पंतप्रधान मोदी यांचे 79 व्या स्वातंत्र्यदिनाचे भाषण: विकसित भारत 2047 साठी एक दृष्टीकोन

August 15th, 11:58 am

79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून तब्बल 103 मिनिटांचे त्यांचे सर्वात मोठे आणि सर्वात निर्णायक भाषण दिले, ज्यामध्ये त्यांनी 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीसाठी एक धाडसी आराखडा मांडला. स्वयंपूर्णता , नवोन्मेष आणि नागरिक सक्षमीकरणावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करून, पंतप्रधानांनी इतर देशांवर अवलंबून असलेला देश ते जागतिक स्तरावरचा प्रचंड आत्मविश्वास असलेला , तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत आणि आर्थिकदृष्ट्या लवचिक देश हा आतापर्यंतचा भारताचा प्रवास अधोरेखित केला.

आत्मनिर्भर भारत: सशक्त आणि विकसित भारताचा पाया

August 15th, 10:20 am

79th स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हा विकसित भारताचा एक महत्त्वाचा पाया असल्याचे अधोरेखित केले. संरक्षण, तंत्रज्ञान, ऊर्जा, अवकाश आणि उत्पादन या क्षेत्रांतील भारताच्या प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचे उदाहरण दिले. आत्मनिर्भरता ही राष्ट्रीय सामर्थ्य, सन्मान आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या प्रवासाचा कणा आहे, असे त्यांनी नमूद केले.