पंतप्रधानांच्या हस्ते बिहारमधील 12,100 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी तसेच लोकार्पण होणार
या भागातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना मोठी चालना देत पंतप्रधान दरभंगा येथील एम्सची करणार पायाभरणी
विशेष लक्ष केंद्रित केले जाणारे प्रकल्प : रस्ते आणि रेल्वे जोडणी
वाहिनीद्वारे गॅस पुरवठ्याच्या माध्यमातून स्वच्छ उर्जा, पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी विविध प्रकल्पांचा पंतप्रधानांच्या हस्ते कोनशीला समारंभ
एका अनोख्या उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान देशभरातील काही रेल्वे स्थानकांवरील 18 जनौषधी केंद्रांचे करणार लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 13 नोव्हेंबर रोजी बिहारला भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याचा प्रारंभ  दरभंगा येथून होणार आहे.सकाळी पावणेअकराच्या सुमारास, बिहारमधील 12,100 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे उद्घाटन, पायाभरणी तसेच लोकार्पण कार्यक्रम होईल. त्या भागातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना मोठी चालना देत पंतप्रधान नरेंद्र मोदी दरभंगा येथे 1260 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह उभारण्यात येणाऱ्या एम्स संस्थेची  ठेवणार आहेत.  या ठिकाणी वैद्यकीय तज्‍ज्ञांची   सुविधा असलेले  सुसज्ज रुग्णालय/आयुष ब्लॉक, वैद्यकीय महाविदयालय, परिचारिका महाविद्यालय, रात्र निवारा तसेच निवासाच्या सुविधांसह इतर अनेक सोयी केल्या जाणार आहेत. बिहार आणि आसपासच्या प्रदेशातील लोकांना या एम्स मध्ये तृतीय स्तरावरील वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतील.

रस्ते आणि रेल्वे अशा दोन्ही क्षेत्रांतील नव्या प्रकल्पांच्या उभारणीद्वारे या भागात जोडणी क्षमतेला चालना देणाऱ्या प्रकल्पांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येईल. पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी बिहारमधील 5,070 कोटी रुपये खर्चाच्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचा कोनशीला समारंभ होईल.

पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग क्र.327 ई मधील गल्गलीया-अरारिया या चौपदरी टप्प्याचे उद्घाटन करतील.ही मार्गिका अरारिया पासून पूर्व-पश्चिम मार्गिकेवर (राष्ट्रीय महामार्ग क्र.-27) गल्गलीया येथे पश्चिम बंगाल या शेजारी राज्यात जाण्यासाठीचा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देईल. यानंतर पंतप्रधान राष्ट्रीय महामार्ग क्र.-110 वर जेहानाबादला बिहारशरीफशी जोडणाऱ्या  बंधुगंज येथील मुख्य पुलाचे उद्घाटन करतील.

पंतप्रधानांच्या हस्ते आठ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये रामनगर ते रोसेरा या दोहोबाजूंना पदपथ असलेल्या दुपदरी रस्त्याच्या बांधकामासह, बिहार-पश्चिम बंगाल सीमेपासून एनएच -131A च्या मनिहारी विभागापर्यंतच्या खंडाचा, महनर आणि मोहिउद्दीन नगरमार्गे हाजीपूर ते बछवारा, सरवान.-चकाई विभाग  यासह इतर रस्त्यांच्या कामाचा समावेश आहे. एनएच -327E वरील राणीगंज बायपास मार्ग;  एनएच -333A वरील कटोरिया, लाखपुरा, बांका आणि पंजवाडा बायपास मार्गांची; आणि एनएच -82 ते एनएच -33 पर्यंतच्या चार पदरी ‘लिंक’ रस्त्याचीही ते पायाभरणी करतील.

पंतप्रधान 1740 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांचेही लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील चिरालापोथू ते बाघा बिश्नूपूर या 220 कोटी रुपयांच्या सोनेनगर बायपास रेल मार्गांचीही त्यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात येणार आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी  1520 कोटी रुपयांच्या रेल्वे प्रकल्पांचे देखील लोकार्पण करतील. यामध्ये झांझरपूर-लौकाहा बाजार रेल मार्गाच्या खंडाचे  गेज  रूपांतरण, दरभंगा बायपास रेल मार्गांच्या कामाचा समावेश आहे, यामुळे दरभंगा जंक्शनवर होणारी कोंडी दूर होऊन तेथील वाहतूक सुरळित होऊ शकेल, याशिवाय  रेल्वे मार्ग प्रकल्पांची संख्या  दुप्पट करून प्रादेशिक दळणवळण सुलभ करणाऱ्या अन्य प्रकल्पांचा समावेश आहे.

झांझरपूर-लौकाहा बाजार सेक्शनमधील रेल्वे सेवांनाही पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवतील. या विभागामध्ये एमईएमयू- मेमू रेलगाडी  सेवा सुरू केल्याने आसपासच्या गावांमध्ये आणि शहरांना रोजगाराच्या संधी, शिक्षण आणि आरोग्य सुविधा सहजपणे उपलब्ध होऊ शकतील.

पंतप्रधानांच्या हस्ते भारतभरातील विविध रेल्वे स्थानकांवरील 18 प्रधान मंत्री भारतीय जन औषधी केंद्रांचेही लोकार्पण करण्यात येईल. या केंद्रांमुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकांवर स्वस्त दरात औषधे उपलब्ध होतील. तसेच प्रवाशांमध्ये जेनेरिक औषधांबदल जागरूकता आणि त्यांचा स्वीकार होण्यास प्रोत्साहन मिळून आरोग्य सेवेवर होणारा त्यांचा एकंदर खर्च कमी होईल.

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू क्षेत्रातील 4,020 कोटी रुपयांच्या विविध उपक्रमांचीही पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी करण्यात येणार आहे. वाहिनीव्‍दारे  स्‍वयंपाकाचा गॅस  (पीएनजी) घराघरात पोहोचवण्याच्या तसेच  व्यावसायिक आणि औद्योगिक क्षेत्रांना स्वच्छ ऊर्जेचा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड द्वारे दरभंगा, मधुबनी, सुपौल, सीतामढी आणि शेओहर या बिहारच्या पाच प्रमुख जिल्ह्यांमध्ये शहर गॅस वितरणाचे (सीजीडी) जाळे विकसित करण्याच्या कामाची पंतप्रधान पायाभरणी करतील. त्यांच्या हस्ते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बरौनी तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या बिटुमेन उत्पादन युनिटचीही पायाभरणी होणार आहे. या युनिटमध्ये स्थानिक पातळीवर बिटुमेनचे उत्पादन केले जाणार असल्याने आयात बिटुमेनवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Patent application filings in India rise 30.2% to 143,000 in 2025-26: Goyal

Media Coverage

Patent application filings in India rise 30.2% to 143,000 in 2025-26: Goyal
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays homage to the martyrs of Jallianwala Bagh
April 13, 2026
PM shares a Sanskrit Subhashitam on nurturing benevolent forces

The Prime Minister Shri Narendra Modi, today paid his heartfelt homage to the brave martyrs of Jallianwala Bagh. Shri Modi remarked that their sacrifice stands as a powerful reminder of the indomitable spirit of our people.

The Prime Minister also shared a Sanskrit Subhashitam today highlighting the call for industrious people to nurture benevolent forces within society that make the nation prosperous, aware, and self-reliant, while firmly resisting destructive forces that create division, injustice, and discontent.

The Prime Minister wrote on X:

"On this day, we pay our heartfelt homage to the brave martyrs of Jallianwala Bagh. Their sacrifice stands as a powerful reminder of the indomitable spirit of our people. The courage and determination they displayed continue to inspire generations to uphold the values of liberty, justice and dignity.”

“ ਅੱਜ ਦੇ ਦਿਨ, ਅਸੀਂ ਜੱਲ੍ਹਿਆਂਵਾਲਾ ਬਾਗ਼ ਦੇ ਸੂਰਬੀਰ ਸ਼ਹੀਦਾਂ ਨੂੰ ਦਿਲੋਂ ਸ਼ਰਧਾਂਜਲੀ ਭੇਟ ਕਰਦੇ ਹਾਂ। ਉਨ੍ਹਾਂ ਦੀ ਕੁਰਬਾਨੀ ਸਾਡੇ ਲੋਕਾਂ ਦੇ ਕਦੇ ਨਾ ਝੁਕਣ ਵਾਲੇ ਜਜ਼ਬੇ ਦੀ ਮਜ਼ਬੂਤ ਯਾਦ ਦਿਵਾਉਂਦੀ ਹੈ। ਉਨ੍ਹਾਂ ਵੱਲੋਂ ਵਿਖਾਇਆ ਗਿਆ ਹੌਸਲਾ ਅਤੇ ਪੱਕਾ ਇਰਾਦਾ, ਆਉਣ ਵਾਲੀਆਂ ਪੀੜ੍ਹੀਆਂ ਨੂੰ ਆਜ਼ਾਦੀ, ਇਨਸਾਫ਼ ਅਤੇ ਮਾਣ-ਸਨਮਾਨ ਦੀਆਂ ਕਦਰਾਂ-ਕੀਮਤਾਂ ਉੱਤੇ ਪਹਿਰਾ ਦੇਣ ਲਈ ਲਗਾਤਾਰ ਪ੍ਰੇਰਿਤ ਕਰਦਾ ਆ ਰਿਹਾ ਹੈ।”

“जलियांवाला बाग नरसंहार के सभी अमर बलिदानियों को मेरी आदरपूर्ण श्रद्धांजलि। विदेशी हुकूमत की बर्बरता के खिलाफ उनके अदम्य साहस और स्वाभिमान की गाथा देश की हर पीढ़ी को प्रेरित करती रहेगी।

इन्द्रं वर्धन्तो अप्तुरः कृण्वन्तो विश्वमार्यम्।
अपघ्नन्तो अराव्णः॥"

O industrious people! Nurture those benevolent forces within your society that make the nation prosperous, aware and self-reliant. At the same time, firmly resist the destructive forces that create division, injustice and discontent in society.