Prime Minister, Shri Narendra Modi paid tributes to Mahatma Gandhi ji and Lal Bahadur Shastri ji, on their birth anniversary.

“पूज्य बापू को शत्-शत् नमन... I bow to Mahatma Gandhi on his birth anniversary.

inner_0214

Gandhi ji's thoughts and beliefs remain a great inspiration for us. Let us dedicate ourselves to building the India of Gandhi ji's dreams.

दृढ़ संकल्प, सरलता के प्रतीक, देश को “जय जवान, जय किसान” का नारा देने वाले श्री लाल बहादुर शास्त्री जी को उनकी जयंती पर शत्-शत् नमन!”, the Prime Minister said.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India’s G7 role indispensable, Rafale deal to align with Make in India: French envoy Mathou

Media Coverage

India’s G7 role indispensable, Rafale deal to align with Make in India: French envoy Mathou
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारताचे सर्वात जास्त काळ पदभार सांभाळणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले
June 09, 2026

भारताच्या पंतप्रधानपदी निवडून येऊन सर्वाधिक काळ पदभार सांभाळत असण्याच्या पूर्वसंध्येला जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.संपूर्ण जगभरातील प्रमुख नेत्यांनी पंतप्रधानांच्या परिवर्तनकारी प्रशासनाला, ग्लोबल साउथ देशांचा पुरस्कार करण्याला आणि समावेशक तसेच आर्थिकदृष्ट्या चैतन्यमय भारताच्या उभारणीच्या संकल्पनेची प्रशंसा केली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके  यांनी 08 जून 2026 रोजी पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांचे सरकार तसेच श्रीलंकेच्या जनतेकडून मोदी यांचे सस्नेह अभिनंदन केले आहे. त्या पत्रात म्हटले आहे: “हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे केवळ  तुमच्या कार्यकाळाचा अवधी नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमधील जनतेने पुनःपुन्हा तुमच्यावर दाखवलेला विश्वास आणि भरवसा याचे देखील द्योतक आहे.” भारतात घडलेले उल्लेखनीय आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन देखील राष्ट्राध्यक्षांनी अधोरेखित केले तसेच पंतप्रधान मोदी यांच्या विचारांनी श्रीलंकेसह भारताच्या सीमेवरील अनेक देशांना प्रेरणा दिली आहे असे देखील नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी 4 ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांची ही चौथी श्रीलंका भेट होती आणि या भेटीदरम्यान मोदी यांना परदेशी मान्यवरांना दिला जाणारा ‘मित्र विभूषण’ हा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीमुळे भारताच्या ‘शेजारी राष्ट्र सर्वप्रथम’ धोरणाची पुष्टी झाली आणि वर्ष 2022 मध्ये श्रीलंका आर्थिक अडचणीत असताना भारताने दिलेल्या महत्त्वपूर्ण सहयोगासह भारताच्या भक्कम भागीदारीच्या सर्वात जवळच्या लाभार्थ्यांपैकी श्रीलंका हा एक देश आहे याची देखील ग्वाही मिळाली.

पापुआ न्यू गिनीचे राष्ट्राध्यक्ष जेम्स मारापे यांनी एका वैयक्तिक व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदींचे वर्णन "एक आदर्श नेतृत्वाचे उत्तम उदाहरण" असे केले. "20 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढून त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देणे ही अद्भुत कामगिरी आहे." त्यांनी असेही नमूद केले. मारापे यांनी पापुआ न्यू गिनीची भारताशी असलेली स्नेहपूर्ण मैत्री आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेसाठी मे 2023 मध्ये पंतप्रधान मोदींनी पापुआ न्यू गिनीला दिलेली भेट ऐतिहासिक होती. भारतीय पंतप्रधानांनी प्रथमच त्या देशाला भेट होती आणि पॅसिफिक द्वीपसमूह राष्ट्रांशी भारताच्या संबंधांमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला, हे त्यांनी अधोरेखित केले. या भेटीमुळे ग्लोबल साउथ देशांच्या  समूहाचा कटिबद्ध भागीदार म्हणून भारताची भूमिका सुस्पष्ट झाली.

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान  कमला प्रसाद-बिसेसर यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, की "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर बुलंद आवाज म्हणून उदयास आला आहे." अत्यंत सामान्य पार्श्वभूमीपासून ते 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या राष्ट्राचे सलग तीन कार्यकाळांसाठी नेतृत्व करण्यापर्यंतच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकला; तसेच परराष्ट्र धोरण, आर्थिक विकास, पायाभूत सुविधा आणि सामाजिक-आर्थिक विकास या क्षेत्रांमधील भारताच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी 3-4 जुलै 2025 रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगोला भेट दिली. ही तब्बल 26 वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांनी दिलेली द्विपक्षीय भेट होती. ती त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये भारतीय स्थलांतरित लोकांच्या आगमनाचा 180 वा वर्धापन दिन साजरा होत असताना झाली हे त्यांनी आवर्जून नमूद केले.