पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे, कि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनातून आपल्याला खऱ्या अर्थाने वीरता  व शौर्याची शिकवण मिळते. पराक्रम दिवसानिमित्त देश नेताजींचे अदम्य साहस, त्याग व मातृभूमीप्रती त्यांच्या अविचल निष्ठेचे स्मरण करत आहे . 

शौर्याच्या परमोच्च आदर्शांचे दर्शन घडवणारा एक संस्कृत श्लोक पंतप्रधांनीं सामायिक केला आहे. 

“एतदेव परं शौर्यं यत् परप्राणरक्षणम्। नहि प्राणहरः शूरः शूरः प्राणप्रदोऽर्थिनाम्॥

दुसऱ्यांचे जीवरक्षण करण्यातच उच्च प्रतीचे शौर्य आहे, जो जीव घेतो तो शूर नाही, पण जो जीवन देतो व गरजवंतांचे रक्षण करतो तोच खरा वीर आहे , असा या सुभाषिताचा अर्थ आहे. 

पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले, 

“नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे जीवन आपल्याला शौर्य आणि वीरतेचा खरा अर्थ काय असतो, हे शिकवते. पराक्रम दिवस आपल्याला याचीच आठवण करून देतो.

एतदेव परं शौर्यं यत् परप्राणरक्षणम्। 

नहि प्राणहरः शूरः शूरः प्राणप्रदोऽर्थिनाम्॥”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
'Housing for all' by 2029: Centre approves Rs 10,021 crore fund for PMAY-G in 12 states

Media Coverage

'Housing for all' by 2029: Centre approves Rs 10,021 crore fund for PMAY-G in 12 states
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 3 जून 2026
June 03, 2026

One Vision, Many Fronts: How PM Modi is Building Viksit Bharat Across Tech, Defense, Green Energy & Welfare