देशातील सर्व नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात याला आमचे प्राधान्य : पंतप्रधान
भारतात अत्यंत कठीण परिस्थितीतही चेतना जागृत ठेवण्यासाठी नवीन सामाजिक चळवळी होत राहिल्या: पंतप्रधान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षयवट आहे, हा अक्षयवट भारतीय संस्कृती आणि आपल्या राष्ट्र भावनेला सतत ऊर्जा देत आहे: पंतप्रधान
जेव्हा राष्ट्र विकासासाठी केले जाणारे प्रयत्न ‘मी’ वर नाही तर आपण या संकल्पनेवर केंद्रित असतात, जेव्हा राष्ट्र प्रथम ही भावना सर्वोच्च असते, जेव्हा देशातील धोरणे आणि निर्णयांमध्ये लोकांचे हित हा सर्वात महत्त्वाचा घटक असतो, तेव्हाच त्याचा परिणाम सर्वत्र दिसून येतो : पंतप्रधान
जगात जिथे जिथे नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी भारत मनापासून मानव सेवेसाठी तत्पर उभा असतो : पंतप्रधान
राष्ट्र उभारणीच्या भावनेने ओतप्रोत भरलेले आपले तरुण 2047 पर्यंत विकसित भारत साध्य करण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करत आहेत: पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रातील नागपूर येथे माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरची पायाभरणी केली. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी पवित्र नवरात्रोत्सवाचा प्रारंभ म्हणजेच चैत्र शुक्ल प्रतिपदेचे महत्त्व अधोरेखित केले. देशभरात आज गुढी पाडवा, उगादी आणि नवरेह असे सण साजरे केले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. याच दिवसाला जोडून येणाऱ्या भगवान झुलेलाल आणि गुरु अंगद देव यांच्या जयंतीचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. हा दिवस प्रेरणादायी डॉ. के. बी. हेडगेवार यांची जयंती तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गौरवशाली प्रवासाच्या शताब्दी वर्षाची आठवण करून देणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. आजच्या महत्त्वपूर्ण दिवशी डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींना आदरांजली वाहण्यासाठी स्मृती मंदिराला भेट देणे हा आपल्यासाठी सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.

याच दरम्यान भारतीय संविधानाच्या 75 व्या वर्षाच्या उत्सवाचे आणि पुढील महिन्यात राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून दीक्षाभूमी येथे डॉ. आंबेडकरांना आदरांजली वाहण्याचे आणि त्यांचे आशीर्वाद घेण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. देशात सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या नवरात्रोत्सव आणि इतर सर्व सणानिमित्त पंतप्रधानांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

 

नागपूर शहराचे ‘सेवेचे पवित्र केंद्र’ म्हणून असणारे महत्त्व अधोरेखित करून आणि एका उदात्त उपक्रमाच्या विस्ताराची वाखाणणी करत पंतप्रधानांनी माधव नेत्रालयाच्या प्रेरणादायी गीतावर भाष्य केले. हे गीत अध्यात्म, ज्ञान, अभिमान आणि मानवता प्रतिबिंबित करत असल्याचे त्यांनी सांगितले. माधव नेत्रालय ही एक अशी संस्था आहे जी कैक दशकांपासून पूज्य गुरुजींच्या आदर्शांचे अनुसरण करत लाखो लोकांची सेवा करत आहे आणि असंख्य जीवनांना पुन्हा प्रकाशित करत आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

पंतप्रधानांनी माधव नेत्रालयाच्या नवीन प्रांगणाच्या पायाभरणीचा उल्लेख करत हा विस्तार संस्थेच्या सेवा कार्यांना गती देईल, हजारो नवीन जीवनांना उजळून टाकेल आणि त्यांच्या जीवनातील अंधार दूर करेल, असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी माधव नेत्रालयाशी संबंधित प्रत्येकाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि त्यांच्या निरंतर सेवेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

लाल किल्ल्यावरून बोलताना आपण 'सब का प्रयास' वर भर दिला होता याची आठवण करून देत तसेच आरोग्यसेवा क्षेत्रात देशाने केलेल्या महत्त्वपूर्ण प्रगतीवर प्रकाश टाकत, माधव नेत्रालय या प्रयत्नांना पूरक आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. "सर्व नागरिकांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा मिळतील आणि गरीबांनाही सर्वोत्तम उपचार मिळावेत हे सुनिश्चित करणे, याला सरकार प्राधान्य देत आहे", असे त्यांनी नमूद केले. कोणताही नागरिक जीवनाच्या प्रतिष्ठेपासून वंचित राहता कामा नये तसेच देशासाठी आपले जीवन समर्पित केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना वैद्यकीय उपचारांची चिंता नसावी यावर त्यांनी भर दिला. लाखो लोकांना मोफत उपचार देणाऱ्या आयुष्मान भारत योजनेच्या परिणामांवर त्यांनी प्रकाश टाकला. देशभरातील हजारो जनऔषधी केंद्रांचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला. जनऔषधी केंद्रामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडणाऱ्या दरात औषधे मिळत असल्याने नागरिकांच्या हजारो कोटी रुपयांची बचत होत आहे, असेही ते म्हणाले. गेल्या दशकात अनेक गावांमध्ये लाखो आयुष्मान आरोग्य मंदिरांची स्थापना झाल्याने लोकांना टेलिमेडिसिनद्वारे प्राथमिक आरोग्य सेवा मिळत आहे यावर त्यांनी प्रकाश टाकला. या सुविधांमुळे नागरिकांना वैद्यकीय चाचण्यांसाठी शेकडो किलोमीटर प्रवास करण्याची गरज राहिली नाही, यावर त्यांनी भर दिला.

 

देशातील वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या दुप्पटीने तर देशात कार्यरत एम्स संस्थांची संख्या तिप्पटीने वाढवली असल्याचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, भविष्यात देशवासीयांना आरोग्य सेवा देण्यासाठी अधिक कुशल डॉक्टरांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील जागांची संख्या देखील दुप्पट करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेत वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला. आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील प्रगतीबरोबरच, देश आपल्या पारंपारिक ज्ञानाचाही प्रचार करत आहे असे त्यांनी सांगितले. भारताच्या योग आणि आयुर्वेदाला जागतिक स्तरावर मिळत असलेल्या मान्यतेबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यामुळे जागतिक स्तरावर देशाची प्रतिष्ठा वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

कोणत्याही राष्ट्राचे अस्तित्व त्याची संस्कृती आणि चेतनेच्या पिढ्यान् पिढ्या होणाऱ्या विस्तारावर अवलंबून असते, असे सांगत, भारताच्या सामाजिक संरचना नष्ट करण्याचा ज्यांनी प्रयत्न केला ती भारताची शतकानुशतकांची गुलामगिरी आणि झालेली आक्रमणे यांच्या इतिहासाला पंतप्रधानांनी अधोरेखित केले. तरीही भारताची राष्ट्रीय चेतना जागृत आणि या संकटांना तोंड देत राहिली,असे त्यांनी नमूद केले. "सर्वात कठीण काळातही भारतातील नव्या सामाजिक चळवळींनी ही चेतना जागृत ठेवली," असे त्यांनी सांगितले. त्यांनी भक्ती चळवळीचे उदाहरण दिले, जिथे गुरु नानक देव, कबीरदास, तुलसीदास, सूरदास तसेच महाराष्ट्रातील संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांनी आपल्या मौलिक विचारांद्वारे भारताच्या राष्ट्रीय चेतनेला नवजीवन दिले. या चळवळींनी भेदभावाच्या बेड्या तोडून समाजाला एकसंध केले, असे त्यांनी नमूद केले. स्वामी विवेकानंदांनी एका निराश समाजाला जागे करून त्याला त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव करून दिली, आत्मविश्वास निर्माण केला आणि भारताची राष्ट्रीय चेतना टिकून राहील, हे सुनिश्चित केले. पंतप्रधानांनी डॉ. हेडगेवार आणि गुरुजी यांच्या योगदानाचाही उल्लेख केला, ज्यांनी वसाहतवादी राजवटीच्या शेवटच्या दशकांत ही चेतना जागृत केली. 100 वर्षांपूर्वी राष्ट्रीय चेतनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी रोवलेले विचारांचे बीज आज एका विशाल वृक्षाच्या रूपात वाढले आहे, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की, या महान वृक्षाला त्याची तत्त्वे आणि आदर्श उंची देतात, तर लाखो स्वयंसेवक ह्या त्याच्या शाखा आहेत. "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षयवट आहे, जो भारतीय संस्कृती आणि राष्ट्राच्या चेतनेला सातत्याने ऊर्जा देत आहे," असे त्यांनी सांगितले.

 

माधव नेत्रालयाच्या नव्या परिसराच्या उद्घाटनप्रसंगी, पंतप्रधानांनी "दृष्टी आणि दिशा" यांच्यातील नैसर्गिक संबंध स्पष्ट केला. जीवनातील दृष्टीच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला आणि वेदातील "पश्येम शरदः शतम्" हा मंत्र उद्धृत केला, ज्याचा अर्थ आहे, "आपण शंभर शरद ऋतू पाहो." त्यांनी बाह्य दृष्टीबरोबरच अंतःदृष्टीचेही महत्त्व सांगितले. विदर्भातील महान संत प्रज्ञाचक्षु श्री गुलाबराव महाराज यांचा उल्लेख करताना ते म्हणाले, "लहानपणी दृष्टी गमावल्यानंतरही, त्यांनी असंख्य ग्रंथ लिहिले."

पंतप्रधानांनी सांगितले की, जरी त्यांच्याकडे बाह्य दृष्टी नव्हती, तरी त्यांच्याकडे असाधारण अंतःदृष्टी होती, जी ज्ञानातून प्रकट होते आणि विवेकाने परिपूर्ण होते. अशा प्रकारची दृष्टी व्यक्ती आणि समाज दोघांनाही सक्षम बनवते, असे ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही बाह्य आणि अंतःदृष्टी या दोन्ही दृष्टींवर कार्य करणारी एक पवित्र चळवळ आहे, असे त्यांनी सांगितले. माधव नेत्रालय हे बाह्य दृष्टीचे उदाहरण असून, अंतःदृष्टीमुळे संघ सेवा परंपरेचे प्रतीक बनले आहे.

 

जीवनाचा खरा हेतू सेवा आणि परोपकार असतो, यावर त्यांनी वेदवचनांचा आधार घेत भर दिला. "जेव्हा सेवा आपल्या मूल्यांचा अविभाज्य भाग बनते, तेव्हा ती भक्तीचे रूप धारण करते," असे ते म्हणाले. स्वयंसेवकांचे जीवन याच सेवाभावाने प्रेरित असून, त्यांच्यात ही भावना पिढ्यान पिढ्या जिवंत राहते. हा सेवाभाव स्वयंसेवकांना कधीही थकू देत नाही, थांबू देत नाही.

गुरुजींच्या विचारांचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, "जीवनाचे मोल त्याच्या कालावधीमध्ये नाही, तर उपयुक्ततेत आहे." त्यांनी "देव ते देश" आणि "राम ते राष्ट्र" या तत्त्वांनुसार कार्य करण्यावर भर दिला. सरहद्दीवरील गावे, डोंगराळ भाग, वनक्षेत्रे या ठिकाणी स्वयंसेवकांची सेवा आणि त्यांचे योगदान त्यांनी अधोरेखित केले.

ते म्हणाले की, वनवासी कल्याण आश्रम, आदिवासी मुलांसाठी एकल विद्यालय, सांस्कृतिक जागृती मोहिमा आणि सेवा भारतीच्या माध्यमातून गरजूंपर्यंत सेवा पोहोचवणारे स्वयंसेवक सतत कार्यरत असतात. प्रयाग महाकुंभमध्ये "नेत्र कुंभ" उपक्रमाच्या माध्यमातून स्वयंसेवकांनी लाखो लोकांना मदत केली, याचा त्यांनी विशेष उल्लेख केला. पूर आणि भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये स्वयंसेवकांनी दाखवलेली शिस्तबद्धता, नि:स्वार्थी भाव आणि समर्पण यांचे त्यांनी कौतुक केले.

 

"सेवा हा एक यज्ञ आहे आणि आम्ही आहुतीसारखे त्यात जळून त्या उद्देशाच्या महासागरात विलीन होतो," असा उल्लेख त्यांनी यावेळी केला.

गुरुजींच्या एका प्रेरणादायी आठवणीचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले की, गुरुजींना एकदा विचारण्यात आले होते की, ते संघाला सर्वव्यापी का म्हणतात? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, "प्रकाश स्वतः सर्व कार्य करत नाही, पण तो अंधार दूर करून इतरांना मार्ग दाखवतो."

गुरुजींची ही शिकवण आपला जीवनमंत्र आहे, असे सांगून पंतप्रधानांनी सर्वांना प्रकाशाचा स्रोत बनण्याचे आणि समाजातील अडथळे दूर करून प्रगतीचा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले.

"स्वतःसाठी नव्हे, तर तुमच्यासाठी" आणि "माझे नाही, तर राष्ट्रासाठी" या तत्त्वांवर आधारित विचारसरणीच खऱ्या सेवाभावाची ओळख आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मी’ पेक्षा ‘आपण’ याला प्राधान्य देण्याचे तसेच सर्व प्रकारच्या धोरणांमध्ये आणि निर्णयांमध्ये राष्ट्र प्रथम ही भावना असण्याचे महत्त्व अधोरेखित करून, या दृष्टीकोनामुळे देशभरात सकारात्मक परिणाम दिसून येतात असं पंतप्रधान म्हणाले. राष्ट्राला पिछाडीवर आणणाऱ्या साखळ्या तोडण्याची गरजही त्यांनी अधोरेखित करत वसाहतवादी मानसिकतेच्या पलीकडे जाण्याचे महत्त्व अधोरेखित केले. गेल्या 70 वर्षांपासून न्यूनगंडासह जपलेल्या वसाहतवादांच्या अवशेषांच्या जागी भारत राष्ट्रीय अभिमानाचे नवीन अध्याय पुनर्स्थापित करत आहे असे प्रतिपादन मोदी यांनी यावेळी केले. भारतीयांना कमी लेखणाऱ्या कालबाह्य ब्रिटिश कायद्यांच्या जागी नव्या भारतीय न्याय संहितेच्या वापरावरही भाष्य केले. वसाहतवादाच्या वारशावर कर्तव्याचे प्रतीक म्हणून राजपथाचे रुपांतर कर्तव्य पथ केले त्यावर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच नौदलाच्या झेंड्यावरील वसाहतवादाची चिन्हे काढल्याची नोंद घेत तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रा अभिमानाने लावल्या आहेत, असे सांगितले.  त्यांनी ज्या ठिकाणी वीर सावरकरांनी देशासाठी कष्ट सहन केले आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यवीरांचा सन्मान करण्यासाठी स्वातंत्र्याचा बिगुल वाजवला, त्या अंदमान बेटाच्या नावात बदल केल्याचे महत्त्व सांगितले.

 

‘“वसुधैव कुटुंबकम्” हे भारताचे मार्गदर्शक तत्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचत असून भारताच्या कृतींमध्ये त्याचे प्रतिबिंब पडताना दिसते”, असे सांगून, मोदी यांनी कोविड 19 महामारी दरम्यान भारताने एक कुटुंब म्हणून जगाला लस पुरवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांवर प्रकाश टाकला. म्यानमारमध्ये नुकत्याच झालेल्या भुकंपात ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत भारताने दिलेल्या त्वरित प्रतिसादासह तुर्कीये आणि नेपाळमधील भूकंप आणि मालदीव्जमधील पाणी संकटादरम्यान केलेल्या मदतीची त्यांनी माहिती दिली. त्यांनी संघर्षाच्या काळात इतर देशांतील नागरिकांना बाहेर काढण्याच्या भारताच्या भूमिकेवर त्यांनी भर दिला आणि भारताच्या प्रगतीमुळे विकसनशील देशांचा आवाज वाढत असल्याचे नमूद केले. जागतिक बंधुत्वाची भावना ही भारताच्या सांस्कृतिक मूल्यांमधून निर्माण झाली असल्याचे त्यांनी नमूद केले. आत्मविश्वासपूर्ण, आणि जोखीम पत्करण्याची क्षमता वाढलेले भारतातील युवक ही देशाची सर्वात मोठी संपत्त्ती असून  मोदी यांनी नवोन्मेष, स्टार्टअप आणि भारताच्या वारसा आणि संस्कृतीविषयीच्या अभिमानातील त्यांच्या योगदानाचा उल्लेख केला. प्रयाग महाकुंभात लाखो तरुणांचा सहभाग हा त्यांची नाळ भारताच्या शाश्वत परंपरेशी जोडली गेली असल्याचे उदाहरण म्हणून त्यांनी नमूद केले.  राष्ट्रीय गरजांवर तरुणांचा भर,  “मेक इन इंडिया” च्या यशात त्यांची असलेली भूमिका आणि स्थानिक उप्तादनांना ते देत असलेला पाठिंबा यावर त्यांनी भाष्य केले. राष्ट्रउभारणीच्या भावनेने प्रेरित होऊन क्रीडा क्षेत्रापासून ते अंतराळ संशोधनापर्यंत उत्कृष्ट कामगिरीपर्यंत देशासाठी जगण्याच्या आणि काम करण्याच्या त्यांच्या दृढनिश्चयावर भर दिला. 2047 पर्यंत विकसित भारताचे लक्ष्य साध्य करण्यासाठी भारतीय युवा भारताचे नेतृत्व करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रवासात प्रेरक शक्ती म्हणून संघटन, समर्पण आणि सेवा यांच्या समन्वयाची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक दशकांच्या प्रयत्नांची आणि समर्पणाची फळे चाखता येत आहेत आणि भारताच्या विकासाचा नवा अध्याय लिहीला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.  1925 मध्ये आरएसएसच्या स्थापनेदरम्यान असलेल्या विरोधाभासी परिस्थितीवरही पंतप्रधानांनी भाष्य केले, हा काळ संघर्ष आणि स्वातंत्र्याच्या ध्येयाने भारलेला होता. त्यांनी संघाच्या शतकी प्रवासाचे महत्त्व अधोरेखित केले आणि 2025 ते 2047 हा काळ राष्ट्रासाठी नवीन, महत्त्वकांक्षी ध्येये समोर ठेवतो आहे, असे त्यांनी नमूद केले. मोदींनी, गुरूजींच्या एका पत्रातील प्रेरणादायी शब्दांची आठवण करून दिली ज्यामध्ये भव्य राष्ट्रीय इमारतीच्या पायाभरणीतील लहानसा दगड होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सेवेप्रती असलेल्या कटिबद्धतेला प्रज्वलित ठेवत, अथक प्रयत्न करत राहाण्यासाठी आणि विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माण कार्यादरम्यान सामाईक केलेल्या, पुढील हजारो वर्षांसाठी भारताचा भक्कम पाया रचण्याविषयीच्या आपल्या दृष्टीकोनाचा पुनरूच्चार केला. डॉ. हेडगेवार आणि गुरूजी यांच्यासारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन देशाला सक्षम बनवत राहील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यांनी भाषणाच्या समारोपावेळी, विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याचा आणि पिढ्यान् पिढ्या केल्या जाणाऱ्या बलिदानाचा सन्मान करण्याचा संकल्प केला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, आरएसएस सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, स्वामी गोविंद देवगिरी महाराज, स्वामी अवधेशानंद गिरी महाराज, डॉ. अविनाश चंद्र अग्निहोत्री आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
With HPV vaccine rollout, AIIMS oncologist says it’s the beginning of the end for cervical cancer in India

Media Coverage

With HPV vaccine rollout, AIIMS oncologist says it’s the beginning of the end for cervical cancer in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
The HPV vaccination campaign, launched from Ajmer, marks a significant step towards empowering the nation’s Nari Shakti: PM Modi in Rajasthan
February 28, 2026
Our government is committed to all-round development: PM
Today, I had the privilege of launching the nationwide HPV vaccination campaign from Ajmer, inaugurating and laying foundation stones for multiple projects and distributing appointment letters to the youth: PM
The HPV vaccination campaign has commenced from Ajmer, this campaign is a significant step towards empowering the Nari Shakti of the country: PM
The double-engine government is moving forward by taking both Rajasthan’s heritage and development together: PM
The campaign to link rivers started by our government will significantly benefit Rajasthan: PM
There is no shortage of sunlight in Rajasthan, this very sunshine is becoming a source of savings and income for the common man: PM
A very significant role is being played by the PM Surya Ghar Free Electricity Scheme, this scheme has the power to change Rajasthan's destiny: PM

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

तीर्थराज पुष्कर और माता सावित्री की इस पावन भूमि पर, आज मुझे आप सबके बीच आने का, आपके आशीर्वाद प्राप्त करने का अवसर मिला है। इस मंच से मैं सुरसुरा के तेजाजी धाम को, पृथ्वीराज की भूमि अजमेर को प्रणाम करता हूं।

मेरे साथ बोलिए –

तीर्थराज पुष्कर की जय।

तीर्थराज पुष्कर की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

भगवान देव नारायण की जय।

भगवान देव नारायण की जय।

वरूण अवतार भगवान झूलेलाल जी की जय।

भगवान झूलेलाल जी की जय।

मंच पर विराजमान राजस्थान के राज्यपाल हरिभाउ बागडे जी, राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा जी, पूर्व मुख्यमंत्री बहन वसुंधरा जी, केंद्रीय मंत्रिमंडल में मेरे साथी भगीरथ चौधरी जी, उपमुख्यमंत्री प्रेमचंद भैरवा जी, दिया कुमारी जी, संसद में मेरे साथी, भाजपा के प्रदेश अध्यक्ष मदन राठौर जी, उपस्थित अन्य मंत्रिगण, अन्य महानुभाव और राजस्थान के मेरे प्यारे भाई और बहनों। मैं पूज्य संतों का बहुत आभारी हूं, कि हमें आशीर्वाद देने के लिए इतनी बड़ी संख्या में पूज्य संतगण यहां मौजूद हैं।

साथियों,

अजमेर आस्था और शौर्य की धरती है। यहां तीर्थ भी है और क्रांतिवीरों के पदचिन्ह भी हैं। अभी कल ही मैं इजराइल की यात्रा को पूरा करके भारत लौटा हूं। राजस्थान के सपूत मेजर दलपत सिंह के शौर्य को इजराइल के लोग आज भी गौरव से याद करते हैं। मुझे भी इजराइल की संसद में, मेजर दलपत सिंह जी के शौर्य को नमन करने का सौभाग्य मिला। राजस्थान के वीर बाकुरों की, इजराइल के हाइफा शहर को आजाद कराने में जो भूमिका थी, मुझे उसका गौरवगान करने का अवसर मिला है।

साथियों,

कुछ समय पहले ही, राजस्थान में भाजपा की डबल इंजर सरकार को दो साल पूरे हुए हैं, मुझे संतोष है कि आज राजस्थान विकास के नए पथ पर अग्रसर है। विकास के जिन वायदों के साथ भाजपा सरकार आपकी सेवा में आई थी, उन्हें तेजी के साथ पूरा कर रही है। और आज का दिन, विकास के इसी अभियान को तेज करने का दिवस है। थोड़ी देर पहले यहां राजस्थान के विकास से जुड़ी करबी 17 हजार करोड़ रूपयों की परियोजनाओं का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। सड़क, बिजली, पानी, स्वास्थ्य, शिक्षा, हर क्षेत्र में नई शक्ति जुड़ रही है। ये सारे प्रोजेक्टस राजस्थान की जनता की सुविधा बढ़ाएंगे और राजस्थान के युवाओं के लिए, रोजगार के भी अवसर पैदा करेंगे।

साथियों,

भाजपा की डबल इंजर सरकार लगातार युवा शक्ति को सशक्त कर रही है। दो साल पहले तक राजस्थान से भर्तियों में भ्रष्टाचार और पेपर लीक की ही खबरें चमकती रहती थीं, आती रहती थीं। अब राजस्थान में पेपर लीक पर लगाम लगी है, दोषियों पर सख्त कार्रवाई हो रही है। आज यहां इसी मंच से राजस्थान के 21 हजार से अधिक युवाओं को नियुक्ति पत्र भी सौंपे गए हैं। ये बहुत बड़ा बदलाव आया है। मैं इस बदलाव के लिए, नई नौकरियों के लिए, विकास के सभी कामों के लिए, राजस्थान के आप सभी लोगों को बहुत-बहुत बधाई देता हूं।

साथियों,

आज वीरांगनाओं की इस धरती से, मुझे देशभर की बेटियों के लिए एक अहम अभियान शुरू करने का अवसर मिला है। यहां अजमेर से HPV वैक्सीनेशन अभियान शुरू हुआ है। ये अभियान, देश की नारीशक्ति को सशक्त करने की दिशा में अहम कदम है।

साथियों,

हम सब जानते हैं कि परिवार में जब मां बीमार होती है, तो घर बिखर सा जाता है। अगर मां स्वस्थ है, तो परिवार हर संकट का सामना करने में सक्षम रहता है। इसी भाव से, भाजपा सरकार ने महिलाओं को संबल देने वाली अनेक योजनाएं चलाई हैं।

साथियों,

हमने 2014 से पहले का वो दौर देखा है, जिसमें शौचालय के अभाव में बहनों-बेटियों को कितनी पीड़ा, कितना अपमान झेलना पड़ता था। बच्चियां स्कूल छोड़ देती थीं, क्योंकि वहां अलग टॉयलेट की सुविधा नहीं होती थी। गरीब बेटियां सेनिटरी पैड्स नहीं ले पाती थीं। पहले जो सत्ता में रहे, उनके लिए ये छोटी बातें थीं। इसलिए इन समस्याओं की चर्चा तक नहीं होती थी। लेकिन हमारे लिए ये बहनों-बेटियों को बीमार करने वाला, उनके अपमान से जुड़ा संवेदनशील मसला था। इसलिए, हमने इनका मिशन मोड पर समाधान किया।

साथियों,

गर्भावस्था के दौरान कुपोषण माताओं के जीवन के लिए बहुत बड़ा खतरा होता था। हमने सुरक्षित मातृत्व के लिए योजना चलाई, मां को पोषक आहार मिले, इसके लिए पांच हज़ार रुपए बहनों के खाते में जमा करने की योजना शुरु की। मां धुएं में खांसती रहती थी, लेकिन उफ्फ तक नहीं करती थी। हमने कहा ये नहीं चलेगा। और इसलिए उज्जवला गैस योजना बनाई गई। ये सब इसलिए संभव हुआ, क्योंकि भाजपा सरकार, सत्ता भाव से नहीं, संवेदनशीलता के साथ काम करती है।

साथियों,

21वीं सदी का एक चौथाई हिस्सा बीत चुका है। आज का समय राजस्थान के विकास के लिए बड़ा महत्वपूर्ण है। भाजपा की डबल इंजन सरकार, राजस्थान की विरासत और विकास, दोनों को साथ लेकर चल रही है। हम सब जानते हैं, अच्छी सड़क, अच्छी रेल और हवाई सुविधा सिर्फ सफर आसान नहीं करती, वो पूरे इलाके की किस्मत बदल देती है। जब गांव-गांव तक अच्छी सड़क पहुँचती है, तो किसान अपनी फसल सही दाम पर बेच पाता है। व्यापारी आसानी से अपना सामान बाहर भेज पाते हैं। और हमारा अजमेर-पुष्कर तो, उसकी पर्यटन की ताकत कौन नहीं जानता। अच्छी कनेक्टिविटी का पर्यटन पर सबसे अच्छा असर पड़ता है। जब सफर आसान होता है, तो ज्यादा लोग घूमने आते हैं।

और साथियों,

जब पर्यटक आते हैं तो स्वाभाविक है होटल चलते हैं, ढाबे चलते हैं, कचौड़ी और दाल बाटी ज्यादा बिकती है, यहां राजस्थान के कारीगरों का बनाया सामान बिकता है, टैक्सी चलती है, गाइड को काम मिलता है। यानी एक पर्यटक कई परिवारों की रोज़ी-रोटी बन जाता है। इसी सोच के साथ हमारी सरकार, राजस्थान में आधुनिक कनेक्टिविटी पर बहुत बल दे रही है।

साथियों,

जैसे-जैसे राजस्थान में कनेक्टिविटी का विस्तार हो रहा है, वैसे-वैसे यहां निवेश के लिए भी अवसर लगातार बढ़ते जा रहे हैं। दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर के इर्द-गिर्द उद्योगों के लिए एक बहुत ही शानदार इंफ्रास्ट्रक्चर बनाया जा रहा है। यानी राजस्थान को अवसरों की भूमि बनाने के लिए, डबल इंजन सरकार हर संभव, अनेक विध काम कर रही है।

साथियों,

राजस्थान की माताएं अपने बच्चों को पालने में ही, राष्ट्र भक्ति का संस्कार देती हैं। राजस्थान की ये धरा जानती है कि देश का सम्मान क्या होता है, और इसीलिए आज राजस्थान की इस धरा पर, मैं आप लोगों से एक और बात कहने आया हूं।

साथियों,

हाल में ही, दिल्ली में, दुनिया का सबसे बड़ा AI सम्मेलन हुआ, Artificial Intelligence इसमें दुनिया के अनेक देशों के प्रधानमंत्री, अनेक देशों के राष्ट्रपति, अनेक देशों के मंत्रि, उस कार्यक्रम में आए थे। दुनिया की बड़ी-बड़ी कंपनियां, उन कंपनियों के कर्ता-धर्ता वो भी एक छत के नीचे इकट्ठे हुए थे। सबने भारत की खुले मन से प्रशंसा की। मैं जरा राजस्थान के मेरे भाई-बहनों से पूछना चाहता हूं। जब दुनिया के इतने सारे लोग, भारत की प्रशंसा करते हैं, ये सुनकर के आपको गर्व होता है की नहीं होता है? आपको गर्व होता है कि नहीं होता है? आपको अभिमान होता है कि नहीं होता है? आपका माथा ऊंचा हुआ या नहीं हुआ? आपका सीना चौड़ा हुआ कि नहीं हुआ?

साथियों,

आपको गर्व हुआ, लेकिन हताशा निराशा में डूबी, लगातार पराजय के कारण थक चुकी कांग्रेस ने क्या किया, ये आपने देखा है। दुनियाभर के मेहमानों के सामने, कांग्रेस ने देश को बदनाम करने की कोशिश की। इन्होंने विदेशी मेहमानों के सामने देश को बेइज्जत करने के लिए पूरा ड्रामा किया।

साथियों,

कांग्रेस, पूरे देश में ल्रगातार हार रही है, और गुस्से में वो इसका बदला, वो भारत को बदनाम करके ले रही है। कभी कांग्रेस, INC यानी इंडियन नेशनल कांग्रेस थी, लेकिन अब INC नहीं बची है, इंडियन नेशनल कांग्रेस नहीं बची है, आज वो INC के बजाय MMC, MMC बन गई है। MMC यानी मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस हो चुकी है।

राजस्थान के मेरे वीरों,

इतिहास गवाह है, मुस्लिम लीग भारत से नफरत करती थी, और इसलिए मुस्लिम लीग ने देश बांट दिया। आज कांग्रेस भी वही कर रही है। माओवादी भी, भारत की समृद्धि, हमारे संविधान और हमारे सफल लोकतंत्र से नफरत करते हैं, ये घात लगाकर हमला करते हैं, कांग्रेस भी घात लगाकर, देश को बदनाम करने के लिए कहीं भी घुस जाती है। कांग्रेस के ऐसे कुकर्मों को देश कभी माफ नहीं करेगा।

साथियों,

देश को बदनाम करना, देश की सेनाओं को कमजोर करना, ये कांग्रेस की पुरानी आदत रही है। आप याद कीजिए, यही कांग्रेस है, जिसने हमारी सेना के जवानों को हथियारों और वर्दी तक के लिए तरसा कर रखा था। ये वही कांग्रेस है, जिसने सालों तक हमारे सैनिक परिवारों को वन रैंक वन पेंशन से वंचित रखा था। ये वही कांग्रेस है, जिसके जमाने में विदेशों से होने वाले रक्षा सौदों में बड़े-बड़े घोटाले होते थे।

साथियों,

बीते 11 वर्षों में भारत की सेना ने हर मोर्चे पर आतंकियों पर, देश के दुश्मनों पर करारा प्रहार किया। हमारी सेना, हर मिशन, हर मोर्चे में विजयी रही। सर्जिकल स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक, वीरता का लोहा मनवाया, लेकिन कांग्रेस के नेताओं ने इसमें भी दुश्मनों के झूठ को ही आगे बढ़ाया। देश के लिए जो भी शुभ है, जो भी अच्छा है, जो भी देशवासियों का भला करने वाला है, कांग्रेस उस सबका विरोध करती है। इसलिए, देश आज कांग्रेस को सबक सिखा रहा है।

साथियों,

राजस्थान में तो आपने कांग्रेस के कुशासन को करीब से अनुभव किया है। यहां जितने दिन कांग्रेस की सरकार रही, वो भ्रष्टाचार करने और आपसी लड़ाई-झगड़े में ही उलझी रही। कांग्रेस ने हमारे किसानों को भी हमेशा धोखा दिया है। आप याद कीजिए, कांग्रेस ने दशकों तक सिंचाई की परियोजनाओं को कैसे लटकाए रखा। इसका राजस्थान के किसानों को बहुत अधिक नुकसान हुआ है। ERCP परियोजना को कांग्रेस की सरकारों ने केवल फाइलों और घोषणाओं में उलझाकर रखा। हमारी सरकार ने आते ही इस स्कीम को फाइलों से निकालकर धरातल पर उतारने का प्रयास किया है।

साथियों,

हमारी सरकार ने नदियों को जोड़ने का जो अभियान शुरु किया है, उसका बहुत अधिक फायदा राजस्थान को मिलना तय है। संशोधित पार्वती-कालीसिंध-चंबल लिंक परियोजना हो, यमुना-राजस्थान लिंक प्रोजेक्ट हो, डबल इंजन सरकार ऐसी अनेक सिंचाई परियोजनाओं का लाभ किसानों तक पहुंचाने के लिए प्रतिबद्ध है। आज भी झालावाड़, बारां, कोटा और बूंदी जिले के लिए पानी की अनेक परियोजनाओं पर काम शुरु हुआ है। हमारा प्रयास है, कि राजस्थान में भूजल का स्तर भी ऊपर उठे।

साथियों,

भाजपा सरकार, राजस्थान के सामर्थ्य को समझते हुए, योजनाएं बना रही है, उन्हें लागू कर रही है। मुझे खुशी है कि राजस्थान अब, सूरज की ताकत से समृद्धि कमाने वाली धरती बन गया है। हम सब जानते हैं, हमारे राजस्थान में धूप की कोई कमी नहीं। अब यही धूप, सामान्य मानवी के घर की बचत और कमाई का साधन बन रही है। और इसमें बहुत बड़ी भूमिका है, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना की। इस योजना में राजस्थान का भाग्य बदलने की ताकत है। इस योजना में भाजपा सरकार लोगों को अपनी छत पर सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए की सहायता देती है। सरकार सीधे आपके बैंक खाते में पैसे भेजती है। आजादी के बाज सब बजट, सब योजनाएं देख लीजिए, जिसमें मध्यम वर्ग को सबसे ज्यादा लाभ होने वाला है, ऐेसी योजना कभी नजर नहीं आएगी, आज इन परिवारों को सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए सीधा सरकार देती है। सबसे अधिक लाभ मध्यम वर्ग के लोग ले रहे हैं। और जिससे घर पर एक छोटा सा बिजली घर तैयार हो जाता है। दिन में सूरज की रोशनी से बिजली बनती है, घर में वही बिजली काम आती है और जो ज्यादा बिजली बनती है, वो बिजली ग्रिड में जाती है। और जिस घर में बिजली बनी होती है, उसे भी इसका लाभ मिलता है।

साथियों,

आज राजस्थान में सवा लाख से अधिक परिवार इस योजना से जुड़ चुके हैं। और इस योजना की वजह से, कई घरों का बिजली बिल लगभग जीरो आ रहा है। यानी खर्च कम हुआ है, बचत ज़्यादा हुई है।

साथियों,

विकसित राजस्थान से विकसित भारत के मंत्र पर हम लगातार काम कर रहे हैं। आज जिन योजनाओं पर काम शुरू हुआ है, वो विकसित राजस्थान की नींव को और अधिक मजबूत करेंगे। जब राजस्थान विकसित होगा, तो यहां के हर परिवार का जीवन समृद्ध होगा। आप सभी को एक बार फिर, विकास परियोजनाओं के लिए बहुत-बहुत शुभकामनाएं। मेरे साथ बोलिये-

भारत माता की जय!

भारत माता की जय!

वंदे मातरम के 150 साल देश मना रहा है। मेरे साथ बोलिये-

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

बहुत-बहुत धन्यवाद।