Indian diaspora in Malaysia acts as a living bridge between the two countries PM Modi at the community programme in Kuala Lumpur

February 07th, 03:59 pm

PM Modi participated and addressed a community programme in Malaysia. In his address, the PM lauded the Indian diaspora in Malaysia for being a living bridge between the two countries, describing the India–Malaysia relationship as IMPACT. Having already established the Thiruvalluvar Chair at the University of Malaya, the PM announced the setting up of a Thiruvalluvar Centre in Malaysia.

PM Modi addresses a community programme in Kuala Lumpur, Malaysia

February 07th, 03:15 pm

PM Modi participated and addressed a community programme in Malaysia. In his address, the PM lauded the Indian diaspora in Malaysia for being a living bridge between the two countries, describing the India–Malaysia relationship as IMPACT. Having already established the Thiruvalluvar Chair at the University of Malaya, the PM announced the setting up of a Thiruvalluvar Centre in Malaysia.

केंद्रीय अर्थसंकल्पावर पंतप्रधानांची प्रतिक्रिया

February 01st, 01:38 pm

आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक आहे; यातून देशातील महिलांच्या शक्तीचे सशक्त प्रतिबिंब झळकते. महिला अर्थमंत्री म्हणून निर्मलाजींनी सलग नवव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. हा अर्थसंकल्प अफाट संधींचा राजमार्ग आहे. हा अर्थसंकल्प वर्तमानातील स्वप्ने साकार करतो आणि भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया मजबूत करतो. हा अर्थसंकल्प 2047 च्या विकसित भारताच्या दिशेने उंच भरारीचा एक मजबूत पाया आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अर्थसंकल्प 2026-27 विषयी व्यक्त केलेली प्रतिक्रिया

February 01st, 01:00 pm

आज मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 विषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्‍य माध्‍यमाव्दारे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. आजचा अर्थसंकल्प ऐतिहासिक असून त्यात देशातील सक्षम महिलांच्या भावनांचे प्रतिबिंब दिसत आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या देशाचा अर्थसंकल्प सलग नऊ वेळा सादर करणाऱ्या पहिल्या महिला अर्थमंत्री असून, हा एक विक्रम आहे असे त्यांनी अधोरेखित केले. हा अर्थसंकल्प म्हणजे अनंत संधींनी परिपूर्ण असा एक महामार्ग असून भारताच्या वर्तमानातील स्वप्ने पूर्ण करणारा तसेच उज्वल भवितव्याची पायाभरणी करणारा आहे, असे ते म्हणाले. हा अर्थसंकल्प वर्ष 2047 पर्यंत विकसित भारत बनण्याच्या संकल्पाकडे झेप घेण्यास देशाची तयारी करत आहे, असे त्यांनी म्हटले.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण

January 29th, 10:15 am

काल राष्ट्रपतींचे अभिभाषण हे 140 कोटी देशवासीयांच्या आत्मविश्वासाचे प्रतिबिंब होते, 140 कोटी देशवासीयांच्या परिश्रमांचा लेखाजोखा होते आणि 140 कोटी देशवासीयांपैकी विशेषतः तरुणांच्या आकांक्षा अधोरेखित करणारे अत्यंत अचूक अभिभाषण होते. तसेच सर्व खासदारांसाठी मार्गदर्शक ठरणाऱ्या अनेक बाबी राष्ट्रपतींनी काल सभागृहासमोर मांडल्या. अधिवेशनाच्या प्रारंभीच आणि 2026 च्या सुरुवातीलाच राष्ट्रपतींनी खासदारांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या, त्यांनी राष्ट्रप्रमुख म्हणून आपल्या भावना अतिशय सोप्या शब्दांत मांडल्या आहेत, मला पूर्ण विश्वास आहे की सर्व माननीय खासदारांनी त्या अतिशय गांभीर्याने घेतल्या असतील. हे अधिवेशन खरोखरच अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. 21व्या शतकाचा एक चतुर्थांश काळ पूर्ण झाला आहे आणि दुसऱ्या चतुर्थांशाची सुरुवात होत आहे. 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ हे लक्ष्य साध्य करण्यासाठीचे महत्त्वाचे 25 वर्षांचे पर्व आता सुरू होत आहे. या शतकाच्या दुसऱ्या चतुर्थांशातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. तसेच अर्थमंत्री निर्मला जी या देशाच्या अशा पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत, ज्या सलग नवव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा क्षण भारताच्या संसदीय इतिहासात गौरवाचा क्षण म्हणून नोंदला जात आहे.

2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संबोधन

January 29th, 10:00 am

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आज संसद परिसरात 2026 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीपूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी नमूद केले की, राष्ट्रपतींचे अभिभाषण हे 140 कोटी नागरिकांच्या आत्मविश्वासाची अभिव्यक्ती, त्यांच्या परिश्रमाचे सिंहावलोकन आणि तरुणांच्या आकांक्षांचे अचूक प्रतिबिंब आहे. राष्ट्रपतींनी अधिवेशनाच्या आणि 2026 या वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच सर्व संसद सदस्यांसमोर अनेक मार्गदर्शक मुद्दे मांडले आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले. राष्ट्रप्रमुख म्हणून राष्ट्रपतींनी साध्या शब्दांत व्यक्त केलेल्या अपेक्षा सर्व खासदारांनी निश्चितपणे गांभीर्याने घेतल्या असतील, ज्यामुळे हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे ठरेल, असे मोदी यांनी सांगितले. त्यांनी यावर भर दिला की, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन 21 व्या शतकातील पहिल्या तिमाहीची समाप्ती आणि दुसऱ्या तिमाहीची सुरुवात दर्शवत आहे, यावर त्यांनी भर दिला. 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी पुढील 25 वर्षे अत्यंत महत्त्वाची आहेत आणि हा अर्थसंकल्प या शतकातील दुसऱ्या तिमाहीतील पहिला अर्थसंकल्प आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. पंतप्रधानांनी आवर्जून नमूद केले की, देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या संसदेत सलग 9 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत, जो भारताच्या संसदीय इतिहासातील एक अभिमानास्पद क्षण आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत भारतीय अर्थव्यवस्था आणि आपण हाती घेत असलेल्या सुधारणांची दिशा यांचे अत्यंत स्पष्ट चित्र उभे केले आहे: पंतप्रधान

February 15th, 04:00 pm

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केलेल्या भाषणाची प्रशंसा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, या भाषणातून भारतीय अर्थव्यवस्था आणि आपण हाती घेत असलेल्या सुधारणांची दिशा यांचे अत्यंत स्पष्ट चित्र उभे राहते.

केंद्रीय अर्थसंकल्पावरील पंतप्रधानांच्या टिप्पणीचा मजकूर

February 01st, 03:00 pm

आज भारताच्या विकास प्रवासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हा 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचा अर्थसंकल्प आहे. हा प्रत्येक भारतीयाचे स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प आहे. आम्ही अनेक क्षेत्रे तरुणाईसाठी खुली केली आहेत. सामान्य नागरिक, विकसित भारताच्या मोहिमेला पुढे घेऊन जाणार आहे. हा अर्थसंकल्प एक फोर्स मल्टिप्लायर म्हणजे बळ बहुगुणीत करणारा आहे. या अर्थसंकल्पामुळे बचत वाढेल, गुंतवणूक वाढेल, वापर वाढेल आणि विकासालाही गती मिळेल. मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन जी आणि त्यांच्या संपूर्ण चमूचे , हा जनता जनार्दनाचा अर्थसंकल्प… लोकांचा अर्थसंकल्प दिल्याबद्दल खूप खूप अभिनंदन करतो.

केंद्रिय अर्थसंकल्प 2025-26 वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया

February 01st, 02:30 pm

आर्थिक वर्ष 2025-26 च्या केंद्रिय अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. भारताच्या विकासाच्या प्रवासातला हा मैलाचा दगड असल्याचा मुद्दा अधोरेखित करुन मोदी म्हणाले की, या अर्थसंकल्पात 140 कोटी भारतीयांच्या आशाआकांक्षा प्रतिबिंबित झाल्या आहेत आणि प्रत्येक नागरिकांचे स्वप्न यामुळे पूर्ण होईल. युवकांसाठी विविध क्षेत्रांची दारं खुली झाली आहेत आणि विकसित भारत हे अभियान आता सामान्य नागरिक पुढे नेतील. हा अर्थसंकल्प देशाचे सामर्थ्य कित्येक पटींनी वाढवणारा आहे. बचत, गुंतवणूक, क्रयशक्ती आणि विकास यामध्ये यामुळे वाढ होईल या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. जनतेचा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल त्यांनी केंद्रिय अर्थ आणि आर्थिक व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

81% of India Inc. Backs PM’s Internship Scheme: Nirmala Sitharaman Praises Industry’s Game-Changing Support!

January 17th, 04:34 pm

Union Minister of Finance and Corporate Affairs, Nirmala Sitharaman, praised the overwhelming response from corporate India to the Prime Minister’s Internship Scheme, citing its transformative potential for the youth and the country’s economy. Speaking on the reports that highlight an impressive 81% support from India Inc. for the scheme, the Minister expressed confidence that the initiative would bridge the gap between education and employability while advancing a culture of skill development through Corporate Social Responsibility (CSR).

ग्रामीण भारतातील क्रेडिट-चलित खपातील वाढीची निर्मला सीतारामन यांच्याकडून प्रशंसा, आपल्या देशाच्या आर्थिक विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्यासाठी ग्रामीण भागातील गरिबांना साधने दिल्याचे पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन

October 02nd, 09:19 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक समावेशन धोरणाचे जोरदार समर्थन करत, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज ग्रामीण भारतातील क्रेडिट-चालित वापरामध्ये झालेल्या उल्लेखनीय वाढीबद्दल आनंद व्यक्त केला. मुख्यतः प्रधानमंत्री जन धन योजने (PMJDY) अंतर्गत उघडण्यात आलेली नवीन बँक खाती आणि ग्राहक वित्त क्षेत्रात खोलवर झालेला प्रसार या मोठ्या वाढीस कारणीभूत असल्याचे सांगत सीतारामन यांनी हा क्रांतिकारक बदल असल्याचे म्हटले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून FY-23 मध्ये भारतातील उत्पादनात 7.6%, वेतनात 5.5%, GVA मध्ये 21% झालेल्या वाढीचे स्वागत

October 01st, 08:11 pm

वित्तीय वर्ष-23 मध्ये उत्पादन क्षेत्रातील नोकऱ्या आणि कामगारांच्या रोजंदारीत अलीकडेच नोंदवल्या गेलेल्या उल्लेखनीय वाढीचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कौतुक केले. एका सरकारी सर्वेक्षणानुसार, आर्थिक वर्ष-23 मध्ये उत्पादन क्षेत्रातील रोजगारांमध्ये 7.6% तर मोबदल्यात 5.5% वाढ झाली.

Viksit Bharat Ambassador Campus Dialogue, Chennai at VELS University

April 02nd, 05:30 pm

The Viksit Bharat Ambassador Campus Dialogue was held at VELS University in Chennai. Over 1,000 students from perse s and more than 20 entrepreneurs, professionals, and actors from the city attended the event. Notable attendees included representatives from FICCI, FLO, EO, and YPO.

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी केलेले भाषण

January 31st, 10:45 am

या नव्या संसद भवनात जे पहिले अधिवेशन झाले होते, त्याच्या शेवटच्या दिवसात या संसदेने एक मोठा गौरवशाली निर्णय घेतला होता, आणि तो निर्णय होता - नारी शक्ती वंदन कायदा. आणि त्यानंतर 26 जानेवारीला देखील आपण पाहिले, कशाप्रकारे देशाने कर्तव्यपथावर नारी शक्ती सामर्थ्याचा, नारी शक्तीच्या शौर्याचा, नारी शक्तीच्या संकल्पाच्या शक्तीचा अनुभव घेतला. आणि आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे तेव्हा राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांचे मार्गदर्शन आणि उद्या निर्मला सीतारामन जी यांच्याद्वारे हंगामी अर्थसंकल्प सादर केला जाणे, हा एक प्रकारे नारीशक्तीच्या साक्षात्काराचाच पर्व आहे.

संसदेच्या अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांसमोर केलेले निवेदन

January 31st, 10:30 am

यावेळी बोलताना पंतप्रधानांनी संसदेच्या नवीन इमारतीत झालेल्या पहिल्या अधिवेशनाचे स्मरण केले आणि या पहिल्या अधिवेशनात घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांवर प्रकाश टाकला. महिला सक्षमीकरणाचा नारीशक्ती वंदन कायदा संमत होणे हा आपल्या देशासाठी एक महत्त्वाचा क्षण आहे.” असे मोदी म्हणाले. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचा संदर्भ देत त्यांनी, नारी शक्तीचे सामर्थ्य, शौर्य आणि दृढनिर्धार याची अनुभूती देशाने घेतली आहे असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाचे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अंतरिम अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि त्याचे महिला सक्षमीकरणाचा उत्सव असे वर्णन केले.

केंद्रीय अर्थसंकल्प 2023 वरील पंतप्रधानांचे विवेचन

February 01st, 02:01 pm

अमृत काळातील हा पहिला अर्थसंकल्प विकसित भारताचा भव्य संकल्प पूर्ण करण्यासाठी एक मजबूत पाया तयार करेल. हा अर्थसंकल्प वंचितांना प्राधान्य देतो. हा अर्थसंकल्प आजचा आकांक्षित समाज- गाव-गरीब, शेतकरी, मधम वर्ग, सर्वांची स्वप्न पूर्ण करेल.

वंचितांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प : पंतप्रधान

February 01st, 02:00 pm

अमृत काळातला पहिला अर्थसंकल्प, विकसित भारताच्या आकांक्षा आणि निर्धार यांच्या पूर्ततेचा भक्कम पाया घालत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. वंचितांना प्राधान्य देणारा हा अर्थसंकल्प असून आकांक्षी समाज,गरीब आणि मध्यम वर्गांच्या स्वप्नांची पूर्तता करेल असे पंतप्रधान म्हणाले.

भारत-सिंगापूर संयुक्त मंत्रिस्तरीय प्रतिनिधीमंडळाने घेतली पंतप्रधानांची भेट

September 19th, 08:19 pm

सिंगापूरचे उपपंतप्रधान आणि अर्थमंत्री लॉरेन्स वोंग, सिंगापूरचे व्यापार आणि उद्योग मंत्री गुन किम योंग आणि भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा समावेश असलेल्या भारत-सिंगापूर संयुक्त मंत्रीस्तरीय प्रतिनिधीमंडळाने आज पंतप्रधानांची भेट घेतली. नवी दिल्ली येथे आज 17 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित भारत-सिंगापूर मंत्रीस्तरीय गोलमेज परिषदेच्या (आयएसएमआर ) उद्घाटन सत्राच्या फलश्रुतीबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली. लॉरेन्स वोंग यांची उपपंतप्रधान म्हणून ही पहिलीच भारत भेट आहे.

India ended three decades of political instability with the press of a button: PM Modi in Berlin

May 02nd, 11:51 pm

PM Narendra Modi addressed and interacted with the Indian community in Germany. PM Modi said that the young and aspirational India understood the need for political stability to achieve faster development and had ended three decades of instability at the touch of a button.

पंतप्रधानांनी जर्मनीतील भारतीय समुदायाशी साधला संवाद

May 02nd, 11:50 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्लिन येथील पॉट्सडेमर प्लॅट्झ या थिएटरमध्ये जर्मनीतील भारतीय समुदायाला संबोधित केले आणि संवाद साधला. विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांचा समावेश असलेल्या जर्मनीतील यशस्वी भारतीय समुदायातील 1600 हून अधिक सदस्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला. जर्मनीच्या अर्थव्यवस्थेत आणि समाजातील त्यांच्या योगदानाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. जागतिक स्तरावर भारतीय उत्पादनांचा प्रचार करून भारताच्या वोकल फॉर लोकल उपक्रमात योगदान देण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.