सन्माननीय महोदय, राष्ट्राध्यक्ष सिसी,

दोन्ही देशांचे मंत्रिगण आणि प्रतिनिधी मंडळ

प्रसार माध्यमातील मित्रांनो,

सर्वप्रथम मी राष्ट्राध्यक्ष सिसी आणि त्यांच्या प्रतिनिधीमंडळाचे भारतामध्ये हार्दिक स्वागत करू इच्छितो. राष्ट्राध्यक्ष सिसी उद्या आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभामध्ये  प्रमुख अतिथी म्हणून सहभागी होत आहेत. संपूर्ण भारतासाठी ही  सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे. मला आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की, इजिप्तच्या सैन्याची एक तुकडीसुद्धा आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन पथसंचलनाची शोभा वृद्धिंगत करत आहे.

मित्रांनो,

भारत आणि इजिप्त, विश्वातल्या सर्वात प्राचीन सभ्यतांपैकी आहेत. उभय देशांमध्ये अनेक हजार वर्षांपासून अनवरत नाते आहे. चार हजार वर्षांच्याही आधी, गुजरातमधल्या लोथल बंदराच्या माध्यमातून इजिप्तबरोबर व्यापार केला जात होता. आणि विश्वामध्ये इतक्या प्रकारे परिवर्तन घडून आल्यानंतरही आपल्या संबंधांमध्ये एक प्रकारची स्थिरता राहिली आहे. आणि आपसातील सहकार्य निरंतर सुदृढ होत आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या सहकार्यामध्ये अधिकाधिक सखोलता आली आहे. आणि मी त्याचे खूप मोठे श्रेय माझे स्नेही राष्ट्राध्यक्ष सिसी यांच्या कुशल नेतृत्वाला देऊ इच्छितो.

यावर्षी भारताने आपल्या जी -20 अध्यक्षपदाच्या काळामध्ये इजिप्तला अतिथी देश म्हणून आमंत्रित केले आहे. यावरून उभय देशातील विशेष मैत्री दर्शविते.

मित्रांनो,

अरबी समुद्राच्या एका किना-यावर भारत आहे तर दुस-या किनाऱ्यावर इजिप्त आहे. दोन्ही देशांमध्ये असणारे  सामरिक समन्वय संपूर्ण क्षेत्रामध्ये शांती आणि समृद्धीसाठी सहाय्यकारी ठरणारे आहे. म्हणूनच आजच्या बैठकीमध्ये उभय देशातल्या व्दिपक्षीय भागीदारीला ‘स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’’- व्यूहरचनात्मक भागिदारीच्या स्तरावर घेऊन जाण्याचा निर्णय राष्ट्राध्यक्ष सिसी आणि मी एकत्रित घेतला आहे. भारत-इजिप्त यांच्यातील धोरणात्मक भागीदारी अंतर्गत , राज, सुरक्षा, आर्थिक आणि वैज्ञानिक क्षेत्रांमध्ये अधिक व्यापक सहयोग करण्यासाठी दीर्घकालीन पायाभूत आराखडा विकसित करायचे आम्ही ठरवले आहे.

अवघ्या जगभरामध्ये होत असलेल्या दहशतवादाच्या प्रसारामुळे भारत आणि इजिप्त चिंतेमध्ये आहेत. आमच्यामध्ये एकमत आहे की, दहशतवाद हा मानवतेच्या सुरक्षेला सर्वात गंभीर धोका निर्माण करत आहे. दोन्ही देश या गोष्टीवर सहमत आहेत की, सीमेपलीकडून होणारा दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी ठोस कार्यवाही करणे आवश्यक आहे. आणि यासाठी आम्ही एकत्रितपणे आंतरराष्ट्रीय समुदायाला सावध करण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत.

आमच्यामध्ये सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य वाढवण्याच्या क्षेत्रात  काम करण्याच्या अपार शक्यता आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या सैन्यदलांमध्ये संयुक्त सराव प्रशिक्षण तसेच क्षमता निर्माण कार्यांमध्ये उल्लेखनीय वृद्धी झाली आहे. आम्ही आजच्या बैठकीमध्ये आपल्या संरक्षण उद्योगांमध्ये सहयोग अधिक मजबूत करणे आणि सीमेपलीकडून होणा-या दहशतवादी कारवायांविषयी सूचना तसेच गुप्तवार्तांचे आदान-प्रदान कार्य वृद्धिगंत करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

अतिरेकी विचारप्रवाह तसेच कट्टरतावादी विचारांचा प्रसार करण्यासाठी होत असलेला सायबर स्पेसचा दुरूपयोग, या संकटाची व्याप्ती वाढत आहे. याविरूद्धही  आम्ही सहयोग वाढवणार आहोत.

मित्रांनो,

कोविड महामारीच्या काळामध्ये आम्ही आरोग्य दक्षता पायाभूत सुविधा निर्माण करणे तसेच वैश्विक पुरवठा साखळीवर जे दुष्परिणाम झाले, ते आपण अगदी जवळून पाहिले, अनुभवले आहेत. राष्ट्राध्यक्ष सिसी आणि मी या आव्हानात्मक काळामध्ये अगदी निकटवर्ती बनून एकमेकांच्या संपर्कामध्ये होतो. आणि दोन्ही देशांनी ज्यावेळी अत्यंत आवश्यकता होती, अशा काळामध्ये एकमेकांना अगदी तात्काळ मदत पाठवली.

आज आम्ही कोविड आणि त्यानंतर उद्भवलेल्या युक्रेन संघर्षामुळे प्रभावित झालेली अन्न आणि वैद्यकीय पुरवठा साखळी, मजबूत करण्याच्या दिशेने व्यापक चर्चा केली आहे. आम्ही या क्षेत्रामध्ये सहकार्याने गुंतवणूक आणि व्यापार वाढवण्याच्या आवश्यकतेवरही सहमत आहोत. आम्ही मिळून असा निर्णय घेतला आहे की, आगामी पाच वर्षांमध्ये आम्ही, आमचा व्दिपक्षीय व्यापार 12 अब्ज डॉलरपर्यंत घेऊन जाणार आहोत.

मित्रांनो,

कॉप-27 चे यशस्वीपणे यजमानपद भूषविणे, आणि हवामान परिवर्तन क्षेत्रामध्ये विकसनशील देशांचे हित सुनिश्चित करण्याच्या प्रयत्नांसाठी, आम्ही इजिप्तचे कौतुक करतो.

संयुक्त राष्ट्र तसेच  इतर आंतरराष्ट्रीय आघाड्यांमध्ये भारत आणि इजिप्त यांच्यामध्ये दीर्घकाळापासून आणि अतिशय उत्तम सहयोगाचे नाते राहिले आहे. आंतरराष्ट्रीय समस्या, वाद यावर तोडगे काढण्यासाठी मुत्सेद्देगिरी आणि संवाद साधण्याच्या आवश्यकतेवरही उभय देश सहमत आहेत.

महोदय,

मी पुन्हा एकदा आपले आणि आपल्या प्रतिनिधी मंडळाचे भारतामध्ये मनापासून स्वागत करतो. मी आपल्याला आणि इजिप्तच्या लोकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छाही देतो.

खूप खूप धन्यवाद!!

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s AI moment: Sarvam turns unicorn at $1.5 billion valuation

Media Coverage

India’s AI moment: Sarvam turns unicorn at $1.5 billion valuation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Today, the world does not suffer from a shortage of resources; it suffers from a shortage of trust: PM Modi at G7 Summit in Evian, France
June 16, 2026

राष्ट्रपति मैक्रों,
Your Excellencies,

नमस्कार!

G-7 समिट में हमारे गर्मजोशी भरे स्वागत के लिए मैं राष्ट्रपति मैक्रों का हार्दिक आभार व्यक्त करता हूँ।

Friends,

आज का विश्व पहले से कहीं अधिक inter-connected और inter-dependent है। किसी भी देश की ऊर्जा सुरक्षा, खाद्य सुरक्षा, स्वास्थ्य सुरक्षा, साइबर सुरक्षा और आर्थिक समृद्धि केवल उसकी सीमाओं के भीतर तय नहीं होती। Mobility, data, capital, technology, ये सभी हमें आपस में जोड़ते हैं।

ऐसे समय में Partnerships का महत्व स्वाभाविक रूप से बढ़ जाता है। लेकिन साझेदारियाँ तभी सफल होती हैं जब उनके केंद्र में विश्वास हो। आज सबसे महत्वपूर्ण Strategic Asset कोई mineral, technology या market नहीं, बल्कि आपसी विश्वास है।

विश्वास कि टेक्नॉलजी और supply chains को हथियार के रूप में नहीं, global good के लिए इस्तेमाल किया जाएगा। विश्वास कि विकास के अवसर कुछ देशों तक सीमित नहीं रहेंगे। विश्वास कि वैश्विक संस्थान सभी देशों की आकांक्षाओं को पूरा करने में सक्षम होंगे।

Friends,

पिछली सदी में मानवता को दो विश्व युद्धों से गुज़रना पड़ा। अनेक बलिदानों के बाद विश्व समुदाय ने शांति, स्थिरता और समृद्धि की ओर बढ़ने के लिए व्यवस्थाएं विकसित की। इन व्यवस्थाओं का आधार भी trust ही था।

किन्तु अनेक दशकों से, अनेक पीढ़ियों के योगदान से बनाए गए विश्वास को आज चोट पहुँच रही है। कोविड ने हमें आईना दिखाया कि trust और solidarity के दावे कितने खोखले थे।

Today the world does not suffer from a shortage of resources; it suffers from a shortage of trust. And the future of our partnerships depends on building this trust.

अमेरिका के राष्ट्रपति रोनल्ड रेगन ने कहा था: Trust but Verify. यह आज के समय में भी प्रासंगिक है। भावी पीढ़ियों के प्रति हमारा दायित्व है कि हम नए युग के अनुरूप trusted rules based order का निर्माण करें।

Friends,

भारत ने सदैव विश्व को एक परिवार के रूप में देखा है। हमारे सभी प्रयास “सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय” यानि, welfare and happiness for all के मूल सिद्धांत पर आधारित रहे हैं।

भारत का अनुभव दिखाता है कि विकास सबसे अधिक प्रभावी तब होता है जब वह लोगों की आकांक्षाओं से जुड़ा हो। यही सिद्धांत हमारी अंतरराष्ट्रीय साझेदारियों का भी आधार है। इसी सोच के साथ भारत ने International Solar Alliance, Coalition for Disaster Resilient Infrastructure, ग्लोबल बायोफ्यूल्स एलायंस, Mission LiFE, और “एक पेड़ माँ के नाम” जैसी वैश्विक पहलों को आगे बढ़ाया है।

संकट के समय भारत ने First Responder के रूप में सभी देशों की सहायता करना अपना दायित्व समझा है। कोविड महामारी के दौरान भारत ने डेढ़ सौ से अधिक देशों को दवाइयाँ और vaccines उपलब्ध कराईं।

श्रीलंका में cyclone हो, अफगानिस्तान में भूकंप हो, मोज़ाम्बिक में floods हों, या क्यूबा और जमैका में hurricane, भारत ने सदैव "Humanity First" के सिद्धांत पर कार्य किया है। हमारी विकास साझेदारियाँ भी इसी भावना को प्रतिबिंबित करती हैं। हमारे प्रयास पार्टनर देशों में capacity building और कौशल विकास पर केन्द्रित रहे हैं।

भारत का मानना है: The true test of partnership is not what we build for others, but what we enable others to build for themselves.

Friends,

आज ग्लोबल साउथ की विश्व समुदाय से बहुत उम्मीदें हैं। किन्तु उनकी अपेक्षा सहारे की नहीं, साथ की है। वे वैश्विक विकास के लाभार्थी नहीं, उसके भागीदार बनना चाहते हैं।

हमें donor–recipient की सोच से आगे बढ़कर, equal पार्टनर्स के रूप में काम करना होगा। उनके पास-पास नहीं, साथ-साथ चलना होगा। साझेदारी को dependency के बजाय, dignity से जोड़ना होगा। इन प्रयासों से हम भावी पीढ़ियों के सतत विकास की मजबूत नींव रख सकेंगे।

Friends,

अंतरराष्ट्रीय साझेदारियाँ और वैश्विक एकजुटता तभी सार्थक बन सकती हैं, जब हम साझा चुनौतियों का मिलकर समाधान करें। भारत का दृढ विश्वास है कि विश्व के विभिन्न हिस्सों में चल रहे तनावों और युद्धों का स्थायी समाधान dialogue, diplomacy और अंतरराष्ट्रीय सहयोग के मार्ग से ही संभव है।

हम west asia में शांति प्रयासों में हुई प्रगति का स्वागत करते हैं। इस संघर्ष से west asia में हमारे मित्र देशों को जान-माल का नुकसान झेलना पड़ा है। होर्मुज़ स्ट्रेट में maritime ट्रेड में आई बाधा के कारण पूरे विश्व की अर्थव्यवस्था को नुकसान पहुंचा। भारत के कई civilians को जान गंवानी पड़ी। Global maritime ट्रेड के माध्यम से सभी देशों को आपस में जोड़ने वाले नाविकों की सुरक्षा हमारा दायित्व है। हमें यह सुनिश्चित करना होगा कि समुद्री मार्ग सुरक्षित रहें, और Seafarers बिना भय के अपना कार्य कर सकें।

Friends,

भारत इन विषयों पर सभी पार्टनर्स के साथ मिलकर काम करने के लिए पूरी तरह से तैयार है।

बहुत-बहुत धन्यवाद।