Every small step will build Viksit Bharat @ 2047: PM Modi to Students at Pariksha Pe Charcha

February 09th, 10:30 am

In continuation of the 9th edition of Pariksha Pe Charcha (PPC) 2026, PM Modi interacted with students from multiple locations, including Coimbatore, Raipur, Devmogra and Guwahati. The discussion covered perse topics such as startups, sports, Vocal for Local, Wed in India, discipline, AI and tribal communities, making it a memorable experience. He urged students to observe situations, accept challenges and rely on their inner strength.

PM Modi interacts with students from multiple locations in the second episode of Pariksha Pe Charcha 2026

February 09th, 10:00 am

In continuation of the 9th edition of Pariksha Pe Charcha (PPC) 2026, PM Modi interacted with students from multiple locations, including Coimbatore, Raipur, Devmogra and Guwahati. The discussion covered perse topics such as startups, sports, Vocal for Local, Wed in India, discipline, AI and tribal communities, making it a memorable experience. He urged students to observe situations, accept challenges and rely on their inner strength.

DMK is the biggest enemy of Tamil Nadu’s culture: PM Modi in Madhuranthakam

January 23rd, 03:15 pm

PM Modi addressed a public rally in Madhuranthakam, Tamil Nadu, where he said the people of the state had given the DMK a clear mandate twice, but the party betrayed the trust of the people. He added DMK made many promises but delivered zero results, adding that people are now calling it a CMC government, one that promotes corruption, mafia, and crime.

Tamil Nadu shows massive support for NDA at PM Modi’s Madhuranthakam rally

January 23rd, 03:00 pm

PM Modi addressed a public rally in Madhuranthakam, Tamil Nadu, where he said the people of the state had given the DMK a clear mandate twice, but the party betrayed the trust of the people. He added DMK made many promises but delivered zero results, adding that people are now calling it a CMC government, one that promotes corruption, mafia, and crime.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी रोजी केरळ दौ-यावर

January 22nd, 02:23 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी 23 जानेवारी 2026 रोजी केरळला भेट देणार आहेत. तिरुवअनंतपुरममध्ये सकाळी 10:45 वाजता पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि आरंभ करण्यात येईल. या कार्यक्रमात ते उपस्थितांना संबोधितही करतील.

पश्चिम बंगालमधील सिंगूर येथील विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 18th, 03:30 pm

काल मी मालदामध्ये होतो आणि आज इथे हुगळीमध्ये तुमच्याशी संवाद साधण्याचे भाग्य मला लाभले आहे. विकसित भारतासाठी पूर्व भारताचा विकास हे उद्दीष्ट ठेवून केंद्र सरकार सातत्यान काम करत आहे. कालचा आणि आजचा कार्यक्रम हाच निर्धार बळकट करणारे आहेत. या दोन दिवसांत पश्चिम बंगालमधील करोडो रुपयांच्या प्रकल्पांचे भूमीपूजन आणि लोकार्पण करण्याची संधी मला मिळाली. देशातली पहिली वंदे भारत शयनयान रेल्वे काल पश्चिम बंगालमधून सुरू झाली. बंगालमध्ये जवळपास अर्धा डझन नवीन अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या आहेत आणि आज आणखी तीन अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या. यातील एका रेल्वेमुळे काशी वाराणसी या माझ्या मतदारसंघाची पश्चिम बंगालसोबतची संपर्कव्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. शिवाय, दिल्ली आणि तमिळनाडूमध्ये जाणाऱ्या अमृत भारत वेगवान रेल्वे सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालमधील रेल्वे वाहतुकीसाठी हे दोन दिवस अभूतपूर्व असेच म्हणावे लागतील. गेल्या 100 वर्षांत 24 तासांत इतके काम कदाचित कधीच झाले नसेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील सिंगूर येथे ₹830 कोटींहून अधिक खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि पहिल्या शयनयान वंदे भारत रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ

January 18th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील सिंगूर येथे ₹830 कोटींहून अधिक मूल्याच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि लोकार्पण केले. याप्रसंगी जनसभेला संबोधित करताना मोदी यांनी नमूद केले की, काल ते मालदामध्ये होते आणि आज त्यांना हुगळीतील लोकांमध्ये उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. त्यांनी अधोरेखित केले की विकसित भारतासाठी पूर्व भारताचा विकास आवश्यक आहे आणि या ध्येयाने केंद्र सरकार सातत्याने काम करत आहे. काल आणि आजचे कार्यक्रम या संकल्पाला बळ देतात, असे त्यांनी सांगितले. या काळात पश्चिम बंगालच्या विकासाशी संबंधित शेकडो कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करण्याची संधी मिळाल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

भारतरत्न डॉ. एम.जी. रामचंद्रन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

January 17th, 10:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री भारतरत्न डॉ. एम.जी. रामचंद्रन म्हणजेच एमजीआर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. यासंदर्भात केलेल्या निवेदनात पंतप्रधानांनी एमजीआर यांच्या बहुआयामी वारशाचा गौरव केला आहे, तसेच तमिळनाडूच्या सामाजिक आणि आर्थिक विकासातील त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आणि तमिळ संस्कृतीला जागतिक स्तरावर नेण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अधोरेखित केले आहेत.

थिरुवल्लुवर दिनानिमित्त थिरुवल्लुवर यांना पंतप्रधानांनी केले अभिवादन

January 16th, 09:24 am

थिरुवल्लुवर दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुप्रतिभावान ऋषी थिरुवल्लुवर यांना अभिवादन केले, ज्यांचे कालातीत कार्य आणि आदर्श पिढ्यानपिढ्या असंख्य लोकांना प्रेरणा देत आहेत.

पंतप्रधानांनी नऊ नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांच्या घोषणेचे केले स्वागत

January 14th, 06:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, नवीन अमृत भारत रेल्वेगाड्या म्हणजे प्रवाशांना आराम आणि देशभरातील संचारसंपर्क सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

शिवगंगा येथील अपघातातील जीवितहानीबद्दल पंतप्रधानांनी केला शोक व्यक्त

December 01st, 10:23 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू मधील शिवगंगा जिल्ह्यात अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला. अपघातात जखमी झालेले लोक लवकर बरे होण्यासाठी त्यांनी कामना व्यक्त केली.

जेनझीने वाहून नेला केटीएस-4.0 चा सांस्कृतिक रथ- तमिळनाडू ते काशीपर्यंत प्रवासाचे युवकांनी आनंदयात्रेत केले रुपांतर

November 30th, 06:56 pm

काशी तमिळ संगमम् 4.0 या महोत्सवाच्या 2 डिसेंबर पासून होत असलेल्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर त्यासाठी सज्ज होत असलेल्या जेन झी म्हणजे डिजिटल युगात जन्माला आलेल्या युवा पिढीमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. काशी आणि तमिळनाडू यांच्यातील प्राचीन सांस्कृतिक आणि भाषिक बंधांना तरुण पिढीच्या उत्साही ऊर्जेशी जोडणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

November 25th, 10:20 am

उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परम पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत जी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष पूज्य महंत नृत्य गोपाल दास जी, पूज्य संत समुदाय, येथे उपस्थित सर्व भक्तगण, देश आणि जगातून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनत असलेले कोट्यवधी रामभक्त, स्त्री-पुरुषहो!

पंतप्रधानांनी केले अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवाला संबोधित

November 25th, 10:13 am

या प्रसंगी एका सभेला संबोधित करताना पंतप्रधानांनी सांगितले की, आज अयोध्या नगरी भारताच्या सांस्कृतिक चेतनेच्या आणखी एका शिखराचा अनुभव घेत आहे. “आज संपूर्ण भारत आणि संपूर्ण जग प्रभू श्री रामाच्या भावनेने भरलेले आहे,” असे मोदी यांनी नमूद केले, आणि प्रत्येक रामभक्ताच्या हृदयात एक अद्वितीय समाधान, अमर्याद कृतज्ञता आणि प्रचंड अलौकिक आनंद भरलेला असल्याचे अधोरेखित केले. शतकानुशतके कायम राहिलेल्या जखमा आता बऱ्या होत आहेत, शतकानुशतकांचा वेदनादायक काळ संपत आहे आणि शतकांचे संकल्प आज पूर्ण होत आहेत, यावर त्यांनी भर दिला. ही एका यज्ञाची सांगता आहे, ज्याचा अग्नी 500 वर्षे प्रज्वलित राहिला, एक असा यज्ञ जो श्रद्धेमध्ये कधीही डगमगला नाही आणि एका क्षणाकरिताही विश्वास ढळला झाला नाही, अशी घोषणा त्यांनी केली. आज प्रभू श्री रामाच्या गाभाऱ्याची अनंत ऊर्जा आणि श्री राम परिवाराचे दिव्य वैभव या धर्म ध्वजाच्या रूपात सर्वात दिव्य आणि भव्य मंदिरात स्थापित झाले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले.

कोईम्बतूर इथे दक्षिण भारत नैसर्गिक शेती परिषद 2025 मध्ये पंतप्रधानांनी शेतकऱ्यांशी साधला संवाद

November 20th, 12:30 pm

ही सगळी उत्पादनं वाया जाणाऱ्या गोष्टींपासून बनवली आहेत साहेब. केळ्यांच्या शेतीमधील टाकाऊ गोष्टींपासून तयार केलेली ही उत्पादनं केळीच्या पिकाचं मूल्यवर्धन करणारी आहेत साहेब

तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला

November 20th, 12:16 pm

तामिळनाडूत कोइम्बतूर येथे आयोजित दक्षिण भारत नैसर्गिक शेती शिखर परिषद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल शेतकऱ्यांशी संवाद साधला. नैसर्गिक शेती पद्धती स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांना अभिवादन करुन पंतप्रधान मोदी यांनी केळी उत्पादनाचे निरीक्षण केले तसेच केळ्यांच्या वाया अवशेषांच्या वापराबद्दल चौकशी केली. शेतकऱ्याने सांगितले की तेथे मांडण्यात आलेल्या सर्व वस्तू म्हणजे केळी पिकाच्या वाया अवशेषांचे मूल्यवर्धन केलेली उत्पादने आहेत. ही उत्पादने भारतभरात ऑनलाईन पद्धतीने विकली जातात का असा प्रश्न पंतप्रधानांनी विचारल्यानंतर शेतकऱ्याने होकार दिला. तो शेतकरी पुढे म्हणाला की, तो आणि त्याच्यासोबतचे शेतकरी एफपीओज म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटनांच्या माध्यामातून तसेच व्यक्तिगत योगदानकर्ते म्हणून संपूर्ण तामिळनाडूचे प्रतिनिधित्व करत आहेत. या शेतकऱ्यांची उत्पादने ऑनलाईन विकली जातात, निर्यात करण्यात येतात तसेच ही उत्पादने स्थानिक बाजारांमध्ये आणि देशभरातील सुपरमार्केट्समध्ये देखील उपलब्ध आहेत असे त्याने सांगितले. प्रत्येक एफपीओमध्ये किती लोक एकत्र काम करतात या पंतप्रधानांच्या प्रश्नावर, शेतकऱ्याने उत्तर दिले की साधारणतः एक हजार जण यात सहभागी असतात. त्याच्या उत्तराची नोंद घेत पंतप्रधानांनी विचारले की जमिनीच्या एका भागावर केवळ केळीची लागवड केली जाते की त्यामध्ये मिश्र पिके देखील घेतात. वेगवेगळी विशिष्ट उत्पादने हे वेगवेगळ्या भागांचे वैशिष्ट्य असून त्यांच्याकडे जीआय टॅग प्राप्त उत्पादने देखील आहेत.

पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूचा करणार दौरा

November 18th, 11:38 am

पंतप्रधान 19 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा दौरा करणार आहेत.

तिरुप्पुर कुमारन आणि सुब्रमण्य शिव यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली

October 04th, 04:51 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील दोन थोर व्यक्तिमत्त्वांना - तिरुप्पुर कुमारन आणि सुब्रमण्य शिव यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली वाहिली.

तामिळनाडूतील चेन्नई येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

September 30th, 09:48 pm

तमिळनाडूतील चेन्नई येथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी सदिच्छा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेतील बाधितांसाठी पीएमएनआरएफ मधून पंतप्रधानांनी केले सानुग्रह अनुदान जाहीर

September 28th, 12:03 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूत करूर इथे राजकीय मेळाव्यात झालेल्या दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्या प्रत्येकाच्या वारसांना आज पीएमएनआरएफ अर्थात पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्य निधी मधून 2 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. जखमींना सहाय्यापोटी 50,000 रुपये देण्यात येणार आहेत.