तामिळनाडूतील कृष्णगिरी येथील फटाके बनवण्याच्या कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

July 29th, 04:32 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूतील कृष्णगिरी येथील फटाका कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतल्या जीवितहानी बद्दल शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी, प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधी मधून प्रत्येक मृताच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे.