नरेंद्र मोदी यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात उदय आणि १९८० च्या दशकात भारतीय जनता पार्टीत प्रवेश तसेच १९९० च्या सुमाराला भाजपामधला त्यांचा कार्यकाळ , हा सगळा काळ ,योगायोगाने स्वतंत्र भारताच्या राजकारणातला अतिशय कठीण काळ होता. त्या काळात देशाच्या सर्व कानाकोपऱ्यात काही ना काही असंतोष धुमसत होता, देशात निर्माण होत असलेल्या या परस्पर दुराव्याकडे, केंद्र सरकार हतबलपणे बघत होते. आपल्या मातृभूमीची  एकात्मता आणि सार्वभौमत्वाला आव्हान देणारा असंतोष आणि बंडखोरी पंजाब तसंच आसाममध्ये निर्माण झाली होती, देशातल्या या स्थितीकडे सरकार हतबलपणे बघत होते.राज्याराज्यांमध्येही अतंर्गत भागात विभाजनाच्या राजकारणाची मुळे खोलवर पसरत चालली होती. गुजरातमध्ये तर संचारबंदी हा  शब्द घराघरात पोहोचला होता. भाऊ भावाविरुद्ध , एक समुदाय दुसऱ्या समुदायाविरुद्ध लढताहेत अशी परीस्थिती निर्माण झाली होती. कारण वोट बँकेच्या गलिच्छ राजकारणाने समाजात दुफळी निर्माण झाली होती.

अशा वातावरणात, भारताला अखंड आणि सामर्थ्यवान बनवण्याच्या सरदार पटेल यांच्या विचारांची कास धरत, लोकशाही आणि मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांना जपण्यासाठी नरेंद्र मोदी उभे राहिले. देशात पसरलेले निराशेचे वातावरण दूर करण्यासाठी मोदींमधला देशभक्त कामाला लागला. आणि त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपाच्या आदर्शांच्या लढाईत त्यांनी अतिशय कष्टपूर्वक स्वतःला झोकून दिले. या त्यांच्या मेहनतीमुळे, त्यांनी अतिशय लहान वयातच स्वतःला केवळ एक समर्पित कार्यकर्ताच नाही तर एक सक्षम, प्रभावी संघटक म्हणूनही सिद्ध केले.  त्यांच्या या कर्तृत्वामुळेच, त्यावेळच्या समाजाच्या निराशाजनक परिस्थितीत, मोदी यांचा उदय होणे अगदी स्वाभाविक होते.

एकता यात्रेदरम्यान अहमदाबाद येथे श्री नरेंद्र मोदी;

एकेकाळी पृथ्वीवरचे नंदनवन म्हणून ओळखले जाणारे जम्मू- काश्मीर १९८० च्या सुमाराला एक रक्तरंजित युद्धभूमी झाले होते.  १९८७ साली केंद्र सरकारचे  संधीसाधू राजकारण आणि जम्मू कश्मीर लोकशाहीचे सातत्याने झालेले दमन ,यामुळे,निवडणुकीच्या काळात या राज्यात देशविघातक घातपाती कारवायांना ऊत आला होता.  कधीकाळी जगातील सर्वात सुन्दर स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  कश्मीरच्या रस्त्यारस्त्यावर रक्त सांडत होते, काश्मीर जळत होते. परिस्थिती इतकी चिघळली होती की काश्मीरमध्ये तिरंगा फडकावण्याची सुध्दा लोकाना भीती वाटत होती. आणि दुर्दैवाने अशा सगळ्या परिस्थितीवर उपाययोजना शोधण्याऐवजी, काही कृती करण्याऐवजी, केंद्र सरकार केवळ हतबलपणे त्याकडे बघत होते.

१९८९ साली केंद्रीय गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची कन्या रुबिया सईदचे काही दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. मात्र अशावेळी दहशतवाद्यांच्या बाबतीत काही कठोर भूमिका घेण्यापेक्षा केंद्र सरकारने दहशतवाद्यांची मागणी मान्य  करत त्यांच्या साथीदारांना सोडून दिले. सरकारच्या या पवित्र्यामुळे अशा देशविघातक शक्तीना नवे बळ मिळाले.  

भारताच्या सार्वभौमत्वाला असा धक्का पोहोचत असताना भारतीय जनता पार्टी केवळ मूकपणे बघत बसने शक्यच नव्हते. काश्मीरमधल्या भेटीतच भाजपाचे संस्थापक नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते.त्या घटनेला दशके उलटून गेल्यावरही, काश्मीरवर भूमिका घेणे भाजपासाठी राष्ट्रीय कर्तव्य होते. या अभूतपूर्व परिस्थितीत भाजपाचे तेव्हाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ मुरली मनोहर जोशी यांनी देशाच्या एकतेचा प्रसार करण्यासाठी , एकता यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. या यात्रेची सुरुवात कन्याकुमारीपासून होणार होती, जिथे स्वामी विवेकानंदानी याना आपल्या जीवनाचा खरा अर्थ सापडला होता, तिथून ही यात्रा सुरु होऊन श्रीनगरच्या लाल चौकात तिची सांगता होणार होती.

 

या यात्रेची तयारी करण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यांचे उत्तम संघटन कौशल्य लक्षात घेऊन ते ही धुरा सांभाळतील असा पक्षाला विश्वास होता.

हे लक्षात घेत , आपले संघटन कौशल्य आणि अपार मेहनत याच्या जोरावर मोदींनी अतिशय अल्पावाधीत या यात्रेची मोठी तयारी केली.यात्रेच्या आयोजनात येणाऱ्या संकटांचा त्यांनी मोठ्या धाडसाने सामना केला. कुठलीही भीती नं बाळगता, धोका पत्करून मोदींनी यात्रेच्या सगळ्या ठिकाणांची जातीने पहाणी केली, कार्यकत्यांशी चर्चा केली.

त्यांनी पक्ष कार्यकर्त्याना उत्साह दिला, प्रोत्साहन दिले , त्यांच्यामध्ये देशभक्तीची भावना जागृत केली. अशा तऱ्हेने त्यांनी या यात्रेच्या यशस्वीतेसाठी सकारात्मक पार्श्वभूमी तयार केली. या सगळ्या प्रक्रियेत आपण केवळ उत्तम संघटक असल्याचेच सिद्ध केले नाही तर कुठल्याही परिस्थितीत वेगाने काम करून इच्छित साध्य पूर्ण करण्याचे दुर्मिळ कसब आपल्याकडे आहे, हे ही दाखवून दिले. या घटनेनंतर विपरीत परिस्थितीतही त्वरीत निर्णय घेण्याची आणि तो निर्णय अमलात आणण्याची आपली क्षमता मोदींनी सिद्ध केली.  

एकता यात्रेदरम्यान श्री नरेंद्र मोदी;

एकता यात्रेचा शुभारंभ ११ डिसेंबर १९९१ या दिवशी झाला, सुब्र्ह्मण्याम भारती यांच्या जयंतीचे आणि गुरु तेगबहादूर यांच्या बलिदान दिवसाचे औचित्य साधून या दिवशी या यात्रेची सुरुवात करण्यात आली. या यात्रेदरम्यान विभाजनाचे आणि हिंसेचे राजकारण याला विरोध आणि काश्मीरमधल्या दहशतवादाला विरोध, हे मुद्दे प्रामुख्याने उपस्थित करण्यात आले होते.

जिथे जिथे मोदी जात तिथे श्यामाप्रसाद मुखर्जीचा संदेश कार्यकर्त्यांना सांगत असत. ते सांगत, की भारताची एकता ही इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा महत्वाची आहे आणि समाजातल्या वेगवेगळ्या घटकांविषयी वेगवेगळे मापदंड असावेत, हे श्यामाप्रसाद मुखर्जीना मान्य नव्हते, तोच वारसा मोदी पुढे चालवत. राष्ट्रविघातक शक्तीना चोख उत्तर देण्याची तीच योग्य वेळ होती. आणि अशावेळी मोदी सर्वात पुढे होते ! एकता यात्रा जिथे जिथे गेली तिथे तिथे तिला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. या यात्रेदरम्यान मुरली मनोहर जोशी यांनी राष्ट्राच्या पुनर्निर्माणाची गरज व्यक्त केली, त्याला देशभरातून प्रतिसाद मिळाला.

देशाची परिस्थिती बघूनही त्याकडे कानाडोळा करणाऱ्या कॉंग्रेस सरकारच्या डोळ्यात धडधडीत अंजन घालणारी ही एकता यात्रा ठरली. आणि या यात्रेचे यश हे नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीतसाठी अतिशय  महत्वाचे  ठरले , हे वेगळे सांगायला नको. कारण त्यांचे संगठन कौशल्याचे कसब या यात्रेतून जगाला कळले. त्यावेळी मोदी यांनी स्वतःच जनतेला धर्मनिरपेक्षतेच्या बेगडी आणि वोटबँकेच्या संधीसाधू राजकारणाला तिलांजली देण्याचे आवाहन केले होते. ज्यावेळी २६ जानेवारी १९९२ साली श्रीनगर येथे तिरंगा फडकला, तेव्हा तो प्रसंग पाहून नरेंद्र मोदी भावूक झाले होते. अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत नरेंद्र मोदी यांनी हे राष्ट्रीय मिशन यशस्वीपणे पूर्ण केले. हे निशाण यशस्वी होणे म्हणजे नरेंद्र मोदी यांचे धाडस, दृष्टीकोन, कौशल्य यांचा विजय होता, ज्यामुळे देशविघातक शक्तींशी ते मुकाबला करू शकले.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi makes India stand tall

Media Coverage

PM Modi makes India stand tall
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधान मोदींच्या साध्या कृतीतून त्यांचा कार्यकर्त्यांबद्दलचा आदर प्रकट झाल्याची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन जी यांनी आठवण सांगितली
January 21, 2026

During the National Executive meeting of the Bharatiya Janata Party in Patna, an incident left a lasting impression on the now BJP President Shri Nitin Nabin Ji and offered a quiet yet powerful lesson in leadership.

Senior leaders from across the country were arriving in Patna for a major rally. Nitin Nabin Ji was part of the team responsible for receiving leaders at the airport and escorting them according to protocol. As leaders arrived, they followed the standard process and proceeded directly to their vehicles.

When PM Modi arrived, he was welcomed and requested to move towards the car. Before doing so, he paused and asked whether the karyakartas were waiting outside. On being informed that many karyakartas were standing there, he immediately said that he would like to meet them first.

Instead of sitting in the vehicle, the PM chose to walk on foot. As the car followed behind, he personally greeted the workers, accepted garlands with his own hands, folded his hands in respect and acknowledged each karyakarta present. Only after meeting everyone did he proceed to his vehicle and depart.

Though the conference itself was brief, the gesture left a deep and lasting impact. PM Modi could have easily remained in the car and waved, but he chose to walk alongside the workers and personally honour them. This moment reflected his sensitivity and his belief that every worker, regardless of position, deserves respect.

Nitin Nabin Ji explains that this incident taught him the true meaning of leadership. For Narendra Modi Ji, leadership is rooted in humility, emotional connection and constant engagement with the grassroots. Respect for workers and open communication are not symbolic acts, but core values of all the karyakartas, leaders and the entire Party.

This ethos, where karyakartas are treated with dignity and warmth, defines the BJP’s organisational culture. It is this tradition that strengthens the Party’s roots and prepares ordinary people to shoulder national responsibilities.