अगलेगा बेटावरील सहा सामुदायिक विकास प्रकल्पांचे केले उद्‌घाटन
“मॉरिशस हा भारताचा अनमोल मित्र आहे.आज उद्‌घाटन झालेले प्रकल्प या दोन देशांमधील भागीदारीला आणखी चालना देतील”
“मॉरिशस हा आमच्या शेजारी प्रथम धोरणातील महत्त्वाचा भागीदार आहे”
“भारताने नेहमीच मित्र देश मॉरिशसला सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे”
“भारत आणि मॉरिशस हे देश सागरी सुरक्षेच्या क्षेत्रातील नैसर्गिक भागीदार आहेत”
“मॉरिशस हा आमच्या जन औषधी उपक्रमात सहभागी होणारा पहिला देश असेल. याद्वारे मॉरिशसच्या जनतेला भारतात निर्मित दर्जेदार जेनेरिक औषधांचा लाभ घेता येईल”

महामहीम पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ, मॉरिशसच्या मंत्रिमंडळाचे उपस्थित सदस्य, भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. जयशंकर, अगालेगा येथील रहिवासी आणि आजच्या या कार्यक्रमाशी संबंधित सर्व सहकारी,

नमस्कार!

गेल्या ६ महिन्यांतील पंतप्रधान जगन्नाथ आणि माझी ही पाचवी भेट आहे. भारत आणि मॉरिशस यांच्यातील व्हायब्रंट, मजबूत आणि अद्वितीय भागीदारीचा हा पुरावा आहे. मॉरिशस हा आमच्या शेजारी प्रथम धोरणाचा महत्त्वाचा भागीदार आहे. आमच्या"सागर" या दृष्टीकोनांतर्गत मॉरिशस विशेष भागीदार आहे. ग्लोबल साऊथचे सदस्य या नात्याने आमची समान प्राधान्ये आहेत. गेल्या 10 वर्षांत आमच्या संबंधांमध्ये अभूतपूर्व गती आली आहे. आम्ही परस्पर सहकार्याने नवीन उंची गाठली आहे. सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संबंधांना नवा आकार दिला गेला आहे. भाषा आणि संस्कृतीच्या सोनेरी धाग्यांनी आपले लोक आधीच जोडलेले आहेत. काही दिवसांपूर्वी, आम्ही यूपीआय आणि  रुपे कार्ड सारख्या उपक्रमांद्वारे आधुनिक संपर्कव्यवस्था प्रदान केली आहे.

मित्रांनो,

विकास भागीदारी हा आमच्या धोरणात्मक संबंधांचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. आमची विकास भागीदारी मॉरिशसच्या प्राधान्यक्रमांवर आधारित आहे. ईईझेड सुरक्षेशी संबंधित मॉरिशसच्या गरजा असोत किंवा आरोग्य सुरक्षा, भारताने नेहमीच मॉरिशसच्या गरजांचा आदर केला आहे. कोविड साथीचे संकट असो किंवा तेल गळती असो, भारत नेहमीच आपल्या मित्र मॉरिशसला प्रथम प्रतिसाद देणारा राहिला आहे. मॉरिशसच्या सामान्य लोकांच्या जीवनात अर्थपूर्ण बदल घडवून आणणे हा आमच्या प्रयत्नांचा मूळ उद्देश आहे. गेल्या 10 वर्षांत, मॉरिशसच्या लोकांना अंदाजे एक हजार दशलक्ष डॉलर्सची क्रेडिट लाइन आणि $400 दशलक्ष मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे. मला मॉरिशसमधील मेट्रो लाईनच्या विकासापासून ते सामुदायिक विकास प्रकल्प, सामाजिक गृहनिर्माण, ईएनटी रुग्णालये, नागरी सेवा महाविद्यालये आणि क्रीडा संकुलांपर्यंतच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे.

 

मित्रांनो,

आमच्या विकास भागीदारीसाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. अगालेगाच्या जनतेच्या विकासासाठी मी 2015 मध्ये जी वचनबद्धता व्यक्त केली होती ती आज आपण पूर्ण होताना पाहत आहोत याचा मला खूप आनंद होत आहे. आजकाल भारतात याला "मोदींची गॅरंटी" म्हटले जात आहे. मला विश्वास आहे की आम्ही संयुक्तपणे ज्या सुविधांचे उद्घाटन केले आहे त्या सुविधांमुळे राहणीमान सुलभ होईल. मॉरिशसच्या उत्तर आणि दक्षिण भागात संपर्क वाढेल. मुख्य भूभागाकडून प्रशासकीय सहकार्य सोपे होईल. सामाजिक व आर्थिक विकासाला चालना मिळेल. वैद्यकीय उपचारांसाठी ‘आणीबाणी’तून बाहेर काढणे आणि शाळकरी मुलांचा शिक्षणासाठी प्रवास करणे यात सुलभता येईल.

 

मित्रांनो,

हिंदी महासागर क्षेत्रात अनेक पारंपरिक आणि अपारंपरिक आव्हाने उभी राहत आहेत. या सर्व आव्हानांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे. त्यांना सामोरे जाण्यासाठी भारत आणि मॉरिशस हे सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात नैसर्गिक भागीदार आहेत. हिंदी महासागर क्षेत्रात सुरक्षा, समृद्धी आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सक्रियपणे काम करत आहोत. अनन्य आर्थिक क्षेत्राचे निरीक्षण, संयुक्त गस्त, जलविज्ञान आणि मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण यासारख्या सर्व क्षेत्रात आम्ही एकत्र सहकार्य करत आहोत. आज अगालेगा येथील हवाई पट्टी आणि जेट्टीचे उद्घाटन आमचे सहकार्य आणखी वाढवेल. यामुळे मॉरिशसमधील ब्लू इकॉनॉमी देखील मजबूत होईल.

 

मित्रांनो,

मॉरिशसमध्ये जनऔषधी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मी पंतप्रधान जगन्नाथजींचे कौतुक करतो. आमच्या जनऔषधी उपक्रमात सामील होणारा मॉरिशस हा पहिला देश असेल. यामुळे मॉरिशसच्या लोकांना भारतात बनवलेल्या चांगल्या दर्जाच्या जेनेरिक औषधांचा लाभ मिळणार आहे. महामहीम, पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ जी, तुमच्या दूरदृष्टी आणि गतिमान नेतृत्वासाठी मी तुमचे अभिनंदन करतो. मला विश्वास आहे की आगामी काळात आपण एकत्र येऊन भारत आणि मॉरिशस संबंधांना नवीन उंचीवर नेऊ. पुन्हा एकदा मी तुमचे मनापासून आभार मानतो!

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
As Naxalism ends in Chhattisgarh, village gets tap water for first time

Media Coverage

As Naxalism ends in Chhattisgarh, village gets tap water for first time
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM to visit Uttarakhand and UP on 14 April
April 13, 2026
PM to inaugurate Delhi–Dehradun Economic Corridor
Corridor to reduce travel time between Delhi and Dehradun from over 6 hours to around 2.5 hours
Corridor has been designed with several features aimed at significantly reducing man-animal conflict
Project include a 12 km long wildlife elevated corridor which is one of the longest in Asia
PM to also visit and undertake review of the Wildlife Corridor

Prime Minister Shri Narendra Modi, will visit Uttarakhand and Uttar Pradesh on 14 April 2026. At around 11:15 AM, the Prime Minister will visit Saharanpur in Uttar Pradesh to undertake a review of the Wildlife Corridor on the elevated section of the Delhi-Dehradun Economic Corridor. At around 11:40 AM, the Prime Minister will perform Darshan and Pooja at Jai Maa Daat Kali Temple near Dehradun. Thereafter, at around 12:30 PM, Prime Minister will inaugurate the Delhi-Dehradun Economic Corridor at a public function in Dehradun and will also address the gathering on the occasion.

The 213 km long six-lane access-controlled Delhi-Dehradun Economic Corridor has been developed at a cost of over ₹12,000 crore. The corridor traverses through the states of Delhi, Uttar Pradesh and Uttarakhand, and will reduce travel time between Delhi and Dehradun from over six hours at present to around two and a half hours.

Implementation of the project also includes the construction of 10 interchanges, three Railway Over Bridges (ROBs), four major bridges and 12 wayside amenities to enable seamless high-speed connectivity. The corridor is equipped with an Advanced Traffic Management System (ATMS) to provide a safer and more efficient travel experience for commuters.

Keeping in view the ecological sensitivity, rich biodiversity and wildlife in the region, the corridor has been designed with several features aimed at significantly reducing man-animal conflict. To ensure the free movement of wild animals, the project incorporates several dedicated wildlife protection features. These include a 12 km long wildlife elevated corridor, which is one of the longest in Asia. The corridor also includes eight animal passes, two elephant underpasses of 200 metres each, and a 370 metre long tunnel near the Daat Kali temple.

The Delhi-Dehradun Economic Corridor will play a pivotal role in strengthening regional economic growth by enhancing connectivity between major tourism and economic centres as well as opening new avenues for trade and development across the region. The project reflects the vision of the Prime Minister to develop next-generation infrastructure that combines high-speed connectivity with environmental sustainability and improved quality of life for citizens.