“स्टार्ट अप्स आणि खेळांचा संगम महत्त्वाचा आहे. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धा या सुंदर शहराला ऊर्जा प्रदान करतील”
“महामारीच्या आव्हानादरम्यान या स्पर्धांचे आयोजन न्यू इंडियाचा निर्धार आणि खेळांविषयीचे प्रेम दाखवून देते. तारुण्याचा हा जोष भारताला प्रत्येक क्षेत्रात चालना देत आहे”
“समग्र दृष्टीकोन आणि 100 टक्के समर्पित वृत्ती ही खेळात आणि आयुष्यात यश मिळवण्याची गुरुकिल्ली आहे.”
“विजयाचा आनंद योग्य प्रकारे साजरा करणे आणि पराभवातून धडा शिकणे ही एक महत्त्वाची कला आपल्याला क्रीडा क्षेत्रातून शिकता येते”
“अनेक उपक्रम जुन्या विचारसरणीच्या बंधनातून खेळांना मुक्त करत आहेत”
“खेळांमधील बहुमान देशाच्या बहुमानात भऱ घालत असतो.”

खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी आपला संदेश दिला. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज बंगळूरु येथे या क्रीडा स्पर्धा सुरू होत असल्याची घोषणा केली. यावेळी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर, राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक उपस्थित होते.

बंगळूरु ही देशातील तरुणाईच्या उत्साहाचे प्रतीक आहे आणि व्यावसायिकांचा मानबिंदू आहे, असे पंतप्रधान म्हणाले. या ठिकाणी स्टार्ट अप्स आणि खेळ यांचा होणारा संगम अतिशय महत्त्वाचा आहे, असे त्यांनी सांगितले. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांच्या आयोजनामुळे या सुंदर शहराच्या उर्जेत भर पडेल असे ते म्हणाले. महामारीच्या आव्हानांना तोंड देत या स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या आयोजकांच्या निर्धार आणि क्रीडाप्रेमाला पंतप्रधानांनी सलाम केला. तारुण्याचा हा जोष भारताला प्रत्येक क्षेत्रात चालना देत आहे, असे त्यांनी नमूद केले.

यशाचा पहिला मंत्र म्हणून संघभावनेचे महत्त्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले. आपल्याला खेळातून संघभावना शिकता येते.. खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धांमध्ये तुम्हाला याचा थेट अनुभव येईल. ही संघभावना आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा एक नवीन मार्ग देखील देते, असे पंतप्रधान म्हणाले. त्याचप्रकारे, खेळातील यशासाठी सर्वांगीण दृष्टिकोन आणि 100 टक्के समर्पित वृत्ती ही गुरुकिल्ली आहे. क्रीडा क्षेत्रातील क्षमता आणि शिकण्याची वृत्ती देखील एखाद्याला आयुष्यात पुढे घेऊन जाते. “खेळ, खऱ्या अर्थाने, जीवनाला पाठबळ देणारी वास्तविक प्रणाली आहे”, यावर मोदींनी भर दिला. यावेळी पंतप्रधानांनी खेळ आणि जीवन यामध्ये असलेल्या ध्यास, आव्हाने, पराभवातून धडा घेणे, एकात्मता आणि जीवनात टिकून राहण्याची क्षमता विविध पैलूंसंदर्भातल्या समानतांकडे लक्ष वेधले. विजयाचा आनंद योग्य प्रकारे साजरा करणे आणि पराभवातून धडा घेणे या कला आपल्याला क्रीडा क्षेत्रातून शिकता येतात, असे ते म्हणाले.

खेळाडू हे नव्या भारताचे युवा आहेत आणि एक भारत श्रेष्ठ भारतचे ध्वजवाहक देखील आहेत, असे पंतप्रधानांनी खेळाडूंना सांगितले. युवा विचारसरणी आणि दृष्टीकोन आज देशाच्या धोरणांना आकार देत आहेत, असे त्यांनी सांगितले. आजच्या तरुणाईने तंदुरुस्ती हा देशाच्या प्रगतीचा मंत्र बनवला आहे, असे त्यांनी नमूद केले. क्रीडा क्षेत्रात सुरू केलेले अनेक नवे उपक्रम या क्षेत्राला जुनाट विचारसरणीच्या बंधनातून मुक्त करत आहेत, असे त्यांनी सांगितले. नव्या शिक्षण धोरणात खेळांवर दिलेला भर, खेळांसाठी आधुनिक पायाभूत सुविधा, पारदर्शक निवड प्रक्रिया किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर ही नव्या भारताची ओळख अतिशय झपाट्याने तयार होऊ लागली आहे. युवा वर्गाच्या आशा आणि आकांक्षा, नव्या भारताच्या निर्णयांचा पाया त्यावर आधारित आहे. आता देशात नवी क्रीडा विज्ञान केंद्रे स्थापन होऊ लागली आहेत. समर्पित क्रीडा विद्यापीठे स्थापन होत आहेत. हे सर्व तुमच्या सोयीसाठी आणि तुमची स्वप्ने साकार करण्यासाठी आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी यावेळी क्रीडा उर्जा आणि देशाची उर्जा यांचा संबंध स्पष्ट केला. क्रीडा क्षेत्रातील बहुमानामुळे देशाचा बहुमान देखील वाढतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. टोक्यो ऑलिंपिक पथकाशी झालेल्या त्यांच्या भेटी आणि या खेळाडूंच्या चेहऱ्यावर देशासाठी काही तरी केल्याची भावना आणि समाधान आणि त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आलेली चमक यांच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. या स्पर्धांमध्ये सहभागी होत असताना देशासाठी खेळण्याची महत्त्वाकांक्षा बाळगण्याचे आवाहन पंतप्रधानांनी या खेळाडूंना केले.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Engineering goods exports up 10.4% in January,2026, crosses $100 billion mark in April-January Period of FY26

Media Coverage

Engineering goods exports up 10.4% in January,2026, crosses $100 billion mark in April-January Period of FY26
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 26 फेब्रुवारी 2026
February 27, 2026

Citizens Express Heartfelt Gratitude to PM Modi: Make in India Surge, Budget Reforms & India-Israel Saffron Synergy