पंतप्रधान, नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमावर एक संस्कृत सुभाषित सामाईक केले:
“विज्ञानसारथिर्यस्तु मनःप्रग्रहवान्नरः।
सोऽध्वनः पारमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम्॥”
या सुभाषितात म्हटले आहे की, ज्या व्यक्तीची विवेकबुद्धी एका दक्ष, तार्किक मार्गदर्शकाप्रमाणे कार्य करते आणि ज्याचे मन शिस्तबद्ध व नियंत्रित असते, ती व्यक्ती जीवनाच्या मार्गावरील गुंतागुंतीच्या अडथळ्यांवर मात करून अंतिम ध्येयापर्यंत पोहोचते.
मोदी यांनी असेही म्हटले आहे की, डिजिटल इंडियाच्या 11 वर्षांच्या यशामुळे भारताला जगभरात एक नवी ओळख मिळाली आहे. हे देशवासीयांचा, नवनवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करून देशाला नव्या उंचीवर नेण्याचा दृढनिश्चय दर्शवते.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स या समाजमाध्यमावर लिहिले आहे की,
डिजिटल इंडियाच्या 11 वर्षांमधील यशाने भारताला एक नवी ओळख मिळाली आहे. कार्य, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाने देशाला एका नव्या उंचीवर नेणे हे देशवासियांच्या संकल्प आणि शक्तीचे प्रतिक आहे.
विज्ञानसारथिर्यस्तु मनःप्रग्रहवान्नरः।
सोऽध्वनः परमाप्नोति तद्विष्णोः परं पदम् ॥
#11YearsOfDigitalIndia
डिजिटल इंडिया के 11 वर्षों की सफलता से भारतवर्ष को दुनियाभर में एक नई पहचान मिली है। इससे इनोवेशन और टेक्नोलॉजी को अपनाकर देश को नई ऊंचाइयों पर ले जाने की देशवासियों की संकल्पशक्ति का पता चलता है।
— Narendra Modi (@narendramodi) July 1, 2026
विज्ञानसारथिर्यस्तु मनःप्रग्रहवान्नरः।
सोऽध्वनः पारमाप्नोति तद्विष्णोः परमं… pic.twitter.com/VhIRgvl4Jo


