किन्नौर येथील भूस्खलनाच्या दुर्घटनेत अनेक नागरिकांचा बळी गेल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुखः व्यक्त केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले,
“किन्नौर येथे घडलेली भूस्खलनाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यादुःखाच्या क्षणी माझ्या संवेदना या दुर्घटनेत बळी पडलेल्यांच्या कुटुंबांसोबत आहेत. या घटनेतील जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारेल अशी आशा मी व्यक्त करतो. या ठिकाणी मदतकार्य सुरु असून ढिगाऱ्याखाली अजूनही अडकून पडलेल्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने शक्य ती सर्व मदत केली जात आहे.”
The landslide tragedy at Kinnaur is very saddening. In this hour of grief, my thoughts are with the families of those who lost their lives. May the injured recover at the earliest. Rescue operations are underway and everything possible is being done to assist those still trapped.
— Narendra Modi (@narendramodi) August 11, 2021


