“भारतासाठी लोकशाही म्हणजे केवळ एक प्रणाली नाही तर लोकशाही आपल्या स्वभावात मुरलेली असून ती भारतीय जीवनाचा एक भाग आहे”
“भारताच्या संघराज्य प्रणालीमध्ये सर्व राज्यांची भूमिका हा ‘सबका प्रयास’ उपक्रमाचा भक्कम पाया आहे”
“कोरोना महामारीशी दिलेला लढा हे ‘सबका प्रयास’ च्या यशाचे उत्तम उदाहरण आहे”
समाजासाठी काही विशेष कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सामाजिक जीवनाच्या पैलूची माहिती देशवासियांना सांगण्यासाठी आपण संसदेच्या कामकाजाचे वर्षातील 3 ते 4 दिवस राखून ठेवू शकतो का”
सदनात दर्जेदार चर्चेसाठी 'हेल्दी टाईम' आणि 'हेल्दी डे' ठेवण्याचा प्रस्ताव
​​संसदीय प्रणालीला आवश्यक असलेली तंत्रज्ञानविषयक चालना देण्यासाठी आणि देशातील सर्व लोकशाहीविषयक घटकांना जोडण्यासाठी ‘एक देश, एक वैधानिक मंच’चा दिला प्रस्ताव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून 82 व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या उद्घाटनपर सत्राला संबोधित केले. लोकसभेचे सभापती, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे उपाध्यक्ष देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.

या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, भारतासाठी लोकशाही म्हणजे केवळ एक प्रणाली नाही तर लोकशाही आपल्या स्वभावात मुरलेली असून ती भारतीय जीवनाचा एक भाग आहे. येत्या काळात आपल्याला आपल्या देशाला नव्या उंचीवर घेऊन जायचे आहे आणि असामान्य उद्दिष्ट्ये गाठायची आहेत. आणि हे लक्ष्य फक्त ‘सबका प्रयास’च्या माध्यमातूनच गाठता येईल. भारताच्या लोकशाही व्यवस्थेत, संघराज्य प्रणालीमध्ये जेव्हा आपण ‘सबका प्रयास’बाबत बोलतो तेव्हा सर्व राज्यांची भूमिका हा या ‘सबका प्रयास’ उपक्रमाचा भक्कम पाया आहे हे लक्षात घ्यायला हवे. एका दशकाहून अधिक काळ रेंगाळलेल्या ईशान्येकडील राज्यांच्या समस्यांवरील उपाययोजना असो किंवा अनेक दशके अडकून पडलेले सर्व विकासविषयक प्रकल्पांचे काम पूर्ण करण्यासाठीचे प्रयत्न असो, देशातील अशी अनेक कामे गेल्या काही वर्षांत पूर्ण करण्यात आली आणि त्यासाठी प्रत्येकाचे प्रयत्न कामी आले असे पंतप्रधानांनी सांगितले. कोरोना महामारीशी दिलेला लढा हे देखील ‘सबका प्रयास’ च्या यशाचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या संसदेच्या सदनांतील परंपरा आणि पद्धती भारतीय असायला हव्यात असा आग्रह पंतप्रधानांनी व्यक्त केला. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही भारतीयांची भावना अधिक मजबूत करण्यासाठी धोरणे आणि कायदे तयार केले पाहिजेत असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले, “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले स्वतःचे सदनातील वर्तन भारतीय मूल्यांनुसार असेल याची काळजी घेतली पाहिजे. ही आपणा सर्वांची जबाबदारी आहे.”

पंतप्रधान म्हणाले की आपला देश वैविध्याने परिपूर्ण आहे. “हजारो वर्षांच्या विकासानंतर आपल्या हे लक्षात आले आहे की या विविधतेमध्ये देखील एक भव्य, दैवी आणि अभंगपणे वाहणारा एकतेचा प्रवाह आहे. एकतेचा हा अभंग प्रवाह आपल्या विविधतेची जपणूक आणि संरक्षण करतो.” असे त्यांनी सांगितले.

समाजासाठी काही विशेष कार्य करणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या सामाजिक जीवनाच्या पैलूची माहिती देशवासियांना सांगण्यासाठी संसदेच्या कामकाजाचे वर्षातील 3 ते 4 दिवस राखून ठेवण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडला. ते म्हणाले कि यामुळे उर्वरित लोकप्रतिनिधींसह समाजातील इतर लोकांना देखील यातून अनेक गोष्टी शिकता येतील.

सदनात दर्जेदार चर्चा होण्यासाठी स्वतंत्र कालावधी निश्चित करता येईल का यावर विचार करण्याचा प्रस्ताव पंतप्रधानांनी मांडला. ते म्हणाले की सन्मान आणि गांभीर्य यांची परंपरा काटेकोरपणे पाळून अशा चर्चा घडायला हव्यात. यामध्ये कोणीही कोणावर राजकीय निंदानालस्तीयुक्त टीका करणार नाही. एक प्रकारे, या उपक्रमामुळे हा सदनाचा 'हेल्दी टाईम' आणि 'हेल्दी डे' असायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. 

पंतप्रधानांनी यावेळी ‘एक देश, एक वैधानिक मंचा’ची संकल्पना मांडली. “हे पोर्टल संसदीय प्रणालीला आवश्यक असलेली तंत्रज्ञानविषयक चालना देईलच पण त्याचबरोबर देशातील सर्व लोकशाहीविषयक घटकांना जोडण्याचे काम देखील करेल,” असे ते म्हणाले.

आगामी 25 वर्षांचा काळ देशासाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असेल यावर पंतप्रधानांनी यावेळी बोलताना भर दिला. संसद सदस्यांनी यापुढे – कर्तव्य, कर्तव्य आणि कर्तव्य- हा एकच मंत्र अनुसरायला हवा असा आग्रह पंतप्रधानांनी व्यक्त केला.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s space programme, a people’s space journey

Media Coverage

India’s space programme, a people’s space journey
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Congratulates Shri S. Suresh Kumar Ji on Inspiring Cycling Feat
January 01, 2026

āThe Prime Minister, Shri Narendra Modi, today lauded the remarkable achievement of Shri S. Suresh Kumar Ji, who successfully cycled from Bengaluru to Kanniyakumari.

Shri Modi noted that this feat is not only commendable and inspiring but also a testament to Shri Suresh Kumar Ji’s grit and unyielding spirit, especially as it was accomplished after overcoming significant health setbacks.

PM emphasized that such endeavors carry an important message of fitness and determination for society at large.

The Prime Minister personally spoke to Shri Suresh Kumar Ji and congratulated him for his effort, appreciating the courage and perseverance that made this journey possible.

In separate posts on X, Shri Modi wrote:

“Shri S. Suresh Kumar Ji’s feat of cycling from Bengaluru to Kanniyakumari is commendable and inspiring. The fact that it was done after he overcame health setbacks highlights his grit and unyielding spirit. It also gives an important message of fitness.

Spoke to him and congratulated him for effort.

@nimmasuresh

https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/age-illness-no-bar-at-70-bengaluru-legislator-pedals-702km-to-kanyakumari-in-five-days/articleshow/126258645.cms#

“ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ಕನ್ಯಾಕುಮಾರಿಯವರೆಗೆ ಸೈಕಲ್ ಸವಾರಿ ಕೈಗೊಂಡ ಶ್ರೀ ಎಸ್. ಸುರೇಶ್ ಕುಮಾರ್ ಅವರ ಸಾಧನೆ ಶ್ಲಾಘನೀಯ ಮತ್ತು ಸ್ಫೂರ್ತಿದಾಯಕವಾಗಿದೆ. ಆರೋಗ್ಯದ ಹಿನ್ನಡೆಗಳನ್ನು ಮೆಟ್ಟಿ ನಿಂತು ಅವರು ಈ ಸಾಧನೆ ಮಾಡಿರುವುದು ಅವರ ದೃಢ ನಿರ್ಧಾರ ಮತ್ತು ಅಚಲ ಮನೋಭಾವವನ್ನು ಎತ್ತಿ ತೋರಿಸುತ್ತದೆ. ಇದು ಫಿಟ್ನೆಸ್ ಕುರಿತು ಪ್ರಮುಖ ಸಂದೇಶವನ್ನೂ ನೀಡುತ್ತದೆ.

ಅವರೊಂದಿಗೆ ಮಾತನಾಡಿ, ಅವರ ಈ ಪ್ರಯತ್ನಕ್ಕೆ ಅಭಿನಂದನೆ ಸಲ್ಲಿಸಿದೆ.

@nimmasuresh

https://timesofindia.indiatimes.com/city/bengaluru/age-illness-no-bar-at-70-bengaluru-legislator-pedals-702km-to-kanyakumari-in-five-days/articleshow/126258645.cms#