पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाला समाजासाठी खऱ्या अर्थाने उपयुक्त बनवण्यासाठी बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि निर्णयक्षमतेचे महत्त्व अधोरेखित केले. इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या अनुषंगाने त्यांनी शिखर परिषदेचा मुख्य उद्देश सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कसा वापर करता येईल याचा शोध घेणे, असल्याचे सांगितले.
पंतप्रधानांनी एक्स वर प्राचीन ज्ञानाचा संदर्भ देत बुद्धिमत्तेच्या कालातीत गुणांवर भाष्य करत एक संस्कृत सुभाषित उद्धृत केले:
“बुद्धिमत्ता, तर्कशक्ती आणि निर्णयक्षमता या विज्ञान आणि तंत्रज्ञानाला सर्वसामान्यांसाठी उपयुक्त बनवतात. इंडिया एआय इम्पॅक्ट समिट चा उद्देशही हाच आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वांच्या हितासाठी कसा करता येईल.
शुश्रूषा श्रवणं चैव ग्रहणं धारणां तथा।
ऊहापोहोऽर्थविज्ञानं तत्त्वज्ञानं च धीगुणाः॥”
— Narendra Modi (@narendramodi) February 17, 2026


