When there is a government with the resolution of Nation First, then national heroes also get due respect: PM Modi

July 06th, 06:47 pm

PM Modi paid tribute to Dr. Syama Prasad Mookerjee on his 125th birth anniversary, saying his vision continues to inspire a united India. He recalled Dr. Mookerjee's firm opposition to Do Vidhan, Do Pradhan, Do Nishan and said the abrogation of Article 370 fulfilled his dream of complete national integration.

PM Modi addresses 125th Janma Jayanti of Dr. Syama Prasad Mookerjee

July 06th, 06:17 pm

PM Modi paid tribute to Dr. Syama Prasad Mookerjee on his 125th birth anniversary, saying his vision continues to inspire a united India. He recalled Dr. Mookerjee's firm opposition to Do Vidhan, Do Pradhan, Do Nishan and said the abrogation of Article 370 fulfilled his dream of complete national integration.

New India's resolve helped overcome the 21st century's biggest energy crisis: PM Modi in Balotra, Rajasthan

July 04th, 12:50 pm

Addressing a public gathering in Balotra, Rajasthan, PM Modi highlighted Rajasthan's development journey, including the dedication of the Rajasthan Refinery, expansion of connectivity, water projects, renewable energy and employment initiatives. He also spoke about India's efforts to ensure energy security during the global crisis and reaffirmed the government's commitment to a self-reliant India.

राजस्थानातील बालोत्रा येथे सुमारे 1.06 लाख कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी

July 04th, 12:30 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील बालोत्रा येथे सुमारे 1.06 लाख कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी, या विकास प्रकल्पांमध्ये सर्वांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. रणरणत्या उन्हातही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त करत पंतप्रधान, या अभूतपूर्व गर्दीला सध्याच्या शासनावर जनतेने लावलेली विश्वासाची मोहोर, असे म्हणाले. तुमच्या या अफाट पाठिंब्याबद्दल मी राजस्थानच्या मातीचा सदैव ऋणी राहीन. हे तुमचे प्रेम आमच्या सरकारच्या प्रयत्नांवर असलेल्या अतूट विश्वासाची साक्ष देते, अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधानांनी चिकाटी आणि दृढनिश्चयाच्या शक्तीवर प्रकाश टाकणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले

May 27th, 08:36 am

सातत्यपूर्ण प्रयत्न, संयम आणि दृढ निश्चयाने मोठी ध्येयेही साध्य करता येतात असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले आहे. आज देशातील जनता याच मार्गदर्शनाने प्रेरित होऊन भारताला नव्या उंचीवर नेत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात घेतले दर्शन

May 11th, 12:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमनाथ मंदिराला भेट दिली. या मंदिराच्या पुनर्बांधणीनंतर, भाविकांसाठी मंदिराचे दरवाजे खुले झाल्याच्या घटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, परमेश्वराचे आशीर्वाद मिळाल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे.

प्रभास पाटण, गुजरात येथील सोमनाथ अमृत महोत्सवात पंतप्रधानांनी केलेल्या संबोधनाचा मूळ मजकूर

May 11th, 10:20 am

आज प्रभास पाटणचे हे पवित्र क्षेत्र एका अद्भुत तेजाने उजळून निघाले आहे. महादेवाचा हे साक्षात दर्शन, हे सौंदर्य, धरती आणि आसमंतातून झालेली पुष्पवृष्टी, भगव्या ध्वजांची ही छटा, कला, संगीत आणि नृत्याची अप्रतिम सादरीकरणे, वेदमंत्रांचा उच्चार, गर्भगृहात होणारा शिव पंचाक्षरीचा अखंड पाठ आणि या सर्वांसोबत सागराच्या लाटांचा जयघोष; असे वाटत आहे जणू ही सृष्टी एका सुरात बोलत आहे- जय सोमनाथ! जय-जय सोमनाथ!

PM Modi participates in Somnath Amrut Mahotsav, marking 75 years since the inauguration of the restored Somnath Temple, Gujarat

May 11th, 10:15 am

Addressing the Somnath Amrut Mahotsav at Somnath Temple, PM Modi described the 75th anniversary of the temple’s reconstruction as a milestone in Bharat’s civilisational journey and a symbol of India’s enduring spiritual consciousness. He said Somnath reflects the nation’s resilience, cultural continuity and unwavering faith, while also highlighting the importance of preserving heritage alongside development and modern progress.

केंद्रीय मंत्रिमंडळाने मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील 19 जिल्ह्यांचा समावेश असलेल्या तीन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना दिली मंजुरी, यामुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्याचा होईल सुमारे 901 किलोमीटरने विस्तार

May 05th, 07:14 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे 23,437 कोटी रुपये एकूण खर्चाच्या 3 (तीन) प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये खालील प्रकल्पांचा समावेश आहे:

पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाचा मजकूर

April 18th, 08:45 pm

आज मी एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर विशेषतः देशातील माता-भगिनी आणि मुलींशी संवाद साधण्यासाठी आलो आहे! आज भारताचा प्रत्येक नागरिक पाहत आहे की, भारताच्या नारी शक्तीच्या भरारीला कशा प्रकारे रोखले गेले आहे. त्यांच्या स्वप्नांना निर्दयीपणे चिरडले गेले आहे. आमच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही आम्ही यशस्वी होऊ शकलो नाही, नारी शक्ती वंदन अधिनियमात दुरुस्ती होऊ शकली नाही! आणि मी यासाठी सर्व माता-भगिनींची, क्षमा मागतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्राला केले संबोधित

April 18th, 08:30 pm

भारतातील माता, भगिनी आणि कन्यांशी संबंधित एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर देशाला संबोधित करताना, पंतप्रधानांनी महिलांच्या प्रगतीला खीळ बसल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. सरकारच्या अथक आणि प्रामाणिक प्रयत्नांनंतरही, 'नारी शक्ती वंदन अधिनियम' दुरुस्ती पारित होऊ शकली नाही, ज्यामुळे महिला वर्गाची रास्त स्वप्ने चिरडली गेली, असे त्यांनी नमूद केले. या दुर्दैवी परिस्थितीसाठी मी देशातील सर्व माता आणि भगिनींची मनापासून माफी मागतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत भाषण

April 16th, 03:07 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लोकसभेत नारी शक्ती वंदन सुधारणा अधिनियम विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतला. या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकावर सकाळपासूनच चर्चा सुरु झाली यांची नोंद घेत, अनेक सहकाऱ्यांनी या चर्चेत तथ्य आणि तर्काच्या आधारे महत्त्वाच्या मुद्द्यांना परिणामकारकरीत्या स्पर्श केला असे पंतप्रधान मोदींनी नमूद केला. प्रत्येक देशाच्या इतिहासात महत्त्वाचे क्षण येत असतात असे निरीक्षण नोंदवत पंतप्रधान म्हणाले की, त्या त्या काळातील सामाजिक मानसिकता आणि नेतृत्वाकडील क्षमता असे क्षण नोंदवून ठेवत, एक भक्कम राष्ट्रीय वारसा निर्माण करतात. संसदेतील आजची स्थिती हा भारताच्या संसदीय लोकशाहीमधील असाच एक ऐतिहासिक क्षण आहे असे सांगत ते म्हणाले की, महिला आरक्षणाची ही कल्पना आज परिपक्व होण्यासाठी ती सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वीच अंमलात आणायला हवी होती. लोकशाहीची जननी म्हणून भारताची ख्याती असल्याचे अधोरेखित करत, पंतप्रधानांनी सदनातील सर्व सदस्यांना या हजारो वर्षांच्या परंपरेला एक नवा सुधारणावादी आयाम देण्याची पवित्र संधी मिळाली आहे, याकडे लक्ष वेधले. देशातील निम्म्या लोकसंख्येला धोरण निर्मिती प्रक्रियेतील सक्रीय सहभागधारक बनवणे हा एक अतुलनीय सन्मान आहे यावर पुन्हा एकदा भर देत, ही महत्त्वाची संधी हातातून निसटू न देण्याचे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी संसदेच्या सर्व सन्माननीय सदस्यांना केले. सध्या होऊ घातलेल्या या परिवर्तनकारी प्रयत्नावर संपूर्ण लक्ष केंद्रित करत, देशाची भविष्यकालीन स्थिती निश्चित करण्यासाठी सर्व भारतीय, एकत्रितपणे शासन प्रणालीमध्ये संवेदनशीलता रुजवण्याची तयारी करत आहेत असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. “आपण अशा एका महत्त्वाच्या वळणावर उभे आहोत जिथे या मंथनातून हाती येणारे अमृत देशाची पुढील दिशा ठरवेल,” मोदींनी सांगितले.

पंतप्रधानांचे एनएक्सटी शिखर परिषदेतील भाषण

March 12th, 10:47 pm

आजचा हा 12 मार्चचा दिवस ऐतिहासिक आहे. 12 मार्च 1930 रोजी महात्मा गांधींनी साबरमती इथून दांडी यात्रा सुरू केली होती. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातला हा एक निर्णायक टप्पा होता. या यात्रेमुळे देशभरातील लोक एका ध्येयाने एकत्र आले, भारताला स्वतंत्र करण्याचे ध्येय! आज या ऐतिहासिक यात्रेला जवळपास 100 वर्ष होत आली असताना आपण पुन्हा एक नवी यात्रा सुरू केली आहे; ती म्हणजे विकसित भारत यात्रा! विकसित भारत हे आपल्या सर्वांचेच ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यामध्ये अशा परिषदांमधून झालेल्या विचारमंथनातील निष्कर्ष खूप उपयोगी ठरतात. मला एनएक्सटी शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. इथे देशभरातले तसेच जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेले बरेच मित्र उपस्थित आहेत. त्यातल्या काही जणांशी माझी जुनी ओळख आहे. मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन एक्स‌ टी शिखर परिषदेला केले संबोधित

March 12th, 08:30 pm

पंतप्रधानांनी आज आयटीव्ही नेटवर्कच्या एनएक्सटी शिखर परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी दांडी यात्रेच्या ऐतिहासिक वर्धापनदिनाचे स्मरण केले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची तुलना आजच्या विकसित भारत घडवण्याच्या प्रयत्नांशी केली. 1930 च्या दांडी यात्रेने देशाला स्वातंत्र्याकडे एकजूट केले त्याचप्रमाणे सध्याचे विकसित भारत अभियान हे 140 कोटी भारतीयांचा सामूहिक संकल्प आहे, यावर मोदी यांनी भर दिला. आज, त्या ऐतिहासिक यात्रेनंतर जवळजवळ 100 वर्षांनी आपण भारतीय पुन्हा एकदा 'विकसित भारत' साठी एका नवीन प्रवासाला निघालो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांकडून आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त शुभेच्छा, भारताच्या प्रगतीमध्ये नारी शक्तीच्या भूमिकेचे केले कौतुक

March 08th, 10:17 am

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त देशाला शुभेच्छा दिल्या आणि भारताच्या नारी शक्तीची शक्ती, जिद्द आणि यशाचा गौरव केला.

गुजरातमध्ये मायक्रॉन सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या सुविधेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले भाषण

February 28th, 02:45 pm

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रातील माझे सहकारी अश्विनी वैष्णव, मायक्रॉन टेक्नॉलॉजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मेहरोत्रा,अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जियो गोर, उपमुख्यमंत्री हर्ष सांघवी, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो,जगातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेनंतर आजआपण येथे आणखी एका ऐतिहासिक टप्प्याचे साक्षीदार बनत आहोत. एआय परिषदेने जगाला भारताच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेची ओळख करून दिली, आजचादिवस हा भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील नेतृत्वाच्या वचनबद्धतेचा आणखीएक वस्तुपाठ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधील साणंद येथे मायक्रोन टेक्नॉलॉजीच्या सेमीकंडक्टर असेंब्ली, टेस्ट अँड पॅकेजिंग (एटीएमपी) सुविधेचे उद्घाटन

February 28th, 02:37 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील साणंद येथे मायक्रोन एटीएमपी (असेंब्ली, टेस्ट, मार्किंग आणि पॅकेजिंग) सुविधेचे उद्घाटन केले. व्यावसायिक उत्पादनाची सुरुवात हा जागतिक तंत्रज्ञानातील नेतृत्वाच्या दिशेने भारताच्या प्रवासातला एक ऐतिहासिक टप्पा आहे.

न्यूज 18 रायझिंग भारत समिटमधील पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर

February 27th, 08:30 pm

आपण सर्वजण रायझिंग भारताची चर्चा करत आहोत. आणि यामध्ये स्ट्रेंथ विदिन यावर तुम्हा सर्वांचा भर आहे, म्हणजेच सोप्या शब्दात सांगायचं तर, आपलं स्वतःचं सामर्थ्य हा तुमचा प्रमुख मुद्दा आहे. आणि आपल्याकडे शास्त्रांमध्ये तर म्हटलंच आहे - तत् त्वम असि! म्हणजे ज्या ब्रह्माच्या शोधात आपण निघालो आहोत, ते आपणच आहोच, ते आपल्यामध्येच आहे. जे सामर्थ्य आपल्या आतमध्येच आहे, तेच आपल्याला ओळखायचं आहे. गेल्या 11 वर्षांमध्ये भारताने आपलं तेच सामर्थ्य ओळखलं आहे, आणि हे सामर्थ्य आणखी सशक्त करण्यासाठी आज देश अविरत प्रयत्न करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेटवर्क18 रायझिंग भारत शिखर परिषदेत भाषण

February 27th, 08:00 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज स्ट्रेंथ विदीन या विषयावर आधारित रायझिंग भारत शिखर परिषदेला संबोधित केले. पंतप्रधानांनी गेल्या 11 वर्षांतील भारताच्या प्रवासावर प्रकाश टाकत देशाचे गमावलेले सामर्थ्य पुन्हा प्राप्त करणे, आर्थिक स्वावलंबन आणि 2047 पर्यंत विकसित भारत बनविण्यासाठीचा आराखडा या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.

सेवा संकल्प प्रस्ताव

February 24th, 04:53 pm

ही बैठक आणि ही इमारत नवभारताच्या नवनिर्माणाची एक प्रत्यक्ष अभिव्यक्ती आहे. या प्रारंभासह, आपण त्या भविष्याचे स्वागत करत आहोत, ज्याच्या उभारणीत अनेक शतकांचे कठोर परिश्रम आहेत. स्वातंत्र्यानंतर, पंतप्रधान कार्यालय, साउथ ब्लॉक येथे इतकी दशके सरकारांनी वारसा जपला आणि भविष्याची स्वप्ने पाहिली. आपण अशा भारताचे स्वप्न पाहिले ज्याचे विचार स्वदेशी असतील, ज्याचे स्वरूप आधुनिक असेल आणि सामर्थ्य अनंत असेल. आज हे सेवातीर्थ त्याच संकल्पनेचे मूर्तिमंत रूप आहे जे लोकशाहीची जननी म्हणून भारताचा गौरव आणखी वाढवेल.