पंतप्रधानांनी राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना वाहिली आदरांजली

January 30th, 01:54 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राजघाटावर राष्ट्रपिता गांधी यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, बापूंचे कालातीत आदर्श आपल्या राष्ट्राच्या वाटचालीस मार्गदर्शन करत आहेत. आम्ही त्यांच्या तत्त्वांप्रमाणे आणि न्याय, सलोखा तसेच मानवतेच्या सेवेवर आधारित भारताच्या निर्मितीसाठी आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

भारत सरकार आणि फिलीपिन्स सरकार यांच्यातील धोरणात्मक भागीदारीच्या स्थापनेबाबत घोषणा

August 05th, 05:23 pm

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून फिलीपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनेंड आर. मार्कोस ज्युनिअर यांनी 4-8 ऑगस्ट 2025 दरम्यान भारताचा दौरा केला. राष्ट्राध्यक्ष मार्कोस यांच्यासमवेत फर्स्ट लेडी लुईस अरनेटा मार्कोस, आणि उच्चस्तरीय अधिकृत शिष्टमंडळ होते, ज्यामध्ये फिलीपिन्सचे अनेक कॅबिनेट मंत्री आणि उच्चस्तरीय व्यावसायिक प्रतिनिधीमंडळाचा समावेश होता.

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली

October 02nd, 03:43 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळी जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

मन की बात (मराठी अनुवाद) 105वा भाग

September 24th, 11:30 am

‘मन की बात’च्या आणखी एका भागात मला तुमच्यासोबत देशाचे यश, देशवासियांचे यश, त्यांचा प्रेरणादायी जीवन प्रवास याबाबत बोलण्याची संधी मिळाली आहे. सध्या मला आलेली बहुतेक पत्रं आणि संदेश, मुख्यत्वेकरुन याच दोन विषयांवर आहेत. पहिला विषय म्हणजे चंद्रयान-3चे यशस्वी अवतरण आणि दुसरा विषय जी-20चे दिल्लीतील यशस्वी आयोजन. मला देशाच्या प्रत्येक भागातून, समाजातील प्रत्येक घटकाकडून, सर्व वयोगटातील लोकांकडून असंख्य पत्रे मिळाली आहेत. चंद्रयान-3चे लँडर चंद्रावर उतरत असताना कोट्यवधी लोक एकाच वेळी वेगवेगळ्या माध्यमातून या घटनेच्या क्षणाक्षणाचे साक्षीदार होत होते. इस्रोच्या यू-ट्यूब लाईव्ह वाहिनीवर 80 लाखांहून अधिक लोकांनी ही घटना थेट पाहिली, हा एक विक्रमच आहे. यावरून हे लक्षात येते की, कोट्यवधी भारतीयांचं चंद्रयान-3 सोबत किती गहिरं नातं आहे. चांद्रयानाच्या या यशावर आधारीत, देशात सध्या एक अतिशय सुंदर अशी प्रश्नमंजुषा स्पर्धा सुरू आहे, प्रश्नांची उत्तरे देण्याची स्पर्धा आणि तिचं नाव आहे - 'चंद्रयान-3 महाक्विझ'. MyGov पोर्टलवर होत असलेल्या या स्पर्धेत आतापर्यंत 15 लाखांहून अधिक लोकांनी भाग घेतला आहे. MyGov सुरु झाल्यानंतर कोणत्याही प्रश्नमंजुषा स्पर्धेमधला हा सर्वात मोठा सहभाग आहे. मी तुम्हालाही विनंती करेन की तुम्ही अद्याप यात सहभागी झाला नसाल तर उशीर करू नका, अजून सहा दिवस शिल्लक आहेत. या प्रश्नमंजुषेमध्ये जरूर भाग घ्या.

G20 राष्ट्रप्रमुखांनी राजघाट इथे महात्मा गांधी यांना अर्पण केली आदरांजली

September 10th, 12:26 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि G20 सदस्य राष्ट्रांच्या नेत्यांनी आज ऐतिहासिक राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. गांधीजींचे कालातीत आदर्श सुसंवादी, समावेशक आणि समृद्ध जागतिक भवितव्यासाठी सामुदायिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.