10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरणाची केली सुरुवात
पंतप्रधानांच्या हस्ते 2800 कोटींहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण
1000 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची केली पायाभरणी
प्रधानमंत्री आवास योजनेच्या 26 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळ्यात पंतप्रधानांचा सहभाग
पंतप्रधानांच्या हस्ते अतिरिक्त घरांच्या सर्वेक्षणासाठी Awaas+ 2024 ॲप चे उद्घाटन
प्रधानमंत्री आवास योजना – शहरी 2.0 च्या कार्यान्वयनाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे केली जारी
"या राज्याने आमच्यावर मोठा विश्वास ठेवला असून, लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यात आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही” : पंतप्रधान
केंद्रातील एनडीए सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकाळात गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी मोठे निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
कोणताही देश, कोणतेही राज्य तेव्हाच प्रगती करते, जेव्हा तिथल्या निम्म्या लोकसंख्येचा, म्हणजेच आपल्या स्त्री शक्तीचा विकासात समान सहभाग असतो: पंतप्रधान
प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतिबिंब असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
सरदार पटेल यांनी असामान्य इच्छाशक्तीचे प्रदर्शन करून देशाला एकसंध केल्याचे पंतप्रधानांचे गौरवोद्गार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ओदिशामध्ये भुवनेश्वर येथे ‘सुभद्रा’ या ओदिशा सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केला. केवळ महिलांसाठीची ही सर्वात मोठी योजना असून, 1 कोटीहून अधिक महिलांना त्याचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे. पंतप्रधानांनी 10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यात निधी हस्तांतरित करण्याची सुरुवातही केली. पंतप्रधान मोदी यांनी रु. 2800 कोटीहून अधिक खर्चाच्या रेल्वे प्रकल्पांची पायाभरणी केली आणि त्याचे लोकार्पण केले, तसेच रु.1000 कोटींहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली. पंतप्रधानांनी पीएमएवाय-जी, अर्थात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण)  अंतर्गत, सुमारे 14 राज्यांमधील जवळजवळ 10 लाख लाभार्थ्यांना मदतीचा पहिला हप्ता जारी केला, देशभरातील पीएमएवाय, अर्थात प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण आणि शहरी) 26 लाख लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश सोहळ्यात ते सहभागी झाले, आणि पीएमएवाय (ग्रामीण आणि शहरी) योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या चाव्या सुपूर्द केल्या. त्यानंतर त्यांनी पीएमएवाय –जी  साठी अतिरिक्त घरांच्या सर्वेक्षणासाठी Awaas+ 2024 ॲप चे उद्घाटन केले आणि प्रधानमंत्री आवास योजना - शहरी (पीएमएवाय – यु ) 2.0 च्या कार्यान्वयनाबाबतची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली.

उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आजच्या या कार्यक्रमाचा भाग बनण्याची आपल्याला संधी मिळाली, याबद्दल कृतज्ञता व्यक्त  केली, आणि ते म्हणाले की, परमेश्वराचा आशीर्वाद असतो, तेव्हाच जनतेची आणि भगवान जगन्नाथांची सेवा करण्याची संधी मिळते.

 

 

सध्या सुरु असलेला गणेशोत्सव, आजची  अनंत चतुर्दशी आणि विश्वकर्मा पूजा या शुभ दिवसाची  नोंद घेत पंतप्रधान म्हणाले की, भारत हा जगातील एकमेव देश आहे, जिथे कौशल्य आणि श्रम यांची भगवान विश्वकर्माच्या रूपात पूजा केली जाते. या निमित्ताने त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. अशा मंगल प्रसंगी ओदिशा येथील माता आणि भगिनींसाठी सुभद्रा योजना सुरू करण्याची आपल्याला संधी मिळाली, असे पंतप्रधान म्हणाले.

भगवान जगन्नाथांच्या भूमीतून आज देशभरातील 30 लाखांहून अधिक कुटुंबांना पक्की घरे सुपूर्द केल्याचा उल्लेख करून, पंतप्रधान म्हणाले की, ग्रामीण भागात 26 लाख घरे, तर शहरी भागात 4 लाख घरे जनतेला सुपूर्द करण्यात आली. ओदिशा मध्ये आज पायाभरणी आणि उद्घाटन करण्यात आलेल्या हजारो कोटींहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांवर भाष्य करताना पंतप्रधानांनी याबद्दल ओदिशामधील आणि देशातील नागरिकांचे अभिनंदन केले.

नवीन भाजपा सरकार सत्तेत आल्यावर, नव्या सरकारच्या शपथविधी समारंभात आपण सहभागी झालो होतो, त्यानंतरचा ओदिशाचा हा आपला पहिलाचा दौरा असल्याचे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी आठवण करून दिली की, निवडणूक प्रचारादरम्यान ते म्हणाले होते की, "डबल इंजिन"सरकार अस्तित्वात आले, तर ओदिशा प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर पुढे जाईल. ग्रामीण, वंचित, दलित, आदिवासी, महिला, तरुण, मध्यमवर्गीय कुटुंबांपासून, ते समाजाच्या विविध घटकांची स्वप्ने आता पूर्ण होतील, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.दिलेली आश्वासने जलद गतीने पूर्ण केली जात आहेत, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. आतापर्यंत पूर्ण केलेल्या आश्वासनांबद्दल सांगताना ते म्हणाले की, श्री जगन्नाथ पुरी मंदिराचे चारही दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले, मंदिराचे रत्न भांडारही खुले करण्यात आले.ते पुढे म्हणाले की, भाजपा सरकार ओदिशाच्या नागरिकांच्या सेवेसाठी झटत आहे. लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार स्वतः त्यांच्यापर्यंत पोहोचत आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. याबद्दल त्यांनी  ओदिशा सरकारचे अभिनंदन केले आणि प्रशंसा केली.

 

केंद्रातील सरकार आज 100 दिवस पूर्ण करत असल्याने आजचा दिवस खास असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या काळात भारतातील गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांच्या कल्याणासाठी मोठे निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 100 दिवसांच्या कामगिरीबद्दल सांगताना पंतप्रधान म्हणाले की, गरिबांसाठी 3 कोटी पक्की घरे बांधण्याचा निर्णय, तरुणांसाठी 2 लाख कोटी रुपयांच्या पंतप्रधान पॅकेजची घोषणा- जिथे खाजगी कंपन्यांमध्ये त्यांच्या पहिल्या नोकरीचा पहिला पगार सरकार भरेल, वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 75,000 नवीन जागांची भर आणि 25,000 गावे पक्क्या रस्त्यांनी जोडायला मंजुरी, या निर्णयांचा यात समावेश असल्याचे ते म्हणाले.पंतप्रधानांनी पुढे माहिती दिली की, आदिवासी व्यवहार मंत्रालयासाठी अर्थसंकल्पीय तरतूद जवळजवळ दुप्पट करण्यात आली, सुमारे 60,000 आदिवासी गावांच्या विकासासाठी विशेष प्रकल्प जाहीर करण्यात आले , सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना सुरू करण्यात आली, आणि व्यावसायिक, व्यवसाय मालक आणि उद्योजकांसाठी आयकरात कपात करण्यात आली.

पंतप्रधानांनी माहिती दिली की गेल्या 100 दिवसांत देशाने 11 लाखांहून अधिक लखपती दिदी निर्माण होताना पाहिले आहे, तेलबिया आणि कांदा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत, भारतीय शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून परदेशांत उत्पादित तेलांवरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली आहे, निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी बासमती तांदळावरील निर्यात शुल्कात कपात करण्यात आली आहे, कोट्यवधी शेतकऱ्यांना सुमारे 2 लाख कोटी रुपये लाभ होईल हे लक्षात घेऊन पिकांच्या किमान हमी भावात वाढ करण्यात आली आहे. “गेल्या 100 दिवसांत प्रत्येकाच्या लाभासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत,” असे उद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.

 

देशातील निम्मी लोकसंख्या असलेली स्त्री शक्ती  सहभागी होते तेव्हा देशाची प्रगती वेगाने होते याकडे लक्ष वेधून घेत पंतप्रधान म्हणाले की महिलांची प्रगती आणि त्यांचे सबलीकरण ही ओदिशाच्या विकासाची गुरुकिल्ली ठरेल. ओदिशातील लोककथांपैकी एका कथेचा  उल्लेख करून त्यांनी सांगितले की भगवान जगन्नाथांच्या जोडीला देवी सुभद्रेचे अस्तित्व आपल्याला महिला सबलीकरणाविषयी सांगते. “सुभद्रा देवीचे रूप असलेल्या सर्व माता, भगिनी आणि कन्यांना मी नतमस्तक होऊन अभिवादन करतो,” असे ते म्हणाले.

नवनिर्वाचित भाजपा सरकारने आपल्या सुरुवातीच्या निर्णयांमध्ये ओदिशातील माता, भगिनींना सुभद्रा योजनेची भेट दिल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की ओदिशातील 1 कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे. योजनेअंतर्गत महिलेला  एकूण 50,000 रुपये रक्कम बँक खात्यात थेट हस्तांतरणाद्वारे दिली जाईल. भारतीय रिझर्व बँकेच्या डिजिटल चलन प्रायोगिक प्रकल्पाशी ही योजना संलग्न करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. देशातील पहिल्या डिजिटल चलन प्रकल्पाशी जोडून घेतल्याबद्दल त्यांनी ओदिशातील महिलांचे अभिनंदन केले.

राज्यभरातील अनेक यात्रांच्या आयोजनाचा उल्लेख करून पंतप्रधान म्हणाले की यातून सुभद्रा योजना ओदिशातील प्रत्येक माता, भगिनी आणि कन्येपर्यंत पोहोचेल. त्यांनी सांगितले की योजनेच्या संपूर्ण माहितीविषयी महिलांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येत आहे. अनेक कर्मचारी स्वेच्छेने या सेवेत उत्साहाने सहभागी झाले आहेत. जनजागृतीसाठी कार्यरत सरकार, प्रशासन, आमदार, खासदार आणि पक्ष कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

 

“प्रधान मंत्री आवास योजनेत भारतातील महिला सबलीकरणाचे प्रतिबिंब आहे,” अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली आणि महिलांच्या नावे मालमत्ता नोंदणीकरण होत असल्याचे सांगितले. देशातील जवळपास 30 लाख कुटुंबांनी आज गृहप्रवेश केला आहे तर 15 लाख नव्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे देण्यात आली आहेत आणि 10 लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या खात्यात गेल्या 100 दिवसांत निधी जमा करण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले, “हे पवित्र कार्य आम्ही ओदिशाच्या पवित्र भूमीवरून केले आहे आणि ओदिशातील गरीब कुटुंबांचा मोठ्या संख्येने यात समावेश आहे.” त्यांनी सांगितले की आज कायमस्वरुपी घर प्राप्त केलेल्या लाखो कुटुंबांसाठी आयुष्याची नवी सुरुवात होत आहे.

आदिवासी कुटुंबाच्या गृहप्रवेश सोहळ्यात सहभागी झाल्याचा सकाळचा अनुभव कथन करताना पंतप्रधानांनी सांगितले की त्यांचा आनंद आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान आपण कधीही विसरणार नाही. “हा अनुभव, ही भावना खजिन्याइतकी मोलाची आहे. गरीब, दलित, वंचित आणि आदिवासी समुदायाच्या जीवनात बदल घडून आल्याने झालेल्या या आनंदाने मला अधिक कष्ट करण्याची ऊर्जा दिली आहे,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

विकसित राज्यासाठी आवश्यक ते सर्व काही ओदिशामध्ये आहे अशी टिप्पणी करून पंतप्रधान म्हणाले की युवांचे कौशल्य, महिलांचे सामर्थ्य  , नैसर्गिक साधनसंपत्ती, उद्योगांसाठी संधी, पर्यटनाच्या प्रचंड शक्यता असे सगळे इथे हजर आहे. त्यांनी पुढे सांगितले की गेल्या 10 वर्षांत केंद्रात असताना सरकारने ओदिशाकडे प्राधान्याने लक्ष पुरवले आहे. 10 वर्षांपूर्वीच्या तुलनेत केंद्राकडून ओदिशाला आज तिप्पट निधी मिळतो आहे. यापूर्वी अंधारात राहिलेल्या योजनांवर आता अंमलबजावणी होत आहे याविषयी त्यांनी आनंद व्यक्त केला. आयुष्मान योजनेविषयी पंतप्रधानांनी सांगितले की ओदिशातील जनतेला 5 लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचारांचा लाभ मिळेल आणि कोणत्याही उत्पन्न गटातील 70 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांनाही 5 लाख रुपयांपर्यंत विनामूल्य उपचारांचा लाभ  दिला जाईल. पुढे त्यांनी सांगितले, “लोकसभा निवडणुकीत मोदींनी दिलेल्या आश्वासनाची ही पूर्तता आहे.”

 

पंतप्रधानांनी ओदिशातील दलित, वंचित आणि आदिवासी समुदाय दारिद्र्याविरोधातील मोहिमेचे सर्वात मोठे लाभार्थी ठरतील, हे अधोरेखित केले.आदिवासी समुदायाच्या कल्याणासाठी वेगळ्या मंत्रालयाची निर्मिती, आदिवासींना त्यांची पाळेमुळे असलेल्या जमिनी, वन हक्क, युवा आदिवासींना शिक्षण व रोजगाराच्या संधी मिळवून देणे असो किंवा ओदिशातील आदिवासी महिलेला देशाचे सन्माननीय राष्ट्रपती पद; या बाबी सरकारने प्रथमच केल्या आहेत.

पंतप्रधानांनी सांगितले की ओदिशातील अनेक आदिवासी क्षेत्रे आणि समुदाय अनेक पिढ्या विकासापासून वंचित राहिले होते. प्रधान मंत्री जनमन योजनेने आदिवासींमधील सर्वाधिक मागास जमातींना पाठबळ दिले, यामध्ये ओदिशातील 13 आदिवासी समुदायांचा समावेश आहे.

जनमन योजनेंतर्गत सरकार या सर्व समुदायांना विकास योजनांचा लाभ देत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. आदिवासी भागांना सिकलसेल ॲनिमियापासून मुक्त करण्यासाठी देखील मोहीम राबविण्यात येत असून या मोहिमेअंतर्गत गेल्या 3 महिन्यांत 13 लाखांहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.

"भारत आज अभूतपूर्व पद्धतीने पारंपरिक कौशल्ये जतन करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे", असे पंतप्रधान म्हणाले. देशातील लोक शेकडो, हजारो वर्षांपासून लोहार, कुंभार, सोनार आणि शिल्पकार यासारख्या कामात गुंतलेले आहेत, असे  ते  म्हणाले. गेल्या वर्षी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सुरू करण्यात आलेल्या विश्वकर्मा योजनेत सरकार 13,000 कोटी रुपये खर्च करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 20 लाख लोकांनी नोंदणी केली असून त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, असेही ते म्हणाले. या लोकांना आधुनिक साधने खरेदी करण्यासाठी हजारो रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे, याशिवाय, कोणत्याही हमीशिवाय बँकांकडून कमी व्याजदरात कर्ज दिल्या जाण्याच्या बाबींचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. गरीबांसाठी आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेची ही हमी विकसित भारताची खरी ताकद बनेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

 

अमाप खनिजे आणि नैसर्गिक संपत्तीने भरलेल्या ओदिशाच्या लांब किनाऱ्यांबाबत बोलताना पंतप्रधानांनी या संसाधनांना ओदिशाची ताकद बनवायला हवे, अशी टिप्पणी केली.  “पुढील 5 वर्षांमध्ये, आपल्याला ओदिशाच्या रस्ते आणि रेल्वे संपर्क सुविधेला नव्या उंचीवर न्यायचे  आहे”, असे ते म्हणाले.आज नव्याने उद्घाटन झालेल्या रेल्वे आणि रस्त्यांसंबंधीच्या प्रकल्पांबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, लांजीगढ रोड - अंबोदला - डोईकालू रेल्वे मार्ग, लक्ष्मीपूर रोड - सिंगारम - टिकरी रेल्वे मार्ग, ढेंकनाल - सदाशिवपूर - हिंडोल रोड रेल्वे मार्ग राष्ट्राला समर्पित करण्याची संधी  मला मिळाली  आहे. जयपूर - नवरंगपूर नवीन रेल्वे मार्गाची पायाभरणी करण्याबरोबरच पारादीप बंदरापासून संपर्क वाढवण्याचे कामही आज सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे ओदिशातील तरुणांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील,हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पुरी ते कोणार्क रेल्वे मार्ग आणि हाय-टेक 'नमो भारत रॅपिड रेल्वे'ही  लवकरच सुरू केली  जाईल, असे पंतप्रधान म्हणाले. आधुनिक पायाभूत सुविधांमुळे ओदिशासाठी संधींचे नवीन दरवाजे उघडतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आज देश ‘हैदराबाद मुक्ती दिन’ साजरा करत आहे यावर पंतप्रधानांनी भर दिला.  विलक्षण इच्छाशक्ती दाखवत देशाला एकसंध  करण्याच्या सरदार पटेल यांच्या प्रयत्नांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. सरदार पटेल यांनी त्या वेळच्या अत्यंत अशांत परिस्थितीत भारतविरोधी कट्टरतावादी शक्तींना रोखून हैदराबाद मुक्त केले, असे ते म्हणाले.“हैदराबाद मुक्ती दिन ही केवळ एक तारीख नाही, तर देशाच्या अखंडतेसाठी, आपल्या राष्ट्राप्रती असलेल्या उत्तरदायित्वासाठी ही एक प्रेरणा आहे”, यावर मोदींनी भर दिला.

 

भारताला मागे ठेवण्याची शक्यता असलेल्या  आव्हानांवर प्रकाश टाकत पंतप्रधानांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील गणेश उत्सवाच्या महत्त्वावर भर दिला आणि राष्ट्र भावनेला नवसंजीवनी देण्यासाठी आणि वसाहतवादी राज्यकर्त्यांच्या फुटीरतावादी डावपेचांचा सामना करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी सार्वजनिकरित्या या उत्सवाचे आयोजन केले होते, असे ते म्हणाले. “गणेश उत्सव भेदभाव आणि जातीयवादाच्या पलिकडे जाऊन एकतेचे प्रतीक बनला आहे ”, असे सांगून, गणेश उत्सवाच्या वेळी संपूर्ण समाज एकसंध दिसतो, असे पंतप्रधान म्हणाले.

आज धर्म आणि जातीच्या आधारे समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात सर्वांनी सावध राहावे असा इशारा पंतप्रधानांनी दिला. गणेश उत्सवात पंतप्रधानांचा सहभाग आणि कर्नाटकातील गणेशमूर्ती जप्त केल्याच्या दुर्दैवी घटनेमुळे काही गटांमध्ये निर्माण झालेले वैमनस्य याकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, समाजात विष कालवणारी  ही द्वेषपूर्ण विचारसरणी आणि मानसिकता अत्यंत घातक आहे. अशा द्वेषी शक्तींना फोफावू देऊ नका, असे आवाहन पंतप्रधानांनी सर्वांनी केले.

ओदिशा आणि देशाला यशाच्या नवीन उंचीवर स्थापित करण्यासाठी अनेक मोठे टप्पे आपण  गाठू,असा विश्वास पंतप्रधानांनी भाषणाच्या समारोपात व्यक्त केला.आगामी काळात देशाच्या विकासाची गती आणखी वेगवान होईल,अशी ग्वाही त्यांनी दिली.

 

ओदिशाचे राज्यपाल  रघुबर दास आणि ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी हे देखील या कार्यक्रमात उपस्थित होते.

पार्श्वभूमी

सुभद्रा योजनेअंतर्गत, 21-60 वयोगटातील सर्व पात्र लाभार्थ्यांना 2024-25 ते 2028-29 या 5 वर्षांच्या कालावधीत 50,000/- रुपयांची मदत दिली जाणार आहे. 10,000/- रुपयांची रक्कम वार्षिक दोन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या आधार-सक्षम आणि थेट बँक हस्तांतरण - सक्षम बँक खात्यात जमा केली जाणार आहे.या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधानांनी 10 लाखांहून अधिक महिलांच्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरणाची सुरुवात केली.

पंतप्रधानांनी भुवनेश्वरमध्ये 2800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे  रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले आणि काही प्रकल्पांची पायाभरणी केली.हे रेल्वे प्रकल्प ओदिशातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा घडवतील, प्रादेशिक विकासाला चालना देतील आणि संपर्क सुविधा सुधारणा घडवून आणतील.पंतप्रधानांनी 1000 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणीही केली.

 

पंतप्रधानांनी सुमारे 14 राज्यांतील प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण अंतर्गत सुमारे 10 लाख लाभार्थ्यांना मदतीचा पहिला हप्ता जारी केला. या कार्यक्रमात,देशभरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या ग्रामीण आणि शहरी या दोन्ही विभागात 26 लाख लाभार्थ्यांसाठी गृहप्रवेश सोहळाही आयोजित करण्यात आला होता.  पंतप्रधानांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या (ग्रामीण आणि शहरी) लाभार्थ्यांना त्यांच्या घराच्या चाव्या सुपूर्द केल्या,तसेच, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण साठी अतिरिक्त घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी आवास+ 2024 या ॲपचा प्रारंभ केला. याशिवाय, प्रधानमंत्री आवास योजना – शहरी (PMAY-U) 2.0 कार्यान्वयन मार्गदर्शक तत्त्वे पंतप्रधानांनी जारी केली.

 

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Great To See How He Supports Art': 'Fauda' Star Lior Raz On Meeting PM Modi In Israel

Media Coverage

Great To See How He Supports Art': 'Fauda' Star Lior Raz On Meeting PM Modi In Israel
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
The HPV vaccination campaign, launched from Ajmer, marks a significant step towards empowering the nation’s Nari Shakti: PM Modi in Rajasthan
February 28, 2026
Our government is committed to all-round development: PM
Today, I had the privilege of launching the nationwide HPV vaccination campaign from Ajmer, inaugurating and laying foundation stones for multiple projects and distributing appointment letters to the youth: PM
The HPV vaccination campaign has commenced from Ajmer, this campaign is a significant step towards empowering the Nari Shakti of the country: PM
The double-engine government is moving forward by taking both Rajasthan’s heritage and development together: PM
The campaign to link rivers started by our government will significantly benefit Rajasthan: PM
There is no shortage of sunlight in Rajasthan, this very sunshine is becoming a source of savings and income for the common man: PM
A very significant role is being played by the PM Surya Ghar Free Electricity Scheme, this scheme has the power to change Rajasthan's destiny: PM

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

तीर्थराज पुष्कर और माता सावित्री की इस पावन भूमि पर, आज मुझे आप सबके बीच आने का, आपके आशीर्वाद प्राप्त करने का अवसर मिला है। इस मंच से मैं सुरसुरा के तेजाजी धाम को, पृथ्वीराज की भूमि अजमेर को प्रणाम करता हूं।

मेरे साथ बोलिए –

तीर्थराज पुष्कर की जय।

तीर्थराज पुष्कर की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

भगवान देव नारायण की जय।

भगवान देव नारायण की जय।

वरूण अवतार भगवान झूलेलाल जी की जय।

भगवान झूलेलाल जी की जय।

मंच पर विराजमान राजस्थान के राज्यपाल हरिभाउ बागडे जी, राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा जी, पूर्व मुख्यमंत्री बहन वसुंधरा जी, केंद्रीय मंत्रिमंडल में मेरे साथी भगीरथ चौधरी जी, उपमुख्यमंत्री प्रेमचंद भैरवा जी, दिया कुमारी जी, संसद में मेरे साथी, भाजपा के प्रदेश अध्यक्ष मदन राठौर जी, उपस्थित अन्य मंत्रिगण, अन्य महानुभाव और राजस्थान के मेरे प्यारे भाई और बहनों। मैं पूज्य संतों का बहुत आभारी हूं, कि हमें आशीर्वाद देने के लिए इतनी बड़ी संख्या में पूज्य संतगण यहां मौजूद हैं।

साथियों,

अजमेर आस्था और शौर्य की धरती है। यहां तीर्थ भी है और क्रांतिवीरों के पदचिन्ह भी हैं। अभी कल ही मैं इजराइल की यात्रा को पूरा करके भारत लौटा हूं। राजस्थान के सपूत मेजर दलपत सिंह के शौर्य को इजराइल के लोग आज भी गौरव से याद करते हैं। मुझे भी इजराइल की संसद में, मेजर दलपत सिंह जी के शौर्य को नमन करने का सौभाग्य मिला। राजस्थान के वीर बाकुरों की, इजराइल के हाइफा शहर को आजाद कराने में जो भूमिका थी, मुझे उसका गौरवगान करने का अवसर मिला है।

साथियों,

कुछ समय पहले ही, राजस्थान में भाजपा की डबल इंजर सरकार को दो साल पूरे हुए हैं, मुझे संतोष है कि आज राजस्थान विकास के नए पथ पर अग्रसर है। विकास के जिन वायदों के साथ भाजपा सरकार आपकी सेवा में आई थी, उन्हें तेजी के साथ पूरा कर रही है। और आज का दिन, विकास के इसी अभियान को तेज करने का दिवस है। थोड़ी देर पहले यहां राजस्थान के विकास से जुड़ी करबी 17 हजार करोड़ रूपयों की परियोजनाओं का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। सड़क, बिजली, पानी, स्वास्थ्य, शिक्षा, हर क्षेत्र में नई शक्ति जुड़ रही है। ये सारे प्रोजेक्टस राजस्थान की जनता की सुविधा बढ़ाएंगे और राजस्थान के युवाओं के लिए, रोजगार के भी अवसर पैदा करेंगे।

साथियों,

भाजपा की डबल इंजर सरकार लगातार युवा शक्ति को सशक्त कर रही है। दो साल पहले तक राजस्थान से भर्तियों में भ्रष्टाचार और पेपर लीक की ही खबरें चमकती रहती थीं, आती रहती थीं। अब राजस्थान में पेपर लीक पर लगाम लगी है, दोषियों पर सख्त कार्रवाई हो रही है। आज यहां इसी मंच से राजस्थान के 21 हजार से अधिक युवाओं को नियुक्ति पत्र भी सौंपे गए हैं। ये बहुत बड़ा बदलाव आया है। मैं इस बदलाव के लिए, नई नौकरियों के लिए, विकास के सभी कामों के लिए, राजस्थान के आप सभी लोगों को बहुत-बहुत बधाई देता हूं।

साथियों,

आज वीरांगनाओं की इस धरती से, मुझे देशभर की बेटियों के लिए एक अहम अभियान शुरू करने का अवसर मिला है। यहां अजमेर से HPV वैक्सीनेशन अभियान शुरू हुआ है। ये अभियान, देश की नारीशक्ति को सशक्त करने की दिशा में अहम कदम है।

साथियों,

हम सब जानते हैं कि परिवार में जब मां बीमार होती है, तो घर बिखर सा जाता है। अगर मां स्वस्थ है, तो परिवार हर संकट का सामना करने में सक्षम रहता है। इसी भाव से, भाजपा सरकार ने महिलाओं को संबल देने वाली अनेक योजनाएं चलाई हैं।

साथियों,

हमने 2014 से पहले का वो दौर देखा है, जिसमें शौचालय के अभाव में बहनों-बेटियों को कितनी पीड़ा, कितना अपमान झेलना पड़ता था। बच्चियां स्कूल छोड़ देती थीं, क्योंकि वहां अलग टॉयलेट की सुविधा नहीं होती थी। गरीब बेटियां सेनिटरी पैड्स नहीं ले पाती थीं। पहले जो सत्ता में रहे, उनके लिए ये छोटी बातें थीं। इसलिए इन समस्याओं की चर्चा तक नहीं होती थी। लेकिन हमारे लिए ये बहनों-बेटियों को बीमार करने वाला, उनके अपमान से जुड़ा संवेदनशील मसला था। इसलिए, हमने इनका मिशन मोड पर समाधान किया।

साथियों,

गर्भावस्था के दौरान कुपोषण माताओं के जीवन के लिए बहुत बड़ा खतरा होता था। हमने सुरक्षित मातृत्व के लिए योजना चलाई, मां को पोषक आहार मिले, इसके लिए पांच हज़ार रुपए बहनों के खाते में जमा करने की योजना शुरु की। मां धुएं में खांसती रहती थी, लेकिन उफ्फ तक नहीं करती थी। हमने कहा ये नहीं चलेगा। और इसलिए उज्जवला गैस योजना बनाई गई। ये सब इसलिए संभव हुआ, क्योंकि भाजपा सरकार, सत्ता भाव से नहीं, संवेदनशीलता के साथ काम करती है।

साथियों,

21वीं सदी का एक चौथाई हिस्सा बीत चुका है। आज का समय राजस्थान के विकास के लिए बड़ा महत्वपूर्ण है। भाजपा की डबल इंजन सरकार, राजस्थान की विरासत और विकास, दोनों को साथ लेकर चल रही है। हम सब जानते हैं, अच्छी सड़क, अच्छी रेल और हवाई सुविधा सिर्फ सफर आसान नहीं करती, वो पूरे इलाके की किस्मत बदल देती है। जब गांव-गांव तक अच्छी सड़क पहुँचती है, तो किसान अपनी फसल सही दाम पर बेच पाता है। व्यापारी आसानी से अपना सामान बाहर भेज पाते हैं। और हमारा अजमेर-पुष्कर तो, उसकी पर्यटन की ताकत कौन नहीं जानता। अच्छी कनेक्टिविटी का पर्यटन पर सबसे अच्छा असर पड़ता है। जब सफर आसान होता है, तो ज्यादा लोग घूमने आते हैं।

और साथियों,

जब पर्यटक आते हैं तो स्वाभाविक है होटल चलते हैं, ढाबे चलते हैं, कचौड़ी और दाल बाटी ज्यादा बिकती है, यहां राजस्थान के कारीगरों का बनाया सामान बिकता है, टैक्सी चलती है, गाइड को काम मिलता है। यानी एक पर्यटक कई परिवारों की रोज़ी-रोटी बन जाता है। इसी सोच के साथ हमारी सरकार, राजस्थान में आधुनिक कनेक्टिविटी पर बहुत बल दे रही है।

साथियों,

जैसे-जैसे राजस्थान में कनेक्टिविटी का विस्तार हो रहा है, वैसे-वैसे यहां निवेश के लिए भी अवसर लगातार बढ़ते जा रहे हैं। दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर के इर्द-गिर्द उद्योगों के लिए एक बहुत ही शानदार इंफ्रास्ट्रक्चर बनाया जा रहा है। यानी राजस्थान को अवसरों की भूमि बनाने के लिए, डबल इंजन सरकार हर संभव, अनेक विध काम कर रही है।

साथियों,

राजस्थान की माताएं अपने बच्चों को पालने में ही, राष्ट्र भक्ति का संस्कार देती हैं। राजस्थान की ये धरा जानती है कि देश का सम्मान क्या होता है, और इसीलिए आज राजस्थान की इस धरा पर, मैं आप लोगों से एक और बात कहने आया हूं।

साथियों,

हाल में ही, दिल्ली में, दुनिया का सबसे बड़ा AI सम्मेलन हुआ, Artificial Intelligence इसमें दुनिया के अनेक देशों के प्रधानमंत्री, अनेक देशों के राष्ट्रपति, अनेक देशों के मंत्रि, उस कार्यक्रम में आए थे। दुनिया की बड़ी-बड़ी कंपनियां, उन कंपनियों के कर्ता-धर्ता वो भी एक छत के नीचे इकट्ठे हुए थे। सबने भारत की खुले मन से प्रशंसा की। मैं जरा राजस्थान के मेरे भाई-बहनों से पूछना चाहता हूं। जब दुनिया के इतने सारे लोग, भारत की प्रशंसा करते हैं, ये सुनकर के आपको गर्व होता है की नहीं होता है? आपको गर्व होता है कि नहीं होता है? आपको अभिमान होता है कि नहीं होता है? आपका माथा ऊंचा हुआ या नहीं हुआ? आपका सीना चौड़ा हुआ कि नहीं हुआ?

साथियों,

आपको गर्व हुआ, लेकिन हताशा निराशा में डूबी, लगातार पराजय के कारण थक चुकी कांग्रेस ने क्या किया, ये आपने देखा है। दुनियाभर के मेहमानों के सामने, कांग्रेस ने देश को बदनाम करने की कोशिश की। इन्होंने विदेशी मेहमानों के सामने देश को बेइज्जत करने के लिए पूरा ड्रामा किया।

साथियों,

कांग्रेस, पूरे देश में ल्रगातार हार रही है, और गुस्से में वो इसका बदला, वो भारत को बदनाम करके ले रही है। कभी कांग्रेस, INC यानी इंडियन नेशनल कांग्रेस थी, लेकिन अब INC नहीं बची है, इंडियन नेशनल कांग्रेस नहीं बची है, आज वो INC के बजाय MMC, MMC बन गई है। MMC यानी मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस हो चुकी है।

राजस्थान के मेरे वीरों,

इतिहास गवाह है, मुस्लिम लीग भारत से नफरत करती थी, और इसलिए मुस्लिम लीग ने देश बांट दिया। आज कांग्रेस भी वही कर रही है। माओवादी भी, भारत की समृद्धि, हमारे संविधान और हमारे सफल लोकतंत्र से नफरत करते हैं, ये घात लगाकर हमला करते हैं, कांग्रेस भी घात लगाकर, देश को बदनाम करने के लिए कहीं भी घुस जाती है। कांग्रेस के ऐसे कुकर्मों को देश कभी माफ नहीं करेगा।

साथियों,

देश को बदनाम करना, देश की सेनाओं को कमजोर करना, ये कांग्रेस की पुरानी आदत रही है। आप याद कीजिए, यही कांग्रेस है, जिसने हमारी सेना के जवानों को हथियारों और वर्दी तक के लिए तरसा कर रखा था। ये वही कांग्रेस है, जिसने सालों तक हमारे सैनिक परिवारों को वन रैंक वन पेंशन से वंचित रखा था। ये वही कांग्रेस है, जिसके जमाने में विदेशों से होने वाले रक्षा सौदों में बड़े-बड़े घोटाले होते थे।

साथियों,

बीते 11 वर्षों में भारत की सेना ने हर मोर्चे पर आतंकियों पर, देश के दुश्मनों पर करारा प्रहार किया। हमारी सेना, हर मिशन, हर मोर्चे में विजयी रही। सर्जिकल स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक, वीरता का लोहा मनवाया, लेकिन कांग्रेस के नेताओं ने इसमें भी दुश्मनों के झूठ को ही आगे बढ़ाया। देश के लिए जो भी शुभ है, जो भी अच्छा है, जो भी देशवासियों का भला करने वाला है, कांग्रेस उस सबका विरोध करती है। इसलिए, देश आज कांग्रेस को सबक सिखा रहा है।

साथियों,

राजस्थान में तो आपने कांग्रेस के कुशासन को करीब से अनुभव किया है। यहां जितने दिन कांग्रेस की सरकार रही, वो भ्रष्टाचार करने और आपसी लड़ाई-झगड़े में ही उलझी रही। कांग्रेस ने हमारे किसानों को भी हमेशा धोखा दिया है। आप याद कीजिए, कांग्रेस ने दशकों तक सिंचाई की परियोजनाओं को कैसे लटकाए रखा। इसका राजस्थान के किसानों को बहुत अधिक नुकसान हुआ है। ERCP परियोजना को कांग्रेस की सरकारों ने केवल फाइलों और घोषणाओं में उलझाकर रखा। हमारी सरकार ने आते ही इस स्कीम को फाइलों से निकालकर धरातल पर उतारने का प्रयास किया है।

साथियों,

हमारी सरकार ने नदियों को जोड़ने का जो अभियान शुरु किया है, उसका बहुत अधिक फायदा राजस्थान को मिलना तय है। संशोधित पार्वती-कालीसिंध-चंबल लिंक परियोजना हो, यमुना-राजस्थान लिंक प्रोजेक्ट हो, डबल इंजन सरकार ऐसी अनेक सिंचाई परियोजनाओं का लाभ किसानों तक पहुंचाने के लिए प्रतिबद्ध है। आज भी झालावाड़, बारां, कोटा और बूंदी जिले के लिए पानी की अनेक परियोजनाओं पर काम शुरु हुआ है। हमारा प्रयास है, कि राजस्थान में भूजल का स्तर भी ऊपर उठे।

साथियों,

भाजपा सरकार, राजस्थान के सामर्थ्य को समझते हुए, योजनाएं बना रही है, उन्हें लागू कर रही है। मुझे खुशी है कि राजस्थान अब, सूरज की ताकत से समृद्धि कमाने वाली धरती बन गया है। हम सब जानते हैं, हमारे राजस्थान में धूप की कोई कमी नहीं। अब यही धूप, सामान्य मानवी के घर की बचत और कमाई का साधन बन रही है। और इसमें बहुत बड़ी भूमिका है, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना की। इस योजना में राजस्थान का भाग्य बदलने की ताकत है। इस योजना में भाजपा सरकार लोगों को अपनी छत पर सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए की सहायता देती है। सरकार सीधे आपके बैंक खाते में पैसे भेजती है। आजादी के बाज सब बजट, सब योजनाएं देख लीजिए, जिसमें मध्यम वर्ग को सबसे ज्यादा लाभ होने वाला है, ऐेसी योजना कभी नजर नहीं आएगी, आज इन परिवारों को सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए सीधा सरकार देती है। सबसे अधिक लाभ मध्यम वर्ग के लोग ले रहे हैं। और जिससे घर पर एक छोटा सा बिजली घर तैयार हो जाता है। दिन में सूरज की रोशनी से बिजली बनती है, घर में वही बिजली काम आती है और जो ज्यादा बिजली बनती है, वो बिजली ग्रिड में जाती है। और जिस घर में बिजली बनी होती है, उसे भी इसका लाभ मिलता है।

साथियों,

आज राजस्थान में सवा लाख से अधिक परिवार इस योजना से जुड़ चुके हैं। और इस योजना की वजह से, कई घरों का बिजली बिल लगभग जीरो आ रहा है। यानी खर्च कम हुआ है, बचत ज़्यादा हुई है।

साथियों,

विकसित राजस्थान से विकसित भारत के मंत्र पर हम लगातार काम कर रहे हैं। आज जिन योजनाओं पर काम शुरू हुआ है, वो विकसित राजस्थान की नींव को और अधिक मजबूत करेंगे। जब राजस्थान विकसित होगा, तो यहां के हर परिवार का जीवन समृद्ध होगा। आप सभी को एक बार फिर, विकास परियोजनाओं के लिए बहुत-बहुत शुभकामनाएं। मेरे साथ बोलिये-

भारत माता की जय!

भारत माता की जय!

वंदे मातरम के 150 साल देश मना रहा है। मेरे साथ बोलिये-

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

बहुत-बहुत धन्यवाद।