The GST spirit is about growing stronger together. I hope the same GST spirit prevails in the session: PM
GST shows the good that can be achieved when all parties come together and work for the nation: PM

नमस्कार मित्रहो,

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. उन्हाळ्यानंतर पहिला पाऊस मृद्‌गंध निर्माण करतो तसेच हे पावसाळी अधिवेशन जीएसटीच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे नवचैतन्यानं भारले आहे. जेव्हा देशातले सर्व राजकीय पक्ष, सर्व सरकारं केवळ आणि केवळ राष्ट्रहिताचा विचार करुन निर्णय घेतात तेव्हा केवढे मोठे राष्ट्रहिताचे कार्य होते ते जीएसटीच्या यशातून सिद्ध झाले आहे. “एकत्र बलवान होऊ” ही जीएसटीमागची प्रेरणा आहे. ही प्रेरणा या अधिवेशनातही वृद्धिंगत होवो.

हे अधिवेशन अनेकदृष्ट्या महत्वाचे आहे. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळून सात दशकं पूर्ण होत आहेत. 9 ऑगस्टला 75 वर्ष होत आहेत. “ छोडो भारत” चळवळीला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. याच अधिवेशनात देशाला नवे रार्ष्टपती आणि उपराष्ट्रपती निवडण्याची संधी मिळत आहे. एक प्रकारे देशाच्या वाटचालीतील महत्वपूर्ण घटनांचा हा कालखंड आहे. त्यामुळे साहजिकच देशवासियांचे लक्ष या पावसाळी अधिवेशनावर विशेषत्वाने राहील.

पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला आम्ही देशातल्या शेतकऱ्यांना अभिवादन करतो. या मोसमात कठोर परिश्रम घेऊन शेतकरी देशवासियांच्या अन्नधान्याची सोय करुन अन्नसुरक्षा देतात.

या पावसाळी अधिवेशनात सर्व राजकीय पक्ष, सर्व माननीय संसद सदस्य राष्ट्रहिताचे महत्वाचे निर्णय घेतील. उत्तम चर्चा करतील. प्रत्येक निर्णयात, व्यवस्थेत आपले मौलिक योगदान देण्याचा प्रयत्न आपण सगळे मिळून करु, असा मला विश्वास वाटतो.

तुम्हा सर्वांना धन्यवाद !

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Paltano Dorkar!’ PM Modi Predicts TMC Rout In Bengal, Says ‘Goons Won’t Find Space To Hide After May 4’

Media Coverage

‘Paltano Dorkar!’ PM Modi Predicts TMC Rout In Bengal, Says ‘Goons Won’t Find Space To Hide After May 4’
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 24 एप्रिल 2026
April 24, 2026

Made in India, Built for 2047: PM Modi’s Reforms Turning Rural Hope into National Strength