पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात कोईम्बतूर, छत्तीसगड, गुजरात आणि आसाममधील विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाची क्षणचित्रे केली सामायिक

February 10th, 05:06 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2026 मधील परीक्षा पे चर्चा (PPC) या कार्यक्रमाच्या 9 व्या आवृत्तीत विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाची काही क्षणचित्रे सामायिक केली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागादरम्यान कोईम्बतूर, छत्तीसगड, गुजरात आणि आसाममधील एक्झाम वॉरियर्स (Exam Warriors) सोबत अनौपचारिक संवाद साधला. परीक्षा पे चर्चाच्या या विशेष आवृत्तीत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी हा कार्यक्रम देशाच्या विविध भागांमध्ये आयोजित केला गेल्याचे नमूद केले.

‘परीक्षा पे चर्चा 2026’ कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागामध्ये पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाचा मजकूर

February 09th, 10:30 am

माझ्या प्रिय मित्रांनो, 'परीक्षा पे चर्चा' च्या या महत्त्वपूर्ण भागात तुमचे स्वागत आहे. यावेळचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रम काहीतरी वेगळा आहे, काहीतरी खास आहे. अनेक विद्यार्थ्यांनी मला सूचना पाठवल्या होत्या की देशाच्या वेगवेगळ्या भागांतही परीक्षा पे चर्चा व्हायला पाहिजे. म्हणून यावेळी मी देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये विद्यार्थ्यांसोबत बसून परीक्षा पे चर्चा केली आहे. या विशेष भागात तुम्हाला हेच पाहायला मिळणार आहे. तर चला प्रथम तामिळनाडूतील कोइम्बतूरला जाऊया. तामिळनाडूतील विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि उत्सुकता पाहून मी खूप प्रभावित झालो. चला, पाहूया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात कोईम्बतूर, रायपूर, देवमोगरा आणि गुवाहाटी येथील विद्यार्थ्यांशी साधला संवाद

February 09th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परीक्षा पे चर्चा 2026 च्या 9 व्या आवृत्तीला पुढे सुरू ठेवत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. परीक्षा पे चर्चा 2026 च्या दुसऱ्या भागात पंतप्रधानांनी कोईम्बतूर, रायपूर, देवमोगरा आणि गुवाहाटी येथील 'एक्झॅम वॉरियर्स'शी अनौपचारिक संवाद साधला. 'परीक्षा पे चर्चा'च्या या विशेष आवृत्तीत विद्यार्थ्यांचे स्वागत करताना श्री मोदी यांनी नमूद केले की, यावेळी हा कार्यक्रम देशाच्या विविध भागांत आयोजित करण्यात आला आहे. कोईम्बतूर आवृत्तीची सुरुवात करताना पंतप्रधानांनी नमूद केले की, तामिळनाडूच्या विद्यार्थ्यांमधील ऊर्जा आणि कुतूहलाने ते मनापासून प्रभावित झाले आहेत. वणक्कम म्हणून त्यांचे स्वागत करत त्यांनी हलकाफुलका संवाद साधला. विद्यार्थ्यांनी आपला उत्साह व्यक्त करताना सांगितले की, त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता जेव्हा त्यांनी पंतप्रधानांना पाहिले; त्यांना वाटले होते की पंतप्रधानांचे आगमन खूप नाट्यमय असेल, परंतु त्यांना ते अत्यंत साधे, नम्र आणि जमिनीशी नाते असलेले वाटले. एका विद्यार्थ्याने आपला अनुभव सांगताना म्हटले की, पंतप्रधानांच्या आगमनाच्या वेळी त्यांना कमालीचे दडपण आल्यासारखे वाटत होते.

पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची अमर्याद क्षमता अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित आणि 'परीक्षा पे चर्चा'चा उद्देश केला सामायिक

February 09th, 09:06 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, आपले विद्यार्थी असामान्य प्रतिभेने संपन्न आहेत आणि त्यांच्यामध्ये आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यांनी नमूद केले की, परीक्षा पे चर्चाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांचा वैयक्तिक वाढ आणि यशासाठी अर्थपूर्ण वापर कसा करावा, यावर मार्गदर्शन करणे हा आहे.

“परीक्षा पे चर्चा 2026” कार्यक्रमात पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी साधलेला संवाद

February 06th, 10:21 am

मी सानवी आचार्य, मी तुमच्याच राज्यातून म्हणजे गुजरातमधील आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की, पालक आमची चिंता करतात आणि शिक्षक देखील आम्हाला मदत करतात. मात्र मुख्य मुद्दा तेव्हा येतो , जेव्हा शिक्षक आम्हाला अभ्यासाची एक वेगळी पद्धत सुचवतात. पालक वेगळ्या पद्धतीने सांगतात की या पॅटर्ननुसार अभ्यास करा आणि विद्यार्थ्यांमध्ये तर वेगळाच ट्रेंड सुरु असतो, त्यामुळे त्यावेळी आम्ही गोंधळून जातो की कोणती पद्धत बरोबर आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'परीक्षा पे चर्चा 2026' या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी साधला संवाद

February 06th, 10:00 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'परीक्षा पे चर्चा' (पीपीसी) च्या नवव्या भागात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी दिल्लीतील आपल्या निवासस्थानी 'एक्झाम वॉरियर्स'सोबत अनौपचारिक संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना 6 फेब्रुवारी 2026 रोजी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाचा विशेष भाग पाहण्यासाठी आमंत्रित केले

February 03rd, 04:45 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना 6 फेब्रुवारी 2026 रोजी 'परीक्षा पे चर्चा' या कार्यक्रमाचा विशेष भाग पाहण्यासाठी आमंत्रित केले आहे. भारताच्या तरुणांच्या एकत्रित भावनेचे आणि या संवादाचे साक्षीदार होण्यासाठी त्यांनी हा विशेष भाग पहावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या वर्षीच्या #ParikshaPeCharcha या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी विचार मांडावेत असे पंतप्रधानांचे आवाहन

January 07th, 07:05 pm

दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा परीक्षा पे चर्चा या आपल्या बहुप्रतिक्षित वार्षिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (120 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

March 30th, 11:30 am

माझ्या प्रिय देशबांधवांनो, नमस्कार. आज या अत्यंत शुभ दिवशी मला तुमच्यासोबत 'मन की बात' करण्याची संधी मिळाली आहे. आज चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातली प्रतिपदा तिथी आहे. आजपासून चैत्र नवरात्राला प्रारंभ होत आहे. भारतीय नववर्ष देखील आजपासून सुरू होत आहे. यावेळी विक्रम संवत 2082 (दोन हजार ब्याऐंशी) सुरू होत आहे. सध्या तुमची अनेक पत्रं माझ्यासमोर आहेत. काही बिहारची आहेत, काही बंगालची आहेत, काही तामिळनाडूची तर काही गुजरातची आहेत. यामध्ये लोकांनी त्यांचे विचार अतिशय मनोरंजक पद्धतीनं लिहिले आहेत. अनेक पत्रांमध्ये शुभेच्छा आणि अभिनंदनाचे संदेश देखील आहेत. पण आज मला काही संदेश तुम्हाला ऐकवावेसे वाटत आहेत -

For me, the nation itself is divine and mankind is a reflection of the divine: PM Modi in Lex Fridman Podcast

March 16th, 11:47 pm

PM Modi interacted with Lex Fridman in a podcast about various topics ranging from fasting to his humble beginnings to AI and more. He stressed on the unifying power of sports and said that they connect people on a deeper level and energize the world. He remarked that the management of Indian elections should be studied worldwide.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टमध्ये लेक्स फ्रिडमन यांच्याशी साधला संवाद

March 16th, 05:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका पॉडकास्टच्या माध्यमातून आज अमेरिकी संगणक शास्त्रज्ञ लेक्स फ्रिडमन यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. या मनमोकळ्या संभाषणादरम्यान जेव्हा पंतप्रधानांना विचारण्यात आले की ते उपवास का करतात आणि कशा पद्धतीने करतात तेव्हा मोदी यांनी पंतप्रधानांप्रती आदराचे प्रतीक म्हणून स्वतः उपवास धरण्याच्या लेक्स फ्रिडमन यांच्या कृतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “भारतात धार्मिक परंपरा दैनंदिन जीवनासोबत खोलवर रुजलेल्या आहेत ,” असे पंतप्रधान म्हणाले. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या अर्थानुसार, हिंदुत्व हे केवळ धार्मिक रीतीभातीविषयीचे तत्व नसून जीवनाला मार्गदर्शन करणारे तत्वज्ञान आहे असे त्यांनी सांगितले. उपवास हे शिस्त अंगी बाणवण्यासाठीचे तसेच आंतरिक आणि बाह्य आत्म्याचा समतोल साधण्यासाठीचे साधन आहे यावर मोदी यांनी अधिक भर दिला. उपवास केल्यामुळे आपल्या जाणीवा अधिक संवेदनशील तसेच जागरूक होऊन अधिक प्रखर बनतात असे त्यांनी नमूद केले. उपवासाच्या काळात कोणाकोणाला सूक्ष्म सुगंध आणि तपशील अधिक स्पष्टपणे जाणवतात असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. उपवासामुळे विचार प्रक्रियेला वेग येऊन नवीन दृष्टीकोन सापडत जातात आणि चौकटीबाहेरच्या विचारांना प्रोत्साहन मिळते असे देखील पंतप्रधानांनी अधोरेखित केले. उपवास म्हणजे केवळ अन्न वर्ज्य करणे नव्हे तर त्यामध्ये मनाची तसेच शरीराची तयारी आणि विषारी तत्वांचे निःसारण करण्याची शास्त्रीय प्रक्रिया समाविष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले. कितीतरी दिवस आधीच ते आयुर्वेदिक आणि योग प्रक्रियांचे अनुसरण करून ते उपवासासाठी त्यांच्या शरीराला सज्ज करतात यावर अधिक भर देऊन पंतप्रधान मोदी यांनी या काळात पाणी पीत राहण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की एकदा उपवास सुरु झाला की त्यानंतर ते त्याला भक्ती आणि स्वयंशिस्तीची कृती मानतात आणि त्या काळात सखोल आत्मचिंतन आणि लक्ष एकाग्र करण्यावर भर देतात. पंतप्रधान म्हणाले की त्यांच्या उपवासाचे मूळ वैयक्तिक अनुभवामध्ये असून त्यांच्या शालेय जीवनादरम्यान महात्मा गांधी यांच्या प्रेरणेतून सुरु झालेल्या चळवळीदरम्यान उपवास धरण्याची सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या पहिल्याच उपवासादरम्यान त्यांना उर्जा आणि जागरुकता यामध्ये मोठी वाढ होत असल्याची अनुभूती आली आणि त्यातून उपवासाच्या परिवर्तनशील सामर्थ्याबद्दल त्यांची खात्री झाली असा अनुभव पंतप्रधानांनी सर्वांना सांगितला. उपवासामुळे त्यांच्या क्रिया मंद होत नाहीत तर उलट बहुतेकदा त्यांची उत्पादकता वाढते असे त्यांनी आवर्जून नमूद केले. ते म्हणाले की उपवासादरम्यान त्यांच्या विचारांचा ओघ अधिक मुक्तपणे आणि सर्जकतेसह वाहतो आणि त्यांच्यासाठी तो स्वतःला व्यक्त करण्याचा एक अतुलनीय अनुभव होऊन जातो.

आरोग्य आणि मानसिक शांतीच्या बाबतीत सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे नाव समोर येते : पंतप्रधान नरेंद्र मोदी

February 14th, 08:15 pm

आरोग्य आणि मानसिक शांतीच्या संदर्भात सद्गुरु जग्गी वासुदेव हे नेहमीच सर्वात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले असून सर्वांनी उद्या 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमाचा चौथा भाग पाहावा, असे आवाहन केले आहे.

उद्योजक निखील यांच्यासमवेत पंतप्रधानांनी साधलेल्या संवादाचा मराठीतील अनुवाद

January 10th, 02:15 pm

निखिल कामत – दर महिन्याला मी एक दिवस एक पॉडकास्ट करतो आणि उरलेला महिना काहीच करत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पहिल्या पॉडकास्टमध्ये उद्योजक निखिल कामत यांच्यासोबत साधला संवाद

January 10th, 02:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये उद्योजक आणि गुंतवणूकदार निखिल कामत यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. अतिशय मोकळेपणाने झालेल्या या संवादात त्यांना त्यांच्या बालपणाबद्दल विचारले असता, पंतप्रधानांनी त्यांच्या जीवनातील सुरुवातीच्या काळातील अनुभव आणि उत्तर गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर या छोट्याशा शहराशी त्यांचे फार पूर्वीपासून असलेले संबंध अधोरेखित केले.. त्यांनी नमूद केले की, गायकवाड राज्यातील वडनगर हे गाव तलाव, पोस्ट ऑफिस आणि लायब्ररी यांसारख्या अत्यावश्यक सुविधांसह शिक्षणाच्या बांधिलकीसाठी ओळखले जात होते. गायकवाड राज्य प्राथमिक शाळा आणि भागवताचार्य नारायणाचार्य हायस्कूलमधील शालेय दिवसांच्या आठवणींना पंतप्रधानांनी उजाळा दिला. वडनगरमध्ये बराच काळ व्यतीत करणारा चिनी तत्ववेत्ता झुआंगझांग यांच्यावरील चित्रपटाबद्दल त्यांनी एकदा चिनी दूतावासाला कसे लिहिले याची एक मनोरंजक कथा त्यांनी सामाईक केली. त्यांनी 2014 मध्ये आलेल्या एका अनुभवाचाही उल्लेख केला, ज्यावेळी ते भारताचे पंतप्रधान झाले आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी झु आंग झांग आणि त्यांच्या दोन मूळ शहरांमधील ऐतिहासिक संबंधाचा हवाला देत गुजरात आणि वडनगरला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की हे बंध दोन्ही देशांमधील सामायिक वारसा आणि मजबूत संबंधांना अधोरेखित करत आहेत.

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पहिल्या 'राष्ट्रीय सर्जक पुरस्कार ' वितरण प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

March 08th, 10:46 am

या कार्यक्रमाला उपस्थित माझे मंत्रिमंडळातील सहकारी अश्विनी वैष्णव जी, परीक्षक मंडळातील सदस्य प्रसून जोशी जी, रुपाली गांगुली जी, देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे उपस्थित असलेले सर्व आशय निर्माते , देशातल्या काना - कोपऱ्यात हा कार्यक्रम पाहणारे माझे सर्व तरुण मित्र. आणि इतर सर्व मान्यवर, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे, तुम्हा सर्वांचे अभिनंदन. आणि तुम्ही ते लोक आहात ज्यांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे आणि म्हणूनच तुम्ही आज त्या ठिकाणी आहात – भारत मंडपम. आणि बाहेरील चिन्ह देखील सर्जनशीलतेशी निगडीत आहे आणि हे ते ठिकाण आहे जिथे जी -20 चे सर्व प्रमुख नेते येथे जमले होते, आणि यापुढे जगाला दिशा कशी दाखवायची यावर चर्चा करत होते. आणि आज तुम्ही लोक आहात जे भारताचे भविष्य कसे घडवायचे यावर चर्चा करायला आले आहात.

पंतप्रधानांनी पहिल्या राष्ट्रीय सृजक पुरस्कार विजेत्यांशी साधला संवाद

March 08th, 10:45 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पहिला राष्ट्रीय सृजक पुरस्कार प्रदान केला. विजेत्यांशीही त्यांनी संवाद साधला. सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सर्जनशीलतेचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन म्हणून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.

'परीक्षा पे चर्चा’ची आतुरतेने वाट पाहत आहे: पंतप्रधान

January 27th, 08:10 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणाले की 'परीक्षा पे चर्चा' मध्ये परीक्षा योद्ध्यांना भेटण्याची आतुरतेने वाट पाहत आहे.

परीक्षेच्या ताणाला यशात रुपांतरीत करून परीक्षा योद्ध्यांना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश आहे : पंतप्रधान

December 14th, 11:22 pm

परीक्षेच्या ताणाला यशात रुपांतरीत करून परीक्षा योद्ध्यांना हसत हसत परीक्षा देणे शक्य करणे हा परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

एक्झॅम वॉरियर्स पुस्तिकेचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त ठेवणे हा आहे: पंतप्रधान

February 25th, 09:44 am

एक्झॅम वॉरियर्स पुस्तिकेचा उद्देश विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित सर्व प्रकारच्या तणावापासून मुक्त ठेवणे हा असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यांच्या ट्विटला ते उत्तर देत होते. एक्झॅम वॉरियर्स पुस्तिका वाचल्यानंतर झारखंड येथील कोडरमा गावातील शाळेतील विद्यार्थ्यांना परीक्षेशी संबंधित तणावापासून मुक्त वाटले, असे अन्नपूर्णा देवी यांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले होते.

परीक्षा पे चर्चा संबंधित मंत्र आणि उपक्रमांचे मनोरंजक भांडार पंतप्रधानांनी केले सामायिक

January 12th, 03:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा संबंधित मंत्र आणि उपक्रमांचे एक मनोरंजक भांडार सामाईक केले आहे. यामुळे परीक्षेचा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.