Agreement for Cooperation in Peaceful Uses of Nuclear Energy marks historic step in our engagement to build a clean energy partnership: PM
India and its economy are pursuing many transformations. Our aim is to become a major centre for manufacturing, investments: PM
We see Japan as a natural partner. We believe there is vast scope to combine our relative advantages: PM Modi
Our strategic partnership brings peace, stability and balance to the region: PM Modi in Japan
We will continue to work together for reforms of the United Nations and strive together for our rightful place in the UNSC: PM Modi
Thank Prime Minister Abe for the support extended for India’s membership of the Nuclear Suppliers Group: PM Modi

महामहिम पंतप्रधान ॲबे,

मित्रांनो,

मिना-सामा, कोम्बान वा !

“इचिगो, इची” हा जपानी भाषेतला एक झेन बुद्धीस्ट उद्‌गार आहे. याचा अर्थ आमची प्रत्येक भेट आगळी वेगळी आहे आणि आम्ही त्यातील प्रत्येक क्षण जपून ठेवला पाहिजे.

मी जपानला अनेक वेळा भेट दिली आहे, आणि पंतप्रधान म्हणून माझी ही दुसरी भेट आहे. आणि प्रत्येक भेट आगळी-वेगळी, विशेष, शिकवणूक देणारी आणि फलदायी ठरली.

मी महामहिम ॲबे यांना जपान, भारत आणि जगात इतर ठिकाणीही अनेक प्रसंगी भेटलो आहे. तसेच गेल्या दोन वर्षात जपानमधील उच्चस्तरीय राजकीय आणि व्यावसायिक नेत्यांचे स्वागत करण्याचा बहुमान मला लाभला आहे.

आमच्यात वारंवार होणारा सुसंवाद हा आमच्यातील दृढ बंध आणि स्फुर्तीचे मूर्तीमंत उदाहरण आहे. या सुसंवादात आमच्यातील विशेष सामरिक आणि जागतिक भागीदारीची पूर्ण क्षमता जाणून घेण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण कटिबद्धतेचे प्रतिबिंबही उमटले आहे.

मित्रांनो, पंतप्रधान ॲबे आणि माझ्यात आज झालेल्या संवादादरम्यान आम्ही गेल्या शिखर परिषदेनंतर आमच्यातील मैत्रीपूर्ण संबंधात झालेल्या विकासाचा आढावा घेतला. आमच्यातील सहकार्य बहुविध स्तरांवर वृद्धींगत झाल्याचे आम्हा दोघांनाही स्पष्टपणे जाणवले.

सखोल आर्थिक करार, व्यापारातील वृद्धी, निर्मिती आणि गुंतवणुकीतील संबंध, स्वच्छ ऊर्जेवर केंद्रित केलेले लक्ष्य, आमच्या नागरीकांच्या सुरक्षिततेबाबतची भागीदारी आणि पायाभूत सुविधा तसेच कौशल्य विकासातील सहकार्य ही क्षेत्रे आमच्या महत्त्वपूर्ण प्राधान्यांपैकी आहेत.

अणुऊर्जेच्या शांततामय वापरासाठीच्या सहकार्याबाबतच्या करारावर आज झालेली स्वाक्षरी ही स्वच्छ ऊर्जा भागीदारीच्या निर्मितीसाठी उचलेले एक ऐतिहासिक पाऊल आहे.

या क्षेत्रातील आमचे सहकार्य हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आम्हाला सहाय्यभूत ठरेल. जपानसाठी अशा कराराच्या असलेल्या विशेष महत्त्वाचा मी स्वीकार करतो.

मी पंतप्रधान ॲबे, जपान सरकार आणि संसद यांनी या कराराला दिलेल्या पाठिंब्याबाबत त्यांना धन्यवाद देतो.


मित्रांनो,

भारत आणि भारताची अर्थव्यवस्था अनेक बदलांचा पाठपुरावा करत आहे. निर्मिती, गुंतवणूक तसेच 21 व्या शतकातील ज्ञानाधारित उद्योगांसाठी महत्त्वपूर्ण केंद्र बनण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

विशिष्ट प्रकल्पांच्या संदर्भात आम्ही मुंबई-अहमदाबाद अति वेगवान रेल्वे प्रकल्पाच्या विकासावर आम्ही लक्षकेंद्रीत करुन आहोत. आर्थिक क्षेत्रातील सहकार्याबाबत आमच्यातील करार हे आम्हाला पायाभूत विकासासाठी मोठे स्रोत उपलब्ध होण्याकरता सहाय्यक ठरतील.

कौशल्य विकास आणि प्रशिक्षणाबाबतच्या आमच्यातील संवादामुळे नवीन पाया निर्माण झाला आहे. आणि हा पाया आमच्या आर्थिक भागीदारीतील महत्त्वाचा घटक आहे. याशिवाय अवकाश तंत्रज्ञान, सागरी आणि भू-विज्ञान, वस्रोद्योग क्षेत्र, क्रीडा, कृषी आणि टपाल बँकिंग सेवा या क्षेत्रांमध्येही आमची नवीन भागीदारी उदयाला येत आहे.

मित्रांनो,

आमची रचनात्मक भागीदारी फक्त चांगल्यासाठी आणि समाजाच्या सुरक्षेसाठी नाही, तर यामुळे क्षेत्रीय शांतता, स्थिरता आणि समतोल प्रस्थापित होणार आहे. तसेच आशिया-पॅसिफिक खंडामध्ये असलेल्या संधी आणि आव्हाने यांना प्रतिसाद देण्यासाठी ती उपयुक्त ठरु शकते.

सर्वंकष दृष्टीकोन असलेले देश म्हणून आम्ही इंडो-पॅसिफिक यांना सांधणाऱ्या जलमार्गाचा समावेश असणाऱ्या भागात संपर्क यंत्रणा, पायाभूत सुविधा आणि क्षमता वृध्दीसाठी अधिक सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.

विशेष म्हणजे मलाबार नाविक कवायतींच्या यशस्वीतेमुळे इंडो-पॅसिफिक जल विस्तारातील आमचे सामरिक हेतू अधोरेखित झाले आहे.

लोकशाहीचा पुरस्कार करणारी आम्ही राष्ट्रे असून मुक्तता, पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य यांना आम्ही पाठिंबा देतो. दहशतवाद, विशेषत: सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाशी लढा देण्याच्या आमच्या निर्धारावर आमचे एकमत आहे.


मित्रांनो,

आमच्या उभय देशातील संबंधांना सांस्कृतिक आणि माणसामाणसातील बंध याचे वरदान लाभले आहे. पंतप्रधान ॲबे यांनी गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये भारताला भेट दिली होती. त्याचवेळी उभय देशातील ऋणानुबंध अधिक दृढ करण्यासाठी पावले उचलू अशी ग्वाही मी दिली होती. आणि त्याचाच परिपाक म्हणजे मार्च 2016 पासून आम्ही सर्व जपानी नागरिकांना “व्हिजा ऑन अरायव्हल” ची सुविधा बहाल केली. याचाच पुढचा टप्पा म्हणजे पात्र जपानी उद्योजकाला 10 वर्षांचा, दीर्घ कालावधीचा व्हिजा देण्याची सोय आम्ही उपलब्ध करुन देणार आहे.

मित्रांनो,

क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत आणि जपान संयुक्तपणे चर्चा आणि सहकार्य करीत आहेत. संयुक्त राष्ट्रात सुधारणा करण्यासाठी आम्ही एकत्रित कार्यरत राहणार आहोत. तसेच संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत आपल्याला स्थान देण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्यात येणार आहेत.

अणु पुरवठादारांच्या समुहाचे भारताला सदस्यत्व देण्यासाठी जपानने देऊ केलेल्या पाठिंब्याबद्दल मी पंतप्रधान ॲबे यांचे आभार मानतो.


महामहिम ॲबे,

आपल्या भागीदारीचे भविष्य हे मौल्यवान आणि मजबूत असल्याचे आम्ही दोघांनी मान्य केले आहे. एकत्रित आल्यानंतर आपण दोन्ही देशांसाठी आणि या विभागासाठी कुठल्या प्रमाणात आणि किती कार्य करु शकतो, याला मर्यादा नाही.
तुमच्यासारखे सामर्थ्यवान आणि गतिमान नेतृत्व हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे. तुमच्यासारखा भागीदार आणि मित्र लाभणे ही आमच्यासाठी खरोखरच आनंददायी गोष्ट आहे. या शिखर परिषदेच्या मौल्यवान फलनिष्पत्तीबाबत तसेच तुमच्या स्वागत आणि आदरातिथ्याबद्दल मी आभार व्यक्त करतो.

Anata No O Motenashi O Arigato Gozaimashita!

(आपल्या आदरातिथ्याबद्दल आभार!)

धन्यवाद, मन:पूर्वक धन्यवाद.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Sagarmala: 315 projects worth Rs 1.57 lakh crore completed to boost maritime sector

Media Coverage

Sagarmala: 315 projects worth Rs 1.57 lakh crore completed to boost maritime sector
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister condoles the passing of iconic and versatile singer Asha Bhosle Ji
April 12, 2026
PM highlights her extraordinary musical journey and timeless brilliance

Prime Minister Shri Narendra Modi today expressed deep sadness over the passing of Asha Bhosle Ji, acknowledging her as one of the most iconic and versatile voices India has ever known.

The Prime Minister remarked that her extraordinary musical journey, which spanned decades, enriched the nation's cultural heritage and touched countless hearts across the world. Shri Modi noted that whether through her soulful melodies or vibrant compositions, her voice carried a timeless brilliance, adding that he will always cherish the interactions he had with her.

The Prime Minister extended his heartfelt condolences to her family, admirers, and music lovers. Shri Modi observed that she will continue to inspire generations and her songs will forever echo in people’s lives.

The Prime Minister wrote on X:

"Deeply saddened by the passing of Asha Bhosle Ji, one of the most iconic and versatile voices India has ever known. Her extraordinary musical journey, spanning decades, enriched our cultural heritage and touched countless hearts across the world. Be it her soulful melodies or vibrant compositions, her voice carried timeless brilliance. I’ll always cherish the interactions I’ve had with her.
My condolences to her family, admirers and music lovers. She will continue to inspire generations and her songs will forever echo in people’s lives."

“भारतातील सर्वात ख्यातनाम आणि अष्टपैलू आवाजांपैकी एक असलेल्या आशा भोसले जी यांच्या निधनाने अतिशय दुःख झाले. त्यांच्या अनेक दशकांच्या अद्वितीय संगीत प्रवासाने आपल्या सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले आणि जगभरातील असंख्य लोकांच्या मनाला स्पर्श केला. भावपूर्ण गीतांपासून ते जोशपूर्ण संगीत रचनांपर्यंत, त्यांच्या आवाजात कालातीत तेज होते. त्यांच्याशी झालेल्या संवादांच्या आठवणी मी सदैव जपून ठेवेन. त्यांच्या कुटुंबीयांना, चाहत्यांना आणि संगीतप्रेमींना माझ्या भावपूर्ण संवेदना. त्या पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांची गाणी सदैव लोकांच्या आयुष्यात गुंजत राहतील.”