कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा'ला पंतप्रधानांनी केलेले भाषणv

November 25th, 04:40 pm

आजचा दिवस भारताच्या परंपरेचा एक अद्भुत संगम ठरला आहे. आज सकाळी मी रामायणाची नगरी अयोध्येत होतो आणि आता मी इथे गीतेची नगरी कुरुक्षेत्रात आलो आहे. आपण सर्व श्री गुरु तेग बहादुरजींच्या 350 व्या बलिदानदिनानिमित्त त्यांना वंदन करत आहोत. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व संतमहंतांना आणि उपस्थित मान्यवरांना आदरपूर्वक नमस्कार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा'ला संबोधित केले

November 25th, 04:38 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील कुरुक्षेत्र येथे श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या 'शहीदी दिवसा' निमित्त आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी नमूद केले की, आजचा दिवस भारताच्या वारशाचा एक उल्लेखनीय संगम आहे. सकाळी ते रामायणाची नगरी असलेल्या अयोध्येत होते आणि आता ते गीतेची नगरी असलेल्या कुरुक्षेत्रात आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या 350 व्या हौतात्म्य दिनानिमित्त सर्वजण त्यांना आदरांजली वाहत असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी कार्यक्रमात संत आणि आदरणीय समुदायाच्या उपस्थितीची दखल घेतली आणि सर्वांना आदराने वंदन केले.

पंतप्रधानांनी जनतेला गुरु चरण यात्रेमध्ये सहभागी होण्याचे आणि पवित्र ‘जोरे साहिब’चे दर्शन घेण्याचे केले आवाहन

October 22nd, 06:41 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरु चरण यात्रेनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या, श्री गुरु गोबिंद सिंहजी आणि माता साहिब कौरजी यांच्या कालातीत शिकवणी आणि आध्यात्मिक वारशाचे स्मरण केले.

गुरु गोविंद सिंह जी आणि माता साहिब कौर जी यांच्या अत्यंत पवित्र आणि अनमोल पावन ‘जोरे साहिब’चे सुरक्षितपणे जतन आणि योग्य प्रदर्शनाच्या संदर्भात सूचना देण्यासाठी आलेल्या शीख प्रतिनिधी मंडळाच्या प्रतिष्ठित आणि सन्माननीय सदस्यांची पंतप्रधानांनी भेट घेतली

September 19th, 04:28 pm

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शीख प्रतिनिधी मंडळाच्या प्रतिष्ठित आणि सन्माननीय सदस्यांची भेट घेऊन गुरु गोविंद सिंह जी आणि माता साहिब कौर जी यांच्या अत्यंत पवित्र आणि अनमोल पावन ‘जोरे साहिब’चे सुरक्षितपणे जतन आणि योग्य प्रदर्शनाच्या संदर्भात त्यांनी दिलेले निवेदन स्वीकारले. पंतप्रधान मोदी म्हणाले की पवित्र अवशेष जितके महत्त्वाचे आणि अध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहेत तसेच ‘जोरे साहिब’ देखील वैभवशाली शीख इतिहासाचा भाग आहेत आणि तितकेच ते आपल्या देशाच्या सांस्कृतिक मूल्यांचे देखील प्रतीक आहेत. “हे पवित्र अवशेष येणाऱ्या पिढ्यांना गुरु गोविंद सिंहजींनी दाखवलेल्या धैर्य, प्रामाणिकपणा, न्याय आणि सामाजिक एकोप्याच्या मार्गावरून चालण्यासाठी प्रेरित करतील,”पंतप्रधान पुढे म्हणाले.