पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. मोदी म्हणाले की, बापूंनी नेहमीच स्वदेशीवर भर दिला, जो विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या आपल्या संकल्पाचा एक आधारस्तंभ आहे. "त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य देशवासियांना कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील", असे मोदी म्हणाले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
"राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतशः नमन. पूज्य बापूंनी नेहमीच स्वदेशीवर भर दिला, जो विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या आपल्या संकल्पाचा देखील आधारस्तंभ आहे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य देशवासियांना कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी नेहमीच प्रेरणा देत राहील."
राष्ट्रपिता महात्मा गांधी को उनकी पुण्यतिथि पर मेरा शत-शत नमन। पूज्य बापू का हमेशा स्वदेशी पर बल रहा, जो विकसित और आत्मनिर्भर भारत के हमारे संकल्प का भी आधारस्तंभ है। उनका व्यक्तित्व और कृतित्व देशवासियों को कर्तव्य पथ पर चलने के लिए सदैव प्रेरित करता रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) January 30, 2026


