The decision to remove Article 370 may seem politically difficult, but it has given a new ray of hope for development in Jammu, Kashmir and Ladakh: PM Modi
For Better Tomorrow, our government is working on to solve the current challenges: PM Modi
112 districts are being developed as Aspirational Districts, with a focus on every parameter of development and governance: PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत 17 व्या हिंदुस्तान टाईम्स लीटरशीप परिषदेत उद्‌घाटनपर भाषण केले.

कुठल्याही समाज किंवा देशाच्या विकासासाठी संभाषण महत्वाचे आहे असे पंतप्रधान म्हणाले. उत्तम भविष्याचा पाया संभाषण आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या मंत्रासह सरकार सध्याच्या आव्हाने आणि समस्यांवर काम करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांची माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की कलम 370 रद्द केल्यामुळे जम्मू आणि काश्मीर आणि लडाखच्या लोकांना आशेचा नवीन किरण मिळाला आहे. मुस्लीम महिला आता तिहेरी तलाकच्या प्रथेपासून मुक्त झाल्या आहेत. दिल्लीतील अनधिकृत वसाहतींवरील निर्णयाचा 40 लाख लोकांना लाभ झाला आहे. नवीन भारतासासाठी, उत्तम भविष्यासाठी असे अनेक निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले.

आरोग्य, स्वच्छता आणि पायाभूत विकासासारख्या अनेक विकास निर्देशांकात मागे पडलेल्या जिल्ह्यांवर आता सरकार लक्ष केंद्रीत करत आहे असे पंतप्रधान म्हणाले. विकास आणि शासन या प्रत्येक मापदंडावर लक्ष केंद्रीत करता 112 जिल्हे महत्वाकांक्षी जिल्हे म्हणून विकसित केले जात आहेत. या जिल्ह्यांमध्ये कुपोषण, सुगम्य बँकिंग सुविधा, विमा, वीज यांसारख्या विविध मापदंडावर सरकार प्रत्यक्ष देखरेख करत आहे ते म्हणाले. यासह 112 जिल्ह्यांचे उत्तम भवितव्य देशाच्या उत्तम भवितव्य निश्चित करील असे ते म्हणाले.

जल जीवन अभियानाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की सरकार 15 कोटी कुटुंबांना पाईपद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जोडणी देत आहे. भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी सरकार वचनबद्ध असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

ऐतिहासिक बँक विलीनीकरण, कामगार कायद्यांचे कोडिंग, बँकांचे पुनर्भांडवलीकरण, कार्पोरेट करात कपात यांसारख्या अनेक आर्थिक सुधारणा हाती घेण्यात आल्याचे पंतप्रधान म्हणाले. व्यवसाय सुलभता क्रमवारीतील स्थान सुधारताना भारताने उत्तम कामगिरी बजावली असे त्यांनी नमूद केले. गेल्या पाच वर्षात भारताने 79 अंकांनी सुधारणा केल्याचे ते म्हणाले. रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी 25 हजार कोटी रुपयांचा विशेष निधी स्थापन करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच सरकार 100 लाख कोटी रुपयांचे पायाभूत प्रकल्प सुरू करत आहे असे पंतप्रधान म्हणाले.

प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकात भारत 34 व्या स्थानावर असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्यटन व्यवसायात वाढ झाल्यामुळे रोजगार निर्मिती वाढल्याचे ते म्हणाले. मनुष्यबळाचे परिवर्तन करण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 130 कोटी भारतीयांच्या उत्तम भविष्यासाठी योग्य उद्देश, उत्तम तंत्रज्ञान आणि प्रभावी अंमलबजावणी हे सरकारचे सूत्र असल्याचे त्यांनी नमूद केले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
With HPV vaccine rollout, AIIMS oncologist says it’s the beginning of the end for cervical cancer in India

Media Coverage

With HPV vaccine rollout, AIIMS oncologist says it’s the beginning of the end for cervical cancer in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister congratulates Jammu and Kashmir team on their first-ever Ranji Trophy victory
February 28, 2026

The Prime Minister has congratulated the Jammu and Kashmir team for their first-ever Ranji Trophy win.

The Prime Minister stated that this historic triumph reflects the remarkable grit, discipline, and passion of the team. Highlighting that it is a proud moment for the people of Jammu and Kashmir, he noted that the victory underscores the growing sporting passion and talent in the region.

The Prime Minister expressed hope that this feat will inspire many young athletes to dream big and play more.

The Prime Minister shared on X post;

"Congratulations to the Jammu and Kashmir team for their first ever Ranji Trophy win! This historic triumph reflects remarkable grit, discipline and passion of the team. It is a proud moment for the people of Jammu and Kashmir and it highlights the growing sporting passion and talent there. May this feat inspire many young athletes to dream big and play more."