सर्व नागरिकांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांनी एक सुभाषित सामायिक केले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या प्रारंभाबद्दल राष्ट्राला शुभेच्छा दिल्या असून गेल्या हजारो वर्षांपासून लाखो लोकांच्या हृदयात सोमनाथ मंदिराला जिवंत ठेवणाऱ्या कालातीत सांस्कृतिक भावनेचे स्मरण केले आहे. 

जानेवारी 1026 मध्ये सोमनाथ मंदिरावर पहिला हल्ला झाला. त्यानंतर आलेल्या अनेक शतकांमध्ये वारंवार हल्ले होऊनही भाविकांची अतूट श्रद्धा कायम राहिली आणि संस्कृतीच्या दृढ निश्चयाने सोमनाथ प्रत्येक वेळी नव्याने पुन्हा उभे राहिले. "सोमनाथ स्वाभिमान पर्व हे भारतमातेच्या त्या अगणित सुपुत्रांचे स्मरण आहे ज्यांनी कधीच आपली तत्त्वे आणि मूल्यांशी तडजोड केली नाही. काळ कितीही कठीण असला तरी त्यांचा निर्धार ठाम राहिला आणि आपल्या मूल्यांप्रति त्यांची निष्ठा अढळ राहिली.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी त्यांच्या यापूर्वीच्या सोमनाथ मंदिराच्या भेटीची क्षणचित्रे सामायिक केली असून नागरिकांनी #सोमनाथस्वाभिमानपर्व वापरुन आपल्या आठवणी सामायिक करुन या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत 1951 मध्ये मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या घटनेला 50  वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने  31 ऑक्टोबर 2001 रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे त्यांनी स्मरण केले. या मंदिराच्या पुनर्निमितीमध्ये सरदार वल्लभभाई पटेल, केएम मुन्शी आणि इतर अनेकांनी केलेल्या प्रयत्नांचे योगदान अतिशय मोलाचे होते. सन 2001 मध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 125 व्या जयंतीचा योग देखील जुळून आला होता आणि या कार्यक्रमाला पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, केंद्रीय गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

भविष्याचा वेध घेताना, पंतप्रधानांनी म्हटले आहे की 2026 हे वर्ष 1951 मध्ये झालेल्या भव्य सोहळ्याचे 75 वर्षपूर्तीचे वर्ष आहे, ज्यावेळी सोमनाथ मंदिर राष्ट्राला समर्पित करण्यात आले होते. "हा टप्पा केवळ मंदिराच्या पुनर्निर्मितीचा नव्हे तर संस्कृतीबद्दल असलेल्या दुर्दम्य भावनेचा असून तो येणाऱ्या कित्येक पिढयांना प्रेरणा देत राहील." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

एक्स समाजमाध्यमावर लिहिलेल्या विविध पोस्ट्समध्ये त्यांनी म्हटले आहे :

“जय सोमनाथ!

सोमनाथ स्वाभिमान पर्व आजपासून सुरु होत आहे. हजारो वर्षांपूर्वी जानेवारी 1026, मध्ये सोमनाथवर पहिला हल्ला झाला होता. त्यानंतरच्या अनेक शतकांमध्ये वारंवार झालेल्या हल्ल्यांमुळे भाविकांची अतूट श्रद्धा  कमी झाली नाही आणि सांस्कृतिक चैतन्याला धक्का लागला नाही त्यामुळेच सोमनाथ प्रत्येक वेळी नव्याने पुन्हा उभे राहिले.

मी सोमनाथला दिलेल्या माझ्या पूर्वीच्या भेटींचे काही फोटो सामायिक करत आहे. तुम्हीही तिथे गेला असाल, तर ते #SomnathSwabhimanParv वापरून सामायिक करा.

"#SomnathSwabhimanParv हे भारतमातेच्या त्या अगणित सुपुत्रांचे स्मरण आहे ज्यांनी कधीच आपल्या तत्त्वांशी आणि मूल्यांशी तडजोड केली नाही. कितीही कठीण काळ आला तरी त्यांचा निर्धार ठाम राहिला आणि आपल्या मूल्यांप्रति असलेली त्यांची निष्ठा अढळ राहिली.”

"सोमनाथ येथे 31 ऑक्टोबर 2001 रोजी झालेल्या सोहळ्याची ही एक झलक.  मंदिराच्या पुनर्निमितीनंतर राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत सन 1951 मध्ये सोमनाथ मंदिर पुन्हा एकदा खुले करण्याच्या सोहळ्याला त्यावर्षी  50 वर्षे पूर्ण झाली होती. सरदार वल्लभभाई पटेल, केएम मुन्शी आणि इतर अनेकांनी केलेल्या प्रयत्नांचे योगदान अतिशय मोलाचे होते. त्याच वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांची 125 वी जयंती देखील होती. 2001 च्या कार्यक्रमाला तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

2026 मध्ये आपण 1951 च्या  समारंभाच्या अमृत महोत्सवाचा भव्य सोहळा साजरा करत आहोत !”

 

 

 

 

जय सोमनाथ !

सोमनाथ स्वाभिमान पर्व का आज से शुभारंभ हो रहा है। एक हजार वर्ष पूर्व, जनवरी 1026 में सोमनाथ मंदिर ने अपने इतिहास का पहला आक्रमण झेला था। साल 1026 का आक्रमण और उसके बाद हुए अनेक हमले भी हमारी शाश्वत आस्था को डिगा नहीं सके। बल्कि इनसे भारत की सांस्कृतिक एकता की भावना और सशक्त हुई और सोमनाथ का बार-बार पुनरोद्धार होता रहा। 

मैं सोमनाथ की अपनी पिछली यात्राओं की कुछ तस्वीरें साझा कर रहा हूं। यदि आप भी सोमनाथ गए हैं, तो अपनी तस्वीरें #SomnathSwabhimanParv के साथ जरूर शेयर करें।”

“#SomnathSwabhimanParv का ये अवसर, भारत माता के उन असंख्य सपूतों को स्मरण करने का पर्व है, जिन्होंने कभी अपने सिद्धांतों और मूल्यों से समझौता नहीं किया। समय कितना ही कठिन और भयावह क्यों ना रहा हो, उनका संकल्प हमेशा अडिग रहा। हमारी सभ्यता और सांस्कृतिक चेतना के प्रति उनकी निष्ठा अटूट रही। अटूट आस्था के एक हजार वर्ष का ये अवसर, हमें राष्ट्र की एकता के लिए निरंतर प्रयासरत रहने की प्रेरणा देता है।”

“मैं 31 अक्टूबर 2001 को सोमनाथ में आयोजित एक कार्यक्रम की कुछ झलकियां भी आपसे साझा कर रहा हूं। यह वो साल था, जब हमने 1951 में पुनर्निर्मित सोमनाथ मंदिर के उद्घाटन के 50 वर्ष पूर्ण होने का उत्सव मनाया था। 1951 में वो ऐतिहासिक समारोह तत्कालीन राष्ट्रपति डॉ. राजेन्द्र प्रसाद जी की मौजूदगी में संपन्न हुआ था। सोमनाथ मंदिर के पुनर्निर्माण में सरदार पटेल और केएम मुंशी जी के साथ ही कई महान विभूतियों के प्रयास अत्यंत उल्लेखनीय रहे हैं। साल 2001 के इस कार्यक्रम में तत्कालीन प्रधानमंत्री अटल जी और गृह मंत्री आडवाणी जी और कई गणमान्य लोग शामिल हुए थे। 

वर्ष 2026 में हम 1951 में हुए भव्य समारोह के 75 वर्ष पूर्ण होने का भी स्मरण कर रहे हैं!”

 

 

 

 

Sharing a Sanskrit verse on X, Shri Modi stated:

“श्री सोमनाथ महादेव की कृपा और आशीर्वाद से सबका कल्याण हो।

सौराष्ट्रदेशे विशदेऽतिरम्ये ज्योतिर्मयं चन्द्रकलावतंसम्।

भक्तिप्रदानाय कृपावतीर्णं तं सोमनाथं शरणं प्रपद्ये॥”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s G7 role indispensable, Rafale deal to align with Make in India: French envoy Mathou

Media Coverage

India’s G7 role indispensable, Rafale deal to align with Make in India: French envoy Mathou
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारताचे सर्वात जास्त काळ पदभार सांभाळणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले
June 09, 2026

भारताच्या पंतप्रधानपदी निवडून येऊन सर्वाधिक काळ पदभार सांभाळत असण्याच्या पूर्वसंध्येला जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.संपूर्ण जगभरातील प्रमुख नेत्यांनी पंतप्रधानांच्या परिवर्तनकारी प्रशासनाला, ग्लोबल साउथ देशांचा पुरस्कार करण्याला आणि समावेशक तसेच आर्थिकदृष्ट्या चैतन्यमय भारताच्या उभारणीच्या संकल्पनेची प्रशंसा केली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके  यांनी 08 जून 2026 रोजी पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांचे सरकार तसेच श्रीलंकेच्या जनतेकडून मोदी यांचे सस्नेह अभिनंदन केले आहे. त्या पत्रात म्हटले आहे: “हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे केवळ  तुमच्या कार्यकाळाचा अवधी नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमधील जनतेने पुनःपुन्हा तुमच्यावर दाखवलेला विश्वास आणि भरवसा याचे देखील द्योतक आहे.” भारतात घडलेले उल्लेखनीय आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन देखील राष्ट्राध्यक्षांनी अधोरेखित केले तसेच पंतप्रधान मोदी यांच्या विचारांनी श्रीलंकेसह भारताच्या सीमेवरील अनेक देशांना प्रेरणा दिली आहे असे देखील नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी 4 ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांची ही चौथी श्रीलंका भेट होती आणि या भेटीदरम्यान मोदी यांना परदेशी मान्यवरांना दिला जाणारा ‘मित्र विभूषण’ हा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीमुळे भारताच्या ‘शेजारी राष्ट्र सर्वप्रथम’ धोरणाची पुष्टी झाली आणि वर्ष 2022 मध्ये श्रीलंका आर्थिक अडचणीत असताना भारताने दिलेल्या महत्त्वपूर्ण सहयोगासह भारताच्या भक्कम भागीदारीच्या सर्वात जवळच्या लाभार्थ्यांपैकी श्रीलंका हा एक देश आहे याची देखील ग्वाही मिळाली.

पापुआ न्यू गिनीचे राष्ट्राध्यक्ष जेम्स मारापे यांनी एका वैयक्तिक व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदींचे वर्णन "एक आदर्श नेतृत्वाचे उत्तम उदाहरण" असे केले. "20 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढून त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देणे ही अद्भुत कामगिरी आहे." त्यांनी असेही नमूद केले. मारापे यांनी पापुआ न्यू गिनीची भारताशी असलेली स्नेहपूर्ण मैत्री आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेसाठी मे 2023 मध्ये पंतप्रधान मोदींनी पापुआ न्यू गिनीला दिलेली भेट ऐतिहासिक होती. भारतीय पंतप्रधानांनी प्रथमच त्या देशाला भेट होती आणि पॅसिफिक द्वीपसमूह राष्ट्रांशी भारताच्या संबंधांमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला, हे त्यांनी अधोरेखित केले. या भेटीमुळे ग्लोबल साउथ देशांच्या  समूहाचा कटिबद्ध भागीदार म्हणून भारताची भूमिका सुस्पष्ट झाली.

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान  कमला प्रसाद-बिसेसर यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, की "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर बुलंद आवाज म्हणून उदयास आला आहे." अत्यंत सामान्य पार्श्वभूमीपासून ते 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या राष्ट्राचे सलग तीन कार्यकाळांसाठी नेतृत्व करण्यापर्यंतच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकला; तसेच परराष्ट्र धोरण, आर्थिक विकास, पायाभूत सुविधा आणि सामाजिक-आर्थिक विकास या क्षेत्रांमधील भारताच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी 3-4 जुलै 2025 रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगोला भेट दिली. ही तब्बल 26 वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांनी दिलेली द्विपक्षीय भेट होती. ती त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये भारतीय स्थलांतरित लोकांच्या आगमनाचा 180 वा वर्धापन दिन साजरा होत असताना झाली हे त्यांनी आवर्जून नमूद केले.