राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातात जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सहाय्य जाहीर केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या एक्स पोस्टवर वर पोस्ट केले;
"राजस्थानमधील जयपूर येथे झालेल्या दुर्घटनेतील जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. ज्यांनी आपले कुटुंबीय आणि प्रियजन गमावले आहेत त्यांच्याप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो.”
पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये सहाय्य दिले जाईल" पंतप्रधान @narendramodi”.
Pained by the loss of lives due to a mishap in Jaipur, Rajasthan. My thoughts are with those who have lost their near and dear ones. I pray that the injured recover soon.
— PMO India (@PMOIndia) November 3, 2025
An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of each deceased. The injured would…


