पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आसामध्ये गुवाहाटी येथे झुमर बिनंदिनी 2025 या भव्य झुमर कार्यक्रमात सहभागी झाले. या समारंभाला संबोधित करताना ते म्हणाले की या ठिकाणी सर्वत्र ऊर्जा, उत्साह आणि रोमांचाने भरून गेलेले नादमाधुर्याचे वातावरण आहे. झुमरमधील सर्वच कलाकारांनी अतिशय उत्तम तयारी केली आहे ज्यामधून चहाच्या मळ्यांचा सुगंध आणि सौंदर्य प्रतिबिंबित होत आहे,असे त्यांनी नमूद केले. झुमर आणि चहाच्या मळ्यांची संस्कृती यांच्याशी ज्या प्रकारे येथील लोकांचे विशेष नाते आहे, तशाच प्रकारचे आपलेही नाते आहे, असे त्यांनी सांगितले. इतक्या मोठ्या संख्येने आज झुमर नृत्यात सहभागी झालेले कलाकार एक विक्रम प्रस्थापित करतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली 2023 मध्ये आपण आसामला दिलेल्या भेटीच्या वेळी बिहू नृत्यात 11,000 कलाकार सहभागी झाले होते याची आठवण करून देत पंतप्रधानांनी सांगितले की कधीही विसरता येणार नाहीत अशा त्या आठवणी होत्या आणि यावेळी देखील तशाच प्रकारचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण असेल, अशी आपल्याला अपेक्षा आहे. अतिशय मनोहारी सांस्कृतिक सादरीकरणाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आसाम सरकार आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले. या आनंदोत्सवात चहाच्या मळ्यातील कामगार समुदाय आणि आदिवासी जनता सहभागी होत असल्याने आजचा दिवस आसामसाठी अतिशय अभिमानाचा दिवस असेल असे त्यांनी नमूद केले. या विशेष दिनाच्या निमित्ताने त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

 

असे भव्य कार्यक्रम केवळ आसामच्या अभिमानाचाच दाखला नाहीत तर भारताच्या महान विविधतेचे दर्शन घडवत आहेत असे नमूद करत पंतप्रधान म्हणाले की एक काळ होता ज्यावेळी आसाम आणि ईशान्य भारताला विकास आणि संस्कृती संदर्भात दुर्लक्षित केले जात होते. मात्र, आता ते स्वतःच ईशान्येकडच्या संस्कृतीचे ब्रँड ऍम्बॅसॅडर बनले असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. आसाममध्ये काझिरंगा येथे वास्तव्य करणारे आणि त्यातील जैवविविधतेचा जगात प्रसार करणारे आपण पहिले पंतप्रधान आहोत, असे ते म्हणाले. काही महिन्यांपूर्वीच आसामी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला, ज्या मान्यतेची प्रतीक्षा आसामच्या जनतेला कित्येक दशकांपासून होती, असे देखील त्यांनी नमूद केले. त्याशिवाय चराईदेव मोईदामचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळेच ही महत्त्वाची कामगिरी साध्य झाली, असे त्यांनी सांगितले.

 

आसामचा गौरव असलेले, आसामची संस्कृती आणि ओळख यांचे मुघलांपासून संरक्षण करणारे लचित बोरफुकन या शूर योदध्याविषयी बोलताना मोदी यांनी लचित बोरफुकन यांच्या 400 व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य सोहळ्याला अधोरेखित केले आणि त्यावेळी प्रजासत्ताक दिन संचलनात त्यांचा चित्ररथ देखील समाविष्ट करण्यात आला होता, अशी माहिती दिली. आसाममध्ये लचित बोरफुकन यांचा 125 फुटी कांस्य पुतळा उभारण्यात आला आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. आदिवासी समाजाच्या वारशाचा गौरव करण्यासाठी जनजातीय गौरव दिवस साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली, असे ते म्हणाले. आदिवासी वीरांच्या योगदानाचे चिरंतन स्मरण करण्यासाठी देशभरात आदिवासी संग्रहालये स्थापन करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

 

आमचे  सरकार आसामचा विकास करत आहे आणि 'टी ट्राइब' समुदायाची सेवा करत आहे, असे नमूद करून पंतप्रधानांनी आसाम टी कॉर्पोरेशनच्या कामगारांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांना बोनस देण्याची घोषणा करण्यात आल्याचे अधोरेखित केले. चहाच्या बागांमध्ये काम करणाऱ्या सुमारे 1.5 लाख महिलांना गर्भावस्थेतील त्यांच्या आर्थिक चिंता कमी करण्यासाठी 15,000 रुपये मदत दिली जात आहे यावर त्यांनी भर दिला. याव्यतिरिक्त, आसाम सरकार कुटुंबांच्या आरोग्यासाठी चहाच्या बागांमध्ये 350 हून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरे उघडत आहे, असे त्यांनी सांगितले. टी ट्राईबच्या  मुलांसाठी 100 हून अधिक मॉडेल टी गार्डन शाळा उघडण्यात आल्या आहेत, तर आणखी 100 शाळा सुरु करण्याची योजना आहे, असे  मोदी यांनी नमूद केले. टी ट्राईबच्या युवकांसाठी आसाम सरकारने ओबीसी कोट्यामधून 3% आरक्षण आणि  स्वयंरोजगारासाठी 25,000 रुपयांची मदत देण्याची तरतूदही केल्याचे त्यांनी सांगितले.  चहा उद्योग आणि त्यातील कामगारांचा विकास आसामच्या सर्वांगीण विकासाला चालना देईल आणि ईशान्येकडील राज्यांना नवीन उंचीवर नेईल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. त्यांनी सर्व सहभागींना त्यांच्या सादरीकरणाबद्दल आधीच  धन्यवाद दिले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, केंद्रीय मंत्री डॉ. एस जयशंकर, सर्बानंद सोनोवाल, त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा, केंद्रीय राज्यमंत्री  पबित्रा  मार्गेरिटा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

झुमर बिनंदिनी (मेगा झुमर) 2025, झुमर नृत्यामध्ये 8,000 कलाकारांचा सहभाग असलेला एक नेत्रदीपक सांस्कृतिक कार्यक्रम आहे.आसामच्या टी ट्राइब आणि आसामच्या आदिवासी समुदायांचे हे लोकनृत्य असून समावेशकता , एकता आणि सांस्कृतिक अभिमानाच्या भावनेला मूर्त रूप देते आणि सांस्कृतिक अभिमानाचे ते प्रतीक आहे. मेगा झुमर कार्यक्रम चहा उद्योगाच्या 200 वर्षांचे आणि आसाममधील औद्योगिकीकरणाच्या 200 वर्षांचे प्रतीक आहे.

 

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Exclusive: Just two friends in a car, says Putin on viral carpool with PM Modi

Media Coverage

Exclusive: Just two friends in a car, says Putin on viral carpool with PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
India–Russia friendship has remained steadfast like the Pole Star: PM Modi during the joint press meet with Russian President Putin
December 05, 2025

Your Excellency, My Friend, राष्ट्रपति पुतिन,
दोनों देशों के delegates,
मीडिया के साथियों,
नमस्कार!
"दोबरी देन"!

आज भारत और रूस के तेईसवें शिखर सम्मेलन में राष्ट्रपति पुतिन का स्वागत करते हुए मुझे बहुत खुशी हो रही है। उनकी यात्रा ऐसे समय हो रही है जब हमारे द्विपक्षीय संबंध कई ऐतिहासिक milestones के दौर से गुजर रहे हैं। ठीक 25 वर्ष पहले राष्ट्रपति पुतिन ने हमारी Strategic Partnership की नींव रखी थी। 15 वर्ष पहले 2010 में हमारी साझेदारी को "Special and Privileged Strategic Partnership” का दर्जा मिला।

पिछले ढाई दशक से उन्होंने अपने नेतृत्व और दूरदृष्टि से इन संबंधों को निरंतर सींचा है। हर परिस्थिति में उनके नेतृत्व ने आपसी संबंधों को नई ऊंचाई दी है। भारत के प्रति इस गहरी मित्रता और अटूट प्रतिबद्धता के लिए मैं राष्ट्रपति पुतिन का, मेरे मित्र का, हृदय से आभार व्यक्त करता हूँ।

Friends,

पिछले आठ दशकों में विश्व में अनेक उतार चढ़ाव आए हैं। मानवता को अनेक चुनौतियों और संकटों से गुज़रना पड़ा है। और इन सबके बीच भी भारत–रूस मित्रता एक ध्रुव तारे की तरह बनी रही है।परस्पर सम्मान और गहरे विश्वास पर टिके ये संबंध समय की हर कसौटी पर हमेशा खरे उतरे हैं। आज हमने इस नींव को और मजबूत करने के लिए सहयोग के सभी पहलुओं पर चर्चा की। आर्थिक सहयोग को नई ऊँचाइयों पर ले जाना हमारी साझा प्राथमिकता है। इसे साकार करने के लिए आज हमने 2030 तक के लिए एक Economic Cooperation प्रोग्राम पर सहमति बनाई है। इससे हमारा व्यापार और निवेश diversified, balanced, और sustainable बनेगा, और सहयोग के क्षेत्रों में नए आयाम भी जुड़ेंगे।

आज राष्ट्रपति पुतिन और मुझे India–Russia Business Forum में शामिल होने का अवसर मिलेगा। मुझे पूरा विश्वास है कि ये मंच हमारे business संबंधों को नई ताकत देगा। इससे export, co-production और co-innovation के नए दरवाजे भी खुलेंगे।

दोनों पक्ष यूरेशियन इकॉनॉमिक यूनियन के साथ FTA के शीघ्र समापन के लिए प्रयास कर रहे हैं। कृषि और Fertilisers के क्षेत्र में हमारा करीबी सहयोग,food सिक्युरिटी और किसान कल्याण के लिए महत्वपूर्ण है। मुझे खुशी है कि इसे आगे बढ़ाते हुए अब दोनों पक्ष साथ मिलकर यूरिया उत्पादन के प्रयास कर रहे हैं।

Friends,

दोनों देशों के बीच connectivity बढ़ाना हमारी मुख्य प्राथमिकता है। हम INSTC, Northern Sea Route, चेन्नई - व्लादिवोस्टोक Corridors पर नई ऊर्जा के साथ आगे बढ़ेंगे। मुजे खुशी है कि अब हम भारत के seafarersकी polar waters में ट्रेनिंग के लिए सहयोग करेंगे। यह आर्कटिक में हमारे सहयोग को नई ताकत तो देगा ही, साथ ही इससे भारत के युवाओं के लिए रोजगार के नए अवसर बनेंगे।

उसी प्रकार से Shipbuilding में हमारा गहरा सहयोग Make in India को सशक्त बनाने का सामर्थ्य रखता है। यह हमारेwin-win सहयोग का एक और उत्तम उदाहरण है, जिससे jobs, skills और regional connectivity – सभी को बल मिलेगा।

ऊर्जा सुरक्षा भारत–रूस साझेदारी का मजबूत और महत्वपूर्ण स्तंभ रहा है। Civil Nuclear Energy के क्षेत्र में हमारा दशकों पुराना सहयोग, Clean Energy की हमारी साझा प्राथमिकताओं को सार्थक बनाने में महत्वपूर्ण रहा है। हम इस win-win सहयोग को जारी रखेंगे।

Critical Minerals में हमारा सहयोग पूरे विश्व में secure और diversified supply chains सुनिश्चित करने के लिए महत्वपूर्ण है। इससे clean energy, high-tech manufacturing और new age industries में हमारी साझेदारी को ठोस समर्थन मिलेगा।

Friends,

भारत और रूस के संबंधों में हमारे सांस्कृतिक सहयोग और people-to-people ties का विशेष महत्व रहा है। दशकों से दोनों देशों के लोगों में एक-दूसरे के प्रति स्नेह, सम्मान, और आत्मीयताका भाव रहा है। इन संबंधों को और मजबूत करने के लिए हमने कई नए कदम उठाए हैं।

हाल ही में रूस में भारत के दो नए Consulates खोले गए हैं। इससे दोनों देशों के नागरिकों के बीच संपर्क और सुगम होगा, और आपसी नज़दीकियाँ बढ़ेंगी। इस वर्ष अक्टूबर में लाखों श्रद्धालुओं को "काल्मिकिया” में International Buddhist Forum मे भगवान बुद्ध के पवित्र अवशेषों का आशीर्वाद मिला।

मुझे खुशी है कि शीघ्र ही हम रूसी नागरिकों के लिए निशुल्क 30 day e-tourist visa और 30-day Group Tourist Visa की शुरुआत करने जा रहे हैं।

Manpower Mobility हमारे लोगों को जोड़ने के साथ-साथ दोनों देशों के लिए नई ताकत और नए अवसर create करेगी। मुझे खुशी है इसे बढ़ावा देने के लिए आज दो समझौतेकिए गए हैं। हम मिलकर vocational education, skilling और training पर भी काम करेंगे। हम दोनों देशों के students, scholars और खिलाड़ियों का आदान-प्रदान भी बढ़ाएंगे।

Friends,

आज हमने क्षेत्रीय और वैश्विक मुद्दों पर भी चर्चा की। यूक्रेन के संबंध में भारत ने शुरुआत से शांति का पक्ष रखा है। हम इस विषय के शांतिपूर्ण और स्थाई समाधान के लिए किए जा रहे सभी प्रयासों का स्वागत करते हैं। भारत सदैव अपना योगदान देने के लिए तैयार रहा है और आगे भी रहेगा।

आतंकवाद के विरुद्ध लड़ाई में भारत और रूस ने लंबे समय से कंधे से कंधा मिलाकर सहयोग किया है। पहलगाम में हुआ आतंकी हमला हो या क्रोकस City Hall पर किया गया कायरतापूर्ण आघात — इन सभी घटनाओं की जड़ एक ही है। भारत का अटल विश्वास है कि आतंकवाद मानवता के मूल्यों पर सीधा प्रहार है और इसके विरुद्ध वैश्विक एकता ही हमारी सबसे बड़ी ताक़त है।

भारत और रूस के बीच UN, G20, BRICS, SCO तथा अन्य मंचों पर करीबी सहयोग रहा है। करीबी तालमेल के साथ आगे बढ़ते हुए, हम इन सभी मंचों पर अपना संवाद और सहयोग जारी रखेंगे।

Excellency,

मुझे पूरा विश्वास है कि आने वाले समय में हमारी मित्रता हमें global challenges का सामना करने की शक्ति देगी — और यही भरोसा हमारे साझा भविष्य को और समृद्ध करेगा।

मैं एक बार फिर आपको और आपके पूरे delegation को भारत यात्रा के लिए बहुत बहुत धन्यवाद देता हूँ।