30 डिसेंबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअर येथे अतुलनीय धैर्य आणि पराक्रमाने तिरंगा फडकवला होता. या ऐतहासिक प्रसंगाचे स्मरण म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोस यांना आदरांजली वाहिली आहे.
इतिहासातील हा क्षण देशाला आठवण करून देतो की स्वातंत्र्य केवळ आकांक्षेने मिळत नाही तर ते शक्ती, कठोर परिश्रम, न्याय आणि सामूहिक दृढनिश्चयाने मिळवले जाते.
ही भावना व्यक्त करण्यासाठी, पंतप्रधान मोदींनी एक्सवरील एका पोस्टमध्ये एक कालातीत सुभाषितम शेअर केले:
"30 डिसेंबर 1943 रोजी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पोर्ट ब्लेअरमध्ये धैर्य आणि शौर्यासह तिरंगा फडकवला. तो क्षण आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य केवळ आकांक्षेने नव्हे तर शक्ती, कठोर परिश्रम, न्याय आणि संघटित दृढनिश्चयाने आकार घेते. आजचे सुभाषित ही भावना व्यक्त करते..."
सामर्थ्यमूलं स्वातन्त्र्यं श्रममूलं च वैभवम्।
न्यायमूलं सुराज्यं स्यात् सङ्घमूलं महाबलम् ॥”
आज ही के दिन 30 दिसंबर, 1943 को नेताजी सुभाष चंद्र बोस ने पोर्ट ब्लेयर में साहस और पराक्रम के साथ तिरंगा फहराया था। वह क्षण हमें याद दिलाता है कि स्वतंत्रता केवल आकांक्षा से नहीं, बल्कि सामर्थ्य, परिश्रम, न्याय और संगठित संकल्प से आकार लेती है। आज का सुभाषित इसी भाव को अभिव्यक्त… pic.twitter.com/vYRNygE2Gv
— Narendra Modi (@narendramodi) December 30, 2025


