PM Modi dedicates multiple development projects worth Rs. 22,000 crores in Bhilai, Chhattisgarh
The expansion of Bhilai Steel Plant will further strengthen the foundation of a New India: PM Modi
Continuous efforts are being made to enhance water, land and air connectivity: PM Modi
Under UDAN Yojana, we are opening new airports at places where the previous government even refrained to construct roads: PM
Naya Raipur is now the country’s first Greenfield Smart City; be it electricity, water or transport, everything will be controlled from a single command centre: PM Modi
Development is necessary to eliminate any kind of violence: PM Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर आहेत, त्यांच्या हस्ते नया रायपूर इथे उभारण्यात आलेल्या एकिकृत निर्देश आणि नियंत्रण केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पाची पाहणी केली.

त्यानंतर पंतप्रधानांनी भिलाई पोलाद प्रकल्पाच्या ब्लास्ट फर्नेस-8 केंद्रालाही भेट दिली. या प्रकल्पाची कार्यपद्धती त्यांनी जाणून घेतली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

या उद्‌घाटन कार्यक्रमानंतर झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधानांनी अत्याधुनिक आणि विस्तारीत भिलाई पोलाद प्रकल्पाचे राष्ट्रार्पण केले. तसेच आयआयटी भिलाई भूमीपूजनही त्यांच्या हस्ते झाले. भारत नेट या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण झाल्यानंतर प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले. तसेच जगदलपूर आणि रायपूर दरम्यानच्या विमान सेवेचेही त्यांनी उद्‌घाटन केले. राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते लॅपटॉप, धनादेश आणि प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.

कुठल्याही प्रकारच्या हिंसेला विकास हेच एकमेव उत्तर आहे, असे मत पंतप्रधानांनी या सभेत बोलतांना व्यक्त केले.

राष्ट्र बांधणीत भिलाई पोलाद प्रकल्पाचा मोठा वाटा असल्याचे सांगत, या प्रकल्पाच्या आधुनिकीकरणामुळे आणि विस्तारीकरणामुळे नव भारताच्या उभारणीत त्याची भूमिका महत्वाची ठरले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या उपस्थितीत शुभारंभ झालेल्या विविध विकास प्रकल्पांचीही त्यांनी माहिती दिली.

गेल्या दोन महिन्यात ग्राम स्वराज्य अभियानाचे अनेक सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत, असे ते म्हणाले. देशातल्या 115 मागास जिल्ह्यांमध्ये हे अभियान जोरकसपणे राबवले जात आहे, त्यातले 12 जिल्हे छत्तीसगडमध्ये आहेत, असे ते म्हणाले. जनधन योजना, मुद्रा योजना, उज्‍ज्वला योजना, फसल विमा योजना आणि सौभाग्य योजनेमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्यात आलेले बदल त्यांनी सांगितले.

आदिवासी जनतेचे हित लक्षात घेऊन केंद्र सरकार वन हक्क कायद्याची कठोर अंमलबजावणी करत आहे, असे मोदी यांनी सांगितले. आदिवासींच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत असून, त्यांच्यासाठी देशभरात एकलव्य विद्यालये स्थापन केली जात आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Click here to read PM's speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
One of the world’s first canal-top solar projects placed a 750-meter solar array above an Indian irrigation canal, generating clean power while saving an estimated 9 million liters of water each year

Media Coverage

One of the world’s first canal-top solar projects placed a 750-meter solar array above an Indian irrigation canal, generating clean power while saving an estimated 9 million liters of water each year
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 17 जुलै 2026
July 17, 2026

Green Trains, Private Rockets & Global Partnerships — PM Modi’s New India is Playing to Win