केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत आज केलेले भाषण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सामायिक केले आहे. हे भाषण महत्त्वपूर्ण तथ्ये, ऐतिहासिक संदर्भ आणि गेल्या दशकातील सरकारच्या प्रयत्नांच्या सविस्तर आढाव्याने परिपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. अनेक दशकांपासून प्रतिगामी स्वरूपाच्या माओवादी विचारसरणीमुळे अनेक प्रदेशांच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून, डाव्या विचारसरणीच्या कट्टरतावादाने असंख्य तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केल्याचे, मोदी यांनी म्हटले आहे.
गेल्या दहा वर्षांत सरकारने ही समस्या मुळापासून उखडून टाकण्यासाठी काम केले आहे, त्याचबरोबर नक्षलवादाने प्रभावित भागांपर्यंत विकासाचे लाभ पोहोचवले आहेत, असे त्यांनी पुढे सांगितले. सरकार सुशासन मजबूत करण्यावर आणि सर्वांसाठी शांतता व समृद्धी सुनिश्चित करण्यावर लक्ष केंद्रित करत राहील, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे.
This is an outstanding speech by the Home Minister, Shri Amit Shah Ji, filled with important facts, historical context and the efforts of our Government in the last decade.
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2026
For decades, the retrograde Maoist ideology had an adverse impact on the development of several regions.… https://t.co/griyI8cLSH


