पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या जीवितहानी आणि व्यापक नुकसानाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. या कठीण काळात नेपाळची जनता आणि नेपाळ सरकारप्रती भारताच्या ठाम समर्थनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. मोदी यांनी या संकटात आवश्यक त्या सर्व मदतीसाठी भारताची बांधिलकी अधोरेखित करत, भारत संकट काळात एक मित्रवत शेजारी आणि प्रथम प्रतिसाद देणारे राष्ट्र असल्याचे स्पष्ट केले.
सामाजिक संपर्क माध्यम ‘एक्स’वरील आपल्या एका संदेशात पंतप्रधान म्हणाले,
“नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे झालेली जीवितहानी आणि नुकसान दुःखद आहे. या कठीण काळात आम्ही नेपाळची जनता आणि सरकार समवेत आहोत. एक मित्रवत शेजारी आणि प्रथम प्रतिसाद देणारे राष्ट्र म्हणून भारत आवश्यक मदत देण्यास वचनबद्ध आहे.”
The loss of lives and damage caused by heavy rains in Nepal is distressing. We stand with the people and Government of Nepal in this difficult time. As a friendly neighbour and first responder, India remains committed to providing any assistance that may be required.
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2025


