पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री जनधन योजनेच्या (पीएमजेडीवाय) 11 व्या वर्धापन दिनानिमित्त गौरवोद्गार काढले. आर्थिक समावेशनात आमूलाग्र बदल घडविणाऱ्या या ऐतिहासिक उपक्रमामुळे देशातील शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक समावेशन पोहोचले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. जनधन योजनेमुळे नागरिकांच्या सन्मानात भर पडली असून, स्वतःचे भविष्य घडविण्याची क्षमता त्यांना प्राप्त झाली आहे.
MyGovIndia च्या एक्स या समाज माध्यमावरील संदेशांना प्रतिउत्तर देतांना मोदी म्हणाले:
आर्थिक उपेक्षेतून आत्मनिर्भरतेकडे! प्रधानमंत्री जनधन योजनेमुळे कोट्यवधी नागरिकांचे जीवनमान उंचावले, याचे हे चित्र आहे.
#जनधनची 11 वर्ष”
शेवटच्या घटकाचेही आर्थिक समावेशन झाले की, राष्ट्राच्या प्रगतीला नवे बळ मिळते. प्रधानमंत्री जनधन योजनेने हेच साध्य केले असून, या योजनेमुळे नागरिकांचा आत्मसन्मान वृद्धिंगत झाला आणि स्वतःचे भविष्य घडविण्याची क्षमता त्यांना प्राप्त झाली.
#जनधनची 11 वर्ष
From financial exclusion to empowerment! Here is a glimpse of how PM Jan Dhan Yojana has transformed lives across India. #11YearsOfJanDhan https://t.co/z0VXPo0e3r
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2025
When the last mile is financially connected, the entire nation moves forward together. That is exactly what the PM Jan Dhan Yojana achieved. It enhanced dignity and gave people the power to script their own destiny.#11YearsOfJanDhan https://t.co/piAYJJOXOj
— Narendra Modi (@narendramodi) August 28, 2025




