पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्कायरूट एरोस्पेस कंपनीला दिल्या शुभेच्छा

July 18th, 09:54 am

भारतात खाजगी क्षेत्राअंतर्गत विकसित केलेल्या विक्रम-1 या पहिल्या कक्षीय प्रक्षेपकाच्या पहिल्या ऐतिहासिक प्रक्षेपणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्कायरूट एरोस्पेस या कंपनीला शुभेच्छा दिल्या आहेत. हा देशाच्या अंतराळ क्षेत्रातील वाटचालीतील एक ऐतिहासिक टप्पा असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. विक्रम-1 च्या प्रक्षेपणामुळे देशाच्या अंतराळ क्षेत्रासंबंधीच्या महत्त्वाकांक्षेसाठी एक नवे दार उघडले जाणार आहे, या प्रक्षेपणातून देशाची नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि उद्योजकता क्षेत्रातील वाढती क्षमता दिसून येते, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Our shared democratic values and common aspirations will take India-Indonesia relations to new heights: PM Modi at Indonesia Parliament

July 07th, 03:15 pm

Addressing the Parliament of Indonesia in Jakarta, PM Modi spoke about the deep civilisational and democratic ties between India and Indonesia. He also highlighted their maritime partnership, proposed the Ganga-Mahakam Vision and called for closer cooperation across development, security and the Global South, while reaffirming a free, open, inclusive and rules-based Indo-Pacific.

पंतप्रधानांनी इंडोनेशियाच्या संसदेला केले संबोधित

July 07th, 03:00 pm

पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाची सुरुवात इंडोनेशियाचे अध्यक्ष महामहीम प्रबोवो सुबियांतो यांच्या सन्माननीय उपस्थितीबद्दल त्यांचे, आणि संसदेच्या अध्यक्षा महामहीम पुआन महारानी यांनी दिलेल्या अगत्यपूर्ण आमंत्रणाबद्दल व भारत-इंडोनेशिया भागीदारीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल आभार मानून केली. भारताच्या 1.4 अब्ज जनतेच्या वतीने खासदारांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, 'लोकशाहीची जननी' या नात्याने भारत इंडोनेशियासोबतचे लोकशाही संबंध अधिक दृढ करण्यासाठी उत्सुक आहे. दोन्ही देशांमधील सखोल सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सागरी संबंध अधोरेखित करत, दोन सहस्रकांहून अधिक काळ हिंदी महासागराने विचार, व्यापार, संस्कृती आणि श्रद्धेच्या देवाणघेवाणीद्वारे भारत आणि इंडोनेशियाला जोडले असल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. 'वसुधैव कुटुंबकम्' आणि 'भिन्नेक तुंगल इका' (विविधतेत एकता) या दोन्ही देशांच्या समान आदर्शांचा उल्लेख करत त्यांनी स्पष्ट केले की, ही मूल्ये आजही दोन्ही देशांमधील भागीदारीला दिशा देत आहेत. ते पुढे म्हणाले की, समान ऐतिहासिक प्रवास, समान आव्हाने आणि दोन्ही देशांतील जनतेच्या समान आकांक्षा यामुळे भारत आणि इंडोनेशिया नैसर्गिक आणि विश्वासू भागीदार म्हणून एकत्र आले आहेत

पंतप्रधानांची सेशेल्सला अधिकृत भेट

June 28th, 08:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 27 ते 29 जून 2026 या कालावधीतील सेशेल्सच्या अधिकृत दौऱ्याचा एक भाग म्हणून, आज व्हिक्टोरिया, माहे येथील 'स्टेट हाऊस'मध्ये आयोजित बैठकीत पंतप्रधान आणि सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्यात अधिकृत चर्चा झाली. या चर्चेत द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंचा समावेश होता. आरोग्य, शिक्षण, क्षमता बांधणी, डिजिटल परिवर्तन, शाश्वत विकास, सामाजिक पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा, सागरी सुरक्षा आणि संरक्षण या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली. तसेच, त्यांनी प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवरही चर्चा केली; यामध्ये बेकायदेशीर मासेमारी, अमली पदार्थांची तस्करी आणि समुद्री चाचेगिरी यांसह हिंदी महासागर क्षेत्रातील आव्हाने या मुदद्यांचाही समावेश होता. भारताने जाहीर केलेल्या विशेष आर्थिक पॅकेजअंतर्गत विविध प्रकल्प आणि उपक्रमांच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रगतीबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले.

पंतप्रधानांचा सेशेल्स दौरा : फलनिष्पत्तीची यादी

June 28th, 08:17 pm

सेशेल्स सरकारला एक जलदगती गस्ती नौका भेट म्हणून देणे

स्लोव्हाकिया च्या पंतप्रधानांसोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी केलेले निवेदन

June 15th, 03:00 pm

माझा हा दौरा, कोणत्याही भारतीय पंतप्रधानाचा स्लोव्हाकियाचा पहिला दौरा आहे. या ऐतिहासिक प्रसंगी, आम्ही आपल्या संबंधांना सर्वसमावेशक भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे, यांचाही मला आनंद आहे. हे आमच्यातील परस्पर विश्वास, सामाईक प्राधान्यक्रम आणि सामाईक भविष्याचे प्रतीक आहे.

Bharat Innovates is becoming a bridge between Indian talent and European capital: PM Modi in Nice, France

June 14th, 04:36 pm

PM Modi and French President Emmanuel Macron jointly inaugurated Bharat Innovates 2026 in Nice, France. Addressing a gathering, PM Modi highlighted India’s deep-tech revolution and the transformative potential of AI, satellite technology, advanced manufacturing and clean energy. He called for trusted, inclusive and human-centric innovation, while reaffirming India’s vision of becoming a global innovation hub.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘भारत इनोव्हेट्स 2026’ मध्ये झाले सहभागी

June 14th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी आज फ्रान्समधील नीस येथील पॅलेस डे एक्स्पोझिशन्स येथे 'भारत इनोव्हेट्स 2026' या कार्यक्रमाचे संयुक्तपणे उद्घाटन केले. भारत इनोव्हेट्स हा तीन दिवसीय कार्यक्रम, जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या नवोन्मेष निधी आणि प्रभावासह भारतीय डीप-टेक स्टार्टअप्स, नवोन्मेषक, संशोधक आणि गुंतवणूकदारांना एकत्र आणणारा मंच आहे. जागतिक स्तरावर भारताचे अग्रगण्य डीप तंत्रज्ञान प्रदर्शित करणाऱ्या या कार्यक्रमात जागतिक महत्त्वाच्या 13 महत्त्वपूर्ण तंत्रज्ञान स्तंभांमधील 120 पथदर्शी स्टार्टअप्स आणि 20 हून अधिक उत्कृष्ट संशोधन संस्थांच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले आहे. जगभरातील 350 हून अधिक आघाडीचे गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

पंतप्रधानांचा संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीचा दौरा ( 15 मे - 20 मे, 2026)

May 11th, 09:00 pm

पंतप्रधान मोदी 15 मे ते 20 मे 2026 या कालावधीत युएई, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटलीला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते युएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतील आणि विविध विषयांवर विचारांची देवाणघेवाण करतील. नेदरलँड्समध्ये पंतप्रधान राजा विलेम-अलेक्झांडर यांची भेट घेतील आणि पंतप्रधान रॉब जेटन यांच्याशी चर्चा करतील. स्वीडनमध्ये ते पंतप्रधान क्रिस्टरसन यांच्याशी संवाद साधतील. नॉर्वेमध्ये ते राजा हॅराल्ड 5 वे यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. त्यानंतर, ते इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करण्यासाठी इटलीला भेट देतील.

नवी दिल्ली येथे वीर बाल दिवस कार्यक्रमामधील पंतप्रधानांचे संबोधन

December 26th, 01:30 pm

केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी अन्नपूर्णा देवी, सावित्री ठाकूर, रवनीत सिंह, हर्ष मल्होत्रा, दिल्ली सरकारचे मंत्री महोदय, इतर मान्यवर, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे उपस्थित असलेले सर्व अतिथी आणि माझ्या प्रिय बालकांनो !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीर बाल दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले

December 26th, 01:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत भारत मंडपम येथे 'वीर बाल दिना’निमित्त आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाला संबोधित केले. कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधानांनी देशभरातून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले आणि उपस्थित मुलांना संबोधित केले. ते म्हणाले की, आज देश वीर बाल दिवस साजरा करत आहे. यावेळी सादर झालेल्या वंदे मातरम या गीताच्या सुंदर सादरीकरणातून कलाकारांची निष्ठा आणि प्रयत्न ठळकपणे दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

ओमानमधील भारतीय विद्यार्थी आणि भारतीय समुदायाला पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मजकूर

December 18th, 12:32 pm

तुम्हा युवकांचा जोश आणि ही ऊर्जा, इथले सारे वातावरण खऱ्या अर्थाने चैतन्यमय झाले आहे. या सभागृहात पुरेशी जागा नसल्यामुळे जे बंधू आणि भगिनी आत येऊ शकले नाहीत व जवळच्या हॉल मध्ये स्क्रीनवर हा प्रोग्रॅम लाईव्ह पाहत आहेत, त्यांनाही मी नमस्कार करतो. तुम्ही कल्पना करू शकता की इथपर्यंत येऊनही त्यांना सभागृहात प्रवेश मिळू न शकल्याने त्यांच्या मनात काय भावना असतील, याची आपण कल्पनाच करू शकतो.

पंतप्रधानांनी ओमानमधील भारतीय समुदायाला केले संबोधित

December 18th, 12:31 pm

पंतप्रधानांनी आज मस्कतमध्ये भारतीय समुदायाच्या मोठ्या समूहाला संबोधित केले. या श्रोत्यांमध्ये विविध भारतीय शाळांमधील 700 हून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे वर्ष ओमानमधील भारतीय शाळांसाठी विशेष महत्त्वपूर्ण आहे, कारण यंदा या देशातील आपला 50 वा वर्धापनदिन त्या साजरा करत आहेत.

जोहनिबर्ग येथे जी-20 शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधानांनी घेतली कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट

November 23rd, 09:41 pm

दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथे सुरु असलेल्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी भारत आणि कॅनडामधील भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला.

जी-20 परिषदेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निवेदन: सत्र 3

November 23rd, 04:05 pm

तंत्रज्ञान जसे पुढे जात आहे, तसे संधी आणि संसाधने काही मोजक्या हातांत केंद्रित होत आहेत. जगात महत्वपूर्ण तंत्रज्ञानावरुन संघर्ष वाढत आहे. हे मानवतेसाठी चिंतेचे कारण तर आहेच, पण नवोन्मेषाच्या मार्गातही अडथळा आहे. यावर उपाय शोधण्यासाठी आपली विचारसरणीत मूलभूत बदल करावे लागतील.

"सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य" या विषयावरील जी20 सत्रात पंतप्रधानांचे संबोधन

November 23rd, 04:02 pm

पंतप्रधानांनी आज सर्वांसाठी न्याय्य आणि योग्य भविष्य - महत्त्वपूर्ण खनिजे; सन्मानजनक रोजगार; कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावरील जी20 शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केले. महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचा ज्या प्रकारे प्रसार केला जातो, त्यामध्ये मूलभूत बदल करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले. त्यांनी नमूद केले की, असे तंत्रज्ञान 'वित्त-केंद्रित' ऐवजी 'मानव-केंद्रित', 'राष्ट्रीय' ऐवजी 'जागतिक' आणि 'बंदिस्त प्रारुपां' ऐवजी 'मुक्त स्त्रोत' प्रणालीवर आधारित असले पाहिजे. हा दृष्टिकोन भारताच्या तंत्रज्ञान परिसंस्थेत समाविष्ट केला गेला आहे आणि त्याचे महत्त्वपूर्ण फायदे झाले आहेत, मग ते अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर असो, कृत्रिम बुद्धिमत्ता असो किंवा डिजिटल व्यवहार असो, जिथे भारत जागतिक नेता आहे, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान 3 नोव्हेंबर रोजी उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद 2025 चे करणार उद्घाटन

November 02nd, 09:29 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषदेचे (ईएसटीआयसी) 2025 चे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान याप्रसंगी उपस्थितांना संबोधित देखील करतील.

भारत-युके सीईओ फोरममध्ये पंतप्रधानांनी केलेले भाषण

October 09th, 04:41 pm

आज भारत-युके सीईओ फोरमच्या बैठकीत सहभागी होणे ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. सर्वप्रथम मी पंतप्रधान स्टार्मर यांच्या मौलिक विचारांबद्दल त्यांचे आभार मानतो.

पंतप्रधानांचा शुभांशू शुक्ला यांच्यासोबतचा संवाद

August 19th, 09:43 am

तर तुम्हाला काही बदल जाणवत असतील, तुम्ही लोक कुठल्या प्रकारच्या अनुभवातून जाता, ते मी समजू इच्छितो.

पंतप्रधानांनी अंतराळवीर शुभांशु शुक्ला याच्याशी साधला संवाद

August 19th, 09:42 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ नवी दिल्ली येथे अंतराळवीर शुभांशु शुक्ला याच्याशी संवाद साधला. अंतराळ प्रवासाच्या परिवर्तनकारी अनुभवाबाबत मत व्यक्त करताना पंतप्रधान म्हणाले की असा महत्त्वाचा प्रवास केल्यानंतर, कोणत्याही व्यक्तीला बदल जाणवतच असेल. आणि अंतराळवीरांना हे परिवर्तन कसे वाटते आणि ते या परिवर्तनाचा कसा अनुभव घेतात हे समजून घ्यायला मला आवडेल. पंतप्रधानांच्या मतावर प्रतिक्रिया व्यक्त करत शुभांशु शुक्ला म्हणाले की अंतराळातील वातावरण अत्यंत वेगळ्या प्रकारचे असून, गुरुत्वाकर्षण शक्तीचा अभाव हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.