunities and contributing to the nation’s growth across sectors. Our continued focus remains on empowering talent, encouraging research and creating solutions that serve both national progress and the aspirations of our people."

"वर्ष 1998 में आज के दिन पोखरण में हुए परमाणु परीक्षण ने दुनिया को भारत के अद्भुत सामर्थ्य से परिचित कराया। हमारे वैज्ञानिक देश के गौरव और स्वाभिमान के सच्चे शिल्पी हैं।

अग्निर्मूर्धा दिवः ककुत्पतिः पृथिव्या अयम्।
अपां रेतांसि जिन्वति॥"

Agni is the supreme power of the heavens and the primary source of all energy on earth. This fiery essence awakens the immense power hidden within the smallest particles of matter and spreads energy and motion throughout creation.