मुंबईत मेरीटाईम लीडर्स परिषदेत पंतप्रधानांनी केलेले भाषण
October 29th, 04:09 pm
महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, केंद्रीय मंत्रिमंडळातील माझे सहकारी सर्बानंद सोनोवाल जी, शांतनु ठाकूर जी, कीर्तिवर्धन सिंह जी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, अजित पवार जी, नौवहन आणि इतर उद्योगांशी संबंधित नेते, इतर मान्यवर, स्त्री-पुरुष हो!पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथे ‘इंडिया मेरीटाईम वीक’ 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला केले संबोधित
October 29th, 04:08 pm
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईत इंडिया मेरीटाईम वीक 2025 मध्ये मेरीटाईम लीडर्स परिषदेला संबोधित केले तसेच सागरी क्षेत्रातील मुख्य कार्यकारी अधिकारी मंचाचे (ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरम) अध्यक्षपद भूषवले. या प्रसंगी बोलताना पंतप्रधानांनी ग्लोबल मेरीटाईम लीडर्स परिषदेला उपस्थित सर्व सहभागींचे स्वागत केले. हा कार्यक्रम 2016 मध्ये मुंबईत सुरू झाला आणि आता तो जागतिक शिखर परिषद म्हणून विकसित झाला आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. 85 हून अधिक देशांचा सहभाग असणे, ही गोष्ट एक मजबूत संदेश देत आहे , यावर मोदी यांनी भर दिला. या कार्यक्रमात आघाडीच्या प्रमुख नौवहन कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी , स्टार्टअप्स, धोरणकर्ते आणि नवोन्मेषकांच्या उपस्थितीची त्यांनी दखल घेतली. छोटी बेटे असलेल्या राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित असल्याचे नमूद करत ते म्हणाले की, अशा सर्वांच्या सामूहिक दृष्टिकोनामुळे शिखर परिषदेची ऊर्जा आणि समन्वय लक्षणीयरीत्या वाढला आहे.मुंबईतील आयएमसी महिला विभागाच्या सुवर्ण जयंती महोत्सव कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून केलेले भाषण
April 13th, 05:56 pm
इंडियन मर्चंट चेंबरच्या महिला विभागाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मी खूप खूप शुभेच्छा देत आहे. कोणत्याही संस्थेसाठी 50 वर्षांच्या पूर्ततेचा टप्पा अतिशय महत्त्वाचा असतो आणि हा असा कालखंड असतो मग ती व्यक्ती असो वा संस्था असो ती सोन्यासारखी तावून सुलाखून निघते आणि चकाकू लागते आणि म्हणूनच बहुधा 50 वर्षे पूर्ण होण्याला सुवर्ण महोत्सव म्हटले जाते. तुम्ही ज्या संस्थेचा भाग आहात त्या संस्थेला अतिशय गौरवशाली इतिहास आहे. स्वदेशी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या संस्थेची स्थापना झाली आहे. तुम्ही देखील गेली 50 वर्षे महिलांसाठी काम करत काही ना काही योगदान दिले आहे आणि त्यामुळे तुमची संस्था प्रशंसेसाठी पात्र आहे आणि गेल्या 50 वर्षांत ज्या ज्या लोकांनी या संस्थेचे नेतृत्व केले आहे, तिचा विकास केला आहे, ते सर्व देखील अभिनंदनासाठी पात्र आहेत.