PM congratulates Justice Dalveer Bhandari on being re-elected to the International Court of Justice

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुन्हा निवडून आल्याबद्दल न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांचे अभिनंदन केले.

“न्यायमूर्ती दलवीर भंडारी आंतरराष्ट्रीय न्यायालयात पुन्हा निवडून आल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. ते पुन्हा निवडून येणे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि राजनैतिक मिशनच्या संपूर्ण दलाने घेतलेल्या अथक प्रयत्नांबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताचे न्यायमूर्ती पुन्हा निवडून आले. भारताला दिलेल्या पाठिंब्यासाठी तसेच भारतावर ठेवलेल्या विश्वासासाठी यूएनजीए तसेच यूएनएससीच्या सर्व सभासदांचे आम्ही मनापासून आभारी आहोत”, असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation

Media Coverage

Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारत छोडो आंदोलनात सहभागी शूर स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांकडून आदरांजली
August 09, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे स्मरण करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या धैर्य आणि दृढ निश्चयाला आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या हाकेने स्वातंत्र्यलढ्यात नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याच्या भारतातील जनतेच्या अढळ संकल्पाचे दर्शन घडवले, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स (X) वर पोस्ट केले:

"ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनातील सर्व सहभागींचे भावपूर्ण स्मरण. त्यांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन दिलेला 'भारत छोडो'चा एल्गार आपल्या स्वातंत्र्यलढ्यात नवीन ऊर्जा भरून गेला आणि वसाहतवादी शासनातून मुक्त होण्याच्या आपल्या लोकांच्या अढळ निश्चयाचे त्याने प्रतीक बनले."