मन की बात

Published By : Admin | January 29, 2017 | 12:30 IST
#MannKiBaat: India celebrated Republic Day with immense enthusiasm, says PM
#MannKiBaat: Prime Minister Modi recalls Mahatma Gandhi, urge countrymen to keep 2 minutes silence
#MannKiBaat: PM Modi motivates youngsters appearing for exams
Appear for exams with pleasure & not under any pressure, says PM Modi #MannKiBaat
PM’s mantra for students appearing for exams – Smile more to score more #MannKiBaat
#MannKiBaat: Marks or mark sheet have limited influence on our lives. Knowledge gained matters most, says PM Modi
Compete with yourself, not others. Do not be let down by failures: PM Modi to youngsters #MannKiBaat
Coordination is must between our sense of mission and sense of ambition, says the Prime Minister #MannKiBaat
Accept capabilities of your children, mentor them in best ways, spend time with them: PM Modi to parents #MannKiBaat
Expecting too much from our children makes them stressed. Accept & back them in doing what they are well capable of: PM #MannKiBaat
Three things vital for exam preparation – proper rest, good sleep, sports or any other such activity: PM Modi during #MannKiBaat
Prime Minister Modi conveys greetings to Indian Coast Guard, salutes their role in safeguarding the nation #MannKiBaat

माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हा सार्यांना नमस्कार. 26 जानेवारी, आपला ‘प्रजासत्ताक दिवस’ आपण देशाच्या प्रत्येक कानाकोपर्यात आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला.  भारताची राज्यघटना, नागरिकांचे कर्तव्य, नागरिकांचे अधिकार आणि लोकशाहीसाठीची आपली कटिबद्धता यांची आठवण करून देणारा हा सण म्हणजे एक प्रकारे येणार्या पिढ्यांवर लोकशाहीचे संस्कार करणारा, लोकशाहीमध्ये पार पाडावयाच्या जबाबदारीबद्दल जागरूक करणारा असा उत्सव आहे. पण आपल्या देशात नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये यासंदर्भात जितकी चर्चा व्हायला हवी, जितक्या व्यापक रूपात चर्चा व्हायला हवी तितकी अजूनही होत नाहीये. मी आशा करतो की प्रत्येक स्तरावर, जितकं महत्त्व अधिकारांना दिलं जातं तितकंच महत्त्व कर्तव्यांनाही दिलं जायला हवं. अधिकार आणि कर्तव्य या दोन रूळांवरच भारताच्या लोकशाहीची गाडी वेगाने पुढे मार्गक्रमण करू शकते.

उद्या 30 जानेवारी आहे. आपल्या पूजनीय बापूजींच पुण्यतिथी. या दिवशी सकाळी 11 वाजता आपण दोन मिनिटांचे मौन पाळून, देशासाठी प्राण अर्पण करणार्या शहीदांना श्रद्धांजली देतो. 30 जानेवारीच्या दिवशी 11 वाजता हे दोन मिनिटांचे मौन पाळलं जाणं हा समाज म्हणून, एक देश म्हणून आपला सहज स्वभाव बनायला हवा. 2 मिनिटांसाठीच का होईना पण त्या मौनातून आपली सामूहिकता, आपला संकल्प आणि शहीदांच्या बद्दलचही आपली श्रद्धा अभिव्यक्त होत असते. 

आपल्या देशामध्ये सैन्याबद्दल, सुरक्षा दलांबद्दल स्वाभाविकपणे आदरभाव व्यक्त होत असतो.  या प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला ज्या वीर जवानांना वेगवेगळ्या वीरता पुरस्कारांनी सन्मानित केले गेले त्यांच्या कुटुंबियांचे मी अभिनंदन करतो. या पुरस्कारांमध्ये ‘कीर्ती चक्र, शौर्य चक्र, परम विशिष्ट सेवा मेडल, विशिष्ट सेवा मेडल अशा अनेक श्रेणी आहेत. माझा विशेषत: देशाच्या तरुणांना एक आग्रह आहे. तुम्ही social media वर खूप active आहात. तुम्ही एक काम करू शकता का? या वेळी ज्या ज्या वीरांना हा सन्मान मिळाला आहे त्यांची माहिती तुम्ही इंटरनेटवर शोधा आणि त्यांच्याबद्दल दोन चांगले शब्द लिहून ते आपल्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवा. जेव्हा आपण या वीरांच्या साहसाबद्दल, त्यांच्या शौर्याबद्दल, त्यांच्या पराक्रमाबद्दल खोलात जाऊन माहिती करून घेतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटतं, अभिमान वाटतो आणि प्रेरणाही मिळते.

एकीकडे आपण 26 जानेवारी सर्वत्र उत्साहात साजरा झाल्याच्या बातम्या वाचून आनंदीत होत होतो त्याचवेळी काश्मीरमध्ये आपल्या देशाच्या सीमांचे रक्षण करण्याच्या कामी तैनात सैनिकांना हिमस्खलनामुळे आपले प्राण गमवावे लागले. मी त्या सर्व वीर सैनिकांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहतो, त्यांना वंदन करतो.

माझ्या युवा साथींनो, तुम्हाला हे चांगलंच माहीत आहे की मी आपली ‘मन की बात’ तुम्हाला सतत सांगत असतो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे सगळेच महिने म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये मोठा कसोटीचा काळ असतो. जवळजवळ प्रत्येक घरात एक-दोन मुलांची परीक्षा असते पण सगळं कुटुंब त्या परीक्षेच्या ओझ्याखाली दबून गेलेलं असतं. तेव्हा वाटलं की माझ्या विद्यार्थी मित्रांशी, त्यांच्या पालकांशी, शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी हा काळ उचित आहे. कारण अनेक वर्षांपासून मी जिथे जिथे जातो, ज्यांना ज्यांना भेटतो तिथे तिथे मुलांची परीक्षा हे खूप मोठं काळजीचं कारण बनलेलं दिसतं. कुटुंब चिंतेत आहे, विद्य़ार्थी काळजीत आहे, शिक्षक विवंचनेत आहेत अशी एक मोठी विचित्र मानसिक स्थिती प्रत्येक घरात तयार झालेली दिसते. आणि मला नेहमीच असं वाटतं की या मनस्थितीमधून बाहेर पडण्याची गरज आहे. म्हणूनच आज मला माझ्या तरुण मित्रांना काही गोष्टी थोड्या विस्ताराने सांगाव्याशा वाटताहेत. मी या विषयावर बोलणार असल्याचं जाहीर केलं तेव्हा अनेक शिक्षकांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी मला मेसेज पाठवले, प्रश्न पाठवले, काही सूचना पाठवल्या, आपल्याला होणारा त्रास, अडचणी यांचाही उल्लेख त्यात होता. ते सारं वाचून माझ्या मनात जे विचार आले ते मी आज आपल्याजवळ व्यक्त करू इच्छितो. मला सृष्टीचा एक टेलिफोन संदेश मिळाला. सृष्टी काय म्हणतेय ते तुम्हीली ऐका...

“सर, मला तुम्हाला सांगायचंय की परीक्षेच्या दिवसांत आमच्या घरी, शेजारी-पाजारी, आमच्या सोसायटीमध्ये खूपच भीतीदायक वातावरण तयार होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनांना उभारी मिळणं तर होत नाहीच उलट आम्ही उदास होऊन जातो. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की हे वातावारण आनंदी बनू शकत नाही का?”

प्रश्न सृष्टीने विचारलाय खरा पण तो आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये उमटत असणार. परीक्षा हा खरं तर आनंदाचा काळ असायला हवा. वर्षभर किती मेहनत केली ते दाखवून देण्याची संधी आता मिळतेय या गोष्टीचा उत्साह या काळामध्ये वाटला पाहिजे. खूप कमी जणं अशी असतात ज्यांना परीक्षेमध्ये असं pleasure दिसतं.  बहुतेकांसाठी परीक्षा म्हणजे pressure असतं. ती खरंच pressure आहे की pleasure याचा निर्णय तुम्हालाच करायचा आहे. जो pleasure, आनंद मानून या परीक्षेला सामोरं जाईल त्याला त्याचं चांगलं फळ मिळेल आणि जो pressure अर्थात दडपण घेईल त्याच्यावर पश्चात्तापाची वेळ येईल. म्हणूनच माझं मत आहे की तुम्ही परीक्षांना असं सामोरं जा, जणू काही तो एखादा सणच असावा. आणि जेव्हा सण असतो, उत्सवी वातावरण असतं तेव्हा आपल्यातलं जे जे सर्वोत्तम आहे त्याला बाहेर येण्यासाठी आपोआपच वाट मिळते. सणासुदीच्या दिवसांमध्ये, उत्सवांमध्येही समाजातील ताकदीचा अनुभव येत असतो, जे उत्तमातील उत्तम आहे ते प्रकट होताना दिसतं. सर्वसाधारणपणे आपला समाज बेशिस्त असल्याचं म्हटलं जातं पण 40-45 दिवस चालणार्या कुंभ मेळ्यांच व्यवस्था पाहिली तर लक्षात येतं की तात्पुरत्या व्यवस्था उभारण्याचं कसब आणि किती शिस्त लोकांमध्य आहे. ही उत्सवाची ताकद आहे. त्याचप्रमाणे परीक्षेच्या काळामध्येही संपूर्ण कुटुंबात, मित्रपरिवारामध्ये, शेजार्या पाजार्यांमध्ये एक उत्सवी वातावारण बनायला हवं. मग तुम्ही पहा pressure, pleasure मध्ये कसं बदलून जातं ते. उत्सवी वातावरणामुळे परिक्षेच्या दडपणातून मुक्तता मिळेल. मला मुलांच्या आई-वडिलांना विशेष आग्रहाने सांगायचं आहे की या तीन-चार महिन्यांमध्ये वातावरण उत्सवी उत्साही ठेवां. संपूर्ण परिवाराने हा उत्सव पूर्णत्वाला नेण्याच्या कामी आपापली भूमिका उत्साहाने पार पाडावी. पाहता पाहता चित्र बदलून जाईल. कन्याकुमारी पासून ते काश्मीरपर्यंत आणि कच्छपासून ते कामरूपपर्यंत, अमरेलीपासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंत सगळीकडे या तीन चार महिन्यांमध्ये परिक्षाच परीक्षा असतात. या तीन चार महिन्यांना आपापल्या पद्धतीने, आपापल्या परंपरांना अनुसरून, आपापल्या कुटुंबातील वातावरणाला अनुसरून उत्सवाच्या काळामध्ये परिवर्तित करावे. आणि म्हणूनच मी तर तुम्हाला सांगेन, ‘smile more, score more.’ जितक्या आनंदात हा काळ घालवाल तितके जास्त गुण तुम्हाला मिळतील. फक्त हे करून पहा. आणि तुम्ही हे पाहिलंच असेल की जेव्हा तुम्ही आनंदी असता, हसत असता तेव्हा आपोआपच निश्चिंत होता. आणि असं निश्चिंत असाताना वर्षभरातलं सगळं काही सहजपणे आठवतं. वर्षभरापूर्वी शिक्षकांनी वर्गात काय सांगितलं होतं वगैरे सारं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. आणि तुम्हाला हे माहीत असलं पाहीजे की आपल्या स्मृतींच उजळणी करण्याचं कसब स्थिरचित्ताने अधिक चांगलं साधतं. तणावपूर्ण मनस्थितीमध्ये सगळे दरवाजे बंद होतात. बाहेरून काही आत जाऊ शकत नाही आणि आतलं बाहेर येऊ शकत नाही. विचार प्रक्रिया जणू थांबून जाते आणि या गोष्टीचं ओझं होऊन बसतं. परीक्षेतही तुम्ही बघितलं असेल की सारं काही आठवत असतं. पुस्तक आठवत असतं, धडा आठवत असतो, पानाचा क्रमांक आठवत असतो, हवा असलेला मुद्दा पानच्या वरच्या भागात लिहिला होता की खालच्या भागात इथपर्यंतही सगळं काही आठवत असतं पण तो विशिष्ट शब्द काही केल्या आठवत नाही. पण पेपर देऊन वर्गातून बाहेर पडून चार पावलं चाललं की अचानक आठवतं. ‘अरे हा तोच शब्द होता. आत असताना का नाही आठवला?’ दडपण होतं. मग बाहेर पडल्यावर कसा काय आठवला ? तुमच्याच तर डोक्यात होता तो, कुणी सांगितला तर नाही. पण तो आत असलेला चटकन बाहेर आला. तो बाहेर आला कारण परीक्षागृहाच्या बाहेर पडताच मनावरच दडपण दूर झालं. तुम्ही शांत झालात. त्यामुळे स्मरणशक्ती वाढविण्यासाठी स्वस्थ मन हे सगळ्यात गुणकारी औषध आहे. आणि हे मी तुम्हाला स्वानुभवातून सांगू शकतो की जर दडपण असेल तर विस्मरण होतं आणि स्वस्थ असताना अशा गोष्टी आठवतात ज्यांचा आपल्याला खूप उपयोग होतो. आणि तुमच्याकडे ज्ञान नाही, माहितीची कमतरता आहे, मेहनत कमी पडतेय असं कुठे आहे? पण ताण असेल तेव्हा तुमचं ज्ञान, तुमच्याकडे असलेली माहिती त्याखाली दबून जाते आणि ताणच त्यावर स्वार होतो. ‘A happy mind is the secret for a good mark-sheet’ हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कधी कधी असं वाटतं की आपण परीक्षेकडे योग्य दृष्टीकोनातून बघत नाही. तो जणू काही जगण्या-मरण्याचा प्रश्न असावा अशी आपली मानसिकता असते. तुम्ही वर्षभरात जो काही अभ्यास केला आहे फक्त तेवढ्याबद्दलची ही परीक्षा असणार आहे. तुमच्या संपूर्ण  आयुष्याची कसोटी तिथे लागणार नाहीये. तुम्ही कसं आयुष्य जगत आला आहेत, कसं जगत आहात, पुढे कोणत्या प्रकारचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे या सार्या गोष्टींबद्दलची ही परीक्षा नव्हे.  वर्गामध्ये, वह्यापुस्तकं घेऊन दिलेल्या परीक्षेच्या व्यतिरिक्त अनेक कसोटीच्या प्रसंगांतून तुम्ही गेला असाल. शाळेतल्या परीक्षेचं प्रत्यक्ष आयुष्यातील यश-अपयशाशी काहीच देणं-घेणं नसतं. तेव्हा अशा दडपणांतून मुक्त व्हा. आपल्या सगळ्यांसमोर देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचं मोठं प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांना हवाईदलामध्ये भरती व्हायचं होतं. पण ते नापास झाले. समजा त्या अपयशामुळे ते निराश झाले असते, आयुष्याकडून हार पत्करली असती तर भारताला इतके मोठे वैज्ञानिक मिळाले असते का, इतके मोठे राष्ट्रपती मिळाले असते का?  कुणी ऋचा आनंद यांनी मला एक प्रश्न पाठवला आहे.

‘ आजच्या काळामध्ये शिक्षणासमोर जे सर्वात मोठं आव्हान मला दिसतंय ते म्हणजे शिक्षण परिक्षाकेंद्री होऊन गेलं आहे. मार्कांना खूप जास्त महत्त्व मिळत आहे. त्यामुळे स्पर्धा तर वाढली आहेच त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण खूप वाढला आहे. शिक्षणपद्धतीच्या सध्याच्या या वाटचालीबद्दलचे आणि तिच्या भविष्यासंबंधीचे तुमचे विचार मला जाणून घ्यायचे आहेत.’

खरं तर आपल्या प्रश्नातच त्यांनी उत्तर देऊन टाकलं आहे पण ऋचा यांची इच्छा आहे की मी या विषयावर माझं काही मत सांगावं. गुण आणि गुणपत्रिका यांचा एक मर्यादित उपयोग आहे. प्रत्यक्ष आयुष्यात सारं काही गुणपत्रिकेतील गुणांबरहुकूम चालत नाही. तिथे तर मिळवलेलं ज्ञान तुम्ही जगण्यात किती उतरवलंत हे जास्त महत्त्वाचं ठरतं. तुमचा sense of mission, आणि sence of ambition अर्थात तुमच्या मनातील ध्येयपूर्तीची संकल्पना आणि महत्त्वाकांक्षा यात काही ताळमेळ आहे की नाही ही गोष्ट आयुष्यात महत्त्वाची ठरते. जर तुम्ही या गोष्टींवर विश्वास ठेवाल तर मार्क आपणहूनच मागे येतील, तुम्हाला त्यांच्या मागून धावाधाव करण्याची कधीच गरज पडणार नाही. आयुष्यात तुम्हाला ज्ञानाचा उपयोग होणार आहे, तुमचं कसब तुमच्या उपयोगी पडणार आहे, आत्मविश्वासाचा, निर्धाराचा उपयोग होणार आहे. तुम्हीच मला सांगा, तुमचे कुणीतरी फॅमिली डॉक्टर नक्कीच असतील. घरातले सगळे जण उपचारांसाठी त्यांच्याकडेच जात असतील. पण त्यांना परीक्षांमध्ये किती मार्क मिळाले हे त्यांना कुणीही विचारलं नसेल. तुम्ही इतकंच बघत असणार की ही व्यक्ती डॉक्टर म्हणून चांगली आहे, त्यांच्या औषधांमुळे लोक बरे होत आहे. आपला मोठ्यात मोठा खटला लढवण्यासाठी तुम्ही एखाद्या वकिलाकडे जाता तेव्हा त्याची ‘मार्क शीट’ बघता का? त्याचा अनुभव, ज्ञान आणि वकिलीच्या क्षेत्रातला यशस्वी प्रवास याच गोष्टी तिथे पाहिल्या जातात. म्हणूनच मार्कांचं हे दडपण कधी कधी आपल्याला योग्य दिशेने जाण्यापासून थांबवतो. याचा अर्थ तुम्ही शिकूच नका असं मी सांगणार नाही. आपलं ज्ञान कसाला लावण्यासाठी परीक्षेचा उपयोग नक्कीच आहे. आपल्या जगण्याकडे बारकाईने पाहिलंत तर तुम्हाला जाणवेल; कधी कधी असंही होतं जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी तुम्ही शॉर्टकट शोधता, नेमकेच मुद्दे निवडता, त्यांच्यावरच लक्ष केंद्रित करता. पण तुम्ही निवडलेले ते ठराविक मुद्दे, ठराविक प्रश्न यांच्याबाहेरचं काही आलं तर मार्कांचं गणित एकदम कोलमडतं. त्याऐवजी तुम्ही ज्ञान मिळवण्यावर लक्ष केंद्रीत केलंत तर जास्तीत जास्त गोष्टी लक्षात घेण्याचा प्रयत्न तुम्ही करता. तुम्ही फक्त मार्कांवर लक्ष केंद्रित करता तेव्हा हळूहळू तुम्ही स्वत:ला आक्रसून घेता, एका विशिष्ट भागापुरतंच पाहू लागता. केवळ मार्क मिळवण्यापुरता विचार करू लागता. मग परीक्षेमध्ये खूपच हुशार विद्यार्थी असूनही प्रत्यक्ष आयुष्यात अपयश सामोरं येऊ शकतं.

ऋचाजींनी इतरांशी सतत चाललेल्या स्पर्धेचा मुद्दाही मांडला आहे. ही एक खूप मोठी मानसिक लढाई आहे. खरोखरीच आयुष्यात पुढे जाण्यासाठी इतरांशा नाही तर स्वत:शी केलेली स्पर्धा उपयोगी ठरते. माझ्या घडून गेलेल्या ‘काल’पेक्षा येणारा ‘उद्या’ अधिक चांगला कसा असेल, काल घडलेल्या गोष्टींच्या परिणामांपेक्षा उद्या मला मिळणार्या संधी अधिक चांगल्या कशा असतील याचा विचार आपण करायला हवा. तुम्ही क्रीडाक्षेत्रात हे घडताना पाहिलं असेल. खेळाशी संबंधित उदाहरणं समजायला सोपी असतात म्हणून मी तीच सांगतो. बहुतांश यशस्वी खेळाडूंचं वैशिष्ट्य हेच असतं की त्यांची स्पर्धा स्वत:शी असते. आपण सचिन तेंडूलकर यांचंच उदाहरण घेऊ या. वीस वर्षं सतत आपलेच विक्रम मोडत जाणं, स्वत:लाच पराजित करत पुढे जात जाणं असा त्यांचा प्रवास राहीला आहे. तो मोठा अद्भूत म्हणायला हवा  कारण त्यांनी इतरांशी स्पर्धा करण्यापेक्षा स्वत:शी स्पर्धेचा मार्ग अनुसरला.

आय़ुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात अगदी अभ्यासाच्या बाबतीतही हेच प्रश्न तुम्ही स्वत:ला विचारा. मी आधी दोन तास शांतपणे अभ्यास करू शकत होतो, आता तीन तास अभ्यास करणं मला जमतंय का? आधी सकाळी उठायला उशीर व्हायचा, आता लवकर उठणं जमतंय का? आधी परीक्षेच्या ताणामुळे झोप यायची नाही, आता येते का? तुमच्या आपणच लक्षात येईल की इतरांशी केलेली स्पर्धा पराजय, निराशा आणि ईर्ष्येला जन्म देते तर स्वत:शी केलेली स्पर्धा आत्ममंथन, आत्मचिंतनाचे कारण बनते, आपला निर्धार दृढ बनवते आणि जेव्हा आपणच आपल्याला हरवतो तेव्हा आणखी पुढे जाण्याचा उत्साह आपोआपच वाटू लागतो. बाहेरून अधिकचा उत्साह आणण्याची गरज उरत नाही. सोप्या शब्दांत सांगायचं तर जेव्हा तुम्ही इतरांशी स्पर्धा करता तेव्हा तीन शक्यता ठळकपणे दिसतात. एक, आपण इतरांपेक्षा सरस आहोत. दुसरी आपली कामगिरी इतरांच्या तुलनेत खूपच वाईट आहे किंवा आपणही इतरांसारखेच आहोत. सरस असाल तर तुम्ही निष्काळजी बनाल. स्वत:वर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकाल. आपण वाईट आहोत असं वाटत असेल तर तुम्ही निराश व्हाला आणि इतरांबद्दल तुमच्या मनात इर्ष्या निर्माण होईल. आतल्या आत कष्टत रहाल. तिसरी शक्यता, म्हणजे इतरांइतकंच हुशार असणं पुरेसं आहे असं मानून चाललात तर सुधारणेला काही वावच उरणार नाही. चाललंय तसं चालू दे असं म्हणून तुम्ही शिथिल रहाल. माझा तुम्हाला आग्रह आहे की तुम्ही स्वत:शी स्पर्धा करा. आधी मी जे काही केलं त्यापेक्षा यापुढे चांगलं कसं करू शकेन याचा विचार कराल. बस, याच गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करा. मग पहा. तुम्हाला स्वत:मध्ये बदल झालेला जाणवेल.

श्री. एस. सुंदर यांनी पालकांच्या भूमिकेसंबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे की परीक्षेमध्ये पालकांची भूमिका खूप महत्त्वाची असते. त्यांनी पुढे म्हटलं आहे, ‘माझी आई खूप शिकलेली नव्हती. तरीही ती माझ्याजवळ बसायची आणि माझ्याकडून गणितं सोडवून घ्यायची. उत्तरं काढायची आणि अशाप्रकारे मला मदत करायची. माझ्या चुका सुधारायची. माझ्या आईने दहावीची परीक्षाही पास केली नव्हती पण तिच्या मदतीशिवाय मला माझी सी.बी. एस. सी. ची परीक्षा पास करणं अशक्य होतं.’

सुंदरजी, तुमचं म्हणणं खरं आहे आणि आजही आपण पाहिलं असेल की प्रश्न विचारण्यांमध्ये, सूचना करणार्यांमध्ये महिलांची संख्या जास्त आहे. कारण मुलांच्या भविष्याच्या बाबतीत त्यांच्या माता सतत सजग असतात, सक्रिय असतात आणि अनेक गोष्टी त्यांच्यामुळे सोप्या होऊन जातात. मी पालकांना फक्त इतकंच सांगेन की त्यांनी तीन गोष्टींवर भर द्यावा. स्वीकार करणं, शिकवणं आणि वेळ देणं. आपलं पाल्य जसं आहे, तसा त्याचा स्वीकार करा. तुमच्याजवळ जितकी क्षमता आहे ती त्याला शिकवण्यासाठी वापरा आणि आपापल्या कामांत कितीही व्यग्र असलात तरीही त्यांच्यासाठी वेळ काढा. एकदा स्वीकार करणं जमलं की बर्याचशा समस्या तिथेच संपून जातील. पालकांना अनुभव असेल की त्यांच्या, शिक्षकांच्या मुलांकडून असलेल्या अपेक्षाच अनेक समस्यांच्या मूळाशी असतात. स्वीकारातून या समस्या सोडविण्याचा मार्ग दिसू लागतो. अपेक्षांमुळे मार्ग खडतर बनतो तर स्वीकार नव्या वाटा शोधण्याची संधी देतो आणि म्हणूनच मूल जसं आहे तसं स्वीकाराल. तुमच्यावरचं ओझंही दूर होईल. आपण मुलांच्या पाठीवरच्या दप्तरांच्या ओझ्यांची चर्चा करतो पण कधी कधी मला वाटतं की पालकांच्या अपेक्षा, आशा-आकांक्षाचं ओझं त्या दप्तरांपेक्षा भारी असतं.

खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. आमच्या ओळखीचे एक व्यक्ती हृदयविकाराने आजारी होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. आपल्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश दादा मावळणकर आणि त्यांचे एकेकाळचे खासदार पुत्र पुरुषोत्तम मावळणकर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले. मी तेव्हा तिथे उपस्थित होतो आणि मी पाहिलं की त्यांनी त्या रुग्ण व्यक्तीच्या तब्येतीसंबंधी एकही प्रश्न विचारला नही. आल्या आल्या त्यांनी विनोदी चुटके ऐकवायला सुरुवात केली. चार-पाच मिनिटांतच वातावारणातला सगळा तणार सैल झाला. एरवी रुग्णाला भेटायला जाणारे आजाराबद्दल बोलून त्यांना घाबरवूनच टाकत असतात. पालकांना मला हेच सांगायचं आहे. कधी कधी मुलांबरोबर आपण नेमकं असंच वागत असतो. परीक्षेच्या काळात मुलांना आनंदी, हसरं-खेळतं वातावरण द्यावं असा विचार आपण कधी केलाय का? तो करून पहा, वातावरण बदलून जाईल.

मला आणखी एक मोठा कमालीचा फोनकॉल आला आहे. त्या सद्गृहस्थांना आपलं नाव सांगायचं नाहीये. त्यांचं बोलणं ऐकून याचं कारण तुमच्या लक्षात येईलच. ते म्हणतात, ‘नमस्कार पंतप्रधान महोदय, मी स्वत:चं नाव तर सांगू शकत नाही कारण माझ्या लहानपणी मी कामच तसं केलंय. लहानपणी एकदा मी कॉपी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मी खूप तयारीही सुरू केली होती. कॉपी करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती शोधण्याचा प्रयत्न केला. त्यात माझा भरपूर वेळ वाया गेला. तेवढा वेळ अभ्यास करण्यासाठी वापरला असता तर चांगले मार्क मिळाले असते. आणि जेव्हा प्रत्यक्ष कॉपी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यातही पकडला गेला. माझ्यामुळे माझ्या जवळपासच्या अनेक मित्रांना खूप त्रास झाला.”

तुमचं म्हणणं खरं आहे. हे जे short-cut चे रस्ते आहेत ते कॉपी करण्यासाठीचं कारण बनून जातात. कधी कधी स्वत:वर विश्वास नसतो तेव्हा शेजारच्या मुलाचं उत्तर पहावं आणि खात्री करून घ्यावी असं वाटून जातं. कधी कधी आपलंच उत्तर बरोबर असतं आणि शेजार्याचं चुकलेलं असतं. पण ते चुकीचं उत्तर आपण खरं मानून बसतो आणि घात होतो. त्यामुळे कॉपीचा फायदा कधीच होत नाही. To cheat is cheap, so please, do not cheat.’ नक्कल करणं तुम्हाला वाईट व्यक्ती बनवतं, त्यामुळे कृपया कॉपी नक्कल करू नका. हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मीही पुन्हा तेच सांगेन. कोणत्याही प्रकारे पाहिलं तरीही कॉपी करण्याचे दुष्परिणामच दिसतील. समजा कॉपी करताना पकडले गेलात तर सारं काही तिथेच संपून जाईल आणि पकडले गेला नाहीत तरीही आयुष्यभर मनावर आपल्या त्या कृत्याचा भार वागवत रहावं लागेल. आपल्या मुलांना कॉपी न करण्याबद्दल समजावताना त्यांच्या डोळ्यांना डोळे भिडवणं तुम्हाला कठीण जाईल आणि एकदा का कॉपी करण्याची सवय लागली की त्यानंतर आयुष्यात काही शिकण्याची इच्छाच उरणार नाही. मग तर तुम्ही कुठेही पोहोचू शकणार नाही. हे तर आपल्याच रस्त्यांना खड्ड्यांनी भरून टाकण्यासारखं आहे. मी काही असे लोकही पाहिले आहेत जे कॉपी करण्याचे इतके प्रकार शोधून काढतात की त्यांची सगळी सर्जनशीलता या एका कामातच वापरली जाते. तीच सर्जनशीलता, तोच वेळ ती परीक्षेतल्या मुद्द्यावर खर्च कराल तर कदाचित कॉपी करण्याची गरजही पडणार नाही. आपल्या स्वत:च्या मेहनतीतून जे यश मिळवाल ते तुमचा आत्मविश्वास वाढवेल. तो अद्भूत असेल.

एक फोनकॉल मला आला आहे, त्या म्हणतात,

‘नमस्कार पंतप्रधान महोदय, माझं नाव मोनिका आहे. मी बारावीची विद्यार्थिनी आहे त्यामुळे मला बोर्डाच्या परीक्षांशी संबंधित काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. माझा पहिला प्रश्न या परिक्षांच्या काळात वाढणार्या तणावासंबंधीचा आहे. तो कमी कसा करता येईल? दुसरं म्हणजे परीक्षा म्हणजे ‘all work and no play’ असं का असतं?’

परीक्षेच्या दिवसांमध्ये मी खेळण्या-बागडण्याबद्दल बोललो तर तुमचे शिक्षक, तुमचे पालक माझ्यावर रागावतील. परीक्षेच्या काळात मुलांना खेळायला सांगणारे असे कसे पंतप्रधान आहेत असं म्हणत नाराज होतील. कारण खेळांमध्ये लक्ष गेले की अभ्यासावरील लक्ष कमी होतं असा आपल्याकडे सर्वसाधारण समज आहे. ही विचारसरणीच मूळात चुकीची आहे. समस्येचं मूळ तिथेच आहे. मुलांचा सर्वांगिण विकास आवश्यक आहे. तो व्हायचा तर पुस्तकांच्या पानांबाहेरचं एक मोठं विशाल जग आहे तेही पहायला हवं. जगायला शिकण्याचंही हेच तर वय असतं. आधी सगळ्या परीक्षा देतो आणि मग खेळतो, मग बाकीच्या गोष्टी करतो असं कुणी म्हटलं तर ते शक्य नाही. माणसाच्या जडणघडणीचा काळ हाच असतो. त्यालाच तर संगोपन म्हणतात. माझ्या दृष्टीने परीक्षेमध्ये तीन गोष्टी खूप गरजेच्या आहेत. योग्य प्रमाणात आराम, शरीरासाठी गरजेची आहे तितकी झोप आणि तिसरी गोष्ट म्हणजे बौद्धिक कार्याव्यतिरिक्तही शरीराच्या इतर भागांचंही चलनवलन योग्य पद्धतीने होणं. शरीरालाही काही व्यायाम मिळायला हवा. आपल्या अभ्यासातून दोन क्षण बाहेर पडून थोडं आकाश पहावं, अवतीभोवतीची झाडं पाहावीत, मन थोडं हलकं करावं आणि पुन्हा आपल्या खोलीत अभ्यासाला बसावं. एक नवा ताजेपणा तुम्हाला तुमच्या कामात जाणवेल. तुम्ही जे काही काम करता आहात त्यातून थोडा विसावा घ्या. उठा, बाहेर जा, किचनमध्ये जा, आपल्या आवडीचं एखादं बिस्किट तोंडात टाका, थोडे हास्यविनोद करा. पाच मिनिटांसाठी का होईना पण हा विश्रांतीचा काळ स्वत:ला द्या. तुम्हाला दिसेल की काम आणखी चांगलं होतंय. सगळ्यांनाच हे आवडेल की नाही माहीत नाही, पण माझा अनुभव मला हेच सांगतो. अशा वेळी थोडं दीर्घश्वसन केल्यास खूप फायदा होईल. त्यासाठी खोलीत बसून राहण्याची गरज नाही. जरा मोकळ्या आभाळाखाली उभं रहा, गच्चीवर जा, पाच मिनिटं दीर्घ श्वसन करा आणि मग अभ्यासाला बसा. तुम्ही पहाल की तुमचं शरीर अगदी तणावरहीत झालं आहे आणि ही अवस्था तुमच्या मेंदूलाही मिळालेली आहे. काही लोकांचा समज असतो की रात्री खूप उशीरा जागलं तर खूप जास्त अभ्यास होईल. पण नाही. शरीराला जितकी झोप आवश्यक आहे तितकी जरूर घ्या. त्यातून तुमचा अभ्यासाचा वेळ फुकट जाणार नाही. उलट अभ्यास करण्यासाठी जास्त उत्साह मिळेल, एकाग्रता वाढेल, ताजेपणा वाटेल. तुमच्या कार्यक्षमतेमध्ये एकूणच वाढ होईल. मी निवडणुकांसाठीच्या प्रचारसभांसाठी जातो तेव्हा काही वेळा माझा आवाज बसलेला असतो. अशाच एका सभेच्या वेळी मला एक लोकगायक भेटायला आले होते. त्यांनी मला विचारले, ‘तुम्ही किती तास झोपता?’ मी म्हणालो, ‘ का बरं, तुम्ही डॉक्टर आहात का?’ म्हणाले,  ‘नाही नाही. भाषणं देता देता तुमचा आवाज बिघडतो त्याच्याशी संबंधित ही गोष्ट आहे. तुम्ही पूर्ण झोप घ्याल तर तुमच्या स्वरयंत्राला आराम मिळेल. माझी झोप, भाषणं आणि आवाज यांच्याबद्दल मी असा विचार कधी केला नव्हता. त्यांनी मला जणू काही एक जडी बूटीच दिली. तुम्हीही या गोष्टीचं महत्त्वं ओळखा. पण याचा अर्थ असा नाही की सतत झोपून रहावं. असं केलंत तर तुमच्या घरातली माणसं माझ्यावर रागावतील. मग तुमची ‘मार्क-शिट’ हातात आल्यावर त्यांना तुम्ही नव्हे तर मीच दोषी दिसेन. तेव्हा असं करू नका. आणि म्हणूनच मी तर म्हणेन की ‘p for prepared and p for play.’ ‘ जो खेले वो खिले’. ‘the peson who plays, shines.’ मन, बुद्धी, शरीर यांना सजग ठेवण्यासाठी हे एक खूप मोठं औषध आहे.

असो, युवा मित्रांनो, तुम्ही परीक्षांच्या तयारीत गुंतलेले आहात आणि मी माझ्या मनातल्या गोष्टींमध्ये अडकून बसलोय. कुणास ठाऊक, कदाचित माझं हे बोलणंच तुमच्या मनावरचा तणाव दूर करण्यासाठी मदत करेल. पण त्याचबरोबर मी हे सुद्धा म्हणेन की मी ज्या गोष्टी सांगितल्या त्यांचं दडपण मनावर घेऊ नका. जमत असेल तर करा, नाहीतर नका करू. नाहीतर त्याचंही एक ओझं बनून बसेल. मुलांवर अपेक्षांची ओझी लादू नका ही तुमच्या पालकांना सांगितलेली गोष्ट मलासुद्धा लागू आहेच. आपण केलेला निर्धार मनाशी जपत, स्वत:वर विश्वास ठेवून परीक्षांना सामोरे जा. माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत आहेत. प्रत्येक कसोटी पार कऱण्यासाठी त्या कसोटीलाच उत्सवाचं रूप द्या. मग कोणतीही परीक्षा ही परीक्षा राहणार नाही. हाच मंत्र घेऊन तुम्ही पुढे जा.

प्रिय देशवासियांनो, 1 फेब्रुवारी 2017 रोजी भारतीय तटरक्षक दलाची चाळीस वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रसंगी मी तटरक्षक दलाचे सर्व अधिकारी आणि जवानांनी केलेल्या देशसेवेसाठी त्यांचे आभार मानतो. स्वनिर्मित 126 जहाजं आणि 62 विमानं यांच्यासह भारतीय तटरक्षक दल विश्वातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे तटरक्षक दल असण्याचा मान राखून आहे. ‘वयम् रक्षाम:’ हा आपल्या तटरक्षक दलाचा मंत्र आहे. आपल्या या आदर्श वाक्यानुसार मार्गक्रमण करीत देशाच्या समुद्री सीमा आणि समुद्री क्षेत्र सुरक्षित ठेवण्यासाठी तटरक्षक दलाचे जवान अहोरात्र तत्पर असतात. गेल्या वर्षी तटरक्षक दलाच्या लोकांनी आपल्या जबाबदार्यांच्या सोबतच आपल्या देशाचा समुद्र किनारा स्वच्छ बनविण्याचं अभिमानास्पद कार्य केलं. हजारो लोक यात सहभागी झाले होते. समुद्री किनार्यांच्या सुरक्षेबरोबरच या किनार्यांच्या स्वच्छेतेची काळजी त्यांनी वाहिली यासाठी ते खरोखरीच अभिनंदनास पात्र आहेत. खूप कमी लोकांना हे माहीत असेल की आपल्या देशाच्या तटरक्षक दलात फक्त पुरुष नसून महिलासुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून तितक्याच तयारीने आपल्या जबाबदार्या पार पाडत आहेत आणि यशस्वीरीत्या पार पाडत आहेत. तटरक्षक दलातील आमच्या महिला अधिकारी वैमानिक आहेत, निरीक्षक आहेत, हॉवरक्राफ्टची जबाबदारीही सांभाळत आहेत. आज जागतिक पातळीवर किनारपट्टीची सुरक्षा हा ऐरणीवरचा प्रश्न बनलेला असताना भारताचे किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी झटणार्या भारतीय तटरक्षक दलाचं त्यांच्या 40 व्या वर्धापनदिनी मी अभिष्टचिंतन करतो. 

1 फेब्रुवारीला वसंत पंचमीचा सण साजरा केला जाईल. वसंत ऋतू हा सर्वश्रेष्ठ ऋतू मानला जातो. तो ऋतुराज आहे. आपल्या देशात वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती पूजेचा मोठा सण साजरा होतो. तो विद्येच्या आराधनेचा काल मानला जातो. इतकेच नाही तर वीरांसाठी प्रेरणादायी असा हा काळ असतो. ‘मेरा रंग दे बसंती चोला’ या गीतामध्ये तीच प्रेरणा दिसून येते. या वसंत पंचमीच्या पवित्र सणानिमित्त मी माझ्या सर्व देशवासियांना खूप सार्या शुभेच्छा देतो.

माझ्या प्रिय देशवासियांनो, ‘मन की बात’ प्रसारीत करताना आकाशवाणीसुद्धा आपल्या कल्पकतेने त्यात नवनवे रंग भरत असते. गेल्या महिन्यापासूनच त्यांनी माझी ‘मन की बात’ पूर्ण झाल्यानंतर लगेचच त्याचा प्रादेशिक भाषांतील अनुवाद प्रसारीत करणं सुरू केलं आहे. याचं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आहे. दूर दूरहून लोक पत्रं पाठवू लागले आहे. आकाशवाणीने स्वयंप्रेरणेने केलेल्या या कामासाठी त्यांचं अभिनंदन करतो. देशवासियांनो, मी तुमचंही खूप अभिनंदन करतो. ‘मन की बात’ तुमच्याशी जोडलं जाण्याची एक खूप मोठी संधी देते. खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi pitches India as stable investment destination amid global turbulence

Media Coverage

PM Modi pitches India as stable investment destination amid global turbulence
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
List of Outcomes: Visit of the Chancellor of the Federal Republic of Germany to India (January 12-13, 2026)
January 12, 2026

I. Agreements / MoUs

S.NoDocumentsAreas

1.

Joint Declaration of Intent on Strengthening the Bilateral Defence Industrial Cooperation

Defence and Security

2.

Joint Declaration of Intent on Strengthening the Bilateral Economic Cooperation by Establishing a Chief Executive Officers’ Forum, integrated into, and as Part of, a Joint India-Germany Economic and Investment Committee

Trade and Economy

3.

Joint Declaration of Intent on India Germany Semiconductor Ecosystem Partnership

Critical and Emerging Technologies

4.

Joint Declaration of Intent on Cooperation in the Field of Critical Minerals

Critical and Emerging Technologies

5.

Joint Declaration of Intent on Cooperation in the Field of Telecommunications

Critical and Emerging Technologies

6.

MoU between National Institute of Electronics & Information Technology and Infineon Technologies AG

Critical and Emerging Technologies

7.

Memorandum of Understanding between All India Institute of Ayurveda and Charite University, Germany

Traditional Medicines

8.

Memorandum of Understanding between Petroleum and Natural Gas Regulatory Board (PNGRB) and the German Technical and Scientific Association for Gas and Water Industries (DVGW)

Renewable Energy

9.

Offtake Agreement for Green Ammonia between Indian Company, AM Green and German Company, Uniper Global Commodities on Green Ammonia

Green Hydrogen

10.

Joint Declaration of Intent for Joint Cooperation in Research and Development on Bioeconomy

Science and Research

11.

Joint Declaration of Intent on the extension of tenure of the Indo-German Science and Technology Centre (IGSTC)

Science and Research

12.

Indo-German Roadmap on Higher Education

Education

13.

Joint Declaration of Intent on the Framework Conditions of Global Skill Partnerships for Fair, Ethical and Sustainable Recruitment of Healthcare Professionals

Skilling and Mobility

14.

Joint Declaration of Intent for Establishment of a National Centre of Excellence for Skilling in Renewable Energy at National Skill Training Institute, Hyderabad

Skilling and Mobility

15.

Memorandum of Understanding between National Maritime Heritage Complex, Lothal, Ministry of Ports, Shipping and Waterways Government of the Republic of India and German Maritime Museum-Leibniz Institute for Maritime History, Bremerhaven, Germany, for the Development of National Maritime Heritage Complex (NMHC), Lothal, Gujarat

Cultural and People to People ties

16.

Joint Declaration of Intent on Cooperation in Sport

Cultural and People to People ties

17.

Joint Declaration of Intent on Cooperation in the Field of Postal Services

Cultural and People to People ties

18.

Letter of Intent between the Department of Posts, Ministry of Communications, and Deutsche Post AG

Cultural and People to People ties

19.

Memorandum of Understanding on Youth Hockey Development between Hockey India and German Hockey Federation (Deutscher Hockey-Bund e.V.)

Cultural and People to People ties

II. Announcements

S.NoAnnouncementsAreas

20.

Announcement of Visa Free transit for Indian passport holders for transiting through Germany

People to people ties

21.

Establishment of Track 1.5 Foreign Policy and Security Dialogue

Foreign Policy and Security

22.

Establishment of Bilateral dialogue mechanism on Indo-Pacific.

Indo-Pacific

23.

Adoption of Work Plan of India-Germany Digital Dialogue (2025-2027)

Technology and Innovation

24.

New funding commitments of EUR 1.24 billion under the flagship bilateral Green and Sustainable Development Partnership (GSDP), supporting priority projects in renewable energies, green hydrogen, PM e-Bus Sewa, and climate-resilient urban infrastructure

Green and Sustainable Development

25.

Launch of Battery Storage working group under the India-Germany Platform for Investments in Renewable Energy Worldwide

Green and Sustainable Development

26.

Scaling up of Projects in Ghana (Digital Technology Centre for design and processing of Bamboo), Cameroon (Climate Adaptive RAC Technology Lab for Nationwide Potato Seed Innovation) and Malawi (Technical Innovation and Entrepreneurship Hub in Agro Value Chain for women and youth) under India-Germany Triangular Development Cooperation

Green and Sustainable Development

27.

Opening of Honorary Consul of Germany in Ahmedabad

Cultural and People to People ties