Quoteपंतप्रधानांनी जगातील सर्वात उंच रेल्वे आर्क पूल असलेला चिनाब पूल आणि भारताचा पहिला केबल-स्टेड रेल्वे पूल असलेल्या अंजी पुलाचे केले उद्घाटन
Quoteआज उद्घाटन करण्यात आलेले भव्य पायाभूत सुविधा प्रकल्प जम्मू आणि काश्मीरच्या विकास प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरेल - पंतप्रधान
Quoteआपण भारत मातेचे वर्णन नेहमीच श्रद्धापूर्वक काश्मीर ते कन्याकुमारी असे केले, आज आपल्या रेल्वे नेटवर्कमध्येही हे वास्तव बनले आहे: पंतप्रधान
Quoteउधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्ग प्रकल्प हा नवीन, सक्षम जम्मू-काश्मीरचे प्रतीक असून ही भारताच्या वाढत्या सामर्थ्याचा जयघोष आहे - पंतप्रधान
Quoteचिनाब आणि अंजी पूल जम्मू-काश्मीरच्या समृद्धीचे प्रवेशद्वार म्हणून काम करतील: पंतप्रधान
Quoteजम्मू आणि काश्मीर हे भारताच्या मुकुटातील मौल्यवान रत्न आहे : पंतप्रधान
Quoteदहशतवादापुढे भारत झुकणार नाही, जम्मू आणि काश्मीरमधील तरुणांनी आता दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे: पंतप्रधान
Quoteपाकिस्तान जेव्हा ऑपरेशन सिंदूर हे नाव ऐकेल, तेव्हा त्याला आपल्या लज्जास्पद पराभवाचे स्मरण होईल : पंतप्रधान

ॐ.. माता वैष्णो देवी दे चरने च मत्था टेकना जय माता दी!

जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा जी, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव जी, जितेंद्र सिंह, व्ही सोमण्णा  जी, उपमुख्यमंत्री सुरेंद्र कुमार जी, जम्मू काश्मीर विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुनील जी, संसदेतील माझे सहकारी  जुगल किशोर जी, अन्य लोकप्रतिनिधिगण आणि माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो , वीर जोरावर सिंह जी यांची ही भूमी आहे , या भूमीला मी वंदन करतो.

मित्रहो,

आजचा हा कार्यक्रम भारताच्या एकतेचा आणि भारताच्या इच्छाशक्तीचा भव्य उत्सव आहे. माता वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने आज काश्मीर खोरे भारताच्या रेल्वे जाळ्याशी जोडले गेले आहे. भारतमातेचे वर्णन करताना, आपण आदराने म्हणतो - काश्मीर ते कन्याकुमारी. हे आता रेल्वे जाळ्यासाठीही वास्तव बनले आहे. उधमपूर, श्रीनगर, बारामुल्ला, हे रेल्वे मार्ग प्रकल्प, ही फक्त नावे नाहीत.  ही जम्मू आणि काश्मीरच्या नवीन सामर्थ्याची ओळख आहे. हा  भारताच्या नवीन सामर्थ्याचा जयघोष आहे. काही वेळापूर्वीच मला चिनाब पूल आणि अंजी पुलाचे लोकार्पण  करण्याची संधी मिळाली. आजच जम्मू आणि काश्मीरला दोन नवीन वंदे भारत रेल्वेगाड्या मिळाल्या आहेत. जम्मूमध्ये एका नवीन वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी करण्यात आली आहे. 46 हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांमुळे जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला नवी गती  मिळेल. विकासाच्या या नवीन युगासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप-खूप अभिनंदन करतो.

मित्रहो,

जम्मू आणि काश्मीरच्या अनेक पिढ्या रेल्वे कनेक्टिव्हिटीचे स्वप्न पाहतच निघून गेल्या आहेत.  मी काल मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला जी यांचे एक वक्तव्य पाहत होतो आणि त्यांनीही आता त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख केला, ते देखील म्हणाले होते की ते जेव्हा सातवी-आठवीत शिकत होते , तेव्हापासूनच हा  प्रकल्प  पूर्ण होण्याची प्रतीक्षा करत होते. आज जम्मू-काश्मीरच्या लाखो लोकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आणि हे देखील खरे आहे, जेवढी चांगली कामे आहेत ना , ती  माझ्यासाठीच  शिल्लक राहिली आहेत.

मित्रहो,

हे आमच्या सरकारचे भाग्य आहे की आमच्या कार्यकाळात या प्रकल्पाने गती घेतली आणि आम्ही तो पूर्ण करून दाखवला. मधल्या  कोविडच्या काळात अनेक अडचणी आल्या, परंतु आम्ही ठाम राहिलो.

 

|

मित्रहो,

मार्गात येण्याजाण्याच्या अडचणी, हवामानाच्या समस्या, डोंगरावरून सतत कोसळणाऱ्या  दरडी , हा  प्रकल्प पूर्ण करणे कठीण होते, आव्हानात्मक होते. मात्र आमच्या सरकारने आव्हानालाच आव्हान देण्याचा मार्ग निवडला आहे. आज जम्मू आणि काश्मीरमध्ये बांधले जाणारे सर्व प्रकारच्या हवामानाशी जुळवून घेणारे पायाभूत सुविधा प्रकल्प हे याचे एक उदाहरण आहेत. काही महिन्यांपूर्वीच सोनमर्ग बोगदा सुरू झाला  आहे. आता काही वेळापूर्वीच मी चिनाब आणि अंजी पुलावरून तुम्हाला भेटायला आलो आहे.या पुलांवरून चालताना, मी भारताच्या बुलंद आकांक्षा, आपले अभियंते आणि कामगारांचे कौशल्य आणि धाडस अनुभवले आहे. चिनाब पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे आर्च ब्रिज आहे. लोक पॅरिसमधील फ्रान्स येथे आयफेल टॉवर पाहण्यासाठी  जातात. आणि हा पूल आयफेल टॉवरपेक्षाही खूप उंच आहे. आता लोक चिनाब पुलावरून काश्मीर पाहण्यासाठी तर जातीलच , हा  पूल देखील एक आकर्षक पर्यटन स्थळ बनेल.  सर्वजण सेल्फी पॉइंटवर जातील आणि सेल्फी काढतील. आपला अंजी ब्रिज देखील अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना आहे. हा भारतातील पहिला केबल-समर्थित रेल्वे पूल आहे. हे दोन्ही पूल केवळ विटा , सिमेंट,स्टील आणि लोखंडापासून बनवलेले नाहीत, तर ते पीर पंजालच्या दुर्गम डोंगरांवर उभे , भारताच्या शक्तीचे जिवंत प्रतीक आहेत. ही भारताच्या उज्ज्वल भविष्याची सिंहगर्जना आहे. यावरून दिसून येते की विकसित भारताच्या स्वप्नाइतकेच आपले धैर्य आणि ताकद  बुलंद  आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपले चांगले हेतू आणि उद्दिष्टे आहेत.

मित्रहो,

चिनाब पूल असो किंवा अंजी पूल, हे जम्मू आणि काश्मीर,  दोन्ही प्रदेशांच्या समृद्धीचे माध्यम  बनतील. यामुळे पर्यटन तर वाढेलच , अर्थव्यवस्थेच्या इतर क्षेत्रांनाही फायदा होईल. जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे कनेक्टिव्हिटीमुळे दोन्ही प्रदेशातील व्यापाऱ्यांसाठी नवीन संधी निर्माण होतील. यामुळे येथील उद्योगाला चालना मिळेल, आता काश्मीरमधील सफरचंदे कमी किमतीत देशातील मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचू शकतील आणि वेळेवर पोहोचू शकतील.  सुकामेवा असो किंवा पश्मीना शाल, येथील हस्तशिल्पे  आता देशाच्या कोणत्याही भागात सहज पोहोचू शकतील . यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील लोकांना देशाच्या इतर भागात प्रवास करणे देखील खूप सोपे होईल.

मित्रहो,

मी इथल्या संगलदान येथील एका विद्यार्थ्याने वर्तमानपत्रात लिहिलेली टिप्पणी वाचत होतो. त्या विद्यार्थ्याने सांगितले की आतापर्यंत त्याच्या गावातील जे लोक गावाबाहेर गेले होते त्यांनीच रेल्वे पाहिली होती. गावातील बहुतेक लोकांनी  रेल्वेचा केवळ व्हिडिओ पाहिला होता.  त्यांना अजूनही विश्वास बसत नाही की त्यांच्या डोळ्यासमोरून खरोखरच एक रेल्वेगाडी जाईल. मी असेही वाचले आहे की अनेकजण गाड्यांच्या येण्याजाण्याच्या  वेळा लक्षात ठेवत आहेत. आणखी एका मुलीने खूप चांगली गोष्ट सांगितली, ती मुलगी म्हणाली - आता रस्ते सुरु राहतील  की बंद राहतील  हे हवामानावर ठरणार नाही, आता ही नवीन रेल्वे सेवा प्रत्येक ऋतूत लोकांना  मदत करत राहील.

मित्रहो,

जम्मू आणि काश्मीर हा भारतमातेचा मुकुट आहे. हा मुकुट एकाहून एक सुंदर रत्नांनी जडलेला आहे. ही वेगवेगळी रत्ने जम्मू आणि काश्मीरची ताकद आहेत. येथील प्राचीन संस्कृती,इथले संस्कार , इथली आध्यात्मिक चेतना, निसर्ग सौंदर्य, इथल्या वनौषधी , फळे आणि फुलांचा विस्तार, इथल्या युवकांमध्ये , तुमच्याकडे असलेली प्रतिभा मुकुटातील मण्याप्रमाणे  चमकत आहे .

 

|

मित्रहो,

तुम्हाला चांगलेच माहित आहे की मी गेल्या अनेक दशकांपासून जम्मू आणि काश्मीरला भेट देत आहे. मला इथल्या दुर्गम भागात भेट देण्याची आणि राहण्याची संधी मिळाली आहे. मी कायमच  इथली क्षमता पाहिली आहे आणि अनुभवली आहे आणि म्हणूनच मी जम्मू आणि काश्मीरच्या विकासासाठी पूर्ण समर्पणाने झटत  आहे.

मित्रहो,

जम्मू आणि काश्मीर हे भारताच्या शिक्षण आणि संस्कृतीचे वैभव  राहिले आहे. आज भारत,आपले जम्मू आणि काश्मीर जगातील सर्वात मोठ्या ज्ञान केंद्रांपैकी एक बनत आहे, त्यामुळे यामध्ये भविष्यात जम्मू आणि काश्मीरचा  सहभागही वाढणार आहे. इथे आयआयटी, आयआयएम, एम्स आणि एनआयटी सारख्या संस्था आहेत. जम्मू आणि श्रीनगरमध्ये केंद्रीय विद्यापीठे आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये संशोधन परिसंस्था देखील विस्तारत आहेत .

मित्रहो,

शिक्षणाबरोबरच येथे वैद्यकीय उपचारासाठीही अभूतपूर्व काम केले जात आहे. गेल्या काही वर्षांमध्ये दोन राज्यस्तरीय कर्करोगविषयक  संस्था स्थापन झाल्या आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये येथे सात नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. जेव्हा वैद्यकीय महाविद्यालय सुरू होते  तेव्हा  त्याचा रुग्णांबरोबरच त्या भागातील युवा वर्गालाही सर्वात जास्त फायदा होतो हे तुम्हाला माहितच  आहे. जम्मू-काश्मीरमध्ये आता एमबीबीएसच्या जागांची संख्या 500 वरून वाढून 1300 पर्यंत पोहोचली आहे. मला आनंद आहे की आता रियासी जिल्ह्यालाही नवीन वैद्यकीय महाविद्यालय मिळणार आहे. श्री माता वैष्णोदेवी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एक्सलन्स हे आधुनिक रुग्णालय तर आहेच, ते आपल्या दान-पुण्य करण्याची आपली जी संस्कृती आहे त्याचेही उदाहरण आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी जी रक्कम खर्च झालेली आहे त्यासाठी भारताच्या कानाकोपऱ्यातून माता वैष्णो देवीच्या चरणी आलेल्या लोकांनी दान केले आहे. मी माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड आणि त्याचे अध्यक्ष मनोज जी यांना या पवित्र कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. या रुग्णालयाची क्षमताही 300 खाटांवरून वाढवून 500 खाटांची केली जात आहे. कटरामध्ये माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांनाही यामुळे खूप दिलासा मिळणार आहे.

मित्रहो,

केंद्रातील भाजपा-एनडीए सरकारला आता 11 वर्षे होत आहेत. ही 11 वर्षे, गरीब कल्याणासाठी समर्पित राहिली आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमुळे 4 कोटी गरिबांचे पक्क्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. उज्ज्वला योजनेमुळे 10 कोटी स्वयंपाकघरे धुरमुक्त झाली आहेत, आपल्या बहिणी, मुलींच्या आरोग्याचे रक्षण झाले आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे 50 कोटी गरिबांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळाले आहेत. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेमुळे प्रत्येक ताटात पोटभर अन्नधान्याची सुनिश्चिती झाली आहे. जनधन योजनेमुळे पहिल्यांदाच 50 कोटींहून अधिक गरिबांसाठी बँकेचे दार उघडले आहे. अंधारात जगत असलेल्या  अडीच कोटी कुटुंबांपर्यंत सौभाग्य योजनेमुळे विजेचा प्रकाश पोहोचला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत बांधलेल्या 12 कोटी शौचालयांनी उघड्यावर शौचाला जाण्याच्या विवशतेतून सुटका केली आहे. जल जीवन अभियानामुळे 12 कोटी नवीन घरांमध्ये नळाने पाणी पोहोचू लागले आहे, महिलांचे जीवन  सुलभ झाले आहे. पीएम किसान सन्मान निधीमुळे 10 कोटी लहान शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळाली आहे.

 

|

मित्रहो,

सरकारच्या अशा अनेक प्रयत्नांमुळे मागील 11 वर्षांत 25 कोटींहून अधिक गरिबांनी, आपल्याच गरीब बंधू-भगिनींनी, गरिबीविरुद्ध लढा दिला आणि 25 कोटी गरीब, गरिबीला पराभूत करून, विजयी होऊन, गरिबीतून बाहेर आले आहेत. आता ते नव मध्यमवर्गाचा भाग बनले आहेत. जे लोक स्वतःला समाज व्यवस्थेचे तज्ज्ञ मानतात, मोठे तज्ज्ञ मानतात, जे लोक पुढचा-मागचा या राजकारणात बुडालेले असतात, जे लोक दलितांच्या नावावर राजकीय पोळ्या भाजत आले आहेत, जरा मी फक्त ज्या योजनांचा उल्लेख केला आहे, त्याकडे नजर टाका. कोण लोक आहेत ज्यांना या सुविधा मिळाल्या आहेत, ते कोण लोक आहेत जे स्वातंत्र्यानंतर 7-7 दशकांपर्यंत या प्राथमिक सुविधांपासून वंचित राहिले होते. हे माझे दलित बंधू-भगिनी आहेत, हे माझे आदिवासी बंधू-भगिनी आहेत, हे माझे मागासलेले बंधू-भगिनी आहेत, हे डोंगरांवर उदरनिर्वाह करणारे, हे जंगलात वस्ती करणारे, झोपडपट्टीत संपूर्ण आयुष्य घालवणारे, अशी ही ती कुटुंबे आहेत, ज्यांच्यासाठी मोदींनी आपली 11 वर्षे खर्च केली आहेत. केंद्र सरकारचा प्रयत्न आहे की गरिबांना, नव मध्यमवर्गाला जास्तीत जास्त ताकद द्यावी. वन रँक वन पेन्शन असो, 12 लाख रुपयांपर्यंतच्या पगाराला करमुक्त करणे असो, घर खरेदीसाठी आर्थिक सहाय्य देणे असो, स्वस्त हवाई प्रवासासाठी मदत देणे असो, प्रत्येक प्रकारे सरकार, गरीब आणि मध्यमवर्गासोबत खांद्याला खांदा लावून चालत आहे.

मित्रहो,

गरिबांना गरिबीतून मुक्ती मिळवून देण्यासाठी त्यांना  मदत करणे, पण प्रामाणिकपणे जगणाऱ्या, देशासाठी वेळोवेळी कर देणाऱ्या, मध्यमवर्गाची ताकद वाढवणे, यासाठीही स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच इतके काम झाले आहे, जे आम्ही करून दाखवले आहे.

मित्रहो,

आम्ही आपल्याकडे युवा वर्गासाठी सातत्त्याने रोजगाराच्या नवीन संधी वाढवत आहोत आणि याचे एक महत्त्वाचे माध्यम आहे- पर्यटन. पर्यटनामुळे रोजगार मिळतो, पर्यटन लोकांना जोडते. पण दुर्दैवाने आपला शेजारचा देश, मानवतेचा विरोधक, सलोख्याचा विरोधक, पर्यटनाचा विरोधक, इतकेच नाही तो असा देश आहे, गरिबांच्या पोटापाण्याचाही विरोधक आहे. 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये जे काही झाले, ते याचेच उदाहरण आहे. पाकिस्तानने पहलगाममध्ये माणुसकी आणि काश्मीरियत, या दोन्हीवर वार केला. त्याचा हेतू भारतात दंगे घडवण्याचा होता. त्याचा हेतू काश्मीरमधील कष्टकरी लोकांची कमाई थांबवण्याचा होता. त्यामुळेच पाकिस्तानने पर्यटकांवर हल्ला केला. ते पर्यटन, जे गेल्या 4-5 वर्षांपासून सतत वाढत होते, दरवर्षी इथे विक्रमी संख्येने पर्यटक येत होते. ज्या पर्यटनामुळे, जम्मू काश्मीरमधील गरिबांचे घर चालते, त्याला पाकिस्तानने लक्ष्य केले. कोणी घोडे हाकणारे, कोणी हमाल, कोणी गाईड, कोणी गेस्ट हाऊसवाला, कोणी दुकान-ढाबा चालवणारा, पाकिस्तानचे   हे कारस्थान या सगळ्यांना उद्ध्वस्त करण्याचे होते. दहशतवाद्यांना आव्हान देणारा तरुण आदिल, तोही तर तिथे मेहनत-मजुरी करण्यासाठी गेला होता,  आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू, म्हणून मेहनत करत होता. दहशतवाद्यांनी त्या आदिललाही मारले.

मित्रहो,

पाकिस्तानच्या या कारस्थानाच्या विरोधात ज्या प्रकारे जम्मू-काश्मीरचे लोक उभे ठाकले आहेत, जम्मू काश्मीरच्या जनतेने यावेळी जी ताकद दाखवली आहे, हे फक्त पाकिस्तानलाच नाही, तर जगभरातील दहशतवादी मानसिकतेला, जम्मू काश्मीरच्या लोकांनी ठाम संदेश दिला आहे. जम्मू-काश्मीरच्या तरुणांनी आता दहशतवादाला सडेतोड उत्तर देण्याचे मनाशी पक्के केले आहे. हा तो दहशतवाद आहे, ज्याने खोऱ्यात शाळा जाळल्या, आणि फक्त शाळा म्हणजे इमारत नव्हती जाळली, दोन-दोन पिढ्यांचे भविष्य जाळून टाकले होते. रुग्णालये उद्ध्वस्त केली. ज्याने अनेक पिढ्या उद्ध्वस्त केल्या. इथे जनता आपल्या पसंतीचे प्रतिनिधी निवडू शकेल, इथे निवडणुका होऊ शकतील, हेही दहशतवादामुळे मोठे आव्हान बनले होते.

मित्रहो,

वर्षानुवर्षे दहशतवाद सहन केल्यानंतर जम्मू-काश्मीरने इतका विध्वंस पाहिला होता की जम्मू काश्मीरच्या लोकांनी स्वप्ने पाहणेच सोडून दिले होते, दहशतवादालाच आपले प्रारब्ध मानले होते. जम्मू-काश्मीरला या स्थितीतून बाहेर काढणे गरजेचे होते, आणि आम्ही ते करून दाखवले आहे. आज जम्मू-काश्मीरचा तरुण नवीन स्वप्नेही पाहत आहे आणि ती पूर्णही करत आहे. आता काश्मीरचा तरुण बाजारपेठांना, शॉपिंग मॉल्सना, सिनेमा हॉलना गजबजलेले पाहून आनंदी आहे.येथील लोक जम्मू-काश्मीरला पुन्हा एकदा चित्रपटांच्या चित्रणाचे प्रमुख केंद्र होताना पाहू इच्छित आहेत, या भागाला खेळांचे मोठे केंद्र झालेले पाहू इच्छित आहेत. हीच भावना आपण आत्ताच माता खीर भवानीच्या जत्रेत देखील पाहिली आहे. ज्या प्रकारे हजारो लोक मातेच्या द्वारी आले त्यातून नव्या जम्मू-काश्मीरचे चित्र दिसते. आता 3 तारखेपासून अमरनाथ यात्रा देखील सुरु होत आहे. ईदच्या सणाचा उत्साह देखील चोहीकडे दिसतो आहे. विकासाचे जे वातावरण जम्मू-काश्मीरमध्ये तयार झाले होते ते पहलगाम हल्ल्यामुळे डळमळणार नाही. जम्मू-काश्मीर मधील सर्व लोकांना, तुम्हा सर्वांना नरेंद्र मोदी असे वचन देतो की मी येथील विकास थांबू देणार नाही,येथील तरुणांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात एखादा अडथळा अथवा समस्या निर्माण होत असेल तर त्या समस्येला आधी मोदीचा सामना करावा लागेल.  

 

|

मित्रांनो,

आज 6 जून आहे, आठवून बघा, बरोबर एका महिन्यापूर्वी, 6 मे च्या त्या रात्री पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा थरकाप उडाला होता. आता पाकिस्तान जेव्हा ऑपरेशन सिंदूरचे नाव ऐकेल तेव्हा त्या देशाला त्यांचा लाजिरवाणा पराभव आठवेल. पाकिस्तानी सेना आणि दहशतवाद्यांनी कधी असा विचार देखील केला नसेल की भारताचे सैन्य पाकिस्तानात शेकडो किलोमीटर अंतर्भागात जाऊन दहशतवाद्यांवर अशा पद्धतीने वार  करेल. वर्षानुवर्षे  त्यांनी दहशतवादाचे जे इमले उभे केले होते ते काही मिनिटांतच उध्वस्त झाले. आणि हे पाहून पाकिस्तान खवळला आणि तो राग जम्मूतील, पूँछ मधील तसेच इतर जिल्ह्यांतील लोकांवर काढला. संपूर्ण जगाने पाहिले की पाकिस्तानने या भागातील घरे कशी उध्वस्त केली, लहान मुलांवर तोफगोळ्यांचा हल्ला केला, शाळा-रुग्णालये उडवून दिली, मंदिर, मस्जिद, गुरुद्वारांवर देखिल बॉम्ब फेकले. तुम्ही ज्या प्रकारे पाकिस्तानच्या हल्ल्यांचा सामना केलात ते प्रत्येक देशवासीयाने पाहिले आहे. म्हणूनच, प्रत्येक देशवासी संपूर्ण शक्तीनिशी तुमच्या कुटुंबांसोबत उभा आहे.

मित्रांनो,

ज्या लोकांचा सीमेपलीकडून झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना काही दिवसांपूर्वीच नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तोफगोळ्यांच्या माऱ्यामुळे प्रभावित 2 हजारहून अधिक कुटुंबांची वेदना ही  आमची स्वतःची वेदना आहे. या कुटुंबांना तोफांच्या माऱ्यानंतर घराच्या दुरुस्तीसाठी आर्थिक मदत करण्यात आली होती.  आता केंद्र सरकारने असे ठरवले आहे की ही मदत आणखीन वाढवण्यात यावी. आजच्या या कार्यक्रमात मी याबद्दल देखील माहिती देऊ इच्छितो.

मित्रांनो,

या आपत्तीमध्ये ज्या घरांचे बरेच नुकसान झाले आहे त्यांना आता 2 लाख रुपये आणि ज्या घरांची थोड्या प्रमाणात पडझड झाली आहे त्यांना 1 लाख रुपयांची वेगळी मदत आधीच्या मदतीसह अतिरिक्त सहाय्य म्हणून दिली जाईल. म्हणजेच आता त्यांना पहिल्या वेळी मिळालेल्या मदतीसह ही अधिकची रक्कम मिळणार आहे.

मित्रांनो,

आमचे सरकार सीमावर्ती भागातील रहिवाशांना देशाचे प्रथम रखवालदार मानते. गेल्या दशकात सरकारने सीमेवरील जिल्ह्यांमध्ये विकास आणि सुरक्षा यासाठी अभूतपूर्व कार्य केले आहे, या दरम्यान सुमारे दहा हजार नवे खंदक तयार करण्यात आले आहेत. या खंदकांनी, ऑपरेशन सिंदूरनंतरच्या परिस्थितीत लोकांचे जीव वाचवण्यास बरीच मदत केली. मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, जम्मू आणि काश्मीर विभागासाठी दोन सीमा तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत. दोन महिला तुकड्या तयार करण्याचे कार्य देखील पूर्ण झाले आहे.

मित्रांनो,

आपली जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे, तिच्या आसपास अतिशय  दुर्गम असलेल्या  भागात  शेकडो कोटी रुपये खर्च करून नव्या पायाभूत सुविधा तयार करण्यात येत आहेत. कथुआ ते जम्मू महामार्गाचे रुपांतर सहा पदरी द्रुतगती महामार्गात करण्यात येत आहे, अखनूर ते पूँछ महामार्गाचे रुंदीकरण करण्यात येत आहे. व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमांतर्गत देखील सीमेवरील गावांमध्ये विकासकार्यांना वेग देण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 400 गावांशी सर्व मोसमात संपर्क शक्य नसे , त्यांना 1800 किमी लांबीच्या नव्या रस्त्यांचे बांधकाम करून इतर भागाशी जोडण्यात येत आहे. या कामासाठी सरकार 4200 कोटी रुपयांहून अधिक निधी खर्च करणार आहे.

 

|

मित्रांनो,

आज मी जम्मू-काश्मीरच्या तुम्हा सर्वांना, विशेषतः येथील तरुणांना एक विशेष आग्रह देखील करण्यासाठी आलो आहे आणि जम्मू-काश्मीरच्या भूमीवरून मी देशाला देखील आग्रह करू इच्छितो. ऑपरेशन सिंदूरद्वारे आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य कसे दिसून आले हे तुम्ही पाहिलेच असेल. आज संपूर्ण जग भारताच्या संरक्षण परिसंस्थेची चर्चा करत आहे. आणि याचे एकच कारण आहे आणि ते म्हणजे आपल्या सैन्यदलांचा ‘मेक इन इंडिया’वरील विश्वास. आपल्या सैन्यांनी जे करून दाखवले त्याचे अनुकरण आता प्रत्येक भारतवासीयाला करायचे आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आम्ही उत्पादन अभियानाची घोषणा केली. या अभियानांतर्गत सरकार देशातील उत्पादन क्षेत्राला नवी झेप घेण्यासाठी तयार करत आहे. मी जम्मू-काश्मीरच्या युवकांना असे सांगेन की तुम्ही या आणि या अभियानाचा भाग व्हा. देशाला तुमची आधुनिक विचारधारा हवी आहे, तुमच्या नवोन्मेषाची देशाला गरज आहे. तुमच्या संकल्पना, तुमची कौशल्ये भारताच्या संरक्षण क्षेत्राला, भारताच्या अर्थव्यवस्थेला नव्या उंचीवर घेऊन जातील. गेल्या 10 वर्षांमध्ये भारत एक मोठा संरक्षण सामग्री निर्यातदार देश बनला आहे. आता जगातील सर्वोत्कृष्ट दहा संरक्षण सामग्री निर्यातदार देशांमध्ये भारताचे नाव समाविष्ट व्हावे हे आमचे लक्ष्य आहे. या लक्ष्याच्या दिशेने आपण जितक्या वेगाने वाटचाल करू तितक्याच वेगाने भारतात रोजगाराच्या लाखो नव्या संधी निर्माण होणार आहेत.

मित्रांनो,

आपल्याला आणखी एक निश्चय करायचा आहे. ज्या वस्तू भारतात तयार झाल्या आहेत, ज्यासाठी आपल्या देशवासियांनी घाम गाळला आहे, अशाच वस्तू आपण आधी खरेदी केल्या पाहिजेत आणि हीच खरी देशभक्ती आहे, हीच देशाची सेवा आहे. आपल्याला सीमेवर उभ्या असलेल्या आपल्या सेनादलांचा सन्मान वाढवायचा आहे आणि बाजारपेठांमध्ये आपल्याला ‘मेड इन इंडिया’ च्या गौरवात भर घालायची आहे. 

 

|

मित्रांनो,

एक सोनेरी आणि उज्ज्वल भविष्य जम्मू-काश्मीरची वाट पाहत आहे. केंद्र सरकार आणि येथील सरकार एकत्र येऊन विकास कार्यांमध्ये गुंतलेले आहेत, परस्परांना सहयोग देत आहे. शांतता आणि समृद्धीच्या ज्या मार्गाने आपण पुढे निघालो आहोत, त्या मार्गाला आपण सतत बळकट केले पाहिजे. माता वैष्णोदेवीच्या आशीर्वादाने विकसित भारत, विकसित जम्मू-काश्मीरचा हा निश्चय पूर्ततेपर्यंत पोहोचावा याच इच्छेसह तुम्हा सर्वांचे या अनेकानेक विकास प्रकल्पांसाठी आणि एकापेक्षा एक भव्य प्रकल्पांसाठी मी खूप खूप अभिनंदन करतो. दोन्ही मुठी उंचावून  संपूर्ण शक्तीनिशी माझ्याबरोबर जयघोष करा -

 

|

भारत माता की जय ! आवाज हिंदुस्तानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दुमदुमला पाहिजे.

भारत माता की जय !

भारत माता की जय !

खूप-खूप धन्यवाद!

 

  • Gaurav munday June 19, 2025

    💚🌸🌸
  • Soumen Pal June 18, 2025

    Modi ji zindabad
  • Prafulla bhanudas bhalshankar June 18, 2025

    दहशतवाद्यांचे तुकडे करून टाकणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी
  • ram Sagar pandey June 18, 2025

    🌹🙏🏻🌹जय श्रीराम🙏💐🌹🌹🌹🙏🙏🌹🌹जय श्रीकृष्णा राधे राधे 🌹🙏🏻🌹जय माँ विन्ध्यवासिनी👏🌹💐🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🙏🏻🌹जय श्रीराम🙏💐🌹🌹🌹🙏🙏🌹🌹जय माता दी 🚩🙏🙏ॐनमः शिवाय 🙏🌹🙏जय कामतानाथ की 🙏🌹🙏🌹🌹🙏🙏🌹🌹जय श्रीराम 🙏💐🌹🌹🌹🙏🙏🌹🌹🌹🙏🏻🌹जय श्रीराम🙏💐🌹जय माता दी 🚩🙏🙏
  • Polamola Anji June 18, 2025

    bjp🔥🔥
  • Polamola Anji June 18, 2025

    bjp🔥
  • Virudthan June 17, 2025

    🔴🔴🔴🔴Retail inflation dropped to 2.82% in May 2025, lowest in 75 months, driven by stable food prices & favorable base effects.
  • Virudthan June 17, 2025

    🔴🔴🔴🔴 India's retail inflation in May 2025 declined to 2.82%, the lowest since February 2019, driven by a significant drop in food inflation. #RetailInflation #IndianEconomy
  • khaniya lal sharma June 17, 2025

    🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️
  • SUNIL CHAUDHARY KHOKHAR BJP June 17, 2025

    17/06/2025
Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
Indian IPO market heads for busiest week with $1.7 billion in deals

Media Coverage

Indian IPO market heads for busiest week with $1.7 billion in deals
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Bihar will prosper and will also play a big role in the prosperity of the country: PM Modi in Siwan
June 20, 2025
QuoteBihar will prosper and will also play a big role in the prosperity of the country: PM
QuoteA record 25 crore Indians have defeated poverty in the last decade: PM
QuoteBihar will become a big center of Made in India,today, the first engine from the Marhowra Locomotive Factory is being exported to Africa: PM

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

रऊआ सब लोगन के प्रणाम कर तानी। बाबा महेंद्र नाथ, बाबा हंसनाथ, सोहगरा धाम, मां थावे भवानी, मां अंबिका भवानी, प्रथम राष्ट्रपति देशरत्न डॉ राजेंद्र प्रसाद अऊरी लोकनायक जयप्रकाश नारायण के पावन भूमि पर रऊआ सब के अभिनंदन कर तानी!

बिहार के राज्यपाल श्रीमान आरिफ मोहम्मद खान जी, यहां की जनता की सेवा में समर्पित मुख्यमंत्री श्रीमान नीतीश कुमार जी, केंद्रीय मंत्रिमंडल में मेरे साथी जीतन राम मांझी जी, गिरिराज सिंह जी, ललन सिंह जी, चिराग पासवान जी, रामनाथ ठाकुर जी, नित्‍यानंद राय जी, सतीश चंद्र दुबे जी, राजभूषण चौधरी जी, बिहार के उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी जी, विजय कुमार सिन्हा जी, संसद के मेरे साथी उपेंद्र कुशवाहा जी, बिहार बीजेपी के अध्यक्ष दिलीप जायसवाल जी, अन्य मंत्रीगण, सांसद और विधायक गण और मेरे प्यारे बिहार के भाइयों और बहनों!

सिवान की ये धरती हमारे स्वतंत्रता संग्राम की प्रेरक स्‍थली है। यह हमारे लोकतंत्र को, देश को, संविधान को ताकत देने वाली भूमि है। सिवान ने राजेंद्र बाबू जैसी महान संतान देश को दी। संविधान निर्माण से लेकर देश को दिशा दिखाने में राजेंद्र बाबू की बहुत बड़ी भूमिका रही। सिवान ने ब्रज किशोर प्रसाद जी जैसी महान समाज सुधारक भी देश को दिए। ब्रज बाबू ने महिला सशक्तिकरण को अपने जीवन का मकसद बनाया था।

|

साथियों,

मुझे खुशी है ऐसी ही महान आत्माओं के जीवन मिशन को एनडीए की यह डबल इंजन सरकार दृढ़ निश्‍चय के साथ आगे बढ़ा रही है। आज का यह कार्यक्रम इन्हीं प्रयासों का हिस्सा है। आज इस मंच से हजारों करोड़ रुपए की योजनाओं का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। विकास की ये सारी परियोजनाएं बिहार को उज्ज्वल भविष्‍य की तरफ ले जाएगी, समृद्ध बिहार बनाएगी। सिवान, सासाराम, बक्सर, मोतिहारी, बेतिया और आरा जैसे बिहार के सारे इलाके फलें-फूलें, इस दिशा में ये प्रोजेक्ट बड़ी भूमिका निभाएंगे। इनसे गरीब, वंचित, दलित, महादलित, पिछड़े, अति पिछड़े, हर समाज का जीवन आसान होगा। मैं बिहार की जनता को, आप सभी को इन प्रोजेक्‍ट्स के लिए बहुत-बहुत बधाई देता हूं। मैं अभी जब आप लोगों के बीच से आ रहा था, अभी कल ही बारिश हुई। सुबह भी थोड़ा बारिश का लाभ आया, इसके बावजूद भी इतनी बड़ी मात्रा में आपका आना, हमें आशीर्वाद देना, मैं आपका हृदय से जितना धन्यवाद करूं, उतना कम है।

भाइयों और बहनों,

जैसा आप सब जानते हैं, मैं कल ही विदेश से लौटा हूं। इस दौरे में मेरी दुनिया के बड़े-बड़े समृद्ध देशों के नेताओं से बात हुई। सारे नेता भारत की तेज प्रगति से बहुत प्रभावित हैं। वो भारत को दुनिया की तीसरी बड़ी आर्थिक महाशक्ति बनते देख रहे हैं और निश्चित तौर पर इसमें बिहार की बहुत बड़ी भूमिका होने वाली है। बिहार समृद्ध होगा और देश की समृद्धि में भी बड़ी भूमिका निभाएगा।

साथियों,

मेरे इस विश्वास का कारण बिहार के आप सभी लोगों का सामर्थ्य है। आपने मिलकर बिहार में जंगलराज का सफाया किया है। यहां के हमारे नौजवानों ने तो 20 साल पहले के बिहार की बदहाली सिर्फ किस्सों और कथाओं में ही सुनी है। उन्हें बहुत अंदाजा नहीं है कि जंगलराज वालों ने बिहार की क्या हालत बना दी थी। जिस बिहार ने सदियों तक भारत की प्रगति को नेतृत्व दिया, उसको पंजे और लालटेन के शिकंजे ने पलायन का प्रतीक बना दिया था।

|

साथियों,

बिहार के रहने वाले हर व्यक्ति के लिए सबसे बड़ी बात होती है, उसका स्‍वाभिमान। मेरे बिहारी भाई-बहन कठिन से कठिन परिस्थिति में काम करके दिखा देते हैं। वह कभी अपने स्वाभिमान से समझौता नहीं करते। लेकिन पंजे और लालटेन वालों ने मिलकर बिहार के स्वाभिमान को बहुत ठेस पहुंचाई। इन लोगों ने ऐसी लूट-खसोट मचाई की गरीबी बिहार का दुर्भाग्य बन गई। अनेक चुनौतियों को पार करते हुए नीतीश जी के नेतृत्व में NDA सरकार बिहार को विकास की पटरी पर वापस लाई है और मैं बिहारवासियों को विश्वास देने आया हूं, हमने भले ही बहुत कुछ किया हो, करते रहे हैं, करते रहेंगे, लेकिन इतने से शांत होकर के चुप रहने वाला मोदी नहीं है, अब बहुत हो गया, बहुत कर लिया जी नहीं, मुझे तो बिहार के लिए और भी बहुत कुछ करना है, आपके लिए करना है, यहां के गांव-गांव के लिए करना है, यहां के घर-घर के लिए करना है, यहां के हर नौजवान के लिए करना है। अगर मैं सिर्फ बीते 10-11 साल की बात करूं तो इन 10 वर्षों में बिहार में करीब 55 हजार किलोमीटर ग्रामीण सड़कें बनी हैं, डेढ़ करोड़ से ज्यादा घरों को बिजली के कनेक्शन से जोड़ा गया है, डेढ़ करोड़ लोगों को, वहां के घरों को पानी का कनेक्शन दिया गया है, 45 हजार से ज्यादा कॉमन सर्विस सेंटर्स बनाए गए हैं, आज बिहार के छोटे-छोटे शहरों में नए-नए स्टार्ट-अप्स खुल रहे हैं।

साथियों,

बिहार की प्रगति की ये गति लगातार बढ़ती है, इसको बढ़ाते रहना है और इसी समय बिहार में जंगलराज लाने वाले मौका देख रहे हैं कि किसी भी तरह फिर से अपने पुराने कारनामे करने का मौका ढूंढ रहे हैं। बिहार के आर्थिक संसाधनों पर कब्जा करें, इसके लिए वो तरह-तरह के हथकंडे अपना रहे हैं, इसलिए मेरे बिहार के प्यारे भाइयों-बहनों, आप के उज्ज्वल भविष्‍य के लिए, आपके बच्‍चों के उज्ज्वल भविष्‍य के लिए, आपको बहुत ही सतर्क रहना है। समृद्ध बिहार की यात्रा पर ब्रेक लगाने के लिए तैयार बैठे लोगों को कोसों दूर रखना है।

साथियों,

गरीबी हटाओ के नारे हमारे देश ने दशकों तक सुने हैं, आपकी दो-दो, तीन-तीन पीढ़ी ने गरीबी हटाओ! गरीबी हटाओ! हर चुनाव में, ये आकर के बोलते थे। लेकिन जब आपने हमें मौका दिया, एनडीए को मौका दिया, तो NDA सरकार ने दिखाया है कि गरीबी कम भी हो सकती है। बीते एक दशक में रिकॉर्ड 25 करोड़ भारतीयों ने गरीबी को पराजित किया है। वर्ल्ड बैंक जैसी दुनिया की जानी-मानी संस्थाएं, भारत की इस बड़ी उपलब्धि की प्रशंसा कर रही हैं। और भारत ने जो ये कमाल किया है, इसमें बिहार का यहां हमारे नीतीश जी की सरकार का बहुत बड़ा योगदान है। पहले बिहार की आधे से अधिक आबादी, बहुत अधिक गरीब की श्रेणी में आती थी। लेकिन बीते दशक में बिहार के करीब पौने चार करोड़ साथियों ने खुद को गरीबी से मुक्त किया है।

|

साथियों,

आज़ादी के इतने दशकों तक भी इतने लोग गरीब थे, नारे गूंजते रहे, गरीबी बढ़ती रही और ये इसलिए नहीं हुआ कि बिहार के लोगों की मेहनत में कोई कमी थी, देशवासियों की मेहनत में कोई कमी थी। बल्कि इसलिए क्योंकि इनके सामने आगे बढ़ने का कोई रास्ता नहीं था। लंबे समय तक कांग्रेस के लाइसेंस राज ने देश को गरीब रखा और गरीब को अति गरीबी में धकेल दिया। जब हर चीज के लिए कोटा-परमिट फिक्स था। छोटे-छोटे काम करने के लिए परमिट चाहिए होता था। कांग्रेस-RJD के राज में गरीब को घर नहीं मिलता था, राशन, बिचौलिए खा जाते थे, इलाज गरीब की पहुंच से दूर था, पढ़ाई और कमाई के लिए संघर्ष था, बिजली-पानी का एक कनेक्शन लगाने के लिए ही सरकारी दफ्तरों के अनगिनत चक्कर लगाने पड़ते थे। गैस कनेक्शन के लिए सांसदों की सिफारिश लगानी पड़ती थी। नौकरी बिना घूस, बिना सिफारिश के मिलती ही नहीं थी। और इसके सबसे बड़े भुक्तभोगी कौन थे, इनमें से ज्यादातर साथी मेरे दलित समाज के, महादलित समाज के, पिछड़े समाज के, अति पिछड़े समाज के यही मेरे भाई-बहन इसके शिकार हुए थे। इन्हें गरीबी हटाने का सपना दिखाकर खुद कुछ परिवार करोड़पति-अरबपति हो गए।

साथियों,

बीते 11 वर्षों से हमारी सरकार, गरीब के रास्ते की हर मुश्किल को दूर करने में जुटी है और आगे भी करती रहेगी और इतनी मेहनत करते हैं, तब ऐसे अच्‍छे परिणाम आज देखने को मिल रहे हैं। अब जैसे गरीबों के लिए आवास हैं, अभी जिन परिवारों को मुझे आवास की चाबी देने का मुझे मौका मिला, वह इतने आशीर्वाद दे रहे थे, उनके चेहरे पर इतना संतोष था, भाव-विभोर थे।

साथियों,

बीते दशक में देशभर में चार करोड़ से अधिक गरीबों को पक्के घर मिल चुके हैं। मैं आपको पूछूं, जवाब देंगे आप लोग? मैं अगर पूछूं, तो आप जवाब देंगे? मैंने अभी कहा, चार करोड़ लोगों को यानी चार करोड़ परिवारों को पक्के घर, कितने लोगों को, जरा जोर से बोलिए कितने लोगों को? चार करोड़! आप कल्पना कीजिए, चार करोड़ लोगों को पक्के घर मिलना, सिर्फ वह चार दीवारें नहीं हैं, उन घरों में सपने सजते हैं, उन घरों में संकल्प पलते हैं। आने वाले समय में तीन करोड़ और पक्के घर तैयार होने जा रहे हैं। मैंने पहले कहा ना, सेवा के काम में मैं रुकने वाला नहीं हूं। जितना हुआ, पहले वालों से बहुत अच्छा हुआ, फिर भी मोदी चैन की नींद नहीं सोएगा, वह दिन-रात काम करता रहेगा, आपके लिए करता रहेगा क्योंकि आप मेरे परिवार के सदस्य हैं और मेरे परिवार का एक भी सदस्य पीछे न रहे, दुखिया न रहे, यह मैं सपना लेकर के चला हूं। इसका बहुत अधिक फायदा बिहार के मेरे गरीब भाई-बहन, दलित भाई-बहन, महादलित भाई-बहन, पिछड़े भाई-बहन, अति पिछड़े भाई-बहन, ये सारी जो योजनाएं चला रहा हूं, सबसे पहले फायदा इनको मिल रहा है। बिहार में पीएम आवास योजना से 57 लाख से ज्यादा पक्के घर बने हैं। यहां सिवान जिले में भी गरीबों के एक लाख दस हजार से ज्यादा पक्के घर बन चुके हैं, मैं एक जिले की बात बोल रहा हूं और ये काम निरंतर जारी है। आज भी बिहार के 50 हज़ार से अधिक परिवारों के लिए घर की किश्त जारी की गई है। और जानते हैं, मेरे लिए दोहरी खुशी किस बात की है? ये घर ज्यादातर माताओं-बहनों के नाम पर हैं, मेरी जिन बहनों-बेटियों के नाम पर कभी कोई भी संपत्ति नहीं होती थी, अब वो अपने घर की मालकिन बन रही हैं।

|

साथियों,

हमारी सरकार घर के साथ-साथ मुफ्त राशन, बिजली और पानी की सुविधा भी दे रही है। बीते सालों में देशभर में 12 करोड़ से अधिक नए परिवारों के घर नल पहुंचा है। इसमें सिवान के भी साढ़े चार लाख से अधिक परिवारों को पहली बार नल से जल मिला है। गांवों में हर घर में नल हो, शहरों में पीने के लिए पर्याप्त पानी हो, हम इस लक्ष्य को लेकर काम कर रहे हैं। बीते सालों में बिहार के अनेक शहरों के लिए पानी की पाइप लाइन और सीवेज ट्रीटमेंट प्रोजेक्ट बनाए गए। अब दर्जनों और शहरों के लिए पाइप लाइन और सीवेज ट्रीटमेंट प्लांट्स स्वीकृत किए गए हैं। ये सारे प्रोजेक्ट, गरीब और मध्यम वर्ग के परिवारों का जीवन और बेहतर बनाएंगे।

भाइयों और बहनों,

आरजेडी-कांग्रेस की करतूतें, इनके कारनामे, बिहार विरोधी हैं, निवेश विरोधी हैं। जब भी अपने मुंह से ये लोग विकास की बात करते हैं, तो लोगों को दुकान-कारोबार, उद्योग-धंधे, सब में ताले लटकते नजर आते हैं। इसलिए, ये बिहार के नौजवानों के दिल में कभी भी जगह नहीं बना पाए। ये लोग, बेहाल इंफ्रास्ट्रक्चर, माफिया राज, गुंडाराज और भ्रष्टाचार के पोषक रहे हैं।

|

साथियों,

बिहार का प्रतिभाशाली नौजवान आज जमीन पर होने वाले काम देख रहा है, उसे परख रहा है। NDA, कैसा बिहार बना रही है, इसका उदाहरण मढ़ौरा रेल फैक्ट्री है। आज मढ़ौरा की लोकोमोटिव फैक्ट्री से पहला इंजन, अफ्रीका को एक्सपोर्ट किया जा रहा है। यह आप ही का जाएगा, वहां की गाड़ी को खींचेगा। आप सोचिए, अफ्रीका में भी बिहार की जय-जयकार होने वाली है। ये फैक्ट्री उसी सारण जिले में बनी है, जिसको पंजे और आरजेडी वालों ने पिछड़ा कहकर अपने हाल पर छोड़ दिया था। आज ये जिला दुनिया के मैन्युफैक्चरिंग और एक्सपोर्ट मैप पर अपनी जगह बना चुका है। जंगलराज वालों ने तो बिहार का विकास इंजन ही ठप कर दिया था, अब बिहार में बना इंजन, अफ्रीका की रेल चलाएगा। ये बहुत बड़े गर्व की बात है, मुझे पक्का विश्वास है बिहार, मेड इन इंडिया का एक बड़ा सेंटर बनेगा। यहां का मखाना, यहां के फल-सब्जियां तो बाहर जाएंगी ही, बिहार के कारखानों में बनने वाला सामान भी दुनिया के बाज़ारों तक पहुंचेगा। बिहार के नौजवान जो सामान बनाएंगे, वो आत्मनिर्भर भारत को ताकत देगा।

साथियों,

इसमें बिहार में बन रहा आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर बहुत काम आएगा। आज बिहार में रोड, रेल, हवाई यात्रा और जलमार्ग, हर प्रकार के इंफ्रास्ट्रक्चर पर अभूतपूर्व निवेश हो रहा है। बिहार को लगातार नई ट्रेनें मिल रही हैं। यहां वंदे भारत जैसी आधुनिक ट्रेनें चल रही हैं। आज हम एक और बड़ी शुरुआत करने जा रहे हैं। सावन शुरु होने से पहले आज बाबा हरिहरनाथ की धरती, वंदे भारत ट्रेन से बाबा गोरखनाथ की धरती से जुड़ गई है। पटना से गोरखपुर की नई वंदे भारत ट्रेन, पूर्वांचल के शिव भक्तों को मिली नई सवारी है। ये ट्रेन भगवान बुद्ध की तपोभूमि को, उनकी महापरिनिर्वाण भूमि कुशीनगर से जोड़ने का भी माध्यम है।

|

साथियों,

ऐसे प्रयासों से बिहार में उद्योग-धंधों को तो बल मिलेगा ही, इससे पर्यटन को सबसे अधिक फायदा होगा। इससे दुनिया के टूरिज्म मैप में भी बिहार और अधिक निखर कर सामने आएगा। यानी बिहार के नौजवानों के लिए रोजगार के अनगिनत अवसर बनने वाले हैं।

साथियों,

देश में सबको आगे बढ़ने के अवसर मिले, किसी के साथ भी भेदभाव न हो, ये हमारे संविधान की भावना है। हम भी इसी भाव से कहते हैं- सबका साथ, सबका विकास। लेकिन ये लालटेन और पंजे वाले कहते हैं- परिवार का साथ, परिवार का विकास। हम कहते हैं- सबका साथ, सबका विकास। वह कहते हैं- परिवार का साथ, परिवार का विकास। इनकी राजनीति का कुल जमा निचोड़ यही है। अपने-अपने परिवारों के हित के लिए ये देश के, बिहार के करोड़ों परिवारों का अहित करने से भी नहीं चूकते हैं। खुद बाबा साहेब अंबेडकर भी इस प्रकार की राजनीति के बिल्कुल खिलाफ थे। इसलिए ये लोग कदम-कदम पर बाबा साहेब का अपमान करते हैं। अभी पूरे देश ने देखा है कि RJD वालों ने बाबा साहेब की तस्वीर के साथ क्या व्यवहार किया हैं। मैं देख रहा था, बिहार में पोस्टर लगे हैं कि बाबा साहेब के अपमान पर माफी मांगो, लेकिन मैं जानता हूं, ये लोग कभी माफी नहीं मांगेंगे, क्योंकि इन लोगों के मन में दलित, महादलित, पिछड़े, अति पिछड़े के प्रति कोई सम्मान नहीं है। आरजेडी और कांग्रेस बाबा साहेब अंबेडकर की तस्वीर को पैरों में रखती है, जबकि मोदी बाबा साहेब अंबेडकर को अपने दिल में रखता है। बाबा साहेब का अपमान करके ये लोग खुद को बाबा साहेब से भी बड़ा दिखाना चाहते हैं। बिहार के लोग बाबा साहेब का ये अपमान कभी नहीं भूलेंगे।

|

साथियों,

बिहार की तेज प्रगति के लिए जो लॉन्चिंग पैड चाहिए, वो नीतीश जी के प्रयासों से तैयार हो चुका है। अब एनडीए को मिलकर, बिहार को तरक्की की नई बुलंदी देनी है। मुझे बिहार के नौजवानों पर भरोसा है। हम सभी मिलकर बिहार का प्राचीन गौरव फिर लौटाएंगे, बिहार को विकसित भारत का मजबूत इंजन बनाएंगे, इसी विश्वास के साथ, आप सभी को विकास कार्यों की फिर से अनेक-अनेक शुभकामनाएं। मेरे साथ दोनों मुट्ठी बंद करके हाथ ऊपर करके बोलिए, भारत माता की जय! जिसके पास तिरंगा है, वह तिरंगा लहराएंगे।

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

बहुत-बहुत धन्यवाद!

|