The relations between India and Netherland are centuries old, says PM Modi
Today’s world is an inter-dependent and inter-connected world: PM Modi
Thank Netherlands for backing India's MTCR entry: PM Narendra Modi

महामहिम, पंतप्रधान मार्क रट,

जून २०१५ मध्ये भारतात तुमचे स्वागत करण्याची संधी मला लाभली होती. त्यावेळी मी म्हटले होते की साधारणपणे जून महिन्यात भारतात तीव्र उन्हाळा असतो, खूप गरम होते आणि तरीही भारतात येण्यासाठी तुम्ही हाच महिना निवडलात आणि आपल्या द्विपक्षीय संबंधांप्रति तुमच्या कटिबध्दतेचे ते प्रतीक होते.

आज बरोबर दोन वर्षांनी, मी देखील जून महिन्यात नेदरलँड्सला आलो आहे, मात्र दिल्ली आणि हेग मधील तापमानात नक्कीच खूप फरक आहे. हे दिवस आणि रात्र प्रमाणे आहे. इथली हवा मी पाहतोय, खूपच आल्हाददायक आहे.

सर्वप्रथम सर्व आदरणीय व्यक्ती, मला तुमचे आभार मानायचे आहेत आणि केवळ माझेच नव्हे तर माझ्या संपूर्ण प्रतिनिधिमंडळाचे तुम्ही आपुलकीने स्वागत केलंत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो, या स्वागतातून तुम्ही भारतीय जनतेप्रति आपुलकीची भावना व्यक्त केली आहे.

महामहिम, माझा हा नेदर्लंड्सचा दौरा अगदी अचानक ठरला आणि तरीही ज्याप्रकारे या दौऱ्याचे आयोजन केले त्याबद्दल मला बोलायलाच हवे, इतक्या कमी अवधीत तुम्ही या दौऱ्यासाठी केवळ तयारीच दर्शवली नाही तर या कमी कालावधीत अतिशय उत्तम तऱ्हेने कार्यक्रमांची आखणी केलीत आणि हा खूपच फलदायी कार्यक्रम होता. मी तुमच्या नेतृत्वाची प्रशंसा करू इच्छितो आणि मला वाटते तुमच्या उत्कृष्ट नेतृत्वामुळेच हे शक्य झाले.

महामहिम, तुमचे बरोबर आहे, भारत आणि नेदरलँड्स यांच्यात शतकानुशतके संबंध आहेत आणि ते अधिक दृढ करण्याची दोन्ही देशांची इच्छा आहे. यावर्षी, महामहिम जसे तुम्ही म्हणालात, भारत आणि नेदरलँड्स दरम्यान राजनैतिक संबंधांचे ७० वे वर्ष आपण साजरे करत आहोत आणि त्यामुळे आपल्या द्विपक्षीय संबंधांवर अधिक लक्ष देणे स्वाभाविक आहे.

आजचे जग परस्परांवर अवलंबून असलेले आणि परस्परांशी जोडलेले जग आहे, त्यामुळे आपल्या चर्चेमध्ये केवळ द्विपक्षीय मुद्द्यांवरच नाही तर आंतरराष्ट्रीय महत्वाच्या मुद्द्यांवर देखील आपली चर्चा होणे स्वाभाविक आहे.

आंतराष्ट्रीय मुद्दयांचा विचार केल्यास, आपल्या दोन्ही देशांच्या मतांमध्ये खूप साधर्म्य आहे. आणि नेदरलँड्सच्या मदतीमुळे भारत गेल्या वर्षी क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण प्रणालीचे(एमटीसीआर) सदस्यत्व मिळवण्यात यशस्वी झाला आणि त्यासाठी मी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार मानतो.

द्विपक्षीय गुंतवणुकीचा विचार केला तर, तर आतापर्यंत नेदरलँड्स थेट परदेशी गुंतवणुकीचा पाचवा सर्वात मोठा स्रोत आहे. खरे तर गेल्या तीन वर्षात तो थेट परदेशी गुंतवणुकीचा तिसरा सर्वात मोठा स्रोत बनला आहे.

मला नाही वाटत ही वस्तुस्थिती पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज आहे कि भारताच्या आर्थिक विकासात, आमच्या विकासविषयक प्राधान्यक्रमात नेदरलँड्स हा नैसर्गिक भागीदार आहे.

आज डच कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेण्याची संधी आम्हाला मिळणार आहे आणि मी आशा व्यक्त करतो भारताबाबत त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन यापुढेही कायम राहील आणि त्यांची मते जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे.

आज, नेदरलँड्समध्ये राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना भेटण्याची संधी देखील मला मिळणार आहे. इथे राहणारा भारतीय समुदाय उभय देशांना जोडणारा साक्षात दुवा आहे. हे परस्पर संबंध अधिक बळकट करण्याचा आमचा देखील प्रयत्न आहे.

माझ्यासाठी ही खरोखरच सौभाग्याची बाब आहे कि आज मी महामहिम राजे आणि राणी यांना भेटणार आहे आणि त्यांना भेटण्यासाठी मी खूप आतुर आहे. मी पुन्हा एकदा पंतप्रधान मार्क रट, नेदरलँड्सचे सरकार आणि जनतेचे कृतज्ञतापूर्ण आभार मानतो.

धन्यवाद.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
From Free Ration To ₹12.75 Lakh Tax-Free Income: PM Modi Lists Govt's Achievements Over 12 Years

Media Coverage

From Free Ration To ₹12.75 Lakh Tax-Free Income: PM Modi Lists Govt's Achievements Over 12 Years
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारताचे सर्वात जास्त काळ पदभार सांभाळणारे निर्वाचित पंतप्रधान बनल्याबद्दल जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले
June 09, 2026

भारताच्या पंतप्रधानपदी निवडून येऊन सर्वाधिक काळ पदभार सांभाळत असण्याच्या पूर्वसंध्येला जागतिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.संपूर्ण जगभरातील प्रमुख नेत्यांनी पंतप्रधानांच्या परिवर्तनकारी प्रशासनाला, ग्लोबल साउथ देशांचा पुरस्कार करण्याला आणि समावेशक तसेच आर्थिकदृष्ट्या चैतन्यमय भारताच्या उभारणीच्या संकल्पनेची प्रशंसा केली आहे.

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके  यांनी 08 जून 2026 रोजी पंतप्रधानांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांचे सरकार तसेच श्रीलंकेच्या जनतेकडून मोदी यांचे सस्नेह अभिनंदन केले आहे. त्या पत्रात म्हटले आहे: “हा महत्त्वाचा टप्पा म्हणजे केवळ  तुमच्या कार्यकाळाचा अवधी नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमधील जनतेने पुनःपुन्हा तुमच्यावर दाखवलेला विश्वास आणि भरवसा याचे देखील द्योतक आहे.” भारतात घडलेले उल्लेखनीय आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन देखील राष्ट्राध्यक्षांनी अधोरेखित केले तसेच पंतप्रधान मोदी यांच्या विचारांनी श्रीलंकेसह भारताच्या सीमेवरील अनेक देशांना प्रेरणा दिली आहे असे देखील नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी 4 ते 6 एप्रिल 2025 या कालावधीत श्रीलंकेचा दौरा केला होता. त्यांची ही चौथी श्रीलंका भेट होती आणि या भेटीदरम्यान मोदी यांना परदेशी मान्यवरांना दिला जाणारा ‘मित्र विभूषण’ हा श्रीलंकेचा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरवण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीमुळे भारताच्या ‘शेजारी राष्ट्र सर्वप्रथम’ धोरणाची पुष्टी झाली आणि वर्ष 2022 मध्ये श्रीलंका आर्थिक अडचणीत असताना भारताने दिलेल्या महत्त्वपूर्ण सहयोगासह भारताच्या भक्कम भागीदारीच्या सर्वात जवळच्या लाभार्थ्यांपैकी श्रीलंका हा एक देश आहे याची देखील ग्वाही मिळाली.

पापुआ न्यू गिनीचे राष्ट्राध्यक्ष जेम्स मारापे यांनी एका वैयक्तिक व्हिडिओ संदेशात पंतप्रधान मोदींचे वर्णन "एक आदर्श नेतृत्वाचे उत्तम उदाहरण" असे केले. "20 कोटींहून अधिक लोकांना गरिबीतून बाहेर काढून त्यांना सन्मानाचे जीवन मिळवून देणे ही अद्भुत कामगिरी आहे." त्यांनी असेही नमूद केले. मारापे यांनी पापुआ न्यू गिनीची भारताशी असलेली स्नेहपूर्ण मैत्री आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा व्यक्त केली. भारत-पॅसिफिक द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या तिसऱ्या शिखर परिषदेसाठी मे 2023 मध्ये पंतप्रधान मोदींनी पापुआ न्यू गिनीला दिलेली भेट ऐतिहासिक होती. भारतीय पंतप्रधानांनी प्रथमच त्या देशाला भेट होती आणि पॅसिफिक द्वीपसमूह राष्ट्रांशी भारताच्या संबंधांमधील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला, हे त्यांनी अधोरेखित केले. या भेटीमुळे ग्लोबल साउथ देशांच्या  समूहाचा कटिबद्ध भागीदार म्हणून भारताची भूमिका सुस्पष्ट झाली.

त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान  कमला प्रसाद-बिसेसर यांनी यावेळी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. त्या म्हणाल्या, की "पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक मुद्द्यांवर बुलंद आवाज म्हणून उदयास आला आहे." अत्यंत सामान्य पार्श्वभूमीपासून ते 1.4 अब्ज लोकसंख्या असलेल्या राष्ट्राचे सलग तीन कार्यकाळांसाठी नेतृत्व करण्यापर्यंतच्या पंतप्रधान मोदी यांच्या प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकला; तसेच परराष्ट्र धोरण, आर्थिक विकास, पायाभूत सुविधा आणि सामाजिक-आर्थिक विकास या क्षेत्रांमधील भारताच्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदींनी 3-4 जुलै 2025 रोजी त्रिनिदाद आणि टोबॅगोला भेट दिली. ही तब्बल 26 वर्षांनंतर एखाद्या भारतीय पंतप्रधानांनी दिलेली द्विपक्षीय भेट होती. ती त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये भारतीय स्थलांतरित लोकांच्या आगमनाचा 180 वा वर्धापन दिन साजरा होत असताना झाली हे त्यांनी आवर्जून नमूद केले.