Blessed to have prayed at the Janaki Temple: PM Modi
India-Nepal ties date back to the ‘Treta Yuga’: PM Modi
Nepal teaches us how women are respected: PM Modi
India and Nepal have stood the test of times: PM Modi in Janakpur
Glad that Nepal now has a democratically elected government: PM Modi in Janakpur
We are now giving impetus to Tradition, Trade, Transport, Tourism and Trade between both countries: PM Modi in Nepal
Our vision for India is ‘Sabka Saath, Sabka Vikas’, we are moving towards building a ‘New India’ by 2022: PM Modi

उपस्थित मान्यवर आणि मोठ्या संख्येने येथे आलेल्या जनकपुरच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो-

जय सियारा, जय सियाराम

जय सियाराम, जय सियाराम,

जय सियाराम, जय सियाराम.

पंतप्रधान म्हणून ऑगस्ट २०१४ मध्ये जेव्हा पहिल्यांदा मी नेपाळला आलो होतो तेव्हा संविधान सभेतच मी सांगितले होते की, मी लवकरच जनकपुरला येईन. सर्वात आधी मी तुम्हा सर्वांची माफी मागू इच्छितो कारण मी लगेच इथे येऊ शकलो नाही, मला येथे यायला फारच उशीर झाला त्यामुळे सर्वात आधी मी तुमची माफी मागतो. परंतु असे वाटते की, कदाचित माता सितेनेच आजचा हा भद्रकाली एकादशीचा दिवस मला दर्शन देण्यासाठी निश्चित केला होता. जनक राजाची राजधानी आणि जगत माता सीतेच्या पवित्र भूमीत येऊन इथे वंदन करण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती. आज जानकी मंदिरात दर्शन घेतल्यानंतर माझी अनेक वर्षांपासूनची मनोकामना पूर्ण झाली आहे त्यामुळे मला खूप धन्य वाटत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

भारत आणि नेपाळे हे दोन देश आहेत, परंतु आपली मैत्री ही त्रेता युगापासून आहे. जनक राजा आणि दशरथ राजाने केवळ जनकपुर आणि अयोध्येलाच नाही तर भारत आणि नेपाळला देखील मैत्री आणि भागीदारीच्या बंधनात बांधले होते. हे बंधन आहे राम-सीतेचे, हे बंधन आहे बुद्धाचे देखील आणि महावीरांचेही आणि याच बंधनामुळे रामेश्वरमध्ये राहणारे लोकं ओढीने पशुपतीनाथाच्या दर्शनाला येतात. हेच बंधन लुम्बिनी मध्ये राहणाऱ्या लोकांना बोध गयेला घेऊन जाते आणि हेच बंधन, हीच आस्था, हेच स्नेह आज मला जनकपुरला घेऊन आले आहे.

रामायण काळात जनकपुरचे, महाभारत काळात विराटनगरचे, त्यानंतर सिमरॉन गंजचे, बुद्ध काळात लुम्बिनीचे; हे संबंध युगांपासून सुरु आहेत. भारत-नेपाळ संबंध कोणत्याही व्याख्येने जोडलेले नाहीत, हे संबध आहेत विश्वासाचे, हे संबंध आहेत आपलेपणाचे, हे संबंध आहे रोटी-बेटीचे. हे माता जानकीचे धाम आहे, ज्याशिवाय अयोध्या अपुरी आहे.

आपली माता देखील एक- आपला विश्वास देखील एक, आपला निसर्ग देखील एक- आपली संस्कृती देखील एक; आपला मार्ग देखील एक आणि आपली प्रार्थना देखील एक. आपल्या मेहनतीचा सुंगंध देखील आहे आणि आपल्या पराक्रमाचा प्रतिध्वनी देखील आहे. आपली दृष्टी देखील समान आहे आणि आपली सृष्टी देखील समान आहे. आपले सुख देखील समान आहे, आपली आव्हाने देखील समान आहेत. आपल्या आशा देखील समान आहेत, आपल्या आकांक्षा देखील समान आहेत. आपली इच्छा एकच आहे आणि आपला मार्ग देखील समान आहे……..आपले मन, आपली मनस्थिती आणि आपले इच्छित स्थळ देखील एकच आहे. ही अशा कर्मवीरांची भूमी आहे ज्यांच्या योगदानामुळे भारताच्या विकास गाथेला अधिक गती प्राप्त होते. नेपाळच्या सोबतीशिवाय भारताचा विश्वास अपूर्ण आहे, इतिहास अपूर्ण आहे, नेपाळ शिवाय आपले धाम अपूर्ण, नेपाळ शिवाय आपले राम अपूर्ण आहेत.

बंधू आणि भगिनींनो,

तुमची धर्म-निष्ठा समुद्राहून खोल आहे आणि तुमचा स्वाभिमान सागरमाथ्याहून उंच आहे. ज्याप्रमाणे मिथिलेची तुळस भारताच्या अंगणात पवित्रता, शुद्धता आणि मर्यादेचा सुंगंध आणते, त्याचप्रमाणे नेपाळशी असलेली भारताची आत्मीयता या संपूर्ण क्षेत्रात शांती, सुरक्षा आणि संस्कारांच्या त्रिवेणीने जोपासली जाते.

मिथिलेची संस्कृती आणि साहित्य, मिथिलेची लोक कला, मिथिलेचे आदरातिथ्य; सर्वकाही अद्भुत आहे; आणि आज मी हे सगळे अनुभवत आहे, तुमच्या प्रेमाचा अनुभव मला येत आहे, तुमच्या आशीर्वादांची जाणीव होत आहे. संपूर्ण जगात मिथिला संस्कृतीचे स्थान सर्वोच्च आहे. कवी विद्यापतींच्या रचना भारत आणि नेपाळमध्ये आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. त्यांच्या शब्दांचा गोडवा आजही भारत आणि नेपाळ दोघांच्या साहित्यात आहे.

जनकपुरला येऊन, तुमच्या लोकांचा आपलेपणा बघून असे मुळीच वाटत नाही की, मी कोणत्यातरी दुसऱ्या जागी आलो आहे, सर्वकाही आपल्यासारखे, सर्वजण आपले, आपलेपणा, हे सर्व आपलेच आहेत. मित्रांनो, नेपाळ हे अध्यात्मवाद आणि तत्त्वज्ञान केंद्र आहे. हा तो पवित्र देश आहे – जेथे लुंबिनी आहे, लुंबिनी, जिथे भगवान बुद्धांचा जन्म झाला. मित्रांनो, ही भूमी माता सीतेची, त्या मानवी मुल्यांची, त्या तत्वांची आणि त्या परंपाराची प्रतिक आहे जे आपल्या उभय देशांना एकमेकांशी जोडतात. जनक नगरी सीतामातेमुळे स्त्री-चेतनेची गंगोत्री झाली आहे. सीतामाता म्हणजे बलिदान, तपस्या, समर्पण आणि संघर्षाची मूर्ती. काठमांडूपासून कन्याकुमारीपर्यंत आपण सर्व माता सीतेच्या परंपरेचे वाहक आहोत. त्यांच्या महिमेविषयी बोलायचे झाले तर त्यांचे भक्त सर्व जगभरात आहेत.

मुलीचा आदर कसा केला जातो ही दाखवणारी ही भूमी आहे. मुलींच्या सन्मानाची ही शिकवण आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. मित्रांनो, आपला इतिहास आणि परंपरांचे जतन करण्यामध्ये नारी शक्तीची भूमिका खूप मोठी आहे. आता इथल्या मिथिला चित्रकलेचेच बघा, ही परंपरा पुढे नेण्यामध्ये सर्वाधिक योगदान आपल्या माता, भगिनी, महिलांनी दिले आहे. आणि मिथिलेची ही कला आज जगप्रसिद्ध आहे. या कलेतही, प्रत्येक क्षणाला आपल्याला निसर्गाचे, पर्यावरणाचे दर्शन होते. आज महिला सक्षमीकरण आणि हवामान बदला संदर्भातील चर्चांमध्ये मिथिलाचा जगाला हा एक मोठा संदेश आहे. जनक राजाच्या दरबारात गार्गी सारखा विदुषक आणि अष्टावक्रा सारखा विद्वान एकाचवेळी असणे हे सिद्ध करतात की, प्रशासनासोबतच विद्वत्ता आणि अध्यात्माचेदेखील महत्व दिले जायचे.

जनक राजाच्या दरबारामध्ये लोककल्याणकारी धोरणांवर विद्वानांमध्ये चर्चा व्हायची. जनक राजा स्वतः त्यात सहभागी व्हायचे; आणि त्या मंथनातून जी फलप्राप्ती व्हायची ती जनतेच्या हितासाठी आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आणि देशातील हितसंबंधांकरिता लागू केली जायची. जनक राजासाठी त्याची प्रजा त्याचे सर्वस्व होते. त्यांना त्यांचे कुटुंब, नाती हे फार महत्वाचे नव्हते. त्यांना दिवस रात्र आपल्या प्रजेची चिंता असायची, हाच त्यांच्यासाठी राजधर्म होता. म्हणूनच राजा जनकला विदेही म्हंटले जायचे. विदेही म्हणजे ज्याला आपला देह, आपले शरीर याच्याशी काही देणेघेणे नाही आणि ज्याने स्वतःला जनहितासाठी समर्पित केले आहे, स्वतःला लोककल्याणासाठी समर्पित केले आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आज नेपाळ आणि भारत, जनक राजा आणि लोककल्याणाचा हा संदेश घेऊनच मार्गक्रमण करत आहेत. नेपाळ आणि भारताचे संबंध राजकारण, कूटनीति, सामाजिक धोरण आणि त्याहूनही पुढे जाऊन देवनितीशी जोडले आहेत. व्यक्ती आणि सरकारं येत-जात राहतील पण आपले हे संबंध अजरामर आहेत. ही वेळ संस्कार, शिक्षण, शांती, सुरक्षा आणि समृद्धी यांसारख्या पंचवटीचे संरक्षण करण्याची आहे. आमचा असा विश्वास आहे की नेपाळचा विकास हा संबंधित क्षेत्रीय विकासाचा एकमेव स्त्रोत आहे. भारत आणि नेपाळची मैत्री कशी आहे, हे आपण रामचरितमानस मधील श्लोकांमधून समजू शकतो.

जे न मित्र दु:ख होहिं दुखारी।

तिन्हहि बिलोकत पातक भारी॥

¬¬
निज दु:ख गिरि सम रज करि जाना।

मित्रक दु:ख रज मेरु समाना॥

याचा अर्थ असा की, जे लोकं आपल्या मित्राच्या दु:खाने दु:खी होत नाहीत त्यांच्या केवळ दर्शनाने देखील पाप लागू शकते आणि म्हणूनच, जर तुमचे
दु:ख डोंगराएवढे विराट असेल, तर त्याला जास्त महत्त्व देऊ नका, परंतु जर मित्राचे दुःख धुळीच्या कणा इतकेच असेल तर तुम्ही ते पर्वताप्रमाणे मानून त्याला शक्य ती सर्व मदत करा.

मित्रांनो,

इतिहास साक्षीदार आहे की, जेव्हा जेव्हा एकमेकांवर संकटे आली तेव्हा भारत आणि नेपाळ दोन्ही एकत्र आले आहेत. आम्ही प्रत्येक कठीण काळामध्ये एकमेकांचे सहकार्य केले आहे. भारत अनेक वर्षांपासून नेपाळचा कायमचा विकासातील भागीदार आहे. आमच्या ‘शेजारधर्म सर्वप्रथम’ या धोरणामध्ये नेपाळ नेहमीच अग्रस्थानी आहे.

आज भारत, जगातली तिसरी सर्वात मोठी, सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना नेपाळ देखील जलद गतीने विकासाच्या उंची गाठत आहे. या भागीदारीला नवीन ऊर्जा देण्यासाठी नेपाळला येण्याची संधी आज मला मिळाली आहे.

बंधू आणि भगिनींनो,

विकासाची पहिली अट आहे लोकशाही. तुम्ही लोकशाही व्यवस्थेला बळकट करत आहात याचा मला आनंद आहे. अलीकडेच तुमच्याकडे निवडणुका झाल्या. तुम्ही नवीन सरकार निवडले आहे. तुमच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जनादेश दिला आहे. एका वर्षाच्या आत तीन स्तरांवर निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल मी तुमचे अभिनंदन करतो. नेपाळच्या इतिहासात प्रथमच नेपाळमधील सर्व सात प्रांतांमध्ये प्रांतीय सरकारे अस्तित्वात आहेत. हे केवळ नेपाळसाठीच अभिमानाची बाब नाही, तर भारत आणि या संपूर्ण प्रदेशासाठी अभिमानास्पद बाब आहे. नेपाळ सामाजिक-आर्थिक बदलासाठी एका नवीन टप्प्यात प्रवेश करत आहे, जो सुशासन आणि समावेशक विकासावर आधारित आहे.

या वर्षी, दहा वर्षांपूर्वी, नेपाळच्या युवकांनी गोळीचा मार्ग सोडून मतदानाचा मार्ग निवडला. युद्ध ते बुद्धां पर्यंतचे हे अर्थपूर्ण परिवर्तन घडवून आणण्यासाठी देखील मी नेपाळच्या लोकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. लोकशाही मूल्य हा आणखी एक दुवा आहे जो भारत आणि नेपाळ मधील प्राचीन संबंधांना प्रोत्साहन देतो. लोकशाही ही अशी शक्ती आहे जी सर्वसामान्य लोकांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्याची संधी आणि हक्क देते. भारताला या शक्तीची जाणीव झाली आहे आणि आज भारताचा प्रत्येक नागरिक आपली स्वप्ने पूर्ण करत आहे. तुम्हाला देखील तुमच्या नेपाळला त्याच मार्गावर मार्गक्रमण करताना पहायचे आहे हे मला तुमच्या सर्वांच्या नजरेत दिसत आहे. मी तुम्हा सर्वांच्या डोळ्यात नेपाळसाठी तिचं स्वप्ने पाहत आहे.

मित्रांनो,

अलीकडेच मला दिल्लीत नेपाळचे पंतप्रधान ओली जी, यांचे स्वागत करण्याची संधी मिळाली. नेपाळसाठी त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल जाणून घेण्याची संधी मला मिळाली. ओलीजी यांनी समृद्ध नेपाळ, सुखी नेपाळची स्वप्ने पाहीली आहेत. भारत नेहमीच नेपाळच्या समृद्धी आणि भरभराटीची कामना करत आला आहे आणि नेहमीच करत राहील. पंतप्रधान ओलीजी यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सव्वाशे कोटी भारतीय आणि भारत सरकारतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. माझे जे भारतासाठी विचार आहेत तसेच त्यांचे देखील नेपाळसाठी आहेत.

भारतामध्ये आमचे सरकार सबका साथ सबका विकास हा मूलभूत मंत्र घेऊन पुढे जात आहे. समाजातील एकही घटक, देशातील एकही भाग विकासधारेपासून वंचित राहू नये म्हणून आम्ही निरंतर प्रयत्न करत आहोत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण प्रत्येक दिशेला विकासाचा रथ धावत आहे. जिथे अजूनपर्यंत विकास पोहोचला नाही, विशेषतः अशा ठिकाणी सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये पूर्वोत्तर म्हणजेच भारताच्या पूर्वेकडील जो भाग नेपाळच्या सीमेजवळ आहे त्यावर विशेष लक्ष दिले जात आहे. उत्तरप्रदेश पासून बिहार पर्यंत, ईशान्य भारत, पश्चिम बंगाल पासून ओदिशा पर्यंत, या संपूर्ण क्षेत्राला उर्वरित भारतासोबत आणण्याचा संकल्प आम्ही केला आहे. या भागात जे काही विकासकार्य होत आहे त्याचा फायदा शेजारी देश म्हणून नेपाळला नक्कीच होईल.

बंधू आणि भगिनींनो,

जेव्हा मी ‘सबका साथ सबका विकासा’ बद्दल बोलतो, तेव्हा केवळ भारतासाठीच नाही तर शेजारच्या देशासाठी देखील माझी हीच इच्छा आहे; आणि आता, जेव्हा नेपाळमध्ये “समृद्ध नेपाळ-सुखी नेपाळी” बोलले जाते, तेव्हा माझे मन अधिक आनंदी होते. सव्वाशे कोटी भारतीय देखील आनंदित होतात. जनकपूरच्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, आम्ही भारतात एक संकल्प आहे, हा संकल्प आहे नव भारताच्या निर्मितीचा.

2022 ला भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. तोपर्यंत सव्वाशे कोटी भारतीयांनी नव भारताच्या निर्मितीचे लक्ष्य पूर्ण करण्याचे ठरविले आहे. आम्ही एक नवीन भारत निर्माण करीत आहोत जेथे गरीबातील गरीब व्यक्तीला देखील प्रगतीची समान संधी मिळेल. जिथे भेदभाव, गरीब श्रीमंत याला थारा नसेल, सर्वांचा आदर केला जाईल. जिथे मुलांना शिक्षण, तरुणांना रोजगार आणि वृद्धांना औषधोपचार उपलब्ध होतील. जीवन सुलभ असावे, सर्वसामान्यांना व्यवस्थेशी झगडावे लागणार नाही. समाज आणि व्यवस्था भ्रष्टाचार मुक्त असतील, अशा नव भारताच्या दिशेने आम्ही मार्गक्रमण करत आहोत.

आम्ही भारत आणि प्रशासनामध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत. प्रणाली सुलभ केली आहे आणि यासाठी आम्ही ज्या उपाययोजना केल्या आहेत, त्याचे जगभरातून कौतुक होत आहे. आम्ही राष्ट्र उभारणी आणि लोकसहभागाचा संबंध अधिक दृढ करत आहेत. आज मी तुम्हाला विश्वास देवू इच्छितो की, नेपाळच्या सामान्य जनतेचे जीवन समृद्ध करण्यासाठी सव्वाशे कोटी भारतीयांना योगदान देताना खूप आनंद होईल.

मित्रांनो, जेव्हा आपण एक दुसऱ्याच्या घरी जातो तेव्हा बंधुभाव अधिक वृद्धिंगत होतो. मला आनंद झाला आहे की नेपाळच्या पंतप्रधानांच्या भारत भेटीनंतर लगेचच मला आज येथे भेट देण्याची संधी मिळाली आहे. ज्याप्रमाणे मी येथे वारंवार येतो, त्याचप्रमाणे दोन्ही देशांतील लोक देखील कोणत्याही अडथळ्याशिवाय प्रवास करू शकले पाहिजेत. आपण हिमालयाने जोडले गेले आहोत, शेतीने जोडले आहोत, असंख्य कच्या पक्या रस्त्यांनी जोडले आहोत. छोट्या मोठ्या अनेक नद्यांनी जोडले आहोत आणि आम्ही आमच्या खुल्या सीमेने देखील जोडलेले आहोत. परंतु आजच्या युगात एवढेच पुरेसे नाही. मुख्यमंत्र्यांनी येथे जेवढे विषय मांडले, मी ते थोडक्यत पूर्ण करतो. आपल्याला महामार्गाने जोडणे गरजेचे, आपल्याला माहितीच्या मार्गाने म्हणजेच आय-वे ने जोडले पाहिजे, आपल्याला ट्रान्स वेज म्हणजेच विजेच्या तारांनी देखील जोडले पाहिजे, आपल्याला रेल्वेने जोडायचे आहे, आपल्याला जकात नाक्यांनी देखील जोडले पाहिजे, आपल्याला विमान सेवेचा देखील विस्तार केला पाहिजे. आपल्याला आंतरिक जलमार्गाने, जलमार्गांनी देखील जोडले पाहिजे. जल असो, भूमी असो, आकाश असो की अंतराळ असो आपल्याला एकत्र यायचे आहे. उभय देशांमधील नागरिकांचे संबध अधिक मजबूत होण्यासाठी कनेक्टीव्हिटी महत्वाची आहे. याच कारणास्तव भारत आणि नेपाळ दरम्यानच्या कनेक्टीव्हिटीला प्राधान्य देण्यात येत आहे.

आजच पंतप्रधान ओलीजी यांच्यासोबत मी जनकपूर ते अयोध्या या बस सेवेचे उद्घाटन केले. मागील महिन्यातच पंतप्रधान ओलजी आणि मी बिरगंजमध्ये पहिल्या एकीकृत चेक पोस्टचे उद्घाटन केले होते. जेव्हा हे चेकपोस्ट पूर्णतः कार्यान्वित होईल तेव्हा सीमेपार व्यापार आणि प्रवास अधिक सुलभ होईल. जयनगर-जनकपुर रेल्वे मार्गाचे काम देखील जोरात सुरु आहे.

बंधू आणि भगिनींनो,

या वर्ष अखेरीपर्यंत या मार्गाचे काम पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. जेव्हा या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण होईल, तेव्हा नेपाळ-भारताच्या विशाल नेटवर्कमध्ये रेल्वेचे नेटवर्क देखील जोडले जाईल. आता आम्ही बिहारच्या रक्सौला मार्गे काठमांडूला भारताशी जोडण्याच्या दिशेने अधिक प्रयत्न करत आहोत. एवढेच नाही तर आम्ही जलमार्गाने देखील भारत आणि नेपाळला जोडण्याचे प्रयत्न करीत आहोत. नेपाळ, भारतासोबत जलमार्गाने देखील जोडला जाईल. या जलमार्गांमुळे नेपाळमध्ये तयार झालेले सामान जगातील इतर देशांना सहज उपलब्ध होईल. यामुळे नेपाळमध्ये उद्योगांना चालना मिळेल, नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हे प्रकल्प केवळ नेपाळमधील सामाजिक-आर्थिक बदलासाठीच महत्त्वाचे नाहीत तर व्यवसायाच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचे आहेत.

आज भारत आणि नेपाळ दरम्यान मोठ्या प्रमाणात व्यापार होतो. व्यापारासाठी लोकं प्रवास करतात. गेल्या महिन्यात आम्ही कृषी क्षेत्रात एका नवीन भागीदारीची घोषणा केली. मुख्यमंत्री आपल्याला सांगत होते, आम्ही एक नवीन भागीदारीची घोषणा केली आहे आणि या भागीदारीमुळे शेतीक्षेत्रातील सहकार्याला प्रोत्साहन मिळेल. उभय देशांतील शेतकऱ्यांचे उत्पन्न कसे वाढवले जाईल यावर लक्ष दिले जाईल. शेतीक्षेत्रात, आम्ही विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापरासाठी सहकार्य वाढवू.

आजच्या काळात तंत्रज्ञानाशिवाय विकास शक्य नाही. अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील पाच अव्वल देशांमध्ये भारताचे स्थान आहे. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा मी पहिल्यांदा नेपाळला आलो तेव्हा मी म्हटले होते की भारत-नेपाळसारख्या शेजारील देशासाठी एखादा उपग्रह प्रक्षेपित करेल. गेल्या वर्षी मी माझे वचन पूर्ण केले आहे. गेल्या वर्षी प्रक्षेपित केलेला दक्षिण-आशियाच उपग्रह पूर्ण क्षमतेने काम करत आहे आणि नेपाळला त्याचा पूर्ण लाभ मिळत आहे.

बंधू आणि भगिनींनो,

भारत आणि नेपाळच्या विकासासाठी आम्ही पाच टी (T) मार्गावर चालत आहोत. पहिला T आहे ट्रेडीशनचा, दुसरा T आहे ट्रेडचा, तिसरा T आहे टुरीजमाचा, चौथा T आहे टेक्नोलॉजीचा आणि पाचवा T आहे ट्रान्सपोर्टचा, म्हणजेच परंपरा, व्यापार, पर्यटन, तंत्रज्ञान आणि दळणवळणाच्या माध्यमातून आम्ही नेपाळ आणि भारताला विकासाच्या मार्गावर घेऊन जाऊ इच्छितो.

मित्रांनो, संस्कृतीशिवाय भारत आणि नेपाळ दरम्यान व्यापारिक संबंधांचा एक महत्वाचा दुवा देखील आहे. वीजनिर्मिती क्षेत्रात नेपाळ जलदगतीने विकास करत आहे. आज भारताकडून अंदाजे 450 मेगावॉट वीज पुरवठा नेपाळला केला जातो, यासाठी आम्ही नवीन ट्रान्समिशन लाईन टाकली आहे.

मित्रांनो, 2014 मध्ये नेपाळच्या संविधान सभेत, मी म्हणालो होतो की तेलाची वाहतूक ट्रकने का करायची, थेट पाइप लाइनने का नाही?. आपल्याला हे जाणून आनंद होईल की आम्ही मोतीहारी-अमलेख गंज ऑईल पाईपलाईनचेही काम सुरु केले आहे.

भारतात आमचे सरकार ‘स्वदेश दर्शन’ नावाची योजना राबवत आहे. ज्या अंतर्गत आम्ही आमच्या ऐतिहासिक वारशाची आणि श्रद्धेची ठिकाणे एकमेकांना जोडत आहोत. रामायण सर्किटमध्ये आम्ही त्या सर्व स्थानांना जोडत आहोत जिथे प्रभू राम आणि माता जानकीचा चरण स्पर्श झाला आहे. आता आम्ही या शृंखलेमध्ये नेपाळला देखील जोडण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. येथे, जिथे जिथे रामायणाची चिन्ह आहेत, त्यांना उर्वरित भारताशी जोडून भक्तांना स्वस्त आणि आकर्षक प्रवासाचा आनंद मिळेल आणि ते येथे मोठ्या संख्येने, नेपाळला येवून, इथल्या पर्यटनाचा विकास होईल.

बंधू आणि भगिनींनो,

दरवर्षी विवाह पंचमीला भारतातील हजारो भाविक अवधहून जनकपूरला येतात. संपूर्ण वर्षभर भाविकांची मांदियाळी सुरु असते. मला हे जाहीर करताना आनंदी होत आहे की भक्तांनं कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून आम्ही जनकपूर आणि जवळपासच्या परिसरातील विकासासाठी नेपाळ सरकारच्या योजनांना सहकार्य करू. या कामासाठी भारतातर्फे शंभर कोटी रुपये दिले जातील. यासाठी नेपाळ सरकार आणि प्रांतीय शासनासोबत मिळून प्रकल्पांची निवड केली जाईल. जनक राजाच्या काळापासून ही परंपरा सुरु आहे, जनकपुरने अयोध्येलाच नाही तर संपूर्ण समजाला काही ना काहीतरी दिले आहे. जनकपूरने दिले आहे, मी तर इथे केवळ माता जानकीचे दर्शन घ्यायला आलो होतो. भारताच्या सव्वाशे कोटी लोकांच्या वतीने, जनकापूरसाठीच्या या घोषणा मी माता जानकीच्या चरणी समर्पित करतो.

असेच अजून दोन कार्यक्रम आहेत. बौद्ध सर्किट आणि जैन सर्कीट ज्यामध्ये बुद्ध आणि महावीर जैन संबंधित भारतातील सर्व संस्था एकमेकांशी जोडण्याचे काम सुरु आहे. नेपाळमध्ये अनेक बौद्ध आणि जैन श्रद्धास्थान आहेत. हे देखील उभय देशातील भाविक आणि पर्यटकांच्या माध्यमातून आपले बंध अधिक दृढ करायला मदत करतील. यामुळे, नेपाळमध्ये युवकांना रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील.

बंधू आणि भगिनींनो,

आपली खाद्यसंस्कृती आणि व्यवहारात बरेच साम्य आहे. भारत आणि नेपाळमध्ये मैथिली भाषिकांची संख्या समान आहे. जागतिक स्तरावर मैथिली कला, संस्कृती आणि सभ्यतेची चर्चा केली जात आहे. जेव्हा दोन्ही देश संयुक्तपणे मैथिलीच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न करतात, तेव्हा या भाषेचा विकास अधिक सहजपणे शक्य होऊ शकेल. मला कळले आहे की, काही मैथिली चित्रपट निर्माते आता नेपाळ-भारतासह कतार आणि दुबईमध्ये देखील एकाचवेळी नवीन मैथिली चित्रपट प्रदर्शित करणार आहेत. हे एक स्वागतार्ह पाउल आहे याला प्रोत्साहन दिले पाहिजे. जसे इथे मोठ्या संख्येने मैथिली भाषिक लोकं आहेत तसेच भारतात मोठ्या संख्यने नेपाळी भाषिक आहेत. नेपाळी भाषेतील साहित्याच्या अनुवादाला देखील प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तुम्हाला मी हे सांगू इच्छितो की, भारतीय घटनेने मान्यता दिलेल्या भाषांमध्ये नेपाळी भाषेचा देखील समावेश आहे.

बंधू आणि भगिनींनो,

आणखी एक क्षेत्र आहे जेथे आपली भागीदारी पुढे प्रगती करू शकते. भारतातील जनतेने स्वच्छतेचे खूप मोठे अभियान सुरु केले आहे. बिहार आणि आसपासच्या दुसऱ्या राज्यांमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडे जात असाल, तेव्हा तुम्ही पहिले असेल आणि ऐकले असेल- केवळ तीन-चार वर्षांमध्ये भरतातील 80 टक्क्यांहून अधिक गावं हगणदारीमुक्त झाली आहेत. भारतातील प्रत्येक शाळेत मुलींसाठी वेगळे शौचालय बांधण्यात आले आहे. मला हे ऐकून फार आनंद झाला की, स्वच्छ भारत आणि स्वच्छ गंगा अभियानाप्रमाणेच तुम्ही लोकांनी देखील जनकपुरमधील ऐतिहासिक धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेचे अभियान सुरु केले आहे. यासाठी मी महापौरांचे अभिनंदन करतो.

मी विशेषतः इथल्या महापौरांचे अभिनंदन करू इच्छितो, त्यांच्या साथीदारांचे अभिनंदन करू इच्छितो, इथल्या तरुणांचे अभिनंदन करू इच्छितो, इथल्या आमदारांचे, खासदारांचे अभिनंदन करू इच्छितो, ज्यांनी स्वच्छ जनकपुर अभियान सुरु केले आहे. बंधू आणि भगिनींनो आज मी माता जानकीचे दर्शन घेतले. उद्या मुक्तीनाथ धाम आणि नंतर पशुपातीनाथाचा आशीर्वाद घेण्याची देखील संधी मिळणार आहे. मला विश्वास आहे की देवाचा आशीर्वाद आणि तुम्हा जनता जनार्दनच्या आशीर्वादाने जे काही करार होतील ते समृद्ध नेपाळ आणि वैभवशाली भारताचा संकल्प साकारण्यामध्ये सहाय्य करतील.

मी पुन्हा एकदा नेपाळचे पंतप्रधान आदरणीय ओलीजी, राज्य सरकार आणि इथल्या जनतेचे मनपूर्वक आभार मानतो.

जय सियाराम। जय सियाराम।

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India leads globally in renewable energy; records highest-ever 31.25 GW non-fossil addition in FY 25-26: Pralhad Joshi.

Media Coverage

India leads globally in renewable energy; records highest-ever 31.25 GW non-fossil addition in FY 25-26: Pralhad Joshi.
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
'Vande Mataram' rekindled an idea deeply rooted in India for thousands of years: PM Modi in Lok Sabha
December 08, 2025
Vande Mataram energised our freedom movement: PM
It is a matter of pride for all of us that we are witnessing 150 years of Vande Mataram: PM
Vande Mataram is the force that drives us to achieve the dreams our freedom fighters envisioned: PM
Vande Mataram rekindled an idea deeply rooted in India for thousands of years: PM
Vande Mataram also contained the cultural energy of thousands of years, it also had the fervor for freedom and the vision of an independent India: PM
The deep connection of Vande Mataram with the people reflects the journey of our freedom movement: PM
Vande Mataram gave strength and direction to our freedom movement: PM
Vande Mataram was the all-encompassing mantra that inspired freedom, sacrifice, strength, purity, dedication, and resilience: PM

आदरणीय अध्यक्ष महोदय,

मैं आपका और सदन के सभी माननीय सदस्यों का हृदय से आभार व्यक्त करता हूं कि हमने इस महत्वपूर्ण अवसर पर एक सामूहिक चर्चा का रास्ता चुना है, जिस मंत्र ने, जिस जय घोष ने देश की आजादी के आंदोलन को ऊर्जा दी थी, प्रेरणा दी थी, त्याग और तपस्या का मार्ग दिखाया था, उस वंदे मातरम का पुण्य स्मरण करना, इस सदन में हम सब का यह बहुत बड़ा सौभाग्य है। और हमारे लिए गर्व की बात है कि वंदे मातरम के 150 वर्ष निमित्त, इस ऐतिहासिक अवसर के हम साक्षी बना रहे हैं। एक ऐसा कालखंड, जो हमारे सामने इतिहास के अनगिनत घटनाओं को अपने सामने लेकर के आता है। यह चर्चा सदन की प्रतिबद्धता को तो प्रकट करेगी ही, लेकिन आने वाली पीढियां के लिए भी, दर पीढ़ी के लिए भी यह शिक्षा का कारण बन सकती है, अगर हम सब मिलकर के इसका सदुपयोग करें तो।

आदरणीय अध्यक्ष जी,

यह एक ऐसा कालखंड है, जब इतिहास के कई प्रेरक अध्याय फिर से हमारे सामने उजागर हुए हैं। अभी-अभी हमने हमारे संविधान के 75 वर्ष गौरवपूर्व मनाए हैं। आज देश सरदार वल्लभ भाई पटेल की और भगवान बिरसा मुंडा की 150वीं जयंती भी मना रहा है और अभी-अभी हमने गुरु तेग बहादुर जी का 350वां बलिदान दिवस भी बनाया है और आज हम वंदे मातरम की 150 वर्ष निमित्त सदन की एक सामूहिक ऊर्जा को, उसकी अनुभूति करने का प्रयास कर रहे हैं। वंदे मातरम 150 वर्ष की यह यात्रा अनेक पड़ावों से गुजरी है।

लेकिन आदरणीय अध्यक्ष जी,

वंदे मातरम को जब 50 वर्ष हुए, तब देश गुलामी में जीने के लिए मजबूर था और वंदे मातरम के 100 साल हुए, तब देश आपातकाल की जंजीरों में जकड़ा हुआ था। जब वंदे मातरम 100 साल के अत्यंत उत्तम पर्व था, तब भारत के संविधान का गला घोट दिया गया था। जब वंदे मातरम 100 साल का हुआ, तब देशभक्ति के लिए जीने-मरने वाले लोगों को जेल के सलाखों के पीछे बंद कर दिया गया था। जिस वंदे मातरम के गीत ने देश को आजादी की ऊर्जा दी थी, उसके जब 100 साल हुए, तो दुर्भाग्य से एक काला कालखंड हमारे इतिहास में उजागर हो गया। हम लोकतंत्र के (अस्पष्ट) गिरोह में थे।

आदरणीय अध्यक्ष जी,

150 वर्ष उस महान अध्याय को, उस गौरव को पुनः स्थापित करने का अवसर है और मैं मानता हूं, सदन ने भी और देश ने भी इस अवसर को जाने नहीं देना चाहिए। यही वंदे मातरम है, जिसने 1947 में देश को आजादी दिलाई। स्वतंत्रता संग्राम का भावनात्मक नेतृत्व इस वंदे मातरम के जयघोष में था।

आदरणीय अध्यक्ष जी,

आपके समक्ष आज जब मैं वंदे मातरम 150 निमित्त चर्चा के लिए आरंभ करने खड़ा हुआ हूं। यहां कोई पक्ष प्रतिपक्ष नहीं है, क्योंकि हम सब यहां जो बैठे हैं, एक्चुअली हमारे लिए ऋण स्वीकार करने का अवसर है कि जिस वंदे मातरम के कारण लक्ष्यावादी लोग आजादी का आंदोलन चला रहे थे और उसी का परिणाम है कि आज हम सब यहां बैठे हैं और इसलिए हम सभी सांसदों के लिए, हम सभी जनप्रतिनिधियों के लिए वंदे मातरम के ऋण स्वीकार करने का यह पावन पर्व है। और इससे हम प्रेरणा लेकर के वंदे मातरम की जिस भावना ने देश की आजादी का जंग लड़ा, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम पूरा देश एक स्वर से वंदे मातरम बोलकर आगे बढ़ा, फिर से एक बार अवसर है कि आओ, हम सब मिलकर चलें, देश को साथ लेकर चलें, आजादी का दीवानों ने जो सपने देखे थे, उन सपनों को पूरा करने के लिए वंदे मातरम 150 हम सब की प्रेरणा बने, हम सब की ऊर्जा बने और देश आत्मनिर्भर बने, 2047 में विकसित भारत बनाकर के हम रहें, इस संकल्प को दोहराने के लिए यह वंदे मातरम हमारे लिए एक बहुत बड़ा अवसर है।

आदरणीय अध्यक्ष जी,

दादा तबीयत तो ठीक है ना! नहीं कभी-कभी इस उम्र में हो जाता है।

आदरणीय अध्यक्ष जी,

वंदे मातरम की इस यात्रा की शुरुआत बंकिम चंद्र जी ने 1875 में की थी और गीत ऐसे समय लिखा गया था, जब 1857 के स्वतंत्रता संग्राम के बाद अंग्रेज सल्तनत बौखलाई हुई थी। भारत पर भांति-भांति के दबाव डाल रहे थी, भांति-भांति के ज़ुल्म कर रही थी और भारत के लोगों को मजबूर किया जा रहा था अंग्रेजों के द्वारा और उस समय उनका जो राष्ट्रीय गीत था, God Save The Queen, इसको भारत में घर-घर पहुंचाने का एक षड्यंत्र चल रहा था। ऐसे समय बंकिम दा ने चुनौती दी और ईट का जवाब पत्थर से दिया और उसमें से वंदे मातरम का जन्म हुआ। इसके कुछ वर्ष बाद, 1882 में जब उन्होंने आनंद मठ लिखा, तो उस गीत का उसमें समावेश किया गया।

आदरणीय अध्यक्ष जी,

वंदे मातरम ने उस विचार को पुनर्जीवित किया था, जो हजारों वर्ष से भारत की रग-रग में रचा-बसा था। उसी भाव को, उसी संस्कारों को, उसी संस्कृति को, उसी परंपरा को उन्होंने बहुत ही उत्तम शब्दों में, उत्तम भाव के साथ, वंदे मातरम के रूप में हम सबको बहुत बड़ी सौगात दी थी। वंदे मातरम, यह सिर्फ केवल राजनीतिक आजादी की लड़ाई का मंत्र नहीं था, सिर्फ हम अंग्रेज जाएं और हम खड़े हो जाएं, अपनी राह पर चलें, इतनी मात्र तक वंदे मातरम प्रेरित नहीं करता था, वो उससे कहीं आगे था। आजादी की लड़ाई इस मातृभूमि को मुक्त कराने का भी जंग था। अपनी मां भारती को उन बेड़ियों से मुक्ति दिलाने का एक पवित्र जंग था और वंदे मातरम की पृष्ठभूमि हम देखें, उसके संस्कार सरिता देखें, तो हमारे यहां वेद काल से एक बात बार-बार हमारे सामने आई है। जब वंदे मातरम कहते हैं, तो वही वेद काल की बात हमें याद आती है। वेद काल से कहा गया है "माता भूमिः पुत्रोऽहं पृथिव्याः" अर्थात यह भूमि मेरी माता है और मैं पृथ्वी का पुत्र हूं।

आदरणीय अध्यक्ष जी,

यही वह विचार है, जिसको प्रभु श्री राम ने भी लंका के वैभव को छोड़ते हुए कहा था "जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी"। वंदे मातरम, यही महान सांस्कृतिक परंपरा का एक आधुनिक अवतार है।

आदरणीय अध्यक्ष जी,

बंकिम दा ने जब वंदे मातरम की रचना की, तो स्वाभाविक ही वह स्वतंत्रता आंदोलन का स्वर बन गया। पूर्व से पश्चिम, उत्तर से दक्षिण वंदे, मातरम हर भारतीय का संकल्प बन गया। इसलिए वंदे मातरम की स्‍तुति में लिखा गया था, “मातृभूमि स्वतंत्रता की वेदिका पर मोदमय, मातृभूमि स्वतंत्रता की वेदिका पर मोदमय, स्वार्थ का बलिदान है, ये शब्द हैं वंदे मातरम, है सजीवन मंत्र भी, यह विश्व विजयी मंत्र भी, शक्ति का आह्वान है, यह शब्द वंदे मातरम। उष्ण शोणित से लिखो, वक्‍तस्‍थलि को चीरकर वीर का अभिमान है, यह शब्द वंदे मातरम।”

आदरणीय अध्यक्ष जी,

कुछ दिन पूर्व, जब वंदे मातरम 150 का आरंभ हो रहा था, तो मैंने उस आयोजन में कहा था, वंदे मातरम हजारों वर्ष की सांस्‍कृतिक ऊर्जा भी थी। उसमें आजादी का जज्बा भी था और आजाद भारत का विजन भी था। अंग्रेजों के उस दौर में एक फैशन हो गई थी, भारत को कमजोर, निकम्मा, आलसी, कर्महीन इस प्रकार भारत को जितना नीचा दिखा सकें, ऐसी एक फैशन बन गई थी और उसमें हमारे यहां भी जिन्होंने तैयार किए थे, वह लोग भी वही भाषा बोलते थे। तब बंकिम दा ने उस हीन भावना को भी झंकझोरने के लिए और सामर्थ्य का परिचय कराने के लिए, वंदे मातरम के भारत के सामर्थ्यशाली रूप को प्रकट करते हुए, आपने लिखा था, त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणी,कमला कमलदलविहारिणी, वाणी विद्यादायिनी। नमामि त्वां नमामि कमलाम्, अमलाम् अतुलां सुजलां सुफलां मातरम्॥ वन्दे मातरम्॥ अर्थात भारत माता ज्ञान और समृद्धि की देवी भी हैं और दुश्मनों के सामने अस्त्र-शस्त्र धारण करने वाली चंडी भी हैं।

अध्यक्ष जी,

यह शब्द, यह भाव, यह प्रेरणा, गुलामी की हताशा में हम भारतीयों को हौसला देने वाले थे। इन वाक्यों ने तब करोड़ों देशवासियों को यह एहसास कराया की लड़ाई किसी जमीन के टुकड़े के लिए नहीं है, यह लड़ाई सिर्फ सत्ता के सिंहासन को कब्जा करने के लिए नहीं है, यह गुलामी की बेड़ियों को मुक्त कर हजारों साल की महान जो परंपराएं थी, महान संस्कृति, जो गौरवपूर्ण इतिहास था, उसको फिर से पुनर्जन्म कराने का संकल्प इसमें है।

आदरणीय अध्यक्ष जी,

वंदे मातरम, इसका जो जन-जन से जुड़ाव था, यह हमारे स्वतंत्रता संग्राम के एक लंबी गाथा अभिव्यक्त होती है।

आदरणीय अध्यक्ष जी,

जब भी जैसे किसी नदी की चर्चा होती है, चाहे सिंधु हो, सरस्वती हो, कावेरी हो, गोदावरी हो, गंगा हो, यमुना हो, उस नदी के साथ एक सांस्कृतिक धारा प्रवाह, एक विकास यात्रा का धारा प्रवाह, एक जन-जीवन की यात्रा का प्रवाह, उसके साथ जुड़ जाता है। लेकिन क्या कभी किसी ने सोचा है कि आजादी जंग के हर पड़ाव, वो पूरी यात्रा वंदे मातरम की भावनाओं से गुजरता था। उसके तट पर पल्लवित होता था, ऐसा भाव काव्य शायद दुनिया में कभी उपलब्ध नहीं होगा।

आदरणीय अध्यक्ष जी,

अंग्रेज समझ चुके थे कि 1857 के बाद लंबे समय तक भारत में टिकना उनके लिए मुश्किल लग रहा था और जिस प्रकार से वह अपने सपने लेकर के आए थे, तब उनको लगा कि जब तक, जब तक भारत को बाटेंगे नहीं, जब तक भारत को टुकडों में नहीं बाटेंगे, भारत में ही लोगों को एक-दूसरे से लड़ाएंगे नहीं, तब तक यहां राज करना मुश्किल है और अंग्रेजों ने बाटों और राज करो, इस रास्ते को चुना और उन्होंने बंगाल को इसकी प्रयोगशाला बनाया क्यूंकि अंग्रेज़ भी जानते थे, वह एक वक्त था जब बंगाल का बौद्धिक सामर्थ्‍य देश को दिशा देता था, देश को ताकत देता था, देश को प्रेरणा देता था और इसलिए अंग्रेज भी चाहते थे कि बंगाल का यह जो सामर्थ्‍य है, वह पूरे देश की शक्ति का एक प्रकार से केंद्र बिंदु है। और इसलिए अंग्रेजों ने सबसे पहले बंगाल के टुकड़े करने की दिशा में काम किया। और अंग्रेजों का मानना था कि एक बार बंगाल टूट गया, तो यह देश भी टूट जाएगा और वो यावच चन्द्र-दिवाकरौ राज करते रहेंगे, यह उनकी सोच थी। 1905 में अंग्रेजों ने बंगाल का विभाजन किया, लेकिन जब अंग्रेजों ने 1905 में यह पाप किया, तो वंदे मातरम चट्टान की तरह खड़ा रहा। बंगाल की एकता के लिए वंदे मातरम गली-गली का नाद बन गया था और वही नारा प्रेरणा देता था। अंग्रेजों ने बंगाल विभाजन के साथ ही भारत को कमजोर करने के बीज और अधिक बोने की दिशा पकड़ ली थी, लेकिन वंदे मातरम एक स्वर, एक सूत्र के रूप में अंग्रेजों के लिए चुनौती बनता गया और देश के लिए चट्टान बनता गया।

आदरणीय अध्यक्ष जी,

बंगाल का विभाजन तो हुआ, लेकिन एक बहुत बड़ा स्वदेशी आंदोलन खड़ा हुआ और तब वंदे मातरम हर तरफ गूंज रहा था। अंग्रेज समझ गए थे कि बंगाल की धरती से निकला, बंकिम दा का यह भाव सूत्र, बंकित बाबू बोलें अच्छा थैंक यू थैंक यू थैंक यू आपकी भावनाओं का मैं आदर करता हूं। बंकिम बाबू ने, बंकिम बाबू ने थैंक यू दादा थैंक यू, आपको तो दादा कह सकता हूं ना, वरना उसमें भी आपको ऐतराज हो जाएगा। बंकिम बाबू ने यह जो भाव विश्व तैयार किया था, उनके भाव गीत के द्वारा, उन्होंने अंग्रेजों को हिला दिया और अंग्रेजों ने देखिए कितनी कमजोरी होगी और इस गीत की ताकत कितनी होगी, अंग्रेजों ने उसको कानूनी रूप से प्रतिबंध लगाने के लिए मजबूर होना पड़ा था। गाने पर सजा, छापने पर सजा, इतना ही नहीं, वंदे मातरम शब्द बोलने पर भी सजा, इतने कठोर कानून लागू कर दिए गए थे। हमारे देश की आजादी के आंदोलन में सैकड़ों महिलाओं ने नेतृत्व किया, लक्ष्यावधि महिलाओं ने योगदान दिया। एक घटना का मैं जिक्र करना चाहता हूं, बारीसाल, बारीसाल में वंदे मातरम गाने पर सर्वाधिक जुल्म हुए थे। वो बारीसाल आज भारत का हिस्सा नहीं रहा है और उस समय बारीसाल के हमारे माताएं, बहने, बच्चे मैदान उतरे थे, वंदे मातरम के स्वाभिमान के लिए, इस प्रतिबंध के विरोध में लड़ाई के मैदान में उतरी थी और तब बारीसाल कि यह वीरांगना श्रीमती सरोजिनी घोष, जिन्होंने उस जमाने में वहां की भावनाओं को देखिए और उन्होंने कहा था की वंदे मातरम यह जो प्रतिबंध लगा है, जब तक यह प्रतिबंध नहीं हटता है, मैं अपनी चूड़ियां जो पहनती हूं, वो निकाल दूंगी। भारत में वह एक जमाना था, चूड़ी निकालना यानी महिला के जीवन की एक बहुत बड़ी घटना हुआ करती थी, लेकिन उनके लिए वंदे मातरम वह भावना थी, उन्होंने अपनी सोने की चूड़ियां, जब तक वंदे मातरम प्रतिबंध नहीं हटेगा, मैं दोबारा नहीं धारण करूंगी, ऐसा बड़ा व्रत ले लिया था। हमारे देश के बालक भी पीछे नहीं रहे थे, उनको कोड़े की सजा होती थी, छोटी-छोटी उम्र में उनको जेल में बंद कर दिया जाता था और उन दिनों खास करके बंगाल की गलियों में लगातार वंदे मातरम के लिए प्रभात फेरियां निकलती थी। अंग्रेजों की नाक में दम कर दिया था और उस समय एक गीत गूंजता था बंगाल में जाए जाबे जीवोनो चोले, जाए जाबे जीवोनो चोले, जोगोतो माझे तोमार काँधे वन्दे मातरम बोले (In Bengali) अर्थात हे मां संसार में तुम्हारा काम करते और वंदे मातरम कहते जीवन भी चला जाए, तो वह जीवन भी धन्य है, यह बंगाल की गलियों में बच्चे कह रहे थे। यह गीत उन बच्चों की हिम्मत का स्वर था और उन बच्चों की हिम्मत ने देश को हिम्मत दी थी। बंगाल की गलियों से निकली आवाज देश की आवाज बन गई थी। 1905 में हरितपुर के एक गांव में बहुत छोटी-छोटी उम्र के बच्चे, जब वंदे मातरम के नारे लगा रहे थे, अंग्रेजों ने बेरहमी से उन पर कोड़े मारे थे। हर एक प्रकार से जीवन और मृत्यु के बीच लड़ाई लड़ने के लिए मजबूर कर दिया था। इतना अत्याचार हुआ था। 1906 में नागपुर में नील सिटी हाई स्कूल के उन बच्चों पर भी अंग्रेजों ने ऐसे ही जुल्म किए थे। गुनाह यही था कि वह एक स्वर से वंदे मातरम बोल करके खड़े हो गए थे। उन्होंने वंदे मातरम के लिए, मंत्र का महात्म्य अपनी ताकत से सिद्ध करने का प्रयास किया था। हमारे जांबाज सपूत बिना किसी डर के फांसी के तख्त पर चढ़ते थे और आखिरी सांस तक वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम, यही उनका भाव घोष रहता था। खुदीराम बोस, मदनलाल ढींगरा, राम प्रसाद बिस्मिल, अशफाकउल्ला खान, रोशन सिंह, राजेन्द्रनाथ लाहिड़ी, रामकृष्ण विश्वास अनगिनत जिन्होंने वंदे मातरम कहते-कहते फांसी के फंदे को अपने गले पर लगाया था। लेकिन देखिए यह अलग-अलग जेलों में होता था, अलग-अलग इलाकों में होता था। प्रक्रिया करने वाले चेहरे अलग थे, लोग अलग थे। जिन पर जुल्म हो रहा था, उनकी भाषा भी अलग थी, लेकिन एक भारत, श्रेष्ठ भारत, इन सबका मंत्र एक ही था, वंदे मातरम। चटगांव की स्वराज क्रांति जिन युवाओं ने अंग्रेजों को चुनौती दी, वह भी इतिहास के चमकते हुए नाम हैं। हरगोपाल कौल, पुलिन विकाश घोष, त्रिपुर सेन इन सबने देश के लिए अपना बलिदान दिया। मास्टर सूर्य सेन को 1934 में जब फांसी दी गई, तब उन्होंने अपने साथियों को एक पत्र लिखा और पत्र में एक ही शब्द की गूंज थी और वह शब्द था वंदे मातरम।

आदरणीय अध्यक्ष जी,

हम देशवासियों को गर्व होना चाहिए, दुनिया के इतिहास में कहीं पर भी ऐसा कोई काव्य नहीं हो सकता, ऐसा कोई भाव गीत नहीं हो सकता, जो सदियों तक एक लक्ष्य के लिए कोटि-कोटि जनों को प्रेरित करता हो और जीवन आहूत करने के लिए निकल पड़ते हों, दुनिया में ऐसा कोई भाव गीत नहीं हो सकता, जो वंदे मातरम है। पूरे विश्व को पता होना चाहिए कि गुलामी के कालखंड में भी ऐसे लोग हमारे यहां पैदा होते थे, जो इस प्रकार के भाव गीत की रचना कर सकते थे। यह विश्व के लिए अजूबा है, हमें गर्व से कहना चाहिए, तो दुनिया भी मनाना शुरू करेगी। यह हमारी स्वतंत्रता का मंत्र था, यह बलिदान का मंत्र था, यह ऊर्जा का मंत्र था, यह सात्विकता का मंत्र था, यह समर्पण का मंत्र था, यह त्याग और तपस्या का मंत्र था, संकटों को सहने का सामर्थ्य देने का यह मंत्र था और वह मंत्र वंदे मातरम था। और इसलिए गुरुदेव रविंद्रनाथ टैगोर ने लिखा था, उन्होंने लिखा था, एक कार्ये सोंपियाछि सहस्र जीवन—वन्दे मातरम् (In Bengali) अर्थात एक सूत्र में बंधे हुए सहस्त्र मन, एक ही कार्य में अर्पित सहस्त्र जीवन, वंदे मातरम। यह रविंद्रनाथ टैगोर जी ने लिखा था।

आदरणीय अध्यक्ष जी,

उसी कालखंड में वंदे मातरम की रिकॉर्डिंग दुनिया के अलग-अलग भागों में पहुंची और लंदन में जो क्रांतिकारियों की एक प्रकार से तीर्थ भूमि बन गया था, वह लंदन का इंडिया हाउस वीर सावरकर जी ने वहां वंदे मातरम गीत गाया और वहां यह गीत बार-बार गूंजता था। देश के लिए जीने-मरने वालों के लिए वह एक बहुत बड़ा प्रेरणा का अवसर रहता था। उसी समय विपिन चंद्र पाल और महर्षि अरविंद घोष, उन्होंने अखबार निकालें, उस अखबार का नाम भी उन्होंने वंदे मातरम रखा। यानी डगर-डगर पर अंग्रेजों के नींद हराम करने के लिए वंदे मातरम काफी हो जाता था और इसलिए उन्होंने इस नाम को रखा। अंग्रेजों ने अखबारों पर रोक लगा दी, तो मैडम भीकाजी कामा ने पेरिस में एक अखबार निकाला और उसका नाम उन्होंने वंदे मातरम रखा!

आदरणीय अध्यक्ष जी,

वंदे मातरम ने भारत को स्वावलंबन का रास्ता भी दिखाया। उस समय माचिस के डिबिया, मैच बॉक्स, वहां से लेकर के बड़े-बड़े शिप उस पर भी वंदे मातरम लिखने की परंपरा बन गई और बाहरी कंपनियों को चुनौती देने का एक माध्यम बन गया, स्वदेशी का एक मंत्र बन गया। आजादी का मंत्र स्वदेशी के मंत्र की तरह विस्तार होता गया।

आदरणीय अध्यक्ष जी,

मैं एक और घटना का जिक्र भी करना चाहता हूं। 1907 में जब वी ओ चिदंबरम पिल्लई, उन्होंने स्वदेशी कंपनी का जहाज बनाया, तो उस पर भी लिखा था वंदेमातरम। राष्ट्रकवि सुब्रमण्यम भारती ने वंदे मातरम को तमिल में अनुवाद किया, स्तुति गीत लिखे। उनके कई तमिल देशभक्ति गीतों में वंदे मातरम की श्रद्धा साफ-साफ नजर आती है। शायद सभी लोगों को लगता है, तमिलनाडु के लोगों को पता हो, लेकिन सभी लोगों को यह बात का पता ना हो कि भारत का ध्वज गीत वी सुब्रमण्यम भारती ने ही लिखा था। उस ध्वज गीत का वर्णन जिस पर वंदे मातरम लिखा हुआ था, तमिल में इस ध्वज गीत का शीर्षक था। Thayin manikodi pareer, thazhndu panintu Pukazhnthida Vareer! (In Tamil) अर्थात देश प्रेमियों दर्शन कर लो, सविनय अभिनंदन कर लो, मेरी मां की दिव्य ध्वजा का वंदन कर लो।

आदरणीय अध्यक्ष महोदय,

मैं आज इस सदन में वंदे मातरम पर महात्मा गांधी की भावनाएं क्या थी, वह भी रखना चाहता हूं। दक्षिण अफ्रीका से प्रकाशित एक साप्ताहिक पत्रिका निकलती थी, इंडियन ओपिनियन और और इस इंडियन ओपिनियन में महात्मा गांधी ने 2 दिसंबर 1905 जो लिखा था, उसको मैं कोट कर रहा हूं। उन्होंने लिखा था, महात्मा गांधी ने लिखा था, “गीत वंदे मातरम जिसे बंकिम चंद्र ने रचा है, पूरे बंगाल में अत्यंत लोकप्रिय हो गया है, स्वदेशी आंदोलन के दौरान बंगाल में विशाल सभाएं हुईं, जहां लाखों लोग इकट्ठा हुए और बंकिम का यह गीत गाया।” गांधी जी आगे लिखते हैंं, यह बहुत महत्वपूर्ण है, वह लिखते हैं यह 1905 की बात है। उन्होंने लिखा, “यह गीत इतना लोकप्रिय हो गया है, जैसे यह हमारा नेशनल एंथम बन गया है। इसकी भावनाएं महान हैं और यह अन्य राष्ट्रों के गीतों से अधिक मधुर है। इसका एकमात्र उद्देश्य हम में देशभक्ति की भावना जगाना है। यह भारत को मां के रूप में देखता है और उसकी स्तुति करता है।”

अध्यक्ष जी,

जो वंदे मातरम 1905 में महात्मा गांधी को नेशनल एंथम के रूप में दिखता था, देश के हर कोने में, हर व्यक्ति के जीवन में, जो भी देश के लिए जीता-जागता, जिस देश के लिए जागता था, उन सबके लिए वंदे मातरम की ताकत बहुत बड़ी थी। वंदे मातरम इतना महान था, जिसकी भावना इतनी महान थी, तो फिर पिछली सदी में इसके साथ इतना बड़ा अन्याय क्यों हुआ? वंदे मातरम के साथ विश्वासघात क्यों हुआ? यह अन्याय क्यों हुआ? वह कौन सी ताकत थी, जिसकी इच्छा खुद पूज्‍य बापू की भावनाओं पर भी भारी पड़ गई? जिसने वंदे मातरम जैसी पवित्र भावना को भी विवादों में घसीट दिया। मैं समझता हूं कि आज जब हम वंदे मातरम के 150 वर्ष का पर्व बना रहे हैं, यह चर्चा कर रहे हैं, तो हमें उन परिस्थितियों को भी हमारी नई पीडिया को जरूर बताना हमारा दायित्व है। जिसकी वजह से वंदे मातरम के साथ विश्वासघात किया गया। वंदे मातरम के प्रति मुस्लिम लीग की विरोध की राजनीति तेज होती जा रही थी। मोहम्मद अली जिन्ना ने लखनऊ से 15 अक्टूबर 1937 को वंदे मातरम के विरुद्ध का नारा बुलंद किया। फिर कांग्रेस के तत्कालीन अध्यक्ष जवाहरलाल नेहरू को अपना सिंहासन डोलता दिखा। बजाय कि नेहरू जी मुस्लिम लीग के आधारहीन बयानों को तगड़ा जवाब देते, करारा जवाब देते, मुस्लिम लीग के बयानों की निंदा करते और वंदे मातरम के प्रति खुद की भी और कांग्रेस पार्टी की भी निष्ठा को प्रकट करते, लेकिन उल्टा हुआ। वो ऐसा क्यों कर रहे हैं, वह तो पूछा ही नहीं, न जाना, लेकिन उन्होंने वंदे मातरम की ही पड़ताल शुरू कर दी। जिन्ना के विरोध के 5 दिन बाद ही 20 अक्टूबर को नेहरू जी ने नेताजी सुभाष बाबू को चिट्ठी लिखी। उस चिट्ठी में जिन्ना की भावना से नेहरू जी अपनी सहमति जताते हुए कि वंदे मातरम भी यह जो उन्होंने सुभाष बाबू को लिखा है, वंदे मातरम की आनंद मठ वाली पृष्ठभूमि मुसलमानों को इरिटेट कर सकती है। मैं नेहरू जी का क्वोट पढ़ता हूं, नेहरू जी कहते हैं “मैंने वंदे मातरम गीत का बैकग्राउंड पड़ा है।” नेहरू जी फिर लिखते हैं, “मुझे लगता है कि यह जो बैकग्राउंड है, इससे मुस्लिम भड़केंगे।”

साथियों,

इसके बाद कांग्रेस की तरफ से बयान आया कि 26 अक्टूबर से कांग्रेस कार्यसमिति की एक बैठक कोलकाता में होगी, जिसमें वंदे मातरम के उपयोग की समीक्षा की जाएगी। बंकिम बाबू का बंगाल, बंकिम बाबू का कोलकाता और उसको चुना गया और वहां पर समीक्षा करना तय किया। पूरा देश हतप्रभ था, पूरा देश हैरान था, पूरे देश में देशभक्तों ने इस प्रस्ताव के विरोध में देश के कोने-कोने में प्रभात फेरियां निकालीं, वंदे मातरम गीत गाया लेकिन देश का दुर्भाग्य कि 26 अक्टूबर को कांग्रेस ने वंदे मातरम पर समझौता कर लिया। वंदे मातरम के टुकड़े करने के फैसले में वंदे मातरम के टुकड़े कर दिए। उस फैसले के पीछे नकाब ये पहना गया, चोला ये पहना गया, यह तो सामाजिक सद्भाव का काम है। लेकिन इतिहास इस बात का गवाह है कि कांग्रेस ने मुस्लिम लीग के सामने घुटने टेक दिए और मुस्लिम लीग के दबाव में किया और कांग्रेस का यह तुष्टीकरण की राजनीति को साधने का एक तरीका था।

आदरणीय अध्यक्ष जी,

तुष्टीकरण की राजनीति के दबाव में कांग्रेस वंदे मातरम के बंटवारे के लिए झुकी, इसलिए कांग्रेस को एक दिन भारत के बंटवारे के लिए झुकना पड़ा। मुझे लगता है, कांग्रेस ने आउटसोर्स कर दिया है। दुर्भाग्य से कांग्रेस के नीतियां वैसी की वैसी ही हैं और इतना ही नहीं INC चलते-चलते MMC हो गया है। आज भी कांग्रेस और उसके साथी और जिन-जिन के नाम के साथ कांग्रेस जुड़ा हुआ है सब, वंदे मातरम पर विवाद खड़ा करने की कोशिश करते हैं।

आदरणीय अध्यक्ष महोदय,

किसी भी राष्ट्र का चरित्र उसके जीवटता उसके अच्छे कालखंड से ज्यादा, जब चुनौतियों का कालखंड होता है, जब संकटों का कालखंड होता है, तब प्रकट होती हैं, उजागर होती हैं और सच्‍चे अर्थ में कसौटी से कसी जाती हैं। जब कसौटी का काल आता है, तब ही यह सिद्ध होता है कि हम कितने दृढ़ हैं, कितने सशक्त हैं, कितने सामर्थ्यवान हैं। 1947 में देश आजाद होने के बाद देश की चुनौतियां बदली, देश के प्राथमिकताएं बदली, लेकिन देश का चरित्र, देश की जीवटता, वही रही, वही प्रेरणा मिलती रही। भारत पर जब-जब संकट आए, देश हर बार वंदे मातरम की भावना के साथ आगे बढ़ा। बीच का कालखंड कैसा गया, जाने दो। लेकिन आज भी 15 अगस्त, 26 जनवरी की जब बात आती है, हर घर तिरंगा की बात आती है, चारों तरफ वो भाव दिखता है। तिरंगे झंडे फहरते हैं। एक जमाना था, जब देश में खाद्य का संकट आया, वही वंदे मातरम का भाव था, मेरे देश के किसानों के अन्‍न के भंडार भर दिए और उसके पीछे भाव वही है वंदे मातरम। जब देश की आजादी को कुचलना की कोशिश हुए, संविधान की पीठ पर छुरा घोप दिया गया, आपातकाल थोप दिया गया, यही वंदे मातरम की ताकत थी कि देश खड़ा हुआ और परास्त करके रहा। देश पर जब भी युद्ध थोपे गए, देश को जब भी संघर्ष की नौबत आई, यही वंद मातरम का भाव था, देश का जवान सीमाओं पर अड़ गया और मां भारती का झंडा लहराता रहा, विजय श्री प्राप्त करता रहा। कोरोना जैसा वैश्विक महासंकट आया, यही देश उसी भाव से खड़ा हुआ, उसको भी परास्त करके आगे बढ़ा।

आदरणीय अध्यक्ष जी,

यह राष्ट्र की शक्ति है, यह राष्ट्र को भावनाओं से जोड़ने वाला सामर्थ्‍यवान एक ऊर्जा प्रवाह है। यह चेतना परवाह है, यह संस्कृति की अविरल धारा का प्रतिबिंब है, उसका प्रकटीकरण है। यह वंदे मातरम हमारे लिए सिर्फ स्मरण करने का काल नहीं, एक नई ऊर्जा, नई प्रेरणा का लेने का काल बन जाए और हम उसके प्रति समर्पित होते चलें और मैंने पहले कहा हम लोगों पर तो कर्ज है वंदे मातरम का, वही वंदे मातरम है, जिसने वह रास्ता बनाया, जिस रास्ते से हम यहां पहुंचे हैं और इसलिए हमारा कर्ज बनता है। भारत हर चुनौतियों को पार करने में सामर्थ्‍य है। वंदे मातरम के भाव की वो ताकत है। वंदे मातरम यह सिर्फ गीत या भाव गीत नहीं, यह हमारे लिए प्रेरणा है, राष्ट्र के प्रति कर्तव्यों के लिए हमें झकझोरने वाला काम है और इसलिए हमें निरंतर इसको करते रहना होगा। हम आत्मनिर्भर भारत का सपना लेकर के चल रहे हैं, उसको पूरा करना है। वंदे मातरम हमारी प्रेरणा है। हम स्वदेशी आंदोलन को ताकत देना चाहते हैं, समय बदला होगा, रूप बदले होंगे, लेकिन पूज्य गांधी ने जो भाव व्यक्त किया था, उस भाव की ताकत आज भी हमें मौजूद है और वंदे मातरम हमें जोड़ता है। देश के महापुरुषों का सपना था स्वतंत्र भारत का, देश की आज की पीढ़ी का सपना है समृद्ध भारत का, आजाद भारत के सपने को सींचा था वंदे भारत की भावना ने, वंदे भारत की भावना ने, समृद्ध भारत के सपने को सींचेगा वंदे मातरम के भवना, उसी भावनाओं को लेकर के हमें आगे चलना है। और हमें आत्मनिर्भर भारत बनाना, 2047 में देश विकसित भारत बन कर रहे। अगर आजादी के 50 साल पहले कोई आजाद भारत का सपना देख सकता था, तो 25 साल पहले हम भी तो समृद्ध भारत का सपना देख सकते हैं, विकसित भारत का सपना देख सकते हैं और इस सपने के लिए अपने आप को खपा भी सकते हैं। इसी मंत्र और इसी संकल्प के साथ वंदे मातरम हमें प्रेरणा देता रहे, वंदे मातरम का हम ऋण स्वीकार करें, वंदे मातरम की भावनाओं को लेकर के चलें, देशवासियों को साथ लेकर के चलें, हम सब मिलकर के चलें, इस सपने को पूरा करें, इस एक भाव के साथ यह चर्चा का आज आरंभ हो रहा है। मुझे पूरा विश्वास है कि दोनों सदनों में देश के अंदर वह भाव भरने वाला कारण बनेगा, देश को प्रेरित करने वाला कारण बनेगा, देश की नई पीढ़ी को ऊर्जा देने का कारण बनेगा, इन्हीं शब्दों के साथ आपने मुझे अवसर दिया, मैं आपका बहुत-बहुत आभार व्यक्त करता हूं। बहुत-बहुत धन्यवाद!

वंदे मातरम!

वंदे मातरम!

वंदे मातरम!