तंत्रज्ञानामुळे जीवनावर सकारात्मक परिणाम होत आहे आणि त्याचबरोबर नागरिकांचे सक्षमीकरणही होत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र  मोदी  यांनी म्हटले आहे. राज्यसभा खासदार नबाम रेबिया यांच्या ट्विटला ते उत्तर देत होते. डिजिटल इंडिया मोहीम सुरू होण्यापूर्वी अरुणाचल प्रदेशातील शेरगावात फक्त 1 मोबाईल सेवा प्रदाता होता आणि आता येथे 3 मोबाईल सेवा पुरवठादार आहेत अशी माहिती रेबिया यांनी त्यांच्या ट्विटमध्ये दिली.

पूर्वी शेरगावात वैद्यकीय आपत्कालीन स्थिती उद्भवली की डॉक्टरांना भेटण्यासाठी आणि या गावात आणण्यासाठी लोकांना रस्तामार्गे  इटानगरला जावे लागे. या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे 3 दिवस लागत. आज व्हिडिओ कॉलच्या मदतीने डॉक्टरांशी लगेच संपर्क करता येतो आणि डॉक्टर लगेचच योग्य उपचारांसाठी मार्गदर्शन करतात. हे  सर्व 30 मिनिटांपेक्षा कमी वेळात होते असे ते म्हणाले. ई-संजीवनी पोर्टल अरुणाचल प्रदेशात राहणाऱ्या लोकांसाठी वरदान ठरले आहे.

राज्यसभा खासदाराच्या ट्वीटला  उत्तर देताना पंतप्रधानांनी ट्विट केले;

"तंत्रज्ञान जीवनावर सकारात्मक परिणाम करत आहे आणि नागरिकांना सक्षम बनवत आहे."

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
IIT Madras incubates 112 startups, files 431 patents in FY26 milestone year

Media Coverage

IIT Madras incubates 112 startups, files 431 patents in FY26 milestone year
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 एप्रिल 2026
April 28, 2026

From Orchids to Expressways: PM Modi’s Blueprint for a Self-Reliant, Connected & Proud India