The wonderful homes under PM Awas Yojana are being made possible because there are no middlemen: PM
It is my dream, it is our endeavour to ensure that every Indian has his own house by 2022: PM Modi
Till now, we only heard about politicians getting their own homes. Now, we are hearing about the poor getting their own homes: PM Modi

दोन-तीन दिवसांनी रक्षाबंधनाचा पवित्र सण आहे आणि आपण सर्व भगिनी इतक्या मोठ्या संख्येने राखी घेवून आला आहात. याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. देशभरातल्या माता-भगिनींनी आशीर्वाद देवून मला जे रक्षा कवच दिलं आहे, आशीर्वाद दिले आहेत, त्यासाठी मी या सर्व माता-भगिनींचे अगदी मनापासून आभार व्यक्त करतो.

रक्षाबंधनाचा सण दोन दिवसांवर आला आहे आणि गुजरातमध्ये एक लाखांपेक्षा अधिक कुटुंबांना, बहिणींना त्यांच्या नावावर आपले घर मिळत आहे. मला वाटते की, रक्षाबंधनाची यापेक्षा चांगली भेट दुसरी कोणतीही असू शकणार नाही.

आपल्याला घर नाही, त्याचा जो त्रास होत असतो, घराशिवाय आयुष्य कसं कंठावं लागतं, भविष्य कसं अंधःकारमय आहे, ही भावना मनात कशी निर्माण होते. आपलं हक्काचं घर बांधायचं असं,रोज सकाळी एक स्वप्न पाहतच असा बेघर माणूस उठत असतो. संध्याकाळ होईपर्यंत त्याचं हे स्वप्न धुळीला मिळत असतं. अशाचप्रकारे झोपडपट्टीमध्ये मग आयुष्य काढावं लागतं. ज्या भगिनींना आज घर मिळाले आहे, त्यांनी याचा अनुभव घेतला असणार.

परंतु आता या भगिनींचे स्वतःच्या घरकुलाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्यांची स्वप्नही सत्यामध्ये उतरली आहेत. आता आपली नवीन स्वप्ने ते पाहू शकणार आहेत आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी संपूर्ण कुटूंब, यामध्ये अबालवृद्धही मेहनत करणार आहेत. पुरुषार्थ दाखवणार आहेत. अशा पद्धतीनेच आयुष्यामध्ये परिवर्तन घडून येण्यास प्रारंभ होत असतो.

या राखी पौर्णिमेच्या पवित्र सणाच्या आधीच मी या सर्व माता-भगिनींना, एक लाखापेक्षा जास्त कुटुंबांना घरकुलाची भेट देत आहे. आपला भाऊ म्हणून ही भेट देतांना मला खूप आनंद होत आहे.

आज आणखी एका योजनेचा प्रारंभ करण्यात येत आहे. 600 कोटी रूपये खर्चून ही योजना पूर्ण होणार आहे. ही योजनाही एक प्रकारे राखी पौर्णिमेच्या सणापूर्वी आमच्या माता- भगिनींना दिलेली भेटच आहे. पाण्याच्या समस्येचा त्रास आपल्या परिवारामध्ये सर्वात जास्त होतो, तो म्हणजे घरातल्या महिलावर्गाला. माता-भगिनींना पाणीटंचाईच्या सर्वात जास्त झळा जाणवतात. संपूर्ण कुटुंबाला लागत असलेले पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आपल्या घरांमध्ये माता-भगिनीच उचलत असतात. त्याचबरोबर प्यायला जर स्वच्छ, शुद्ध पाणी उपलब्ध होवू शकले नाही तर मात्र त्या घराला जणू आजारपणाचा शाप लागतो. पेयजल जर शुद्ध असेल तर, त्या कुटुंबाचा अनेक आजारांपासून बचाव होवू शकतो.

माझ्या आयुष्यातली अनेक वर्षे मी आदिवासी क्षेत्रामध्ये घालवली आहेत. ज्यावेळी मी धर्मपूर सिदम्बाडी या भागात वास्तव्य करत होतो, त्यावेळी माझ्या मनामध्ये एक प्रश्न नेहमीच उपस्थित व्हायचा की, या भागामध्ये इतका चांगला पाऊस होतो तरीही दिवाळीनंतर अवघ्या दोन महिन्यांनंतर फारसा पाणीसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे या भागातल्या लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्याकाळातल्या गोष्टी मला चांगल्याच स्मरणामध्ये आहेत. धर्मपूरमध्ये सिदम्बूर, आणि त्या पूर्ण पट्ट्यामध्ये सगळे या भागातल्या आदिवासींपासून  उमरगांव ते अम्बाजीपर्यंत वास्तविक खूप चांगला पाऊस पडतो. आदिवासी पट्ट्यामध्ये भरपूर पाऊस पडतो. पावसाचे हे सगळे पाणी आमच्या बाजूला म्हणजे सागराच्या दिशेला जाते. पावसाचे पाणी असेच वाहून जात असल्यामुळे, तो संपूर्ण भाग काही महिन्यातच कोरडा पडतो. हे माझ्या त्याचवेळी लक्षात आले होते.

यानंतर ज्यावेळी मी राज्याचा मुख्यमंत्री बनलो, त्यावेळी हजारों कोटी रूपये खर्चाची तरतूद केली. या निधीतून उमरगांवापासून ते अम्बाजीपर्यंतचा संपूर्ण आदिवासी पट्टा  आहे, त्या गुजरातच्या पूर्वेकडील भागामधल्या प्रत्येक गावाला आणि गावातल्या प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न मी पाहू लागलो.

आत्ता आपल्याला जी ध्वनिचित्रफीत दाखवली, त्यामध्ये सांगितलं आहे की, या प्रकल्पामध्ये एकूण दहा योजनांचा समावेश आहे. त्यापैकी आज अखेरच्या दहाव्या योजनेच्या कामाचा प्रारंभ करण्यात येत आहे. ज्या लोकांनी ही ध्वनिचित्रफीत पाहिली आहे, त्यांनाही खूप आश्चर्य वाटत असेल. या योजनेतून सर्वात जास्त उंचीवर पाणी पोहोचणार आहे, सोप्या शब्दात सांगायचं तर, त्या भागात  इमारत जर 200 मजल्यांची असेल, तरीही शेवटच्या मजल्यावरच्या घरामध्ये पाणी घेवून जाता येणार आहे. याचाच एक अर्थ असा आहे की, नदीच 200 मजले उंचीवर घेवून जाण्यात येणार आहे आणि तिथून पाणी खालच्या लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे. हे तंत्रज्ञानामुळे निर्माण झालेले आश्चर्य आहे.

आमच्या देशामध्ये अतिशय दुर्गम स्थानी गिरच्या जंगलामध्ये एक निवडणूक मतदान केंद्र होतं. या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी फक्त एक मतदार होता. त्या एका मतदारासाठी घनदाट जंगलामध्ये मतदान केंद्र उघडण्यात आलं होतं. या बातमीला प्रसार माध्यमांनी अगदी चैकटीमध्ये विशेष स्थान दिलं होतं. हिंदुस्तानामध्ये निवडणूक प्रक्रिया अशीच आहे. गिरच्या जंगलामध्ये केवळ एका मतदारासाठी मतदान केंद्र सुरू करण्याची सर्व व्यवस्था करण्यात येते.

मला वाटतं की, ही योजनासुद्धा सर्वांच्या दृष्टीने एक नवलपूर्ण गोष्ट बनणार आहे. या भागात अगदी वरच्या बाजूला एक छोटंस गाव आहे. या गावाची लोकसंख्या 200-300 आहे. या लोकांच्या वस्तीला पाणीपुरवठा करण्यासाठी एक संवेदनशील सरकार 200 मजल्यांपर्यंत उंचीवर पाणी नेणार आहे. प्रत्येक नागरिकांविषयी आमच्या मनामध्ये असलेला भक्तीचा भाव दाखवणारे हे एक जीवंत उदाहरण आहे, असे म्हणावे लागेल.

याआधीही सरकारांनी सत्ता उपभोगली आहेच. आदिवासी मुख्यमंत्रीही होवून गेले आहेत. मी राज्याचा मुख्यमंत्री होण्याच्याआधी एक आदिवासी नेते मुख्यमंत्री होते. मी ज्यावेळी नव्यानं मुख्यमंत्री झालो, त्यावेळी या माजी आदिवासी मुख्यमंत्र्याच्या गावी गेलो होतो त्यावेळी दिसून आले की, गावात पाण्याची टाकी आहे, परंतु त्यामध्ये पाणीच नाही. त्यांच्या गावाला पाणी देण्याचे काम मी केले, हे माझे सौभाग्य मानतो.

जर कोणी पाणपोई सुरू करतो आणि येणा-या -जाणा-या वाटसरूंसाठी पेयजलाची सुविधा व्हावी म्हणून एक- दोन माठ पाणी भरून ठेवण्याची व्यवस्था करतो, तर त्या कुटुंबाविषयी परिसरामध्ये खूप आदराने बोलले जाते. या परिवाराविषयी अभिमानाने सांगितले जाते.

ज्यांनी पाण्यासाठी कार्य केलं, त्या  लाखा बलधाराची कथा आजही सांगितली जाते. गुजरात आणि राजस्थानातल्या गावां गावांमधून ही कथा लोकांच्या तोंडी असते. मला सांगा, असं कोणीतरी पाण्यासाठी काम केलं आहे का? गुजरात सरकारने घरा घरांमध्ये नळाने पाणी पोहोचवण्याचे कार्य केलं आहे, यासाठी या सरकारने जी मोहीम सुरू केली आहे, त्याचा मला गर्व वाटतो.

भविष्यामध्ये आमचा गुजरात कसा असेल, गरीबातल्या गरीब व्यक्तीचं आयुष्य कसं असेल, आमचे स्वप्ने काय आहेत, या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी, ती साकार करण्यासाठी आम्ही नेमके कसे प्रयत्न करणार आहोत, याचे सगळे चित्र आता स्पष्ट होत आहे.

आपण सर्वांनीच आत्ता पाहिलं असेल. अर्धा-पाऊण तासाच्या काळात मला आज एक प्रकारे संपूर्ण गुजरातचा जणू दौरा करण्याची संधी मिळाली. तिथल्या माता भगिनींशी संवाद साधण्याची संधीही मिळाली. मी त्या काय बोलत आहेत, हे ऐकत होतो. त्याचबरोबर माझं लक्ष त्यांच्या घराकडे होती. त्यांनी घर कसं बनवलं आहे, हे तर तुम्हीही पाहिलं असेल. प्रधानमंत्री आवास योजना, सरकारी योजनेतून इतकं चांगलं घरकूल बनवणं शक्य आहे का? असा प्रश्न ती छान घरं पाहून तुम्हालाही नक्कीच पडला असेल. आता हे कसं शक्य आहे ते सांगतो. आम्ही ‘कट’ कंपनी बंद केली आहे, म्हणूनच हे शक्य होवू शकलं आहे.

दिल्लीमधून ज्यावेळी एक रूपयाची मदत दिली जाते, त्यावेळी या गरीबाच्या घरामध्ये अगदी पूर्णच्या पूर्ण 100 पैसे पोचतात. हे सरकारचे खरे काम आहे. यामुळेच अशी कामे शक्य होत आहेत. आज या इथं असंख्य टी.व्ही.वाले उपस्थित आहेत. अनेक वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आलेले आहेत. इतक्या प्रचंड संख्येने जनता उपस्थित आहे. आणि संपूर्ण देश दूरचित्रवाणी पाहत आहे. या सगळ्यांसमोर कोणत्याही एका लाभार्थी माता – भगिनीला कुणीही प्रश्न विचारू शकतो की, ‘‘या घरासाठी आपल्याला कोणाला लाच तर द्यावी लागली नाही ना? कोणी दलाली तर घेतली नाही ना?’’ असे प्रश्न विचारण्याची कोणीही हिम्मत दाखवू शकतो.

आम्ही राष्ट्राच्या चरित्राच्या निर्माणाचे काम करत आहोत. कोणाच्याही अशा प्रश्नांवर आमच्या माता-भगिनी जे उत्तर देतात, त्यामुळे मी आज जास्त आनंदी आहे. ज्यावेळी या माता भगिनी मोठ्या आत्मविश्वासाने आणि अतिशय आनंदाने सांगतात ‘‘ नाही, नाही. आम्ही कोणालाही लाच, दलाली दिली नाही. आम्हाला आमच्या हक्काचे घर मिळत आहे. नियमित नियमांप्रमाणे ते मिळत आहे. आम्हाला कोणालाही एक नवा रुपयाही द्यावा लागला नाही.’’ त्यांच्या उत्तराने मी अधिक संतुष्ट आहे.

ही घरकुले आपण पाहिलीच आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेमधून बांधण्यात आलेल्या या घरांचा दर्जा ज्यावेळी आपण पाहतो, त्यावेळी तुम्हालाही प्रश्न पडला असेल,  सरकारने बनवलेली घरे इतकी चांगली कशी काय असू शकतील? आपल्याला पडलेला प्रश्नही, तुम्ही केलेला विचार अगदी बरोबर आहे. सरकारने निधी दिला आहे. परंतु सरकारच्या निधीबरोबरच या लाभार्थी कुटुंबाच्या मेहनतीचा घामही त्यामध्ये मिसळला आहे. आपलं घर कसं असावं, हे या लोकांनीच ठरवलं होतं. कोणते सामान वापरले पाहिजे, कशा पद्धतीने घर बांधलं जावं, हेही या कुटुंबांनीच ठरवलं आहे.

सरकारी कंत्राटदारांच्या भरवशावर आम्ही काम केलेलं नाही. आम्ही या लाभार्थी कुटंबांवर विश्वास टाकला. आणि ज्यावेळी एखादे कुटुंब स्वतःला राहण्यासाठी आपलं घरकूल बनवतो, त्यावेळी ते त्याच्यासाठी सर्वोत्तम असतं. म्हणूनच आज हे परिवार अतिशय आनंदात आहेत. त्यांना हवं तसं घर त्यांनी बनवलं आहे. गुजरातमधल्या प्रत्येक गावामध्ये या कुटुंबियांनी आपल्याला हव्या असलेल्या सुविधांनी युक्त अशी घरे बनवली आहेत. यासाठी मी या कुटुंबियांचे अभिनंदन करतो.

देशाला गरीबीमधून मुक्त करण्याची खूप मोठी मोहीम आम्ही सुरू केली आहे. यामध्ये गरीबांचे सशक्तीकरण करण्यात येणार आहे. आपल्याकडे आधीपासूनच  बँका आहेत. परंतु या बँकांमध्ये गरीबाला प्रवेश नव्हता. आम्ही बँकच आता गरीबाच्या घरासमोर आणून उभी केली आहे. प्रधानमंत्री जन-धन योजना यासाठीच सुरू केली.

गावांमध्ये श्रीमंतांच्या घरामध्ये विजेचे कनेक्शन असायचे. गरीबाच्या घरी विजेची जोडणी कधीच केली गेली नाही. माझ्या घरातला अंधःकार कधी जाणार, तो कधी काळी जाईल की नाही? असा प्रश्न त्याला पडलेला असायचा. आज उजाला योजनेअंतर्गत सौभाग्य योजना राबवून प्रत्येक घरा घरामध्ये विजेची जोडणी देण्याची मोठी मोहीम आम्ही राबवली आहे. आगामी एक ते दीड वर्षामध्ये हिंदुस्तानामधल्या सर्व घरांमध्ये वीज पोहोचलेली असेल. वीजेची जोडणी नाही, असे घरंच येत्या एक-दीड वर्षांनंतर दिसणार नाही.

प्रत्येकाकडे स्वमालकीचे घर असावे, घरामध्ये शौचालय असावे, घरामध्ये वीज असावी, पिण्याच्या स्वच्छ पाण्याचा त्या घराला नळाव्दारे पुरवठा केला जावा, घरामध्ये स्वयंपाकाचा गॅस असावा. यासाठी आम्ही योजना राबवत आहोत. एकप्रकारे गरीबाच्या आयुष्यात अमुलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.

माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, आपण लोकांनी मला मोठं बनवलं आहे. तुम्ही गुजरातच्या लोकांनी माझं पालन-पोषण केलं आहे. गुजरातने मला खूप काही शिकवलं आहे. आणि आपल्याकडून मी जे काही शिकलो आहे, त्याचा परिणाम म्हणजे मी कोणतेही स्वप्न अतिशय काटेकोर वेळेचे नियोजन करून निश्चित केलेल्या समय सीमेमध्येच ते कसे पूर्ण होईल, यासाठी प्रयत्न करीत असतो. आता 2022 मध्ये, ज्यावेळी हिंदुस्तानला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होतील, त्यावेळी या आपलं स्वतःच घर नाही, असे एकही कुटूंब असणार नाही. प्रत्येक परिवाराचे स्वमालकीचे घर असेल,असा हिंदुस्तान बनवण्याचे स्वप्न मी पाहिले आहे.

आत्तापर्यंत नेत्यांनी बनवलेल्या आपल्या मोठ-मोठ्या घरांच्या बातम्या येत होत्या. नेत्यांनी आपल्या घराची सजावट कशी केली आहे, याच्या बातम्या आत्तापर्यंत येत होत्या. आता मात्र गरीबांसाठी कशा रितीने घर बनवले आहे, त्याची वृत्ते येत आहेत. गरीबांच्या घराची सजावट कशी केली गेली आहे, या बातम्या आता येत आहेत.

एक लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये हे परिवार आज वास्तुप्रवेश करत आहेत आणि त्यांच्या या आनंदामध्ये सहभागी होण्यासाठी वलसाडच्या भूमीवर आज पंतप्रधान आले आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या कुटुंबियांच्या आनंदामध्ये मी सहभागी होत आहे, यामुळे त्यांच्यामध्ये निर्माण झालेला उत्साह, पाहून त्यांच्याइतकाच आनंदीत होणारा हा प्रधानमंत्री आहे.

बंधू-भगिनींनो, गेला आठवडा आपल्यासाठी खूप दुःखद ठरला. अटल बिहारी वाजपेयीजी आपल्याला सोडून निघून गेले. परंतु त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये पक्का रस्ता बांधून ते गाव शहराला जोडण्याचे काम आम्ही निश्चित केलेल्या अवधीमध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य गाठण्यासाठी कार्यरत आहोत.

एकूण समाजामध्ये अमुलाग्र परिवर्तन आणण्याच्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत. आज इथे आपण पाहिलेच असेल की कौशल्य विकासाचे कार्य कसे सुरू आहे. दुर्गम-अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी भागात, जंगलांमध्ये वास्तव्य करत असलेल्या युवतींनी कौशल्य विकसनाचा लाभ घेतल्यानंतर त्यांना रोजी-रोटी कमावण्यासाठी किती चांगल्या संधी मिळत आहेत. या कन्यांना प्रमाणपत्र देण्याची मला आज संधी मिळाली आहे.

आपण अशा प्रकारे पुढाकार घेवून योजनांचा लाभ घेतला तर आपोआपच देशाला अनेक समस्यांमधून मुक्त करता येवू शकते. देशातल्या सामान्यातल्या सामान्य माणसाचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.

वलसाडच्या माझ्या बंधू-भगिनींनो, वास्तविक या आधीच, काही दिवसांपूर्वीच मी इथं येणार होतो. तसा कार्यक्रमही ठरवला होता. परंतु पावसामुळे ठरलेला कार्यक्रम रद्द करावा लागला. पाऊसही काही वेळेस आला की खूप जोरदार येतो. आणि नाही आला तर त्याचा काही आठवडे पत्ताच नसतो. गुजरातमधल्या काही भागामध्ये तर यंदा अजिबातच पाऊस झाला नाही. त्यामुळे खूपच चिंता निर्माण झाली. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये सर्वदूर झालेल्या चांगल्या पर्जन्यवृष्टीने गुजरातच्या काही भागाची समस्या संपुष्टात आली आहे. या पावसामुळे आगामी वर्ष पाण्याच्या दृष्टीने नक्कीच चांगले जाईल. कृषी क्षेत्रालाही या पावसाचा खूप चांगला लाभ होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.

वलसाडचे माझे प्रिय बंधू, भगिनी इतक्या मोठ्या संख्येने आपण इथं आलात आणि दीर्घकाळ आपण अगदी मनापासून इथं बसून राहिलात, त्याबद्दल आपले किती आभार मानावेत, तेवढे कमी आहेत.

सर्व माता, भगिनींनो, राखी पौर्णिमेच्या आपल्या सर्वांना खूप- खूप शुभेच्छा देवून आपल्या सर्वांना खूप -खूप धन्यवाद देतो.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress

Media Coverage

Govt directs faster processing of city gas projects, hikes commercial LPG allocation to ease supply stress
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
This is the New India that leaves no stone unturned for development: PM Modi
March 23, 2026
Today, India is moving forward with a new confidence; Now India faces challenges head-on: PM
From the Gulf to the Global West and from the Global South to neighbouring countries, India is a trusted partner for all: PM
What gets measured gets improved and ultimately gets transformed: PM
This is the new India, It is leaving no stone unturned for development: PM

नमस्कार!

पिछले कुछ समय में मुझे एक-दो बार टीवी9 भारतवर्ष देखने का मौका मिला है। नॉर्मली भी युद्धों और मिसाइलों पर आपका बहुत फोकस होता है और आजकल तो आपको कंटेंट की ओवरफीडिंग हो रही है। बड़े-बड़े देश टीवी9 को इतना सारा कंटेंट देने पर तुले हुए हैं, लेकिन On a Serious Note, आज विश्व जिन गंभीर परिस्थितियों से गुजर रहा है, वो अभूतपूर्व है और बेहद गंभीर है। और इन स्थितियों के बीच, आज टीवी-9 नेटवर्क ने विचारों का एक बेहद महत्वपूर्ण मंच बनाया है। आज इस समिट में आप सभी India and the world, इस विषय पर चर्चा कर रहे हैं। मैं आप सबको बधाई देता हूं। इस समिट के लिए अपनी शुभकामनाएं देता हूं। सभी अतिथियों का अभिनंदन करता हूं।

साथियों,

आज जब दुनिया, conflicts के कारण उलझी हुई है, जब इन conflicts के दुष्प्रभाव पूरी दुनिया पर दिख रहे हैं, तब India and the world की बात करना बहुत ही प्रासंगिक है। भारत आज वो देश है, जिसकी अर्थव्यवस्था तेजी से आगे बढ़ रही है। 2014 के पहले की स्थितियों को पीछे छोड़कर के आज भारत एक नए आत्मविश्वास के साथ आगे बढ़ रहा है। अब भारत चुनौतियों को टालता नहीं है बल्कि चुनौतियों से टकराता है। आप बीते 5-6 साल में देखिए, कोरोना की महामारी के बाद चुनौतियां एक के बाद एक बढ़ती ही गई हैं। ऐसा कोई साल नहीं है, जिसने भारत की, भारतीयों की परीक्षा न ली हो। लेकिन 140 करोड़ देशवासियों के एकजुट प्रयास से भारत हर आपदा का सामना करते हुए आगे बढ़ रहा है। इस समय युद्ध की परिस्थितियों में भी भारत की नीति और रणनीति देखकर, भारत का सामर्थ्य देखकर दुनिया के अनेकों देश हैरान हैं। हमारे यहां कहावत है, सांच को आंच नहीं। 28 फरवरी से दुनिया में जो उथल-पुथल मची है, इन कठोर विपरीत परिस्थितियों में भी भारत प्रगति के, विकास के, विश्वास के संकल्प के साथ आगे बढ़ रहा है। इन 23 दिनों में भारत ने अपनी Relationship Building Capacity दिखाई है, Decision Making Capacity दिखाई है और Crisis Management Capacity दिखाई है।

साथियों,

आज जब दुनिया इतने सारे खेमों में बंटी हुई है, भारत ने अभूतपूर्व और अकल्पनीय bridges बनाए हैं। Gulf से लेकर Global West तक, Global South से लेकर पड़ोसी देशों तक भारत सभी का trusted partner है। कुछ लोग पूछते हैं, हम किसके साथ हैं? तो उनको मेरा जवाब यही है कि हम भारत के साथ हैं, हम भारत के हितों के साथ हैं, शांति के साथ हैं, संवाद के साथ हैं।

साथियों,

संकट के इसी समय में जब global supply chains डगमगा रही हैं, भारत ने diversification और resilience का मॉडल पेश किया है। Energy हो, fertilizers हों या essential goods अपने नागरिकों को कम से कम परेशानी हो, इसके लिए भारत ने निरंतर प्रयास किया है और आज भी कर रहे है।

साथियों,

जब राष्ट्रनीति ही राजनीति का मुख्य आधार हो, तब देश का भविष्य सर्वोपरि होता है। लेकिन जब राजनीति में व्यक्तिगत स्वार्थ हावी हो जाता है, तब लोग देश के फ्यूचर के बजाय अपने फ्यूचर के बारे में सोचते हैं। आप ज़रा याद कीजिए 2004 से 2010 के बीच क्या हुआ था? तब कांग्रेस सरकार के समय पेट्रोल-डीजल और गैस की कीमतों का संकट आया था और तब कांग्रेस ने देश की नहीं बल्कि अपनी सत्ता की चिंता की। उस वक्त कांग्रेस ने एक लाख अड़तालीस हज़ार करोड़ रुपए के ऑयल बॉन्ड जारी किए थे और प्रधानमंत्री मनमोहन सिंह जी ने खुद कहा था कि वो आने वाली पीढ़ी पर कर्ज का बोझ डाल रहे हैं। यह जानते हुए भी कि ऑयल बॉन्ड का फैसला गलत है, जो रिमोट कंट्रोल से सरकार चला रहे थे, उन लोगों ने अपनी सत्ता बचाने के लिए यह गलत निर्णय किया क्योंकि जवाबदेही उस समय नहीं होनी थी, उस बॉन्ड पर री-पेमेंट 2020 के बाद होनी थी।

साथियों,

बीते 5-6 वर्षों में हमारी सरकार ने कांग्रेस सरकार के उस पाप को धोने का काम किया है, और इस धुलाई का खर्चा कम नहीं आया है, ऐसी लाँड्री आपने देखी नहीं होगी। 1 लाख 48 हज़ार करोड़ रुपए की जगह, देश को 3 लाख करोड़ रुपए से अधिक की पेमेंट करनी पड़ी क्योंकि इसमें ब्याज भी जुड़ गया था। यानी हमने करीब-करीब दोगुनी राशि चुकाने के लिए मजबूर हुए। आजकल कांग्रेस के जो नेता बयानों की मिसाइलें दाग रहे हैं, मिसाइल आई तो टीवी9 को मजा आएगा, उनकी इस विषय का जिक्र आते ही बोलती बंद हो जाती है।

साथियों,

पश्चिम एशिया में बनी परिस्थितियों पर मैंने आज लोकसभा में अपना वक्तव्य दिया है। दुनिया में जहां भी युद्ध हो रहे हैं, वो भारत की सीमा से दूर हैं। लेकिन आज की व्यवस्थाओं में कोई भी देश युद्धों से दुष्प्रभाव से दूर रहे, ऐसा संभव नहीं होता। अनेक देशों में तो स्थिति बहुत गंभीर हो चुकी है। और इन हालातों में हम देख रहे हैं कि राजनीतिक स्वार्थ से भरे कुछ लोग, कुछ दल, संकट के इस समय में भी अपने लिए राजनीतिक अवसर खोज रहे हैं। इसलिए मैं टीवी9 के मंच से फिर कहूंगा, यह समय संयम का है, संवेदनशीलता का है। हमने कोरोना महासंकट के दौरान भी देखा है, जब देशवासी एकजुट होकर संकट का सामना करते हैं, तो कितने सार्थक परिणाम आते हैं। इसी भाव के साथ हमें इस युद्ध से बनी परिस्थितियों का सामना करना है।

साथियों,

दुनिया की हर उथल-पुथल के बीच, भारत ने अपनी प्रगति की गति को भी बनाए रखा है। अगर मैं 28 फरवरी को युद्ध शुरू होने के बाद, बीते 23 दिनों का ही ब्यौरा दूं, तो पूरब से पश्चिम तक, उत्तर से दक्षिण तक देश में हजारों करोड़ के डेवलपमेंट प्रोजेक्ट्स का काम हुआ है। दिल्ली मेट्रो रेल के महत्वपूर्ण कॉरिडोर्स का लोकार्पण, सिलचर का हाई स्पीड कॉरिडोर का शिलान्यास, कोटा में नए एयरपोर्ट का शिलान्यास, मदुरै एयरपोर्ट को इंटरनेशनल एयरपोर्ट का दर्जा देना, ऐसे अनेक काम बीते 23 दिनों में ही हुए हैं। बीते एक महीने के दौरान ही औद्योगिक विकास को गति देने के लिए भव्य स्कीम को मंजूरी दी गई है। इसके तहत देशभर में 100 plug-and-play industrial parks विकसित किए जाएंगे। देश में Small Hydro Power Development Scheme को भी हरी झंडी दी गई है। इससे आने वाले वर्षों में 1,500 मेगावाट नई hydro power capacity जोड़ी जाएगी। इसी दौरान जल जीवन मिशन को साल 2028 तक बढ़ाने का निर्णय लिया गया है। किसानों के हित में भी अनेक बड़े निर्णय लिए गए हैं। बीते एक महीने में ही पीएम किसान सम्मान निधि के तहत 18 हजार करोड़ रुपए से अधिक सीधे किसानों के खातों में ट्रांसफर किए गए हैं। और जो हमारे MSMEs हैं, जो हमारे निर्यातक हैं, उनके लिए भी करीब 500 करोड़ रुपए के राहत पैकेज की भी घोषणा की गई है। यह सारे कदम इस बात का प्रमाण हैं कि विकसित भारत बनाने के लिए देश कितनी तेज गति से काम कर रहा है।

साथियों,

Management की दुनिया में एक सिद्धांत कहा जाता है - What gets measured, gets managed. लेकिन मैं इसमें एक बात और जोड़ना चाहता हूं, What gets measured, gets improved और ultimately, gets transformed. क्योंकि आकलन जागरूकता पैदा करता है। आकलन जवाबदेही तय करता है और सबसे महत्वपूर्ण आकलन संभावनाओं को जन्म देता है।

साथियों,

अगर आप 2014 से पहले के 10-11 साल और 2014 के बाद के 10-11 साल का आप आकलन करेंगे, तो यही पाएंगे कि कैसे इसी सिद्धांत पर चलते हुए, भारत ने हर सेक्टर को Transform किया है। जैसे पहले हाईवे बनते थे, करीब 11-12 किलोमीटर प्रति दिन की रफ्तार से, आज भारत करीब 30 किलोमीटर प्रतिदिन की स्पीड से हाईवे बना रहा है। पहले पोर्ट्स पर शिप का Turnaround Time, 5-6 दिन का होता था। आज वही काम, करीब-करीब 2 दिन से भी कम समय में पूरा हो रहा है। पहले Startup Culture के बारे में चर्चा ही नहीं होती थी। 2014 से पहले, हमारे देश में 400-500 स्टार्ट अप्स ही थे। आज भारत में 2 लाख से ज्यादा रजिस्ट्रर्ड स्टार्ट अप्स हैं। पहले मेडिकल education में सीटें भी सीमित थीं, करीब 50-55 हजार MBBS seats थीं, आज यह बढ़कर सवा लाख से ज्यादा हो चुकी हैं। पहले देश के Banking system से भी करोड़ों लोग बाहर थे। देश में सिर्फ 25 करोड़ के आसपास ही बैंक account थे। वहीं जनधन योजना के माध्यम से 55 करोड़ से ज्यादा बैंक अकाउंट खुले हैं। पहले हमारे देश में airports की संख्या भी 70 से कम थी। आज एयरपोर्ट्स की संख्या भी बढ़कर 160 से ज्यादा हो चुकी है।

साथियों,

पहले भी योजनाएं तो बनती थीं, लेकिन आज फर्क है, आज परिणाम दिखते हैं। पहले गति धीमी थी, आज भारत fastrack पर है। पहले संभावनाएं भी अंधकार में थीं, आज संकल्प सिद्धियों में बदल रहे हैं। इसलिए दुनिया को भी यह संदेश मिल रहा है कि यह नया भारत है। यह अपने विकास के लिए कोई कोर-कसर बाकी नहीं छोड़ रहा है।

साथियों,

आज हमारा प्रयास है कि अतीत में विकास का जो असंतुलन पैदा हो गया था, उसको अवसरों में बदला जाए। अब जैसे हमारा पूर्वी भारत है। हमारा पूर्वी भारत संसाधनों से समृद्ध है, दशकों तक वहां जिन्होंने सरकारें चलाई हैं, उनकी उपेक्षा ने पूर्वी भारत के विकास पर ब्रेक लगा दी थी। अब हालात बदल रहे हैं। जिस असम में कभी गोलियों की आवाज सुनाई देती थी, आज वहां सेमीकंडक्टर यूनिट बन रही है। ओडिशा में सेमीकंडक्टर से लेकर पेट्रोकेमिकल्स तक अनेक नए-नए सेक्टर का विकास हो रहा है। जिस बिहार में 6-7 दशक में गंगा जी पर एक बड़ा पुल बन पाया था एक, उस बिहार में पिछले एक दशक में 5 से ज्यादा नए पुल बनाए गए हैं। यूपी में कभी कट्टा मैन्युफैक्चरिंग की कहानियां कही जाती थीं, आज यूपी, मोबाइल फोन मैन्युफैक्चरिंग में दुनिया में अपनी पहचान बना रहा है।

साथियों,

पूर्वी भारत का एक और बड़ा राज्य पश्चिम बंगाल है। पश्चिम बंगाल, एक समय में भारत के कल्चर, एजुकेशन, इंडस्ट्री और ट्रेड का हब होता था। बीते 11 वर्षों में केंद्र सरकार ने पश्चिम बंगाल के विकास के लिए बड़ी मात्रा में निवेश किया है। लेकिन दुर्भाग्य से, आज वहां एक ऐसी निर्मम सरकार है, जो विकास पर ब्रेक लगाकर बैठी है। TV9 बांग्ला के जो दर्शक हैं, वो जानते हैं कि बंगाल में आयुष्मान योजना पर निर्मम सरकार ने ब्रेक लगाया हुआ है। पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना पर ब्रेक लगाया हुआ है। पीएम आवास योजना पर ब्रेक लगाया हुआ है। चाय बागान श्रमिकों के लिए शुरू हुई योजना के लिए ब्रेक लगाया हुआ है। यानी विकास और जनकल्याण से ज्यादा प्राथमिकता निर्मम सरकार अपने राजनीतिक स्वार्थ को दे रही है।

साथियों,

देश में इस तरह की राजनीति की शुरुआत जिस दल ने की है, वो अपने गुनाहों से बच नहीं सकती और वो पार्टी है - कांग्रेस। कांग्रेस पार्टी की राजनीति का एक ही लक्ष्य रहा है, किसी भी तरह विकास का विरोध और कांग्रेस यह तब से कर रही है, जब मैं गुजरात में था। गुजरात में वर्षों तक जनता ने हमें आशीर्वाद दिया, तो कांग्रेस ने उस जनादेश को स्वीकार नहीं किया। उन्होंने गुजरात की छवि पर सवाल उठाए, उसकी प्रगति को कटघरे में खड़ा किया और जब यही विश्वास पूरे देश में दिखाई दिया, तो कांग्रेस का विरोध भी रीजनल से नेशनल हो गया।

साथियों,

जब राजनीति में विरोध, विकास के विरोध में बदल जाए, जब आलोचना देश की उपलब्धियों पर सवाल उठाने लगे, तब यह सिर्फ सरकार का विरोध नहीं रह जाता, यह देश की प्रगति से असहज होने की मानसिकता बन जाती है। आज कांग्रेस इसी मानसिकता की गुलाम बन चुकी है। आज स्थिति यह है कि देश की हर सफलता पर प्रश्न उठाया जाता है, हर उपलब्धि में कमी खोजी जाती है और हर प्रयास के असफल होने की कामना की जाती है। कोविड के समय, देश ने अपनी वैक्सीन बनाई, तो कांग्रेस ने उस पर भी संदेह जताया। Make in India की बात हुई, तो कहा गया कि यह सफल नहीं होगा, बब्बर शेर कहकर इसका मजाक उड़ाया गया। जब देश में डिजिटल इंडिया अभियान शुरू हुआ, तो उसका मजाक उड़ाया गया। लेकिन हर बार यह कांग्रेस का दुर्भाग्य और देश का सौभाग्य रहा कि भारत ने हर चुनौती को सफलता में बदला। आज भारत दुनिया की सबसे बड़ी वैक्सीनेशन ड्राइव का उदाहरण है। भारत डिजिटल पेमेंट्स में दुनिया का अग्रणी देश है। भारत मैन्युफैक्चरिंग और स्टार्टअप्स में नई ऊंचाइयों को छू रहा है।

साथियों,

लोकतंत्र में विरोध जरूरी होता है। लेकिन विरोध और विद्वेष के बीच एक रेखा होती है। सरकार का विरोध करना लोकतांत्रिक अधिकार है। लेकिन देश को बदनाम करना, यह कांग्रेस की नीयत पर सवाल खड़ा करता है। जब विरोध इस स्तर तक पहुंच जाए कि देश की उपलब्धियां भी असहज करने लगें, तो यह राजनीति नहीं, यह दृष्टिकोण की समस्या है। अभी हमने ग्लोबल AI समिट में भी देखा है। जब पूरी दुनिया भारत में जुटी हुई थी, तो कांग्रेस के लोग कपड़े फाड़ने वहां पहुंच गए थे। इन लोगों को देश की इज्जत की कितनी परवाह है, यह इसी से पता चलता है। इसलिए आज आवश्यकता है कि देशहित को, दलहित से ऊपर रखा जाए क्योंकि अंत में राजनीति से ऊपर, राष्ट्र होता है, राष्ट्र का विकास होता है।

साथियों,

आज का यह दिन भी हमें यही प्रेरणा देता है। आज के ही दिन शहीद भगत सिंह, शहीद राजगुरु और शहीद सुखदेव ने देश के लिए सर्वोच्च बलिदान दिया था। आज ही, समाजवादी आंदोलन के प्रखर आदर्श डॉ. राम मनोहर लोहिया जी की जयंती भी है। यह वो प्रेरणाएं हैं, जिन्होंने देश को हमेशा स्व से ऊपर रखा है। देशहित को सबसे ऊपर रखने की यही प्रेरणा, भारत को विकसित भारत बनाएगी। यही प्रेरणा भारत को आत्मनिर्भर बनाएगी। मुझे पूरा विश्वास है कि टीवी9 की यह समिट भी भारत के आत्मविश्वास और दुनिया के भरोसे पर, भारतीयों पर जो भरोसा है, उस भरोसे को और सशक्त करेगी। आप सभी को मेरी तरफ से बहुत-बहुत शुभकामनाएं हैं और आपके बीच आने का अवसर दिया, आप सबसे मिलने का मौका लिया, इसलिए बहुत-बहुत धन्यवाद!

नमस्‍कार!