Disburses 18th installment of the PM-KISAN Samman Nidhi worth about Rs 20,000 crore to around 9.4 crore farmers
Launches 5th installment of NaMo Shetkari Mahasanman Nidhi Yojana worth about Rs 2,000 crore
Dedicates to nation more than 7,500 projects under the Agriculture Infrastructure Fund (AIF) worth over Rs 1,920 crore
Dedicates to nation 9,200 Farmer Producer Organizations (FPOs) with a combined turnover of around Rs 1,300 crore
Launches Unified Genomic Chip for cattle and indigenous sex-sorted semen technology
Dedicates five solar parks with a total capacity of 19 MW across Maharashtra under Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana – 2.0
Inaugurates Banjara Virasat Museum
Our Banjara community has played a big role in the social life of India, in the journey of India's development: PM
Our Banjara community has given many such saints who have given immense energy to the spiritual consciousness of India: PM

आजच्या भव्य सभेत उपस्थित असणाऱ्या संपूर्ण देशभरातील आमच्या आदरणीय बंधू आणि भगिनींना मी अभिवादन करतो - जय सेवालाल! जय सेवालाल!

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, माझे केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी शिवराज सिंह चौहान, राजीव रंजन सिंह, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्र आणि राज्य सरकारचे इतर मंत्री, खासदार, आमदार आणि दूरदूरवरून आलेले बंजारा समाजातील माझे बंधूभगिनी, देशभरातील शेतकरी बंधू भगिनी आणि इतर सर्व मान्यवर आणि महाराष्ट्रातील माझ्या बंधू-भगिनींनो, वाशीमच्या या पावन भूमीतून मी पोहरादेवी मातेला वंदन करतो. आज नवरात्री दरम्यान माता जगदंबेचा आशीर्वाद तिच्या मंदिरात घेण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. मी संत सेवालाल महाराज आणि संत राम-राव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.  या व्यासपीठावरून मी या दोन महान संतांना माथा झुकवून नमन करतो.

आज महान योद्धा आणि गोंडवाना राणी दुर्गावती यांची जयंती आहे.  गेल्या वर्षी देशाने त्यांची 500 वी जयंती साजरी केली.  राणी दुर्गावतीलाही मी नमन करतो.

 

मित्रांनो,

हरियाणात आज मतदानही होत आहे. मी हरियाणातील सर्व देशभक्त लोकांना जास्तीत जास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन करीत आहे. तुमचे मत हरियाणाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाईल.

 

मित्रांनो,

नवरात्रीच्या या शुभ मुहूर्तावर, मला आता पीएम किसान सन्मान निधीचा 18 हप्ता जारी करण्याची संधी मिळाली आहे. आज देशातील साडे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. महाराष्ट्राचे डबल इंजिन सरकार तर येथील शेतकऱ्यांना दुहेरी लाभ देत आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 90 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सुमारे 1900 कोटी रुपये देण्यात आले आहेत. आज शेकडो कोटी रुपयांचे कृषी, पशुसंवर्धन आणि शेतकरी उत्पादक संघ-एफपीओशी संबंधित प्रकल्प लोकांसाठी समर्पित केले आहेत.  पोहरादेवीच्या आशीर्वादाने मला लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मदत करण्याचे सौभाग्यही मिळाले आहे. या योजनेमुळे महिला शक्ती वाढते आहे. मी महाराष्ट्रातील बंधू-भगिनींचे आणि देशातील सर्व शेतकरी बंधू-भगिनींचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

आज येथे येण्यापूर्वी मला पोहरादेवी येथील बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करण्याचे सौभाग्यही लाभले. हे संग्रहालय देशातील नवीन पिढ्यांना देशाची महान बंजारा संस्कृती, एवढा मोठा वारसा, एवढी प्राचीन परंपरा यांची ओळख करून देईल  आणि मी तुम्हा सर्वांना विनंती करतो, स्टेजवर बसलेल्यांनाही मी विनंती करतो की, आज जाण्यापूर्वी या बंजारा विरासत संग्रहालयाला भेट द्या. मी देवेंद्रजींचे अभिनंदन करतो. ही संकल्पना त्यांनी पहिल्या सरकारच्या काळात मांडली होती आणि आज ती अतिशय चांगल्या पद्धतीने साकारली गेल्याचे मी पाहिले, त्याचे मला खूप समाधान आणि आनंद आहे आणि मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही तर ते पहाच, पण नंतर तुमच्या कुटुंबालाही थोडा वेळ काढून ते बघण्यासाठी जरूर पाठवा. मी आताच पोहरादेवीला बंजारा समाजातील काही महान व्यक्तींना भेटून आलो. या संग्रहालयाच्या माध्यमातून आपली विरासत सर्वमान्य झाल्याचे समाधान आणि अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर होता.  बंजारा विरासत संग्रहालयासाठी मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

 

मित्रांनो,

ज्यांना कोणी विचारले नाही, त्यांची मोदी पूजा करतात. आपल्या बंजारा समाजाने भारताच्या सामाजिक जीवनात आणि भारताच्या निर्माण प्रवासात मोठी भूमिका निभावली आहे. कला, संस्कृती, अध्यात्म, राष्ट्ररक्षण, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात या समाजातील कोणत्या महापुरुषांनी, विद्वानांनी देशासाठी काय केले नाही? राजा लखीशाह बंजारा‌  याने परकीय राज्यकर्त्यांकडून किती अत्याचार सहन केले! त्यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी समर्पित केले. संत सेवालाल महाराज, स्वामी हाथीराम जी, संत ईश्वरसिंह बापूजी, संत डॉ. रामराव बापू महाराज, संत लक्ष्मण चैत्यन बापूजी, असे कितीतरी संत आपल्या बंजारा समाजाने दिले आहेत, ज्यांनी भारताच्या आध्यात्मिक चेतनेला प्रचंड ऊर्जा दिली.  पिढ्यानपिढ्या, शेकडो हजारो वर्षांपासून हा समाज भारताच्या संस्कृती आणि परंपरांचे पालन आणि जतन करत आला आहे.  स्वातंत्र्यलढ्याच्या वेळी ब्रिटिश सरकारने या संपूर्ण समाजाला गुन्हेगार घोषित केले होते.

 

पण बंधू आणि भगिनींनो,

स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजाची काळजी घेणे आणि त्यांना योग्य तो सन्मान देणे ही देशाची जबाबदारी होती. आणि त्यावेळी काँग्रेस सरकारांनी काय केले? काँग्रेसच्या धोरणांमुळे हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर राहिला. स्वातंत्र्यानंतर ज्या घराण्याने काँग्रेस पक्षाची सूत्रे हाती घेतली, त्यांची विचारसरणी सुरुवातीपासूनच परकीय आहे. ब्रिटीश राजवटीप्रमाणे ही काँग्रेस घराणीही दलित, मागासवर्गीय, आदिवासी यांना आपल्या बरोबरीचे मानत नाहीत.  त्यांना असे वाटते की भारतावर फक्त एका घराण्याने राज्य केले पाहिजे, कारण ब्रिटिशांनी त्यांना हा अधिकार दिला होता.  त्यामुळे या लोकांनी बंजारा समाजाबद्दल नेहमीच अपमानास्पद वृत्ती बाळगली.

 

मित्रांनो,

रालोआच्या केंद्र सरकारने भटक्या-विमुक्त समाजासाठी कल्याणकारी मंडळाचीही स्थापना केली आहे. या समाजाच्या सांस्कृतिक अस्मितेला योग्य सन्मान मिळावा यासाठी भाजप सरकार आणि रालोआ सरकार सातत्याने या दिशेने काम करत आहेत.  विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृद्धी अभियानही सुरू केले आहे.

 

मित्रांनो,

आमच्या या प्रयत्नांमध्ये काँग्रेस आणि महाआघाडीचा तुमच्याबद्दलचा दृष्टिकोन काय होता हेही तुम्ही लक्षात ठेवावे.  फडणवीस मुख्यमंत्री असताना पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी योजना आखण्यात आली होती. पण, मध्येच महाआघाडी सरकार आले आणि त्यांनी या कामाला विराम दिला.

महाराष्ट्रात पुन्हा महायुतीचे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतरच पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा विकास झाला. आज या योजनेवर 700 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या तीर्थक्षेत्राच्या विकासामुळे भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध होणार असून आजूबाजूच्या परिसराच्या विकासालाही गती मिळणार आहे.

 

बंधू आणि भगिनींनो,

भाजपला आपल्या धोरणातून वंचित समाजाला पुढे करायचे आहे. तर काँग्रेसला फक्त लोकांना लुटायचे कसे हे माहीत आहे. काँग्रेसला गरीबांना गरीबच राहू द्यायचे आहे. कमकुवत आणि गरीब भारत काँग्रेस आणि त्याच्या राजकारणाला खूप अनुकूल आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांनी काँग्रेसबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. आज काँग्रेस पूर्णपणे शहरी नक्षली टोळी चालवत आहे. सर्वांनी एकत्र आल्यास देशाचे विभाजन करण्याचा त्यांचा उद्देश फसेल, असे काँग्रेसला वाटते! त्यामुळे त्यांना आम्हाला आपापसात भांडायला लावायचे आहे. काँग्रेसच्या या उद्देशाला सध्या कोणाचा पाठिंबा मिळतोय हे सारा देश बघतोय! ज्यांना भारताची प्रगती थांबवायची आहे तेच आजकाल काँग्रेसचे जवळचे मित्र आहेत! यातून बोध काय तर, संघटित होण्याची वेळ आली आहे. आपली एकजूटच देशाला तारेल.

 

बंधू-भगिनींनो,

मला महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेसच्या आणखी एका कृतीबद्दल सांगायचे आहे. नुकतेच दिल्लीत हजारो कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचे तुम्ही बातम्यांमध्ये पाहिले असेल.यातली खेदजनक बाब म्हणजे या ड्रग्ज रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण निघाला? काँग्रेसचाच एक नेता निघाला. तरुणांना नशेच्या आहारी ढकलून काँग्रेसला त्या पैशातून निवडणूक लढवायची आहे आणि जिंकायची आहे. या धोक्याची जाणीव ठेवून इतरांनाही सावध केले पाहिजे. ही लढाई आपल्याला एकत्र जिंकायची आहे.

 

मित्रांनो,

आज आपल्या सरकारचे प्रत्येक निर्णय, प्रत्येक धोरण विकसित भारताला समर्पित आहे. आणि आपले शेतकरी हे विकसित भारताचा सर्वात मोठा पाया आहेत. आज शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने अनेक मोठी पावले उचलली गेली आहेत. आज 9200 शेतकरी उत्पादक संघ देशाला समर्पित करण्यात आले आहेत. सध्या शेतीसाठीच्या अनेक पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटनही झाले आहे. यामुळे कृषी उत्पादनांची साठवणूक, प्रक्रिया आणि व्यवस्थापन करण्याची क्षमता वाढेल. या सर्व प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. बरं, इथे महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना दुहेरी लाभ मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिलही शून्य केले आहे. आम्हाला बिल येत आहे, शेतकरी दादा, त्यावर शून्य लिहिले आहे, नाही का?

 

मित्रांनो,

महाराष्ट्र आणि त्यात ही विदर्भातील शेतकऱ्यांनी अनेक दशकांपासून मोठ्या संकटांचा सामना केला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सरकारांनी शेतकऱ्यांना कंगाल आणि गरीब करण्यात काहीही कसूर ठेवली नाही. जोपर्यंत येथे महाआघाडीचे सरकार होते, तोपर्यंत त्यांचे दोनच उद्देश होते. पहिलं, शेतकऱ्यांशी संबंधित प्रकल्प बंद करणे. दुसरं, या प्रकल्पांच्या पैशात भ्रष्टाचार करणे. केंद्राकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आम्ही पैसे पाठवायचो, पण महाआघाडीचे सरकार वाटून खात असे. काँग्रेसने शेतकऱ्यांचे जगणे नेहमीच कठीण केले आहे. ती अजूनही तोच जुना खेळ खेळत आहे. म्हणूनच काँग्रेसला पीएम-किसान सन्मान निधी योजना आवडत नाही. काँग्रेस या योजनेला घेऊन गंमत करते आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पैशाला विरोध करते. कारण, शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात जाणाऱ्या पैशातून यांना पैसे कमवण्याची, कपात करण्याची आणि भ्रष्टाचार करण्याची संधी नाही. आज शेजारील कर्नाटक राज्य बघा! ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील महायुती सरकार किसान सन्मान निधीसोबत वेगळे पैसे देते, त्याचप्रमाणे कर्नाटकातील भाजप सरकार पैसे देते. माझी कर्नाटकातील अनेक बंजारा कुटुंबे येथे आली आहेत. पण, कर्नाटकात काँग्रेसचे सरकार येताच त्यांनी ते पैसे देणे बंद केले. तेथील अनेक सिंचन प्रकल्पांकडे राज्य सरकारने पाठ फिरवली. काँग्रेसने कर्नाटकातही बियाणांच्या किमती वाढवल्या. प्रत्येक निवडणुकीपूर्वी कर्जमाफीचे खोटे आश्वासन ही काँग्रेसची आवडती खेळी! कर्जमाफीचे आश्वासन देऊन हे लोक तेलंगणात सत्तेवर आले! पण सरकार स्थापन होऊन इतका वेळ निघून गेला! आता कर्जमाफी का झाली नाही, असा सवाल शेतकरी करत आहेत.

 

बंधू-भगिनींनो,

महाराष्ट्रातही काँग्रेस आणि महाआघाडी सरकारने सिंचनाची किती कामे बंद पाडली, हे आपण विसरता कामा नये! राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार आल्यावर या दिशेने वेगाने काम केले गेले. वैनगंगा-नळगंगा नद्या जोडण्याच्या योजनेला महाराष्ट्र सरकारने मंजुरी दिली आहे. सुमारे ९० हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशीम, नागपूर आणि वर्धा येथील पाणीटंचाई दूर होणार आहे. कापूस आणि सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महाराष्ट्र सरकार आर्थिक मदत करत आहे. कापूस आणि सोयाबीनसाठी प्रत्येकी 10 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात दिले जात आहेत. अमरावतीच्या टेक्सटाईल उद्यानाची नुकतीच पायाभरणीही झाली आहे. या उद्यानामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी मदत होणार आहे.

 

मित्रांनो,

आपल्या महाराष्ट्रामध्ये देशाच्या आर्थिक प्रगतीचे नेतृत्व करण्याची अफाट क्षमता आहे. गाव, गरीब, शेतकरी, मजूर, दलित, वंचित अशा सर्वांना पुढे घेऊन जाण्याची मोहीम जोरात सुरू राहील तेव्हाच हे घडेल. मला खात्री आहे, तुम्ही सर्वजण तुमचे आशीर्वाद कायम ठेवाल. आपण सर्व मिळून विकसित महाराष्ट्र आणि विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू. या शुभेच्छांसह मी पुन्हा एकदा आमच्या शेतकरी मित्रांचे आणि बंजारा समाजातील माझ्या सर्व बंधू भगिनींचे अभिनंदन करतो. माझ्यासोबत भारत माता की जय म्हणा,

भारत माता चिरंजीवी होवो!

भारत माता चिरंजीवी होवो!

खूप खूप धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
With HPV vaccine rollout, AIIMS oncologist says it’s the beginning of the end for cervical cancer in India

Media Coverage

With HPV vaccine rollout, AIIMS oncologist says it’s the beginning of the end for cervical cancer in India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
The HPV vaccination campaign, launched from Ajmer, marks a significant step towards empowering the nation’s Nari Shakti: PM Modi in Rajasthan
February 28, 2026
Our government is committed to all-round development: PM
Today, I had the privilege of launching the nationwide HPV vaccination campaign from Ajmer, inaugurating and laying foundation stones for multiple projects and distributing appointment letters to the youth: PM
The HPV vaccination campaign has commenced from Ajmer, this campaign is a significant step towards empowering the Nari Shakti of the country: PM
The double-engine government is moving forward by taking both Rajasthan’s heritage and development together: PM
The campaign to link rivers started by our government will significantly benefit Rajasthan: PM
There is no shortage of sunlight in Rajasthan, this very sunshine is becoming a source of savings and income for the common man: PM
A very significant role is being played by the PM Surya Ghar Free Electricity Scheme, this scheme has the power to change Rajasthan's destiny: PM

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

तीर्थराज पुष्कर और माता सावित्री की इस पावन भूमि पर, आज मुझे आप सबके बीच आने का, आपके आशीर्वाद प्राप्त करने का अवसर मिला है। इस मंच से मैं सुरसुरा के तेजाजी धाम को, पृथ्वीराज की भूमि अजमेर को प्रणाम करता हूं।

मेरे साथ बोलिए –

तीर्थराज पुष्कर की जय।

तीर्थराज पुष्कर की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

वीर तेजाजी महाराज की जय।

भगवान देव नारायण की जय।

भगवान देव नारायण की जय।

वरूण अवतार भगवान झूलेलाल जी की जय।

भगवान झूलेलाल जी की जय।

मंच पर विराजमान राजस्थान के राज्यपाल हरिभाउ बागडे जी, राज्य के लोकप्रिय मुख्यमंत्री श्री भजनलाल शर्मा जी, पूर्व मुख्यमंत्री बहन वसुंधरा जी, केंद्रीय मंत्रिमंडल में मेरे साथी भगीरथ चौधरी जी, उपमुख्यमंत्री प्रेमचंद भैरवा जी, दिया कुमारी जी, संसद में मेरे साथी, भाजपा के प्रदेश अध्यक्ष मदन राठौर जी, उपस्थित अन्य मंत्रिगण, अन्य महानुभाव और राजस्थान के मेरे प्यारे भाई और बहनों। मैं पूज्य संतों का बहुत आभारी हूं, कि हमें आशीर्वाद देने के लिए इतनी बड़ी संख्या में पूज्य संतगण यहां मौजूद हैं।

साथियों,

अजमेर आस्था और शौर्य की धरती है। यहां तीर्थ भी है और क्रांतिवीरों के पदचिन्ह भी हैं। अभी कल ही मैं इजराइल की यात्रा को पूरा करके भारत लौटा हूं। राजस्थान के सपूत मेजर दलपत सिंह के शौर्य को इजराइल के लोग आज भी गौरव से याद करते हैं। मुझे भी इजराइल की संसद में, मेजर दलपत सिंह जी के शौर्य को नमन करने का सौभाग्य मिला। राजस्थान के वीर बाकुरों की, इजराइल के हाइफा शहर को आजाद कराने में जो भूमिका थी, मुझे उसका गौरवगान करने का अवसर मिला है।

साथियों,

कुछ समय पहले ही, राजस्थान में भाजपा की डबल इंजर सरकार को दो साल पूरे हुए हैं, मुझे संतोष है कि आज राजस्थान विकास के नए पथ पर अग्रसर है। विकास के जिन वायदों के साथ भाजपा सरकार आपकी सेवा में आई थी, उन्हें तेजी के साथ पूरा कर रही है। और आज का दिन, विकास के इसी अभियान को तेज करने का दिवस है। थोड़ी देर पहले यहां राजस्थान के विकास से जुड़ी करबी 17 हजार करोड़ रूपयों की परियोजनाओं का शिलान्यास और लोकार्पण हुआ है। सड़क, बिजली, पानी, स्वास्थ्य, शिक्षा, हर क्षेत्र में नई शक्ति जुड़ रही है। ये सारे प्रोजेक्टस राजस्थान की जनता की सुविधा बढ़ाएंगे और राजस्थान के युवाओं के लिए, रोजगार के भी अवसर पैदा करेंगे।

साथियों,

भाजपा की डबल इंजर सरकार लगातार युवा शक्ति को सशक्त कर रही है। दो साल पहले तक राजस्थान से भर्तियों में भ्रष्टाचार और पेपर लीक की ही खबरें चमकती रहती थीं, आती रहती थीं। अब राजस्थान में पेपर लीक पर लगाम लगी है, दोषियों पर सख्त कार्रवाई हो रही है। आज यहां इसी मंच से राजस्थान के 21 हजार से अधिक युवाओं को नियुक्ति पत्र भी सौंपे गए हैं। ये बहुत बड़ा बदलाव आया है। मैं इस बदलाव के लिए, नई नौकरियों के लिए, विकास के सभी कामों के लिए, राजस्थान के आप सभी लोगों को बहुत-बहुत बधाई देता हूं।

साथियों,

आज वीरांगनाओं की इस धरती से, मुझे देशभर की बेटियों के लिए एक अहम अभियान शुरू करने का अवसर मिला है। यहां अजमेर से HPV वैक्सीनेशन अभियान शुरू हुआ है। ये अभियान, देश की नारीशक्ति को सशक्त करने की दिशा में अहम कदम है।

साथियों,

हम सब जानते हैं कि परिवार में जब मां बीमार होती है, तो घर बिखर सा जाता है। अगर मां स्वस्थ है, तो परिवार हर संकट का सामना करने में सक्षम रहता है। इसी भाव से, भाजपा सरकार ने महिलाओं को संबल देने वाली अनेक योजनाएं चलाई हैं।

साथियों,

हमने 2014 से पहले का वो दौर देखा है, जिसमें शौचालय के अभाव में बहनों-बेटियों को कितनी पीड़ा, कितना अपमान झेलना पड़ता था। बच्चियां स्कूल छोड़ देती थीं, क्योंकि वहां अलग टॉयलेट की सुविधा नहीं होती थी। गरीब बेटियां सेनिटरी पैड्स नहीं ले पाती थीं। पहले जो सत्ता में रहे, उनके लिए ये छोटी बातें थीं। इसलिए इन समस्याओं की चर्चा तक नहीं होती थी। लेकिन हमारे लिए ये बहनों-बेटियों को बीमार करने वाला, उनके अपमान से जुड़ा संवेदनशील मसला था। इसलिए, हमने इनका मिशन मोड पर समाधान किया।

साथियों,

गर्भावस्था के दौरान कुपोषण माताओं के जीवन के लिए बहुत बड़ा खतरा होता था। हमने सुरक्षित मातृत्व के लिए योजना चलाई, मां को पोषक आहार मिले, इसके लिए पांच हज़ार रुपए बहनों के खाते में जमा करने की योजना शुरु की। मां धुएं में खांसती रहती थी, लेकिन उफ्फ तक नहीं करती थी। हमने कहा ये नहीं चलेगा। और इसलिए उज्जवला गैस योजना बनाई गई। ये सब इसलिए संभव हुआ, क्योंकि भाजपा सरकार, सत्ता भाव से नहीं, संवेदनशीलता के साथ काम करती है।

साथियों,

21वीं सदी का एक चौथाई हिस्सा बीत चुका है। आज का समय राजस्थान के विकास के लिए बड़ा महत्वपूर्ण है। भाजपा की डबल इंजन सरकार, राजस्थान की विरासत और विकास, दोनों को साथ लेकर चल रही है। हम सब जानते हैं, अच्छी सड़क, अच्छी रेल और हवाई सुविधा सिर्फ सफर आसान नहीं करती, वो पूरे इलाके की किस्मत बदल देती है। जब गांव-गांव तक अच्छी सड़क पहुँचती है, तो किसान अपनी फसल सही दाम पर बेच पाता है। व्यापारी आसानी से अपना सामान बाहर भेज पाते हैं। और हमारा अजमेर-पुष्कर तो, उसकी पर्यटन की ताकत कौन नहीं जानता। अच्छी कनेक्टिविटी का पर्यटन पर सबसे अच्छा असर पड़ता है। जब सफर आसान होता है, तो ज्यादा लोग घूमने आते हैं।

और साथियों,

जब पर्यटक आते हैं तो स्वाभाविक है होटल चलते हैं, ढाबे चलते हैं, कचौड़ी और दाल बाटी ज्यादा बिकती है, यहां राजस्थान के कारीगरों का बनाया सामान बिकता है, टैक्सी चलती है, गाइड को काम मिलता है। यानी एक पर्यटक कई परिवारों की रोज़ी-रोटी बन जाता है। इसी सोच के साथ हमारी सरकार, राजस्थान में आधुनिक कनेक्टिविटी पर बहुत बल दे रही है।

साथियों,

जैसे-जैसे राजस्थान में कनेक्टिविटी का विस्तार हो रहा है, वैसे-वैसे यहां निवेश के लिए भी अवसर लगातार बढ़ते जा रहे हैं। दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर के इर्द-गिर्द उद्योगों के लिए एक बहुत ही शानदार इंफ्रास्ट्रक्चर बनाया जा रहा है। यानी राजस्थान को अवसरों की भूमि बनाने के लिए, डबल इंजन सरकार हर संभव, अनेक विध काम कर रही है।

साथियों,

राजस्थान की माताएं अपने बच्चों को पालने में ही, राष्ट्र भक्ति का संस्कार देती हैं। राजस्थान की ये धरा जानती है कि देश का सम्मान क्या होता है, और इसीलिए आज राजस्थान की इस धरा पर, मैं आप लोगों से एक और बात कहने आया हूं।

साथियों,

हाल में ही, दिल्ली में, दुनिया का सबसे बड़ा AI सम्मेलन हुआ, Artificial Intelligence इसमें दुनिया के अनेक देशों के प्रधानमंत्री, अनेक देशों के राष्ट्रपति, अनेक देशों के मंत्रि, उस कार्यक्रम में आए थे। दुनिया की बड़ी-बड़ी कंपनियां, उन कंपनियों के कर्ता-धर्ता वो भी एक छत के नीचे इकट्ठे हुए थे। सबने भारत की खुले मन से प्रशंसा की। मैं जरा राजस्थान के मेरे भाई-बहनों से पूछना चाहता हूं। जब दुनिया के इतने सारे लोग, भारत की प्रशंसा करते हैं, ये सुनकर के आपको गर्व होता है की नहीं होता है? आपको गर्व होता है कि नहीं होता है? आपको अभिमान होता है कि नहीं होता है? आपका माथा ऊंचा हुआ या नहीं हुआ? आपका सीना चौड़ा हुआ कि नहीं हुआ?

साथियों,

आपको गर्व हुआ, लेकिन हताशा निराशा में डूबी, लगातार पराजय के कारण थक चुकी कांग्रेस ने क्या किया, ये आपने देखा है। दुनियाभर के मेहमानों के सामने, कांग्रेस ने देश को बदनाम करने की कोशिश की। इन्होंने विदेशी मेहमानों के सामने देश को बेइज्जत करने के लिए पूरा ड्रामा किया।

साथियों,

कांग्रेस, पूरे देश में ल्रगातार हार रही है, और गुस्से में वो इसका बदला, वो भारत को बदनाम करके ले रही है। कभी कांग्रेस, INC यानी इंडियन नेशनल कांग्रेस थी, लेकिन अब INC नहीं बची है, इंडियन नेशनल कांग्रेस नहीं बची है, आज वो INC के बजाय MMC, MMC बन गई है। MMC यानी मुस्लिम लीगी माओवादी कांग्रेस हो चुकी है।

राजस्थान के मेरे वीरों,

इतिहास गवाह है, मुस्लिम लीग भारत से नफरत करती थी, और इसलिए मुस्लिम लीग ने देश बांट दिया। आज कांग्रेस भी वही कर रही है। माओवादी भी, भारत की समृद्धि, हमारे संविधान और हमारे सफल लोकतंत्र से नफरत करते हैं, ये घात लगाकर हमला करते हैं, कांग्रेस भी घात लगाकर, देश को बदनाम करने के लिए कहीं भी घुस जाती है। कांग्रेस के ऐसे कुकर्मों को देश कभी माफ नहीं करेगा।

साथियों,

देश को बदनाम करना, देश की सेनाओं को कमजोर करना, ये कांग्रेस की पुरानी आदत रही है। आप याद कीजिए, यही कांग्रेस है, जिसने हमारी सेना के जवानों को हथियारों और वर्दी तक के लिए तरसा कर रखा था। ये वही कांग्रेस है, जिसने सालों तक हमारे सैनिक परिवारों को वन रैंक वन पेंशन से वंचित रखा था। ये वही कांग्रेस है, जिसके जमाने में विदेशों से होने वाले रक्षा सौदों में बड़े-बड़े घोटाले होते थे।

साथियों,

बीते 11 वर्षों में भारत की सेना ने हर मोर्चे पर आतंकियों पर, देश के दुश्मनों पर करारा प्रहार किया। हमारी सेना, हर मिशन, हर मोर्चे में विजयी रही। सर्जिकल स्ट्राइक से लेकर ऑपरेशन सिंदूर तक, वीरता का लोहा मनवाया, लेकिन कांग्रेस के नेताओं ने इसमें भी दुश्मनों के झूठ को ही आगे बढ़ाया। देश के लिए जो भी शुभ है, जो भी अच्छा है, जो भी देशवासियों का भला करने वाला है, कांग्रेस उस सबका विरोध करती है। इसलिए, देश आज कांग्रेस को सबक सिखा रहा है।

साथियों,

राजस्थान में तो आपने कांग्रेस के कुशासन को करीब से अनुभव किया है। यहां जितने दिन कांग्रेस की सरकार रही, वो भ्रष्टाचार करने और आपसी लड़ाई-झगड़े में ही उलझी रही। कांग्रेस ने हमारे किसानों को भी हमेशा धोखा दिया है। आप याद कीजिए, कांग्रेस ने दशकों तक सिंचाई की परियोजनाओं को कैसे लटकाए रखा। इसका राजस्थान के किसानों को बहुत अधिक नुकसान हुआ है। ERCP परियोजना को कांग्रेस की सरकारों ने केवल फाइलों और घोषणाओं में उलझाकर रखा। हमारी सरकार ने आते ही इस स्कीम को फाइलों से निकालकर धरातल पर उतारने का प्रयास किया है।

साथियों,

हमारी सरकार ने नदियों को जोड़ने का जो अभियान शुरु किया है, उसका बहुत अधिक फायदा राजस्थान को मिलना तय है। संशोधित पार्वती-कालीसिंध-चंबल लिंक परियोजना हो, यमुना-राजस्थान लिंक प्रोजेक्ट हो, डबल इंजन सरकार ऐसी अनेक सिंचाई परियोजनाओं का लाभ किसानों तक पहुंचाने के लिए प्रतिबद्ध है। आज भी झालावाड़, बारां, कोटा और बूंदी जिले के लिए पानी की अनेक परियोजनाओं पर काम शुरु हुआ है। हमारा प्रयास है, कि राजस्थान में भूजल का स्तर भी ऊपर उठे।

साथियों,

भाजपा सरकार, राजस्थान के सामर्थ्य को समझते हुए, योजनाएं बना रही है, उन्हें लागू कर रही है। मुझे खुशी है कि राजस्थान अब, सूरज की ताकत से समृद्धि कमाने वाली धरती बन गया है। हम सब जानते हैं, हमारे राजस्थान में धूप की कोई कमी नहीं। अब यही धूप, सामान्य मानवी के घर की बचत और कमाई का साधन बन रही है। और इसमें बहुत बड़ी भूमिका है, प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजना की। इस योजना में राजस्थान का भाग्य बदलने की ताकत है। इस योजना में भाजपा सरकार लोगों को अपनी छत पर सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए की सहायता देती है। सरकार सीधे आपके बैंक खाते में पैसे भेजती है। आजादी के बाज सब बजट, सब योजनाएं देख लीजिए, जिसमें मध्यम वर्ग को सबसे ज्यादा लाभ होने वाला है, ऐेसी योजना कभी नजर नहीं आएगी, आज इन परिवारों को सोलर पैनल लगाने के लिए 78 हजार रुपए सीधा सरकार देती है। सबसे अधिक लाभ मध्यम वर्ग के लोग ले रहे हैं। और जिससे घर पर एक छोटा सा बिजली घर तैयार हो जाता है। दिन में सूरज की रोशनी से बिजली बनती है, घर में वही बिजली काम आती है और जो ज्यादा बिजली बनती है, वो बिजली ग्रिड में जाती है। और जिस घर में बिजली बनी होती है, उसे भी इसका लाभ मिलता है।

साथियों,

आज राजस्थान में सवा लाख से अधिक परिवार इस योजना से जुड़ चुके हैं। और इस योजना की वजह से, कई घरों का बिजली बिल लगभग जीरो आ रहा है। यानी खर्च कम हुआ है, बचत ज़्यादा हुई है।

साथियों,

विकसित राजस्थान से विकसित भारत के मंत्र पर हम लगातार काम कर रहे हैं। आज जिन योजनाओं पर काम शुरू हुआ है, वो विकसित राजस्थान की नींव को और अधिक मजबूत करेंगे। जब राजस्थान विकसित होगा, तो यहां के हर परिवार का जीवन समृद्ध होगा। आप सभी को एक बार फिर, विकास परियोजनाओं के लिए बहुत-बहुत शुभकामनाएं। मेरे साथ बोलिये-

भारत माता की जय!

भारत माता की जय!

वंदे मातरम के 150 साल देश मना रहा है। मेरे साथ बोलिये-

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

वंदे मातरम।

बहुत-बहुत धन्यवाद।