नवी दिल्ली येथील लोक कल्याण मार्ग येथे आयोजित कार्यक्रमात आज  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, ”व्यवसाय सुलभीकरण -एक आव्हान” चे उदघाटन केले.

सरकारी प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजेंस, इंटरनेट ऑफ थिंग्ज, डेटा  विश्लेषण,  ब्लॉकचेन आणि इतर  तंत्रज्ञान युगावर आधारीत नाविन्यपूर्ण कल्पनांना आमंत्रित करणे हा या आव्हानाचा उद्देश आहे. ग्रँड चॅलेंजसाठी स्टार्टअप इंडिया पोर्टल आहे.

”या प्रसंगी संमेलनास संबोधित करताना, पंतप्रधानांनी उद्योजक प्रतिनिधी आणि इतर सर्व उपस्थित मंडळींचे, "व्यवसाय सुलभिकारणा च्या हेतूने(ईओडीबी), जागतिक पातळीवरील मानांकनात  भारताच्या क्रमवारीत सुधारणा करण्याच्या प्रयत्नांसाठी कौतुक केले.

पंतप्रधान  म्हणाले  की,  जागतिक  पातळीवरील  सर्वोच्च  ५० च्या   मानांकनात भारताला स्थान मिळावे  यासाठी  सर्व  प्रथम जेंव्हा  त्यांनी  व्यवसायातील  सुलभीकरणाचा  दृष्टिकोन  लोकांसमोर  ठेवला तेंव्हा त्यावर कोणीही विश्वास ठेवला नाही परंतु फक्त गेल्या चार वर्षातील प्रगती आता लोक बघू शकत आहेत. त्यांनी भारताने एकदम ६५ अंकांची झेप घेतल्याचे सांगितले.   

ते म्हणाले की, दक्षिण आशियामध्ये भारत प्रथम  क्रमांकावर आहे आणि  पहिल्या ५० मध्ये येण्यासाठीकाही टप्पेच दूर आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, व्यवसाय सुलभीकरणातील यशासाठी केंद्र आणि राज्य सरकारने सहकारिता , स्पर्धात्मकतेच्या भावनेने  एकत्रित  काम केले आहे. पंतप्रधानांनी सांगितले की केंद्र सरकारने धोरण संचालित शासन आणि अंदाजयोग्य पारदर्शक धोरणांवरील ताण  कमी केला  आहे .

पंतप्रधान  म्हणाले  की, केंद्र  सरकारने  हाती  घेतलेल्या  सुधारणा   प्रकल्पांचा  उद्देश  हा  सर्वसामान्य  जनतेचे  राहणीमान सुधारावे असाहि आहे.ते म्हणाले, आज लहान उद्योजक व्यवसाय अधिक सुलभतेने करू  शकतात.वीज जोडण्यासारखे साधे काम सोपे झाले आहे. गेल्या चार वर्षांत 1400 पुरातन कायद्यांची विल्हेवाट लावली गेली आहे. व्यावसायिक विवादांचे निराकरण करण्यासाठी लागणारा वेळ आणि आयात केलेल्या वस्तूसाठी लागणारा वेळ यासारख्या क्षेत्रात  नाट्यमय कपात केली गेली आहे. त्यांनी इतर अनेक क्षेत्र सूचीबद्ध केले  जात असून यात मोठ्या सुधारणा केल्या गेल्या आहेत असे सांगितले. ५९ मिनिटांमध्ये एक कोटी रुपयांचे कर्ज एम.एसएमई  सेक्टरसाठी मंजूर करण्याच्या प्रयत्नांचाही त्यांनी उल्लेख  केला.

पंतप्रधान म्हणाले की आयएमएफ आणि मूडीजसारख्या संस्था आज भारताच्या भविष्याबद्दल आत्मविश्वास आणि आशावादी आहेत. पंतप्रधानांनी सांगितले की, शक्य तितक्या कमी वेळात  भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनविण्याचा हेतू आहे. अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात सुधारणा करणे आवश्यक  असून,  केंद्र सरकार एका  औद्योगिक धोरणावर काम करीत आहे, जे सध्याच्या वास्तविक परिस्थितीवर नवीन भारताच्या उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण  दृष्टीकोनातून  प्रतिबिंबित होईल. ईओडीबी रँकिंगमधील  सर्वोच्च  50 स्थानांच्या उद्दीष्टांच्या  प्राप्तीसाठी एकाच  दिशेने काम करण्यास एकत्रित  करण्यात आले आहे.

पंतप्रधान  म्हणाले  की,  कार्य  प्रक्रियेतील  मानवी हस्तक्षेप कमी करणे, आणि आधुनिक  तंत्रज्ञान  व  डिजिटल  तंत्रज्ञान अंगीकारणे अपेक्षित आहे . यानंतर पुढे सरकारतर्फे  अशा प्रकारच्या आधुनिक डिजिटल, तंत्रज्ञानात्मक  कार्य संस्कृतीला  धोरणात्मक प्रोत्साहन  देण्यात  येईल. असेही पंतप्रधान म्हणाले.

Click here to read full text speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India achieves milestone as first domestically produced C-295 aircraft is ready for flight test

Media Coverage

India achieves milestone as first domestically produced C-295 aircraft is ready for flight test
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles the demise of former Uttarakhand Chief Minister Major General Bhuwan Chandra Khanduri (Retd.)
May 19, 2026

Prime Minister Shri Narendra Modi today expressed deep grief over the passing of the former Chief Minister of Uttarakhand, Major General Bhuwan Chandra Khanduri (Retd.).

The Prime Minister noted that Major General Khanduri made invaluable contributions spanning from the armed forces to the political sphere, for which he will always be remembered. Shri Modi highlighted his unwavering dedication to the development of Uttarakhand during his tenure as Chief Minister, and described his stint as a Union Minister as truly inspiring. He further lauded his tireless efforts toward significantly improving connectivity across the nation.

The Prime Minister extended his heartfelt condolences to the family and supporters of the departed leader in this hour of grief.

The Prime Minister posted on X:

"उत्तराखंड के पूर्व मुख्यमंत्री मेजर जनरल भुवन चंद्र खण्डूडी (सेवानिवृत्त) जी के निधन से अत्यंत दुख हुआ है। सशस्त्र बलों से लेकर राजनीतिक जगत में उन्होंने बहुमूल्य योगदान दिया, जिसके लिए उन्हें सदैव याद किया जाएगा। उत्तराखंड के विकास के लिए वे हमेशा समर्पित रहे, जो मुख्यमंत्री के रूप में उनके कार्यकाल में भी साफ तौर पर दिखा। केंद्रीय मंत्री के रूप में भी उनका कार्यकाल हर किसी को प्रेरित करने वाला है। देशभर में कनेक्टिविटी की बेहतरी के लिए उन्होंने निरंतर अथक प्रयास किए। शोक की इस घड़ी में मेरी संवेदनाएं उनके परिजनों और समर्थकों के साथ हैं। ओम शांति!"